🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_वैराने वैर शांत होत नाही_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_14.html
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_न हि वेरेन वेरानि समन्तीध कुदाचनं ।_*
*_अवेरेन च सम्मन्ति एस धम्मो सनन्तनो ॥_*
*_अर्थ - वैराने वैर कधीच शांत होत नाही. अवैरानेच ते शांत होते हाच सनातन धर्म आहे._*
_दोन महिला सवति मत्सरापोटी अनेक जन्मापासून एकमेकिंचा बदला घेत घेत बुद्धकाळात यक्षिणी आणि कुलकन्याच्या रूपात श्रावस्त्रीमध्ये जन्माला आल्या. कन्या लग्न होऊन पतिगृही गेली. जेव्हा जेव्हा तिला मुल होत होते तेव्हा तेव्हा यक्षिणी येऊन त्यांना खाऊन टाकत होती. तिसऱ्यांदा ती आपल्या आईच्या घरी प्रसुत झाली. मलगा मोठा व शहाणा झाला तेव्हा ती आपल्या पति सोबत पुन्हा पतिगृही जाण्यास निघाली. मार्गात जेतवन महाविहारा जवळ बाळाला दूध पाजत असतांना तीने यक्षिणीला येतांना पाहिले. घाबरून धावत धावत तथागतांपाशी गेली. आपल्या तान्ह्या बाळास तथागतांच्या चरणांवर ठेऊन म्हणाली - " भन्ते ! याला जीवदान द्या."_
_यक्षिणीला सुमन नामक देवतेने जेतवनाच्या दारापाशीच ठेवले होते. तथागतांनी आनन्दाला पाठवुन तिला बोलविले. येवून ती उभी असतांना तू असे का करित आहेस? जर तुम्ही दोघीही माझ्या समोर आल्या नसत्या तर तुमचे शत्रुत्व अनेक कल्पापर्यन्त चालत राहिले असते. *वैराने वैर कशाला वाढविता ? वैर तर अवैरानेच शांत होत असते वैराने नाही.* असे भगवंत म्हणाले आणि त्यांनी ही गाथा सांगितली. गाथा समाप्त होताच यक्षिणी स्त्रोतापन्न झाली. तथागताच्या सांगण्यावरून त्या कुलकन्येने तीला आपल्या घरी नेले. तिची अग्र खाद्य भोज्य पदार्थानी पूजा केली._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :-१५/०३/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) धम्मपद - यमकवग्ग, अट्ठकथा*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment