🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_!! सब्बदान धम्मदानं जिनाति !!_*
_*- प्रा निरज बोधी*_
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_सब्बदानं धम्मदानं जिनाती,_*
*_सब्बरसं धम्मरसो जिनाति।_*
*_सब रतिं धम्मरति जिनाति,_*
*_तण्हक्खयो सब्बदुक्खं जिनाति।।_*
_*अर्थात :- धम्माचे दान सर्व दानात श्रेष्ठ आहे. धम्माचा रस सर्व रसापेक्षा श्रेष्ठ आहे. धम्माची रती सर्व रती पेक्षा श्रेष्ठ आहे. आणि तृष्णेचा क्षय सर्व दु:क्ख क्षयापेक्षा श्रेष्ठ आहे.*_
_याप्रमाणे *तथागत बुद्धांनी दानाचे श्रेष्ठत्व वर्णिले आहे. दान देणे हे श्रेष्ठ, महान असे कुशलकर्म आहे. भौतिक वस्तुंचे दान देणे, आपल्याजवळील संचिताचे दान देणे हे जरी श्रेष्ठ उत्तम असले तरी धम्माचे दान दान करणे है अतिउत्तम दान आहे, परमश्रेष्ठ दान आहे असे तथागत बुद्ध सांगतात.* म्हणून समाजात विहार करताना प्रत्येकाने धम्माचे यथायोग्य ज्ञान ग्रहण करावे, त्याचे स्वतः आचरण करावे आणि तद्नंतर त्या धम्माचे मार्गदर्शन इतरांना करावे, यालाच आधुनिक संकल्पने *Missionary work* असे म्हणतात. समाजात धम्माचा प्रचार-प्रसार होण्यासाठी आणि धम्मजीवनपद्धती समाजात रूजविण्यासाठी याप्रकारच्या धम्मदानाची समाजात नित्तांत गरज आहे._
_*सम्राट अशोकांद्वारा राबविल्या गेलेल्या या दानसंकल्पनेच्या प्रभावी उपाययोजनेमुळेच भारतभर बौद्ध संस्कृतीचा प्रसार झपाट्याने घडून आलेला दिसून येतो. त्यांनी जनतेला उपदेश करताना शिलालेखात नमुद केले की, त्यांनी शिलालेखात ठिकठिकाणी प्रतिपादित केलेला धम्माचार हा प्रत्येकाने आपल्या पिता, पूत्र, बंधु, मित्र, परिचित, नातेवाईक यांना सांगावे की, यानुसार 'धम्माचरण करणे उत्तम आहे. यामुळे मनुष्य विपुल सुखाला प्राप्त करतो. अर्थात त्यांनी प्रत्येक मनुष्याला धम्मदान करण्यास प्रेरित केले. त्यामुळे समाजात बौद्ध संस्कृती कायमस्वरूपी रूजली.* याचप्रकारचे धम्मदान आधुनिक समाजात प्रत्येकाने करण्याची गरज आहे. तेंव्हाच बुद्धवाणी घराघरात पोचली जाईल आणि सदाचरण रूपी आचारपद्धती धम्मामार्गाच्या रूपाने स्वीकारली जाईल. *पंचशील हा उपासकासाठी सांगितल्या गेलेला सदाचाराचा आचरण मार्ग आहे. आर्य अष्टांगिक मार्ग हा त्याच्या दुक्खमुक्तीचा मार्ग आहे. जसे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मान्त, सम्यक आजिवीका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृति आणि सम्यक समाधी. या मार्गाच्या परिपुर्ण आचारणामुळे मनुष्य सहजपणे सुखी जीवनाची अनुभुती प्राप्त करू शकतो. हाच जीवनमार्ग आहे. याचे प्रतिपादन धम्मदान करतेवेळी केल्यास धम्मदान ग्रहण करणाऱ्यास धम्मारसाची प्राप्ती होईल. या धम्मरसाची प्राप्ती झाल्यामुळे अर्थात धम्मश्रवण करण्यात गोडी, आवड, रूची निर्माण झाल्यामुळे त्याला निर्मल आनंदाची प्राप्ती होईल. आणि पुन्हा पुन्हा धम्मश्रवण करण्याची, धम्म धारण करण्याची प्रबल मानसिक इच्छा जागृत होईल. यामुळे मनुष्य धम्मरती मध्ये रममान होईल. धम्मरती ही केवळ सर्व सुखाच्या अनुभुती कडे घेऊन जाणारी असल्यामुळे मनुष्य समर्थपणे सन्मार्गावर आरूढ राहिल, याप्रकारे सुखी जीवन जगताना तृष्णाक्षण होईल. जे सर्वदुक्खाच्या क्षयापेक्षा श्रेष्ठ आहे.* कारण तृष्णा नष्ट झाल्यास सांसारिक जीवनातील आसक्ती नष्ट होईल. आणि मनुष्य अधिकाअधिक परम सुखाला प्राप्त करेल. अशाप्रकारे सदोदीत सुखी राहण्यासाठी धम्मदान अतिशय श्रेष्ठ दान ठरते._
_*'सर्वदानात धम्मदान श्रेष्ठ आहे या तत्ववचनाची दुसरी बाजू याप्रमाणे प्रतिपादत करता येईल की, सर्वप्रकारच्या दानकायपिक्षा धम्मकार्यासाठी दिलेले दान श्रेष्ठ फलदायी आहे.* ज्या दिलेल्या दानातून धम्माचे कार्य, केल्या जाते. अर्थात धम्मशिकवणुकीचे कार्य केल्या जाते. धम्म लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले जाते. त्यासाठी शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. सामान्य लोकांना धम्मदान करण्याचे कार्य केले जाते. अशाप्रकारच्या धम्मकार्यासाठी दिल्या गेलेले दान महान फलदायी होते. ज्या दानाचा उपयोग सन्मामार्गावर आरूढ घेण्यासाठी उपयुक्त धम्मकार्यासाठी होतो. त्यासाठी दिलेले दान अर्थातच श्रेष्ठ दान, ठरते, महान फलदायी ठरते. म्हणून सतत अशा धम्मकार्यासाठी दान करणे उत्तम आहे. ते श्रेष्ठ असे मंगलाचार आहे. धम्मकार्यासाठी दिलेल्या दानाचे फळ परिमापात मोजता येत नाही. म्हणून श्रद्धेने दिलेले दान हे अधिक फळ देणारे ठरते. *तथागत बुद्ध म्हणतात, 'ज्याप्रमाणे जळत असलेल्या घरातून बाहेर काढलेली भांडीकुंडीच आपली असतात, न की ते जे घरात जळून खाक झालेले असतात. त्याचप्रमाणे हे संसाररूपी घर, जळते घर आहे यामध्ये दान देऊन जे पुण्य संचित काढले तेच आपले असते. अन्यथा काहीही उरत नाही.'* अर्थात- हे मनुष्यजीवन राग, लोभ, द्वेष, मोह, मत्सर, इत्यादी विकारांवर आश्रीत जळते घर आहे. दुक्खउत्पत्तीकारक आहे. यामध्ये दान देवून जे कुशलकर्म केल्या जाते त्याचेच फळ आपल्यासोबत असते. बाकी सर्व इथेच नष्ट होऊन जाते. म्हणून सुखी जीवनाची आकांक्षा ठेवणाऱ्यांनी जीवनभर येथेच्छ दानकार्य केले पाहिजे. म्हणून *सम्राट अशोकाने धम्माचार प्रसारीत करताना, दानावर अत्याधिक भर दिले. त्यांनी लोकांना मोठ्याप्रमाणात दानदी कर्म करण्यास प्रेरित केले. ते स्वतः वेगळेगळ्या प्रसंगी, धम्मयात्रेच्या वेळी मोठ्याप्रमाणात दान कर्म करीत असत. त्याचेच अनुकरण सामान्य लोकांनी केले. जे आजही भारतीय संस्कृतीचे उदात्त स्वरूप प्रदर्शित करते.*_
_*बुद्धकाळात दिसून येते की विशाखा मिगार माताने आठ प्रकारे केलेल्या विपूल दानाच्या प्रभावाने परम सुखाकडे घेऊन जाणऱ्या आठ समाधी अंगांना प्राप्त केले होते.* तसेच *प्रत्यक्ष तथागत बुद्धांच्या बोधिसत्व चर्येमध्ये दानाला अत्याधिक महत्व दिलेले आढळते. त्यांनी दान पारमितेला आपल्या चर्येमध्ये अत्याधिक महत्व दिलेले होते. यावरूनच दान कर्माचे महत्व प्रतिपादीत होते. म्हणून प्रत्येक बौद्ध मनुष्याचे कर्तव्य आहे की त्यांनी विपूल प्रमाणात दानादी कूशल कर्म करून स्वतः धम्माचे दायाद बनावे आणि अधिकाधिक सुखाला प्राप्त करावे तसेच बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीच्या कार्याला अधिक गतीमान करावे.*
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- २१/०१/२०२४_*
*_संदर्भ :-_*
*_१) विजित संग्राम, मासिक जानेवारी २०१० अंक १८ वर्ष दुसरे_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_64.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment