🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_पुक्कुसाति कथा_*
*_१. धर्म रत्न उपहार_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_विपश्यना साधनेवर भगवान बुद्धांनी दिलेल्या एका कल्याणकारी उपदेशाच्या संदर्भात एक चित्र स्पष्टपणे पहायला मिळते. त्यावरून मगधनरेश बिम्बिसार याचे धर्मप्रेम प्रकाशात आले आहे._
_त्या काळात आजच्यासारखी जलद गतीची सुखसोयीची दळणवळणाची साधने व दूरध्वनीसारखी संवाद साधणारी साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे दूर-दूरच्या देशातील परस्पर राजनैतिक संबंध प्रस्थापित करणे सोपे नव्हते. बिम्बिसार आपल्या स्वभावानुसारच अशा दूरस्थ राजांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करू इच्छित होता. त्यासाठी अशी सुसंधी तो पहात होता की ज्या आधारे तशी इच्छा पूर्ण करून घेता येईल._
_एकदा गंधार देशाची राजधानी तक्षशिलेहून काही व्यापारी त्या देशातील उत्पादने मगध देशात विकण्याच्या व मगध देशात उत्पादीत सामान खरेद करून आपल्या देशात नेण्याच्या उद्देशाने राजगिरीस आले. त्याकाळात व्यापाऱ्यांचे असे 'सार्थ' म्हणजे काफिले यांच्याद्वारेच दोन देशात परस्परात व्यापार-व्यवहार होत असे. त्या काळातील मान्यताप्राप्त प्रथेनुसार प्रथम ते व्यापारी बिम्बिसार यांना नजराणा अर्पण करण्यासाठी राजदर्शनासाठी राजदरबारात दाखल झाले._
_क्षेम कुशल विचारल्यानंतर बिम्बिसारने प्रश्न विचारला, 'कोणत्या देशातून आला आहांत ?'_
_'तक्षशिलेहून महाराज !'_
_'आपल्या देशाचे शासक कोण आहेत ?'_
_'राजनरेश पुक्कुसाति महाराज!'_
_'ते धर्मनिष्ठ आहेत का ?'_
_'अतिशय धर्मनिष्ठ आहेत. महाराज! आपल्या मुलांप्रमाणे ते प्रजेचे पालन करतात. प्रजेचे सुखदुःख ते आपलेच सुखदुःख मानतात. '_
_"त्यांचे वय किती आहे?"_
_"आपल्याच वयाचे आहेत. महाराज!"_
_वयही माझ्याएवढे आणि प्रजावात्सल्याचा राजधर्म पालनातही माझ्यासारखाच. मग तर अशा व्यक्तीशी अवश्य मैत्री संपादन केली पाहिजे. व्यापारी हो! तुम्ही माझी एक मनोकामना पूर्ण करण्यास मदत कराल का?_
_"अवश्य महाराज!"_
_मग आता जा व आपला व्यापार व्यवसाय पूर्ण करून स्वदेशास परतण्यापूर्वी मला पुन्हा भेटा. तुमच्या मदतीने मी तुमच्या नरेशांना एक मैत्रीसंदेश पाठवणार आहे. '_
_"अशा प्रकारचा संदेश नेण्यास आम्हांला अतिशय आनंदच वाटेल. महाराज!'_
_काही दिवसानंतर आपल्या बरोबर आणलेले गंधार देशातील उत्पादन विकुन आणि मगध देशातील सामान खरेदी करून वायदा केल्याप्रमाणे ते महाराज बिम्बिसार यांना भेटावयास आले. महाराज बिम्बिसार म्हणाले 'नरेश पुक्कुसाति यांना भेटाल तेव्हा माझ्यातर्फे पुनः पुन्हा त्यांचे क्षेम कुशल विचारा आणि सांगा की मी त्यांना आपला मित्र बनविण्यास अतिशय उत्सुक आहे. माझ्या मनांतील ही गाढ मित्रभावना त्यांना आत्मीयतेने कळवा.'_
_व्यापाऱ्यांनी त्यास मान्यता दिली व प्रसन्न मनाने ते स्वदेशी परतले. तक्षशिलेत गंधारनरेश पुक्कुसाति यांची भेट घेऊन त्याला मगध सम्राटांचा हा मैत्री-संदेश सांगितला. पुक्कुसाति फारच आनंदित झाला. त्याने व्यापाऱ्यांचे आभार मानले. मगधासारख्या विशाल शक्तिशाली साम्राज्याच्या सम्राटाशी मित्रत्व होणे ही गंधारनरेशाच्या दृष्टीने मोठीच अभिमानाची गोष्ट होती. या मैत्रीभावांचा विकास करण्यासाठी त्याने मोठ्या समजुतदारपणे अनेक राजनैतिक पावले उचलली._
_काही दिवसांनी मगध देशातील व्यापाऱ्यांचा एक काफिला व्यापारानिमित्त तक्षशिलेला पोहोचले. हे व्यापारी जेव्हा नजराणा घेऊन तक्षशिलेच्या नरेशाला भेटले तेव्हा त्याने आपली प्रसन्नता व्यक्त केली. मगध नरेशच्या स्वास्थ्याची चौकशी केली आणि घोषणा केली की हे व्यापारी मंडळ आपल्या मित्र देशांतून आले आहे, म्हणून माझे व गंधार देशाचे अतिथी आहेत. त्याने तक्षशिला नगरातही तशी दवंडी पटवली की मित्र मगध सम्राटांच्या देशातील जी व्यक्ती गंधार देशात व्यापार करण्यासाठी येईल मग ती एकटी असो वा व्यापारी मंडळ असो, पायी अथवा गाडीत, जसे आले असतील त्यांना राजकीय अतिथी मानावे. त्याबरोबर हेही लक्षात ठेवावे की माझ्या मित्र देशाचे नागरिक व नात्याने अशा लोकांची चांगली सुरक्षा करावी. विशेष व्यवस्था करावी. त्यांना राजकीय विश्रामधामात ठेवावे. त्यांना माझ्या देशात कोणत्याच प्रकारचे कष्ट होऊ नयेत. त्यांनी आणलेल्या पदार्थांवर कोणताच आयात कर आकारू नये._
_सम्राट बिम्बिसारला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने देखील महाराज पुक्कुसाति यांस आपला अदृश्य मित्र घोषित केले. आपल्या राजधानीतही ह्याच प्रकारची दवंडी पिटवली की गंधार देशातील व्यापाऱ्यांनाही त्याच सर्व सुखसोयी उपलब्ध करून द्याव्यात ज्या सुखसोयी मगधांतील व्यापाऱ्यांना गंधार देशात उपलब्ध आहेत._
*_सध्या देखील दोन राष्ट्रांत मैत्री-संधी झाल्यावर येणे जाणे, आयात निर्यात मालावर जकात कर माफ केला जातो किंवा अन्य राष्ट्राच्या तुलनेत कमी जकात कर आकारण्याची व्यवस्था केली जाते. मित्र राष्ट्राला 'मोस्ट फेवर्ड नेशन' घोषित केले जाते किंवा 'ड्यूटी-फ्री' वा 'ड्यूटी-प्रिफरेंस'ची सुविधा केली जाते. आधुनिक काळातील या राजनीतीचे हे पूर्व संस्करण या चित्रात दिसून येते. पण त्या काळातील वैशिष्ट्य असे होते की, मित्र राष्ट्रातील नागरिकांना राजअतिथी सन्मानही दिला जात होता. परंतु हे तेव्हाच शक्य होते की जेव्हा लोकांचे जाणे येणे मर्यादित होते. काहीही असो, वरील घटना हे सिद्ध करते की त्या काळात भारतात देखील दोन देशांतील मित्रभावना वाढविण्यासाठी अशा प्रकारची सुखसोय केली जात होती. होय! हा फरक अवश्य जाणवतो की एकतंत्रीय शासक राज्यव्यवस्था असल्यामुळे दोन एकतंत्रीय शासकांची मैत्री ही दोन राष्ट्रांची राष्ट्र मैत्री ठरत असे. बिम्बिसार व पुक्कुसाति यांच्यातील मित्रभावना राष्ट्रमित्रभावना ठरून त्याचा फायदा दोन्ही देशातील नागरिकांना त्यांच्यातील परस्पर व्यापार-उदीमाला मिळाला._*
_दोन्ही शासकांचा मैत्रीभाव दिवसेंदिवस वाढतच गेला. दोघांची परस्परांची कधीच भेट होत नव्हती. पण जसजसा काळ गेला तसतसा पत्रव्यवहार व अमूल्य नजराणे यांची देवाण घेवाण होऊन मैत्रीची भावना दृढतर झाली._
_*त्याकाळीदेखील काश्मिरमध्ये, जो गंधार देशाचा भाग होता, आजच्याप्रमाणेच बहुमूल्य आणि उंची लोकरीच्या शाली बनत.* मगधासारख्या मध्य देशात अशा शाली दुर्लभ असत, बनत नसत. *एकदा पुक्कुसातिने आपल्या मित्राला आठ अत्यंत मूल्यवान आणि सुंदर पंचरंगी लोकरीच्या अत्युत्तम बनावटीच्या शाली पाठविल्या.* हा नजराण्याचा पेटारा मोठ्या उत्साहात वाजत गाजत राजगिरीला पाठवला. एका मोठ्या समारंभात राजमंत्री व सन्माननीय नागरिकांच्या उपस्थतीत तो उघडण्यात आला. लोक हा नजराणा पाहून हर्षाने व आश्चर्याने फुलून गेले. अशा मौल्यवान शाली मगधवासीयांनी यापूर्वी कधी पाहिल्या नव्हत्या. मग अशा निर्माण करणे तर दूरच राहिले. किती नयन मनोहर रंग ! किती सुकोमल स्पर्श आणि किती विशाल ! प्रत्येक शाल सोळा हात लांब व आठ हात रुंद !_
_लोकांनी आपली प्रसन्नता व्यक्त करण्यासाठी बोटांनी चुटक्या वाजविल्या. आपले फेटे हवेत उंच फेकले. [ज्याप्रमाणे आजकाल लोक टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त करतात.] *बिम्बिसारही या नजराण्यामुळे फार प्रसन्न झाला. त्याने त्यातील चार शाली भगवानांच्या विहारात दान म्हणून पाठविल्या व बाकीच्या चार राजप्रासादात ठेवून घेतल्या.* लोकदेखील या उपहाराची प्रशंसा करीत आपापल्या घरी परतले. गंधार नरेश पुक्कुसातिने आपला मित्र मगधराज बिम्बिसार याला मौल्यवान शाली भेट म्हणून पाठविल्या याचा लोकात खूप गाजावाजा झाला. राजमहालात पोहोचल्यानंतर बिम्बिसार विचार करू लागला की मित्राच्या या रत्नांसारख्या बहुमूल्य भेटीच्या बदल्यात मला याहून अधिक मूल्यवान भेट पाठविली पाहिजे. राजगिरीत याहून अधिक उत्तम रत्न आहे का जे उपहार स्वरुपात पाठविता येईल ? होय! निश्चितच आहे!_
*_बिम्बिसार भगवान बुद्धांच्या सान्निध्यात आल्यापासून व आपल्या आत नित्य, शाश्वत, ध्रुव व अमृतपद निर्वाणाची अनुभूती घेतल्यानंतर स्रोतापन्न अवस्थेत आला होता. तेव्हापासून बहुमूल्यात बहुमूल्य, उच्चतमात उच्चतम, वस्तू त्याला स्पृहणीय वाटत नव्हती. जरी तो आपल्या सांसारिक जबाबदान्या चांगल्याप्रकारे पार पाडीत होता तरी त्याच्या आसक्ती तुटू लागल्या होत्या. आता तो खरा रत्नपारखी बनला होता. म्हणून त्या दिशेने त्या चितन सुरू झाले._*
*_जगात अनेक प्रकारची रत्ने आहेत. हिरे, पाचू यासारख्या निर्जीव रत्नांच्या तुलनेत, सजीव रत्नांत पुरुष व स्त्री ही उत्तम रले असतात. हत्ती घोड्यांपेक्षाही श्रेष्ठ सामान्य स्त्री-पुरुषांपेक्षा आर्यश्रावक उत्तम. आर्यश्रावक रत्नांपेक्षा बुद्धरत्न सर्वोत्तम. मी खरोखरच अति भाग्यवान आहे की माझ्या राज्यात भगवान बुद्धासारखे सर्वश्रेष्ठ रत्न विद्यमान आहे._*
_बिम्बिसारने गंधारहून आलेल्या व्यापारी मंडळ प्रतिनिधींना विचारले._
_*'तुमच्या देशात बुद्ध, धर्म, संघ यासारखी रत्ने आहेत का ?"*_
_त्यांनी उत्तर दिले, 'नाही महाराज!' बिम्बिसारने विचार केला, तर मग मला असेच रत्न पाठविले पाहिजे की ज्यामुळे माझ्या मित्राचेही कल्याण होईल आणि त्याच्या गणराज्यातील प्रजेलाही त्याचा लाभ मिळेल. आता नुकतेच दुष्काळग्रस्त व व्याधीग्रस्त वैशाली नगरात भगवान जाऊन आले आहेत. भगवान तेथे जाताच दुष्काळाचे सुकाळात परिवर्तन झाले. वैशाली नगरीची सारी आधी व्याधी दूर झाली. लोकांचे लक्ष भगवानांच्या शिकवणुकीकडे आकर्षित झाले. त्यांचे कल्याण झाले. असेच हे बुद्धरत्न गंधार प्रदेशात गेले तर खरोखर त्यांचे मोठेच कल्याण होईल. परंतु तो प्रत्यंत प्रदेश, या मध्य देशापासून इतका लांब आहे की तेथे विहारासाठी जावे अशी भगवानांना प्रार्थना करणे योग्य वाटत नाही._
_भगवानांचे प्रमुख शिष्य सारिपुत्र व महामोग्गलायन यांना देखील तेथे जाण्यासाठी प्रार्थना करणे योग्य होणार नाही. कारण त्यांचा येथील निवास मला अपूर्व लाभदायक आहे. जेव्हा कधी ते कोणत्या जवळच्या प्रत्यंत प्रदेशांत धर्मयात्रेसाठी थोड्या काळासाठी दूर जातात तो संदेशवाहक पाठवून त्यांना आग्रहपूर्वक बोलावून राजगृहास येण्याचे आमंत्रण द्यावे लागते. त्यांच्या अनुपस्थितीची मला फार मोठीच उणीव वाटते. म्हणून त्यांना देखील इतके दूर पाठविणे योग्य होणार नाही. मग काय बरे करावे?_
_लागलीच त्याच्या मनात एक विचार आला की *माझ्या मित्राकडे - गंधारमध्ये धर्म पोहोचेल तर बुद्धच तेथे पोहोचले व संघसुद्धा पोहोचला असेही होईल. अखेर धर्मच असे रत्न आहे जे बुद्धातही आहे व संघातही आहे. म्हणून माझ्या मित्राला उपहारस्वरूप धर्मच पाठवला पाहिजे. बिम्बिसारने हा निर्णय घेतला आणि लगेच धर्म-उपहार पाठविण्याच्या तयारीस लागला. त्याने सोनाराकडून एक फार मोठा लांब सोन्याचा पत्रा बनवला तो दुमडला तर तुटेल इतका पातळ नसावा व एवढा जाडही असू नये की दुमडलाही जाणार नाही.*_
_जेव्हा तसा सुवर्णाचा पत्रा तयार होऊन आला तेव्हा महाराज बिम्बिसार प्रातः कालीन स्नान झाल्यावर स्वच्छ पांढरे साधे कपडे घालून तयार झाला. *कोणत्याही प्रकारची माला, गंध, विलेपन, अलंकार भूषणे वगैरे काहीही धारण न करता अष्टशील व्रत घेतले आणि प्रातः कालीन नाश्ता करून राजमहालातील मोकळ्या व्हरांड्यात येऊन बसला. त्याने एक सोन्याची दंड-शलाक हातात घेतली [लेखणी घेतली] आणि हिंगुळ शेंदूर यांच्या मिश्रणाने बनविलेल्या विशिष्ट रंगाने मोठ्या श्रद्धेने त्या सुवर्णपत्रावर लिहिण्यास प्रारंभ केला.*_
*_'इथे या मनुष्यलोकात तथागत उत्पन्न झाले आहेत. ते भगवान आहेत. अरहंत आहेत. सम्यक सम्बुद्ध आहेत. विद्याचरण संपन्न आहेत. सुगत-सूज्ञ आहेत, लोकांचे ज्ञाते आहेत. लोकांना सन्मार्गाने नेणारे अनुपम-मार्गदर्शक - सारथी आहेत. देव व मनुष्यांचे शासक आहेत. असे हे भगवान बुद्ध!_*
*_त्यांनतर त्याने भगवानांचा जन्म, महाभिनिष्क्रमण, दुष्कर कठीण तपस्या, तसेच बोधिवृक्षाखाली प्राप्त झालेली सम्बोधी-सर्वज्ञता प्राप्ती, त्यानंतर लोक कल्याणाच्या प्रित्यर्थ सुरू झालेली धर्मयात्रा यासंबंधी थोडक्यात लिहिले व सांगितले की, येथे-तेथे तसेच परलोकातही कोठेही तथागताप्रमाणे दुसरे कोणतेही रत्न नाही._*
*_त्यानंतर अत्यंत श्रद्धापूर्वक अंतःकरणाने लिहिले की भगवान सांगतात, त्याची शिकवण अत्यंत सरळपणे व्याख्या केलेली आहे, त्यांत गूढ धर्म रहस्यमय किल्मिष असे काही नाही. ती स्पष्ट आहे. विरहित, अकालिक म्हणजे तात्काळ फळदायक आहे. स्वतः अनुभवण्याजोगी सरळ मुक्तीकडे नेणारी, आणि प्रत्येक समजूतदार व्यक्तीने स्वतः अनुभूती घ्यावी अशी आहे._*
*_नंतर भगवानांच्या उपदेशांची संक्षिप्त व्याख्या करून सदतीस बोधीपक्षीय धर्माचे विवरण दिले व लिहिले की भगवान जेव्हा धर्मशिक्षण देतात आणि त्याचा अभ्यास करून जी समाधि लागते ती केवळ लोकीय- सर्व साधारण समाधि नव्हे तर त्या समवेत इंद्रियातीत फलाची प्राप्तीही होते. निर्वाणाच्या अवस्थेचा साक्षात्कारही होतो._*
*_समाधिमानन्तरिकञ्ञमाहु ।_*
*_या समाधी अवस्थेशी कसलीच तुलना नाही. ह्या समान दुसरी समाधि नाही. जो धर्म सांगितला त्यात हे सुद्धा एक अमूल्य रत्न आहे._*
*_आणि 'संघ' रत्नासंबंधी समजावून देतांना लिहिले की भगवानांचा श्रावक संघ, सन्मार्गी आहे, ऋजूमार्गी आहे, ज्ञान मार्गी आहे. आणि समीचीनमार्गाचा आहे. भगवान त्यांनाच श्रावक संघ मानतात. जे स्रोतापन्न, सकदागामी अनागामी किंवा अरहंत पद प्राप्त केलेले असेच हे श्रावक आहेत. वस्तुतः अशा व्यक्ती परमपूजनीय असतात. यातील कित्येकांनी राजसिंहासनाचा त्याग केला. आहे वा उपराजपदाचा त्याग केला आहे अथवा मंत्री वा सेनापती पदाचा त्याग केला आहे आणि प्रव्रजित झाले आहेत. अशा त-हेने प्रव्रजित होऊन महाशीलाचे पालन करीत इंद्रियांवर स्मृतीचा जागता पहारा देऊन संवर [संयम] करायला शिकले आहेत. आणि आस्रवमुक्त अरहंत अवस्था प्राप्त केली आहे._*
_*त्यानंतर त्याने सोळा प्रकारच्या आनापानस्मृति साधनेची व्याख्या लिहिली.* जेव्हा पत्र समाप्तीची वेळ आली तेव्हा अचानक त्याला एक गोष्ट आठवली की माझ्या मित्राची पूर्वसंचित पुण्याई असेल तर पत्र वाचून त्याच्या मनात प्रबल धर्मसंवेग जागृत होईल. धर्माच्या या सैद्धांतिक बाजूने तो प्रभावित होईल. परंतु धर्माचा परम मुक्तदायिनी मार्ग जी विपश्यना साधना त्याला कशी प्राप्त होणार? मध्यदेश मगधाचे लोक फार भाग्यवान आहेत. कारण ते साक्षात भगवानांकडून ही साधना प्रत्यक्ष शिकतात व माझ्याप्रमाणे सांसारिक जबादाऱ्याही पार पाडतात. परंतु माझा मित्र पुक्कुसातिला हे शक्य होणार नाही._
_त्याने शासनाची जबाबदारी कोणत्यातरी दुसऱ्या योग्य व्यक्तीवर सोपवून स्वतः गृहत्याग करून प्रव्रज्या ग्रहण करणेच त्याच्या हिताचे होईल आणि भगवानांपासून विपश्यना साधना शिकून परममुक्ती निर्वाणाचा साक्षात्कार करून घेईल. हे विचार त्याच्या मनात येताच पत्राच्या शेवटी त्याने-बिम्बिसारने लिहिले, 'जर तुझ्या मनात धर्मसंवेग जागा झाला तर येथे येऊन भगवानांच्याकडून प्रव्रजित होऊन आपली मुक्ती मिळव.'_
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- २४/१०/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_24.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment