Tuesday, 4 July 2023

धम्मदीक्षा

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_धम्मदीक्षा घेतल्याशिवाय बौद्ध म्हणून मानले जाणार नाही_* 

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

          _'सामान्य माणसाचे धर्मांतर नावापुरते असते. त्याला खरेखुरे धर्मांतर म्हणता येत नाही. बौद्ध धर्म नष्ट करण्यासाठी ब्राम्हणांनी ज्या देवदेवतांची स्थापना केली त्यांचीही तथाकथित सामान्य बौद्धजन भगवान बुद्धाबरोबरच आराधना करीत असतात. सर्वसामान्य बौद्धजनांच्या या दृष्टिकोणामुळेच मुख्यतः बौद्धधर्म भारतातून नाहीसा झाला. भविष्यकाळात बौद्ध धर्माची भक्कम पायावर स्थापना करावयाची असेल तर सामान्य लोकांना धर्माशी बांधून घ्यावे लागेल. असे पूर्वी घडले नाही. कारण *बौद्ध धर्मात तेव्हा फक्त संघात प्रवेश देण्याचा समारंभ होत असे. मात्र धम्मप्रवेशासाठी असा समारंभ आयोजित केला जात नसे.* ख्रिस्ती धर्मामध्ये मात्र दोन समारंभ असतात. १) बाप्तीस्मा म्हणजे ख्रिस्त धर्मी नामकरणाचा समारंभ २) धर्मगुरू म्हणून नियुक्ती करण्याचा समारंभ. *भारतात बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी आंदोलन करायचे असेल तर या बाबतीत ख्रिस्तीधर्माचा कित्ता गिरवला पाहिजे. 'बौद्ध धर्मामध्ये संघदीक्षा होती व आजही आहे. परंतु धम्मदीक्षा नव्हती. धम्मदीक्षा नसल्याकारणाने मनुष्य बौद्ध धर्मातून जैन धर्मात व जैन धर्मातून अन्य धर्मात वावरत असे. सर्व धर्म सारखे अशी त्याची भावना असे. त्यामुळे तो कोणत्याच धर्माला चिकटून रहात नसे. बौद्ध धर्माच्या -हासाला हे एक मोठे कारण झाले.* 'असे पुनश्च घडू नये म्हणून धर्म दीक्षा प्रचारात आणणे अत्यंत आवश्यक झाले आहे *ख्रिस्ती धर्मातील बॅप्टिझम म्हणजे धर्मदीक्षा आणि ऑर्डिनेशन म्हणजे संघदीक्षा. बौद्ध धर्माच्या पुनरूज्जीवनात दोन्ही दीक्षांना स्थान दिले पाहिजे. सर्वांनाच संघ दीक्षा घेण्याची आवश्यकता नाही. पण त्याला बौद्ध धर्म स्वीकारायचा असेल त्याने धम्मदीक्षा घेतलीच पाहिजे. त्याशिवाय कोणालाही बौद्ध म्हणून मानले जाणार नाही.* धम्मदीक्षा, कोणाही धम्मदीक्षा घेतलेल्या माणसाला देता येते. त्याला भिक्षूच पाहिजे असे नाही. *हा विधी करतांना स्नान, शुभ्रवस्त्र परिधान, नव्या मडक्यात पाणी व त्यात पिंपळाच्या झाडाची फांदी आणि त्याला (मडक्याला) शुभ्र धागा गुंडाळलेला एवढी तयारी केल्यानंतर धर्मांतर करणाऱ्याकडून प्रश्नोत्तरे (म्हणजे २२ प्रतिज्ञा) वदवून घ्यावीत.'*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :-_*

*१)* भी. रा. आंबेडकर, बौद्ध धम्म दीक्षा पाठ, १९५६

*२)* कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीचे सरचिटणीस देवप्रिय वलीसिंह यांना लिहिलेल्या पत्रात - १९५५

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०५/०७/२०२३_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/07/blog-post_4.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...