🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_सुखी - सुरक्षित कोण ?_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_पाली वाङ्मयाच्या विशाल फलकावर सव्वीशसे वर्षांपूर्वीच्या भारताचे एक मनोहारी चित्र डोळ्यासमोर उभे राहते. *त्या काळात शेती समवेतच गोपालन एक लोकांचा प्रमुख व्यवसाय होता.* मोठ-मोठे गोपाळ शेकडो, हजारोंच्या संख्येने गायी पाळत असत आणि सुखमय समृद्धीचे जीवन जगत असत._
_अशाच एका समृद्ध आणि सुखी गृहस्थाच्या जीवनाचे हे चित्र नजरेसमोर आहे. *त्याचे नाव धनिय गोप.* त्याची *प्रेमळ पतिव्रता पत्नी सात आज्ञाधारक मुले, सात सुशील सूना आणि सात मुलींचा भरलेला संसार.* पुष्कळ गोधनामुळे परिवार धन-धान्य संपन्न एकत्र कुटुंबपद्धती. कुटुंबातील सर्व माणसे सदाचारी, परस्परांवर प्रेम, सामंजस्य यामुळे संतोषप्रद वातावरण. सुखसमृद्धतेची ही समाधानी वृत्ती धनिय गोपाच्या प्रसन्न वाणीतून स्पष्टपणे व्यक्त होते आहे._
_परंतु भौतिक समृद्धी समवेतच हे अध्यात्मिक नवजागृतीचे युग आहे. भगवान बुद्धांच्या आविर्भावाने अध्यात्मिक वातावरणात गहन गांभीर्य भरले आहे. भगवानांची व त्यांच्याकडून शिकवल्या गेलेल्या मुक्तिदायिनी विपश्यना साधनेची धर्मकीर्ती दूरवर पसरलेली आहे._
_*धनिय गोप आपल्या कुटुंबासह आणि गोधनासह महीनदीच्या किनारी राहतो आहे.* नदीकिनारा आणि सभोवतालचा प्रदेश हिरव्यागार कुरणांमुळे गाईंना चरण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे._
_संध्याकाळची वेळ, सूर्यनारायण विश्रांतीसाठी पश्चिम क्षितिजाकडे पावले टाकीत चालला आहे. आकाशात मेघ येत आहेत. काळे ढग गर्दी करीत आहेत. अधूनमधून वीज चमकत आहे. मेघांचा गडगडाट आसमंतात भरून राहिला आहे._
_धनिय गोप आपल्या पर्णकुटीसमोर बसला होता. सांसारिक समृद्धता आणि कौटुंबिक सौख्य यामुळे संतुष्ट आहे, प्रसन्न आहे. त्याच्या सौभाग्याने त्याचवेळी भगवान बुद्ध देखील महीनदीच्या सुंदर किनाऱ्यावर आले._
_धनिय गोप आपल्या उल्हसित शब्दांनी गृहसौख्याचे गोड गीत गात आहे. प्रत्युत्तरात भगवान अनुत्तर विमुक्ती सुखाचा उद्घोष करीत आहेत. भौतिक सुख है अखेर भौतिक सुखच आहे. अनित्य, नश्वर, भंगुर आज ना उद्या बदलणारे, नाश पावणारे व परिणामी दुःखदायकच असते. नित्य, शाश्वत, ध्रुव, अनुत्तर विमुक्ती सुखाशी त्याची काय तुलना ?_
_दोघांमधील सुखसंवाद अत्यंत रोचक नव्हे तर प्रेरणादायक, धर्मसंवेग जागृत करणारा आहे._
_यावे! आपण ऐकावे!_
_*धनिय गोप -* "माझे भात पिकले आहे. दूध पिळून झाले आहे. एकत्र कुटुंबात मी गुण्यागोविंदाने नांदत आहे. शेजारून मही नदी संथपणे वाहात आहे. तिच्या काठीच माझे घर आहे. आगोटी पेटविली आहे. आता है वरुणदेवा! वाटेल तेवढी वृष्टी कर. "_
_[सांसारिक गृहस्थ जेव्हा घरातील सर्व कामे आटोपून विश्रांती घेत असतो तेव्हा वाटेल तेवढा पाऊस पडला तरी त्याला त्याची चिंता वाटत नाही.]_
_*भगवान बुद्ध -* "मी क्रोध आणि कठोरता यापासून सर्वस्वी मुक्त झालो आहे. मही नदीच्या किनारी फक्त एका रात्रीसाठी राहात आहे. माझी झोपडी छतविरहित आहे. माझी आग संपूर्णतया विझलेली आहे. आता पाहिजे तेवढी वर्षावृष्टी होऊ दे."_
*_[जीवनमुक्त व्यक्तीसाठी काहीच अडचण उरत नसते. हे भौतिक शरीर म्हणजे एक झोपडीच आहे जी राग, द्वेष, मोह, मत्सर यांनी आच्छादलेली असते. त्यात मर्कटचेष्टा करणारे मन निवास करते. विपश्यना साधनेच्या सहाय्याने या विकार-वासनांवर पडलेले आवरण काढले जाते. जणु काय झोपडीचे छतच काढून टाकले जाते तेव्हा मनाचा मर्कटपणा समाप्त होतो. ते शांत होते, यालाच खुले कपाट किंवा खुली झोपडी म्हणतात. अशा निर्वाणदर्शी व्यक्तीच्या अंतःकरणातील विकार-वासनांची आग पूर्णतया विझून जाते. त्याचे भवभ्रमण चुकते. त्याचे ते अंतिम जीवन असते. म्हणून मही नदी किनारी केवळ एकच दिवस राहण्याचे त्यांनी म्हटले आहे.]_*
_धनिय गोप - "इथे माशा, मच्छर, डास नाहीत. गायी नदी किनारी उगावलेला चारा खात आहेत. कितीही पाऊस पडला तरी तो सहन करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. म्हणून वरुणदेवते पाहिजे तेवढा पाऊस पाड!"_
*[माशा मच्छर नसणे हे त्या काळातील स्वच्छ ग्रामीण जीवनाचे प्रतीक आहे ]*_
_भगवान बुद्ध - "मी एक नाव तयार केली आहे व भवसागर पार करून आलो आहे. आता तर या नावेचीही आवश्यकता नाही. म्हणून पाहिजे तेवढा पाऊस पडू दे."_
_*[भवचक्राबाहेर पडलेल्या व्यक्तीला कसल्याच भवबाधा नसतात. आता संसारातील वादळे, पाऊसवारे त्याचे काहीच नुकसान करू शकत नाही.]*_
_धनिय गोप- "माझी पत्नी आज्ञाधारक आहे. अलोलुप व पतिव्रता आहे. दीर्घकालापासून ती माझ्यासमवेत प्रेमाने रहात आहे. तिच्याबाबत मी कधी पापमय गोष्ट ऐकली नाही. आता हे देवा! पाहिजे तेवढा पाऊस पाड."_
_*[एका संसारी माणसाला पतिव्रता स्त्री जीवनसाथी म्हणून लाभल्यास चिंतामुक्त सुखी जीवनाचा लाभ होतो. ]*_
\भगवान बुद्ध - "माझं मन आज्ञाधारक आहे. विमुक्त आहे. दीर्घकालापासून मी ह्यास सुशिक्षित करून ठेवले आहे. सुदन्त बनविले आहे. माझ्यात पापाचा लवलेशही नाही. म्हणून पाहिजे तेवढा वर्षाव व्हावा!"_
_*[ अशा विमुक्त चित्ताच्या साऱ्या काळज्या आपोआपच नष्ट होतात. जो निष्पाप आहे त्याला कसलीही भवबाधा नाही.]*_
_धनिय गोप- "मी स्वतः माझा धनी आहे. वेतन घेणारा नोकर नाही. माझे पुत्र देखील आज्ञाधारक आहेत. माझ्याप्रमाणेच सशक्त आणि संयमी सर्व आहेत. त्यांच्याविषयी देखील मी एकही पापी गोष्ट ऐकली नाही. म्हणून हे देवा! पाहिजे तेवढी वर्षा होऊ दे."_
_भगवान बुद्ध - "मी चाकर नाही. निवृत्त होऊन साऱ्या जगात माझ्या फिरत राहतो. मला नोकरीची गरज नाही. म्हणून आता हवा तेवढा वर्षाव होऊ दे."_
*_[जो आपल्या मनाचा गुलाम नाही, स्वतःच आपला मालक असतो. तो खया अर्थाने स्वाधीन असतो. म्हणून चितामुक्त असतो.]_*
_धनिय गोप - "माझ्याजवळ तरुण धट्टेकट्टे बैल आहेत. गाभण गायी आहेत. बछडे आहेत. या गायींचा पती वृषभदेखील आहे. म्हणून हे वरुणा! पाहिजे तेवढा पाऊस पडू दे."_
_[धनधान्याने परिपूर्ण, आरोग्य संपन्न, पतिव्रता पत्नी आणि आज्ञाधारक मुले असलेला माणसाला स्वतःला मोठा सुखी, सुरक्षित असल्याचे जाणवते.]_
_भगवान बुद्ध - "माझ्याकडे बैल नाहीत वा वासरे नाहीत, गाभण गायी नाहीत वा पाडे आणि वळू नाहीत म्हणून भरपूर पाऊस पडू दे."_
*_[अपरिग्रही अनासक्त माणसापेक्षा सुखी, सुरक्षित आणखी कोण असणार बरे ?]_*
_धनिय गोप - "माझे खुंट बळकटपणे गाडलेले आहेत. चांगल्या प्रकारे वळलेली मूंजेची नवी मजबूत दोरी आहे. बलवान बैल देखील ती तोडू शकत नाहीत. म्हणून हे देवा! पाहिजे तेवढा पाऊस पडू दे.'_
_[सांसारिक व्यक्ती समजते की धनधान्य, वैभव, पुत्र, पत्नी माझीच आहेत. मी त्यांना बांधून ठेवले आहे. आपल्या ताब्यात ठेवले आहे. हे सारे माझ्या आज्ञेत राहतील. म्हणून भविष्यातही मी नेहमी पूर्ण सुरक्षित राहीन. बिचारा भोळा मनुष्य हे समजत नाही की ज्यांना मी बांधून ठेवले आहे असे समजतो त्यांनीच मला बांधले आहे. ज्या परिवार आणि संपत्तीला मी स्थायी सुरक्षित समजतो, ज्या आधारावर मी मला स्वतःला स्थायी समजतो; माझ्यासहित ते सारेच किती अस्थायी, किती असुरक्षित आहेत. याच जीवनात विवशतेने पाहता पाहता सारेच संपून जाते आणि हे दुःखगर्भा अस्थायी सुख पुढे जन्म-जन्मांतरीसुद्धा चालत रहाते. कसला हा संभ्रम! किती विपर्यास!]_
_आणि *याच्या तुलनेत भगवान बुद्ध- “ज्याप्रमाणे बलवान बैल सारी बंधने तोडतो, जसा मस्त हत्ती साऱ्या लतावेली छिन्न भिन्न करतो तशीच मीदेखील माझी सारी बंधने पूर्णपणे तोडून टाकली आहेत. या भवबंधनातून मी मुक्त झालो आहे आता मला पुनर्जन्म नाही, पुन्हा गर्भावास नाही. म्हणून पाहिजे तेवढी वृष्टी होऊ दे."*_
_पूर्ण विमुक्तीच्या या मंगलघोषाने सारे वातावरण धर्ममय तरंगांनी भरून गेले. जिथे एकीकडे जवळच्या उंचसखल भूमीला पाण्याने भरून टाकणाऱ्या पर्जन्ययुक्त मेघाने वृष्टी केली, *तिथे त्या बरोबरच साऱ्या प्रकृतीला सद्धर्माच्या अमृतजलाचे सिंचन करणाऱ्या भगवानांच्या वाणीच्या धर्ममेघाने वर्षाव केला. धनिय भाग्यशाली होता. अनेक जन्माच्या पुण्यसंग्रहाचे संचित त्याच्यापाशी होते. धर्मवाणीचा हा मंगल घोष ऐकताच त्याचे तन-मन रोमांचित झाले. अनित्यबोधिनी तरंग लहरींनी युक्त अशी धर्मगंगा साऱ्या शरीरभर प्रवाहित झाली. क्षणभर इंद्रियातीत नित्य, ध्रुव, शाश्वत, निरोध अवस्थेचा त्याला साक्षात्कार झाला. धनिय धन्य झाला. स्रोतापन्न झाला. त्याच्याबरोबर त्याचे काही अन्य कुटुंबीय देखील स्रोतापन्न झाले.*_
_अजूनपर्यंत तर केवळ नावच ऐकले होते. आता पाहिले आणि जाणले की हे तर साक्षात भगवान बुद्ध आले आहेत. मी देखील कसा वेडा आहे. यांच्याशी वादविवाद करीत होतो. परंतु हे ठीकच झाले. या निमित्ताने यांचे दर्शन झाले. योग्य दर्शन झाले. केवळ भौतिक शरीराचेच नव्हे तर धर्मकायेचे देखील दर्शन झाले. स्वानुभूतीच्या पातळीवर धर्माचे दर्शन झाले. हेच तर भगवानांचे खरे दर्शन. मी सर्वार्थाने धन्य झालो!_
_प्रचंड मेघमालेच्या वर्षा-ध्वनीमध्ये धनिय गोप भावविभोर होऊन म्हणतो *'लाभा बत नो अनप्पका'* खरंच! आमचा अनल्प [पुष्कळ] लाभ झाला आहे._
_आम्ही भगवानांचे योग्य दर्शन घेतले आहे. हे चक्षुष्मान ! आम्ही आपल्याला शरण आहोत. हे महामुने! आपण आमचे शासक आहात. गुरु आहात. ही गोपी व मी आपल्या उपदेशाप्रमाणे विशुद्ध ब्रह्मचर्याचे जीवन व्यतीत करून धर्माचे आचरण करू आणि याच मार्गाचा अवलंब करून प्रगत होऊन जन्ममृत्यूच्या पलिकडील भवदुःखांचा नितांत अंत करून घेऊ._
_धनिय गोप आपल्या भवक्षेत्राच्या बाहेर जात असलेला पाहून देव पुत्र मार म्हणाला, “पुत्रवान, पुत्रांना पाहून आनंदित होतो. गायींना पाहून आनंदित होतो. विषयांचा उपभोग घेतल्यानेच मानवाला आनंद होतो... ज्याच्याजवळ विषयांच्या उपयोगाची साधने नसतात त्याला आनंद कसा मिळणार ?"_
_*याला उत्तरादाखल भगवानांची गुरुगंभीर वाणी निनादली, "पुत्रवान पुत्रांच्यामुळे चिंताग्रस्त असतो आणि गोपाल गोधनामुळे काळजीत असती. विषयांच्या आसक्तीमुळे मनुष्य नेहमीच चिंताग्रस्त असती. जो विषयासक्तीपासून विमुक्त असतो तोच चिंतामुक्त असती."*_
_ही धर्ममय वाणी आपल्यासाठीदेखील प्रभूत प्रेरणादायक बनू द्या. आपण देखील धनिय गोपाप्रमाणे एकेक पाऊल प्रगती पथावर टाकीत विषयासक्तीपासून सुटका करून घेऊ या. आणि दुःख विमुक्त होऊन आपले मंगल साधू या._
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- ३१/१०/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_31.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment