🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_बौद्ध देशातील श्रामणेर परंपरा_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_श्रामणेर बनणे हे फार पवित्र मानले जात असे. कोणीही माणूस आपली मानसिक तयारी नसेल तर एकाएकी श्रामणेर बनण्यास तयार होत नसे. आजही *बौद्ध राष्ट्रात अशीच श्रद्धेची भावना आहे. आपल्या मुलांनी आयुष्यात एकदा तरी श्रामणेर बनावे व आचार्यांच्या सहवासात काही दिवस राहून धम्माचे प्रशिक्षण घ्यावे, अशी पालक वर्गाची फार इच्छा असते. जर मुलाने तसे ठरविले तर त्यांना फार आनंद होतो व ते त्याचा श्रामणेरदीक्षा समारंभ खूप मोठा खर्च करून मोठ्या धुमधडाक्याने साजरा करतात. अनेकदा अशा मुलांची दीक्षेपूर्वी हत्तीवरून मिरवणूक काढली जाते. विहाराला भरपूर दान दिले जाते. कमीत कमी तीन महिने तरी मुलाने श्रामणेर म्हणून राहावे अशी तेथे प्रथा आहे.* गमतीसाठी, देखाव्यासाठी किंवा मिरविण्यासाठी म्हणून कोणीही थोड्या दिवसांसाठी श्रामणेर बनत नाहीत. धम्मरॅलीच्या नावाने मिरवत लोकांना धम्माच्या नावाखाली इतर काही उपदेश करीत बसत नाहीत. असे प्रकार करणे म्हणजे धम्मपरंपरेचे विडंबन होय._
_*बौद्ध देशातील लोक फार श्रद्धेने व धम्म- परंपरेचे पावित्र्याने पालन करण्याच्या भावनेने श्रामणेर बनतात. ब्रह्मदेशातही असेच आहे. तेथे श्रामणेराला 'शिम्ब्यू' असे म्हणतात. थाईलँडमध्ये तर कोणी मुलगा जर तरूणपणात श्रामणेर बनला नसेल, तर त्याला लग्नाचे वेळी कोणी मुलगी देत नाहीत. या श्रमण परंपरेचा भंग करणाऱ्या किंवा त्यामध्ये दोष निर्माण करणाऱ्या भिक्खूला थाईलँडमध्ये दोन-दोन वर्षाची कारावासाची सजा केली जाते व भिक्खू जीवनातून कायमचे हाकलून दिले जाते. वर्षावासाच्या काळात तीन महिने श्रामणेर बनून विहारात राहण्यासाठी तेथील सरकारी कर्मचाऱ्यांना भर पगारी सुट्टी मिळत असते. उपोसथाच्या व इतर सणावारांच्या दिवशी विहारात खास प्रशिक्षण देण्याचे व साधना सरावाच्या मार्गदर्शनाचे कार्य केले जाते. दर रोज सकाळी व संध्याकाळी भिक्खूवर्ग सुत्त पठण करून साधना करीत असतो. त्यात जिज्ञासू उपासक वर्गसुद्धा सहभागी होत असतो.*_
_*विहाराचे प्रांगणात मुख्य प्रशिक्षणाचे सभागृह असते. त्याला पाली भाषेत 'साला' (म्हणजे शाला) असे म्हणतात. त्यावरून मराठी भाषेत 'शाळा' हा शब्द आलेला आहे.* अशी काही शालागृहे असतात. त्यामध्ये अत्यंत सजावटीपूर्ण बुद्धमूर्ती बसविलेली असते. भिक्खूंना बसण्यासाठी त्यापुढे किंवा उजव्या बाजूच्या भिंतीलगत चांगला रुंद चौथरा बांधलेला असतो. *बुद्धमूर्तीपुढे मेणबत्ती व अगरबत्ती लावल्या जातात. त्रिवार पंचांग प्रणाम केला जातो. हे सर्व आदरसूचक असते. बुद्धाची प्रार्थना केली जात नाही, तर वन्दना केली जाते व त्यांच्या शिकवणीचे सुत्रपठण जाते. बुद्धाला नवस केला जात नाही किंवा त्यांच्याकडे काही मागितले जात नाही. केले जी काही प्राप्ती करून घ्यायची ती धम्माचे आचरणातून होते. म्हणून बुद्धविहारात धम्माचे जास्तीत जास्त आचरण करण्यावर भर दिला जातो. या शालागृहात ग्रंथालय व अभ्यासिकासुद्धा असतात. उपोसथाचे पालन करण्यासाठी खास 'उपोसथागार' म्हणून स्त्री-पुरूषांसाठी वेगवेगळी निवासस्थाने असतात. भिक्खू व श्रामणेर यांच्या निवासासाठी स्वतंत्र खोल्यांची इमारत असते, तिला 'भिक्खूनिवास' असे म्हणतात. तसेच भिक्खूंसाठी अनेक ठिकाणी लाकडी कुटी बांधलेल्या असतात. वेगवेगळ्या आचार्यांची मोठी निवासस्थाने असतात व तेथे आचार्य आपल्या श्रामणेरांसह राहतात. ते एक आचार्यांचे संकुल असते. विहाराच्या परिसरात अशी अनेक संकुले असतात. मुलांच्या धम्मपाठशालेसाठी कधी कधी स्वतंत्र इमारत बांधलेली असते. भिक्खुकुटीच्या जवळपास सुमारे वीस ते तीस फुटांचे मातीचे फूटपाथ असतात. ते 'चंक्रमण' करण्यासाठी म्हणजे चलत ध्यान-साधना (Walk- ing Meditation) करण्यासाठी वापरले जातात.*_
*_बाबासाहेबांना ही अशाच प्रकारच्या बौद्ध संस्कृतीचे पुनर्जीवन करायचे होते, ह्या बौद्ध राष्ट्रांकडून आपण काही आदर्श घेऊन आपल्या देशातही अशी संस्कृती राबविण्यासाठी प्रयत्न करायला हवे._*
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- विहार संस्कृती_*
*_लेखक :- पूज्य भदंत विमलकीत्ती गुणसिरी_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०७/०७/२०२३_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2023/07/blog-post_6.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment