🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*_ओम मणी पद्मे हूं_*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*_आचार्य नागार्जुन हे त्यांचे कार्यकाळातील सर्वश्रेष्ठ विद्वान गणले जात होते ..त्यांना प्रतिबुध्द समजले जात असत .._*
_ते एकदा ध्यान साधनेत असतांना त्यांना भेटण्यासाठी एक श्रामणेर असणारा विद्यार्थी येतो .._
_बराच वेळ झाला ..तरी तो बाहेर तिष्टत उभा असतो .._
_आचार्यांचे ध्यान संपल्यावर द्वारपाल त्यांना त्या विद्यार्थ्याबाबत सांगतो .._
_*आचार्य नागार्जुन द्वारपाला जवळ पाण्याने काठोकाठ भरलेले एक मटके पाठवून देतात ..*_
_द्वारपालाला वाटले विद्यार्थी तहानलेला असावा ..म्हणून आचार्यांनी पाणी पाठवले असावे .._
_त्याने ते मटके त्या श्रमणेर विद्यार्थ्यांच्या हातात देण्यासाठी पुढे केले ..*ते मटके आपल्या हातात न घेता ..त्या विद्यार्थ्याने आपल्या जवळ असलेली चीवर शिवण्याची सुई त्या मटक्यात टाकली ..आणी उत्तरला .." हे मटके आचार्यांना परत करा " !*_
_त्याचा हा उद्धटपणा पाहून द्वारपालला भयंकर राग आला ..पण तो शांतपणे आत निघून आचार्या समोर आला .._
*_काठोकाठ भरले मटके ..व त्या मटक्याच्या तळाशी बसलेली सुई पाहून आचार्य फारच आनंदी व उत्साही झालेत .. " त्यांना ताबडतोब आत बोलवा ..त्यांना माझा संदेश समजला आणी मला त्यांचा संदेश समजलाय " ! तोच श्रमणेर विद्यार्थी पुढे खुप विद्वान म्हणून प्रसिध्द झाला ..त्यांचे नाव " आर्यदेव " असे आहे ..!_*
*_पाण्याने भरलेले मटके व सुई ..यातुन कोणत्या संदेशाचे आदान प्रदान झाले असावे ?_*
तर ..मित्रांनो ..
*_" माझ्या जवळ ज्ञान काठोकाठ भरलेले आहे " !......हा संदेश होता आचार्यांचा ..._*
*_तर .." मी सुई होऊन त्या ज्ञानाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करणार " ! हा संदेश होता आर्यदेवांचा...!_*
*_कालांतराने अशाच स्वरूपाची द्वार परिक्षा नालंदा विद्यापीठाची असायची ...!_*
*_म्हणूनच देश - विदेशातील विद्यार्थी भारतात अध्ययनासाठी येत असत ..आचार्य आणि विद्यार्थी ...हे नाते ..असेच असावे ..!_*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*_ओम मणी पद्मे हूं_*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*_महेश कांबळे_*
*_०१/११/२०२२_*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
No comments:
Post a Comment