Wednesday, 12 July 2023

मला बुद्धधम्म का आवडतो ?

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_मला बुद्धधम्म का आवडतो ?_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

         _मला दिलेल्या या थोड्या वेळात मला दोन प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले आहे. *पहिला प्रश्न आहे, मला बुद्धधम्म का आवडतो ? आणि दुसरा प्रश्न आहे. आजच्या परिस्थितीत तो जगाला कशा प्रकारे उपयोगी आहे ?*_

              _*मला बुद्धधम्म पसंत आहे याचे कारण असे की, दुसरा कोणताही धर्म देत नाही अशा तीन तत्त्वांचे त्यात संयुक्तपणे शिकवण दिलेली आहेत.* इतर सर्व धर्म है देव, आत्मा आणि मृत्यूनंतरच्या जीवनाच्या चिंतेत पडले आहेत. *बुद्धधम्म मात्र प्रज्ञेची (म्हणजे अंधश्रद्धा आणि अलौकिकतेच्या विरूद्ध समजदारीची) शिकवण देतो. तो करूणेची शिकवण देतो. तो समतेची शिकवण देतो. या पृथ्वीतलावरील चांगल्या व सुखकारक जीवनासाठी माणसास याचीच तर गरज आहे. बुद्धधम्माची ही तीन तत्त्वे मला पटतात, तशीच ती जगालासुद्दा पटली पाहिजेत.* समाजाला देव किंवा आत्मा यापैकी कोणीही वाचवू शकत नाही. आणखी तिसरा एक असा विचार आहे की जो जगाला आणि खास करून जगाच्या आग्नेय आशियायी भागाला पटला पाहिजे. जग कार्ल मास्कच्या आणि त्याने जन्म दिलेल्या साम्यवादाच्या भीषण हल्ल्याला तोंड देत आहे. हे आव्हान अत्यंत गंभीर आहे. मार्स्कवाद आणि साम्यवाद ऐहिक गोष्टीशी संबंधित आहे. त्याने जगाच्या सर्व देशातील धार्मिक व्यवस्थांना हादरा दिलेला आहे. धार्मिक व्यवस्थांच्या बाबतीत हे स्वाभाविकच आहे, जरी आजचा काळ ऐहिक व्यवस्थेशी संबंधित नसला, तरीसुद्धा प्रत्येक ऐहिक गोष्टीचा पाया धार्मिक व्यवस्थाच असते. जेव्हा ऐहिक व्यवस्था अधिक काळ टिकाव धरू शकत नसते, तेव्हा दूरान्वये कां होईना, परंतु तिला धर्म प्रमाण्याचाच आधार घ्यावा लागतो._ 

        *_आग्नेय आशियातील बौद्द देशांचे मन साम्यवादाकडे वळल्याचे पाहून मला भयंकर आश्चर्य वाटते. याचा अर्थ त्यांना बुद्धधम्मच कळत नाही. माझा असा दावा आहे की बुद्धधम्मच मास्क आणि त्याच्या साम्यवादाला संपूर्ण उत्तर आहे._*

            _*रशियाच्या पद्धतीत साम्यवाद रक्तरंजीतपणे तो घडवून आणू पाहतो. बौद्ध समाज मात्र तो रक्तहीन मानसिक क्रांतीतून घडवून आणतो.* जे साम्यवादाचा स्वीकार करण्यास उत्सुक आहेत, त्यांनी हे लक्षात घ्यावे की, संघ हे साम्यवादी संघटन आहे. संघात खाजगी मालमत्ता नाही. हे परिवर्तन हिंसेच्या माध्यमातून घडवून आणलेले नाही. तर तो मानसिक परिवर्तनाचा परिणाम असून तो तरीही २५०० वर्षे टिकून राहिलेला आहे. त्याला कधी काही अवकळा आली असेल, परंतु विचार मात्र अजूनही बंधनकारकच आहे. *रशियाच्या साम्यवादाने याचे उत्तर दिलेच पाहिजे. त्याने तशाच दोन अधिक प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. पहिला प्रश्न असा की, साम्यवादी व्यवस्था सदासर्वदा कां आवश्यक असावी ? त्यांनी आपले कार्य सिद्ध केले आहे जे अन्यथा रशियाला करणे शक्य झाले नसते, हे कबूल केलेच पाहिजे. मग एकदा कां कार्य संपन्न झाले की मग लोकांना बुद्धाने शिकविल्याप्रमाणे प्रेमासह स्वातंत्र्य का असू नये ?* आग्नेय आशियायी देशांनी रशियाच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी याबाबत सावधान असले पाहिजे. नंतर ते त्यातून कधीही बाहेर पडू शकणार नाहीत. त्यांना फक्त एवढेच करावयाचे आहे की बुद्धाचा आणि त्याने सम्यक कशाला म्हटले आहे याचा अभ्यास करून त्यांच्या शिकवणीला राजकीय आकार द्यायचा आहे. गरिबी सर्वत्र आहेच आणि ती तशी राहिलही. अगदी रशियातसुद्धा गरिबी आहे. परंतु गरिबी हे मानवी स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे निमित्त मात्र ठरू शकत नाही._

           _*दुर्दैवाने बुद्धाच्या शिकवणीचा योग्य ते अर्थ लावला जात नाही आणि ती समजून घेतली जात नाही. त्यांची शिकवण हे सत्य आणि सामाजिक सुधारणेचा संग्रह आहे याबद्दल संपूर्ण गैरसमज झालेला आहे. बुद्धाचा धम्म हे एक सामाजिक तत्त्वज्ञानही आहे, याची कां एकदा जाणीव झाली की मग त्याचे पुनरूज्जीवन करणे ही एक चिरंतन घटना ठरेल आणि मग बुद्धधम्म सर्वांनाच पटण्यासारखा कां आहे, हे जग समजू शकेल.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- १२ मे १९५६ रोजी बी.बी.सी. लंडन रेडिओवर दिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- १४/०७/२०२३_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/07/blog-post_12.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...