🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_बुद्धपिताब्राह्मणवत्थु_*
_*- प्रा. भदंत सीलवंस*_
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_"अहिंसका ये मुनयो, निच्चं कायेन संवुता।_
_ते यन्ति अच्युतं ठानं, यत्थ गन्तवान सोचरे।।_
_*अर्थ -* जे साधक अहिंसा धर्माचे आचरण करणारे आहेत, आणि शरीराने सदैव संयमित जीवन जगणारे आहेत ते अच्युत (कधीही पतन न होणारे) स्थितीलाच प्राप्त करतात, जेथे पोहचून ते शोकरहित होतात."_
_*भगवान बुद्धांनी ही धम्मदेशना साकेत मधील अंजन वनात भिक्खूंना दिली होती.*_
_भगवान जेंव्हा साकेत नगरात पिण्डपाता करीता गेले असता त्या नगरातील एक वृद्ध ब्राह्मण भगवंताला बघून त्यांच्या चरणावरती पडून म्हणाला- "पुत्र ! वृद्धावस्थेत असलेल्या माता-पित्याची मुलांनी सेवा करायला पाहिजे ऐवढे दिवस झाले, आमची काळजी घेतली नाही, आज मी तुला इथे बघितले. तिकडे आई सुद्धा तुला बघण्यासाठी ललायित आहे. चल घरी जावू" असे म्हणून तथागतांना सोबत आपल्या घरी घेवून गेला. तथागत तिथे जावून भिक्खु संघासोबत टाकलेल्या आसनावरती बसले. त्याक्षणी, ब्राह्मणी तिथे आली व तथागतांच्या चरणावरती पडून म्हणाली- "मुला! ऐवढे दिवस कुठे होतास? अरे! वृद्धापकाळी आई-वडिलांची सेवा करायला पाहिजे कि नाही!" सोबतच त्या ब्राह्मणाने आपल्या मुला-मुलांना सुद्धा तिथे बोलावून म्हटले- "या, यांना वंदन करा, हा तुमचा भाऊ आहे।" त्यांनी सुद्धा वंदन केले._
_त्यांनी आनंदित होवून, बुद्धप्रमुख भिक्खुसंघाला श्रद्धापूर्वक भोजन दान देवून विनंती केली- "भन्ते! आपण दररोज इथेच भोजन करावे" तथागत म्हणाले- "बुद्ध एकाच ठिकाणी नेहमी भोजन करीत नाही." "तर जे आपल्याला निमंत्रित करतील त्यांना आमच्याकडे पाठवावे." तथागतांनी तेंव्हापासून जे कोणी त्यांना निमंत्रित करण्याकरिता येत असत, त्यांना म्हणत-" जा, त्या ब्राह्मणाला सुद्धा सांगून जावे." ते जेव्हा ब्राह्मणाजवळ जावून सांगत- उद्याला आम्ही तथागतांना भोजनाकरिता आपल्या इथे निमंत्रित केले आहे" तेव्हा तो ब्राह्मण दूसऱ्या दिवशी आपल्या घरून भात-डाळ बनवून तथागतांच्या निमंत्रित स्थळी घेवून जात असे. ज्या दिवसी कोणाचेही निमंत्रण राहत नव्हते, त्या दिवशी तथागत ब्राह्मणाच्या घरी भोजन करीत. *अशाप्रकारे ते दोघेही (ब्राह्मण-ब्राह्मणी) तथागतांना दररोज आपल्या इथून काही ना काही दान देवून धम्मोपदेश ऐकून अनागामि फळाला प्राप्त झाले.*_
_ऐके दिवशी भिक्खूंच्या धम्मसभेत गोष्ट सुरू होती- "आयुष्यमानांनो ! सर्वांना माहित आहे की आपल्या तथागतांचे आई-वडिल शुद्धोदन आणि माया देवी आहे. हा ब्राह्मण हे जाणून सुद्धा तथागतांना आपले पुत्र मानतो, आणि तथागत सुद्धा त्यांच्या त्या म्हणण्याला स्वीकार करतात. त्याचे कारण काय आहे? तथागतांनी त्या भिक्खूंची गोष्ट ऐकून म्हणाले - "होय, भिक्खूंनो! दोघेही आपल्या मूलालाच 'मुलगा' म्हणत आहेत." असे म्हणून तथागतांनी भूतकाळातील गोष्ट (कथा) सांगितली._
_भूतकाळात, भिक्खूंनो! हा ब्राह्मण पाचशे जन्मापर्यंत माझे वडिल होते. आणि पाचशे जन्मापर्यंत काका (वडिलांचा लहान भाऊ) होते व पाचशे जन्मापर्यंत माझा मोठे वडिल होते. अशाच प्रकारे पाचशे जन्मापर्यंत ही ब्रह्मणी माझी आई होती, आणि पाचशे जन्मापर्यंत माझी काकू व पाचशे जन्मापर्यंत मोठी आई होती. माझे पंधराशे वर्षापर्यंत ह्या ब्राह्मणाच्या व ब्राह्मणीच्या द्वारे पालन-पोषण झालेले आहे. अशाप्रकारे तीन हजार जन्मापर्यंत यांनी पुत्रभावाने माझ पालन पोषण केलेले आहे त्या सोबतच तथागताने गाथा म्हटली-_
_"यस्मिं भन्ते निविसति, चित्तं पि पसीपति।_
_अदिट्ठपुब्बके पोसे, कामं तस्मिं ति विरससे।।"_
_पुब्बे व सन्निवासेन, पच्चुप्पन्नहितेन वा।_
_एवं तं जायते पेमं, उप्पलं व यसोदके ।। ति ।।_
_*"ज्या व्यक्तिला बघून त्याच्यावरती मन मोहित होते, ज्याला बघून चित्त प्रसन्न होतो, मृदु होते. साधारण पणे ज्याला ह्या जन्मात कधीच बघितले नाही, अशा व्यक्ती मध्ये सुद्धा, अभूतपूर्व स्नेह झाल्यामुळे पूर्णपणे विश्वास होतो."*_
_*"अगोदर कधी सोबत राहिल्यामुळे, आणि ह्या जन्मात हितकारी असल्यामुळे सुद्धा परस्पर प्रेम होवून जातो; जसा कमळाला जला बद्दल प्रेम होतो."*_
_*अशा प्रकारे तथागत तीन महिन्यापर्यंत दररोज त्या कुळाच्या सहाय्याने साधनारत राहिले. ते दोघेही शेवटी अर्हत्व प्राप्त करून परिनिर्वाणास प्राप्त झाले.* शरीर त्यागानंतरही त्या दोघांचा नागरिकांनी खूप आदर-सत्कार केला. एकाच ठिकाणी कूटागारात दोघांचे ही प्रेत ठेवून स्मशान भूमित आणल्या गेले. तथागत सुद्धा पाचशे भिक्खुंसोबत त्या प्रेतयात्रेत सहभागी झाले. आणि स्मशानात एका चबुतऱ्यावरती बसले. प्रेत यात्रेतील सहभागी पुरूष तथागतांना प्रणाम करून त्यांना लौकिक पुरुषाप्रमाणे समजून- "भन्ते! आपले आई- वडील कालातित झाले आहेत' - या गोष्टीचा विचार करू नका." तथागताने त्यांना 'असे म्हणू नका'- अशा प्रकारे त्यांचा निषेध न करता, त्या लोकांचे विचार जाणून त्याप्रसंगी धम्मोपदेश करतांना म्हणाले_
_अप्पं वत जीवितं इदं, ओरं वस्ससता पि मिय्यति।_
_यो चे पि अतिच्च जीवति, अथ सो जरसा पि मिय्याति।। "ति।।_
_*"मनुष्याचे हे जीवन अत्यंत अल्प आहे. कोणी खूपच जगला तर तो शंभर वर्षे जगेल, नंतर त्याला मरणेच आहे. जो याही पेक्षा अधिक जगला तर त्याला त्याचे वृद्धत्व निरर्थक करून टाकते."*_
_काही भिक्खु त्या ब्राह्मण-ब्राह्मणी चा परिनिर्वाण न जाणता तथागतांना प्रश्न विचारतात- *"भन्ते! ह्या दोघांचा पूढचा जन्म कुठे होणार?" त्यावर तथागत म्हणाले "भिक्खूंनो! अशा अशैक्ष्य मुनिंचा पुनर्जन्म (अभिसम्पराय) होत नसतो. ते अच्युत अमृतमय निर्वाणालाच प्राप्त होत असतात.*_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- २०/०१/२०२४_*
*_संदर्भ :-_*
*_१) विजित संग्राम, मासिक जानेवारी २०१० अंक १८ वर्ष दुसरे_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_40.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment