Monday, 17 October 2022

आणखी एक प्रश्न

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_आणखी एक प्रश्न_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                   *_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

            _बिम्बिसारचा पुत्र राजकुमार अभय आता भगवान बुद्धांचा परम श्रद्धावान शिष्य बनला होता. आता तो वारंवार त्यांच्या दर्शनासाठी जात असे आणि धर्म प्रवचन ऐकत असे. कधी कधी एकाद्या प्रश्नाच्या समाधानासाठीही जात असे._

                  _तो भगवानांना भेटण्यासाठी राजगृहाच्या गिज्नकूट पर्वतावर आला. तिथे भगवान राहात आहेत. आज तो एक विशेष जिज्ञासा घेऊन आला आहे._

                   _*तसं पाहिलं तर भारताचे हे वैशिष्ट्यच आहे, पण असे वाटते की, त्या काळात परस्पर विरोधी विचारांचा प्रचार करण्याची विशेष सवलत होती. असे आचार्यही होते आणि चांगल्या विपुल प्रमाणात त्यांचा शिष्यगणही होता.* ते कर्मसिद्धांत मानत नसत. चांगल्या कर्माचे चांगले फळ नाही की वाईट कर्माचे वाईट फळ नाही. कारण आणि परिणाम या सिद्धांतालाही ते मानत नसत. कोणत्याही परिणामाचे कोणतेही कारण नाही. काहीही हेतू नाही. जगात सारे काही असेच अकारण घडत असते. अशा विचारवंताचा एक अग्रणी होता, *प्रसिद्ध धर्माचार्य पूरण काश्यप. त्यांचा असा सिद्धांत होता की जर कोणी सम्यकदर्शी झालाच तर ते कोठल्याही कारणाने नाही. कोणतेही कारण नसता कोणी व्यक्ती सम्यक् दर्शी सम्यकज्ञानी होत असते.*_

                 _*याप्रमाणे त्याची मान्यता होती की, जर एकादी व्यक्ती अज्ञानी, अदर्शी राहते म्हणजे सत्याचे सम्यक् दर्शन घेऊ शकत नाही वा सम्यक् ज्ञान प्राप्त करू शकत नाही तर त्यामागे कोणतेही कारण वा हेतू नसतो. कारणावाचूनही एकादी व्यक्ती सम्यक दर्शी, सम्यक् ज्ञानी होते व कारणावाचून अदर्शी अज्ञानी असू शकते.*_

                 _आज याच सिद्धांताविषयी भगवानांचे विचार जाणून घेण्यासाठी राजकुमार अभय आला आहे. *भगवान त्याला समजावित आहेत की, 'या लोकिय जगात जे उत्पन्न होते त्याचे प्रत्यय म्हणजेच कारण, त्याचा हेतू असतोच असतो. सर्व परिणामांच्या मुळाशी कोणता ना कोणता हेतू समाविष्ट असतो. एकादी व्यक्ती जसं आहे तसं सत्य यथाभूत पाहू शकत नाही, जाणू  शकत नाही म्हणजेच तो अदर्शी अज्ञानी राहतो, सम्यक् ज्ञान व सम्यक् दर्शन यापासून वंचित राहतो. तेव्हा हे विनाकारण नाही त्याचे पाच हेतू आहेत.*_

_*१.* मनात इच्छाआकांक्षाच्या लाटा उठतात._

_*२.* मनांत द्वेषाग्नी उफाळतो._

_*३.* शारीरिक आळस व मानसिक प्रमादाची गडद छाया पसरते._

_*४.* शारीरिक अस्वस्थता आणि मानसिक संताप प्रबळ होतो._

_*५.* मन संशय आणि शंका यांनी उद्विग्न होत असते._

               _या पाचामधील कोणतीही एक अवस्था सम्यक दर्शन, सम्यक ज्ञानाला बाधक ठरते. तेव्हा हा हेतू आहे, ही कारणे आहेत की, ज्यांच्यामुळे माणूस सत्याविषयी अदर्शी अज्ञानी राहत असतो. या पाचांचा स्वभाव जाणल्याशिवाय त्यांना दूर केल्याशिवाय सम्यक् दर्शन कुठे ? सम्यक् ज्ञान कुठे? अभय या उत्तराने खूप संतुष्ट झाला, प्रसन्न झाला. त्याने विचारले, *'या पाचांना काय म्हणतात भगवान ?'*_

*_भगवान म्हणाले, 'नीवरण'._*

          *_वस्तुतः नीवरणच आहेत. सत्यावर पडलेली आवरणेच आहेत जी सत्याला जसे आहे तसे पाहू देत नाहीत._*

               _'खरंच भगवान ! ही नीवरणे आहेत. यातून एक नीवरण जरी निर्माण झाले तरी ते बाधक-अडचणीचे होते. पाचही नीवरणे उत्पन्न झाली तर अडचणीचे काय बोलावे?' राजकुमाराने बुद्धीने विचाराने समजून असे म्हटले._

                 _विपश्यी साधक स्वानुभूतीच्या आधारे हे समजतो. या पाचांना साधनेच्या क्षेत्रात दुष्मन मानतो. कारण ते प्रगतीला बाधक असतात. *ज्याप्रमाणे एकाद्या भांड्यात असलेले पाणी रंगीत असेल, गढूळ असेल किंवा फार डुचमळत असेल तर त्यात आपले स्वच्छ प्रतिबिंब कसे दिसणार ? डोळ्यांवर रंगीत चष्मा घातला वा डोळ्यात धूळ गेली किंवा डोळ्यासमोर अंधार असला, दाट धुके असेल तर सत्य जसे आहे तसे दिसणार कसे ? विपश्यी साधकाला हे चांगले समजते की ही नीवरणे जेवढी जेवढी नष्ट होतील मन तेवढे तेवढे समाहित होईल, शांत होत जाईल, स्वच्छ होईल कारण ते आवरणहीन होईल. तेव्हाच यथाभूत म्हणजे जसं असेल तसं सत्य दर्शन होईल.* हे खरंच म्हटलं आहे, *समाहितो यथाभूतं पजानाति'* चित्त सम्यकरूपाने समाहित होते तेव्हा सत्याला प्रज्ञापूर्वक यथाभूत जाणून घेते._

              _त्याच प्रकाराने भगवानांनी समजाविले की, सम्यकदर्शी व सम्यक् ज्ञानी देखील कारणाशिवाय विनाहेतू होऊ शकत नाही. याचे देखील कारण आहे, उद्देश आहे. *ज्यांच्या असण्यामुळे कोणतीही व्यक्ती सम्यक् दर्शी, सम्यक् ज्ञानी होऊ शकते असे सात हेतू आहेत.* ते येणेप्रमाणे :_

_*१] सति [स्मृति] म्हणजे सजगता सावधानता.* आपल्या अंतरंगात नामरुपाचा उदय-व्यय पाहता पाहता, भ्रमभ्रांती, मायेपासून दूर होता होता, रागद्वेषादि भावनांपासून दूर होत निरोध अवस्था प्राप्त करून घेतो; म्हणजेच सर्व इंद्रियानुभूतींचा परित्याग करून त्या पलिकडील परमसत्याचे, निर्वाणाचे दर्शन घेतो. अशा रीतीने सजगतेचा अभ्यास वाढवून जसे आहे तसे सम्यक् दर्शन व सम्यक् ज्ञान यांचा लाभ करून घेतो. ठीक याच प्रमाणे_

_*२] धम्म विचय [धर्म विचयन]* म्हणजे सत्याचे विभाजन करीत, तुकडे तुकडे करीत गुण धर्म जाणण्याचा अभ्यास वाढवितो._

_*३] विरिय [वीर्य] याचा अर्थ परिश्रम,* मेहनत पुरुषार्थाच्या अभ्यासाचे संवर्धन करतो._

_*४] पीति, [प्रीति] म्हणजे आनंदाची अनुभूती* त्याचे संवर्धन करण्याचा अभ्यास._

_*५] पसद्धि [प्रश्रब्धि], 'प्रशांत नीरवता'* तिच्या संवर्धनाचा अभ्यास करतो._

_*६] समाधि - म्हणजे कुशल मनाची एकाग्रता वाढवितो.*_

_*७] उपेक्खा [उपेक्षा] म्हणजे साऱ्या इंद्रिय जगातील अनित्य स्वभावाचे स्वानुभूतीच्या आधारे दर्शन घेऊन जाणतो व समतेच्या अभ्यासाचा विकास करतो.* आणि जसे आहे तसे सम्यक् ज्ञानी व सम्यक् दर्शन यांचा लाभी होतो._

                  _*असे सात हेतू आहेत. सात कारणे आहेत ज्यांच्यामुळे कोणीही व्यक्ती सम्यकदर्शी व सम्यक् ज्ञानी बनू शकते. कारणाशिवाय हे होत नाही.*_

_'या सातांचे काय नाव आहे भगवान!'_

*_'राजकुमार, यांना "बोध्यङ्ग” म्हणतात._*

            _"खरेच बोध्यङ्गच आहेत भगवान! बोधीचे अंगच तर आहेत भगवान! यातील कोणतेही एक अंग परिपुष्ट- समर्थ झाले तरीही यथाभूत सम्यक् दर्शन, सम्यक् ज्ञान यांची प्राप्ति होऊ शकते. सातही अङ्गे परिपुष्ट झाल्यावर त्याचे वर्णन काय करावे!"_

            _*अभय राजकुमाराने हे बौद्धिक पातळीवर समजून घेतले पण प्रत्येक साधक ही गोष्ट अनुभवाने जाणतो की, या सातही अङ्गांच्या सतत अभ्यासानेच हळूहळू बंधनातून मुक्तीकडे, नश्वरातून अमृताकडे वाटचाल करीत असतो. आणि सत्याचे जसे आहे तसे यथाभूत सम्यक् दर्शन आणि सम्यक् ज्ञानाची प्राप्ती करून घेत असतो.*_

                 _राजकुमार अभय भगवानांच्या उत्तराने अत्यंत संतुष्ट, प्रसन्न झाला. भगवानांना भेटण्यासाठी त्याला गिज्झकूट पर्वताची चढण चढावी लागली होती. ती श्रमाने साध्य झाली होती. शरीर आणि मन दोघांनाही थकवा आला होता. पण आता तो म्हणतो की, 'भगवानांच्या भेटीने, त्यांच्या धर्मविवेचनाने माझा सारा थकवा दूर पळाला आहे. मन या स्पष्ट व योग्य ज्ञानामृत सिंचनाने शीतल-शांत झाले आहे, अभय धन्य झाला._

                     _आपण देखील पांचही नीवरणांना समजून घेऊन ती दूर करण्याचा प्रयत्न करू या. सातही बोध्यङ्गे समजून घेऊन ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करू या. त्यातच आपले कल्याण सामावलेले आहे._

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- १७/१०/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_68.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...