🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_अमूल्य भेट : अमृतमय धर्मकथा_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_परंतु आता तो भगवान बुद्ध आणि त्यांनी शिकविलेल्या सांप्रदायिकताविहीन शुद्ध धर्माच्या बाबतीत अनन्य भावाने समर्पित झाला होता. कारण त्याचमार्गाने जाऊन स्वतः सत्याचा साक्षात्कार अनुभवला होता. स्रोतापन्न झाला होता. त्याची श्रद्धा अतूट होती._
_त्या काळातील एक घटना :_
_*रोरुव नगराचा शासक तिष्य.* त्याचे राज्य दूर असल्यामुळे मगधनरेश श्रेणिक बिम्बिसारची व त्याची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. परंतु राजदूतांच्या मार्फत एकमेकांशी पत्रव्यवहाराने संदेश पाठवून तो बिम्बिसारचा परम मित्र बनला होता. त्याला आपला एक चांगला सहाय्यक मानू लागला होता._
_एकदा महाराज तिष्य याने आपल्या न पाहिलेल्या मित्राला, सहाय्यक स्नेह्याला, श्रेणिक बिम्बिसार याला राजदूतामार्फत अत्यंत मूल्यवान जवाहिर रत्नभूषणे यांनी भरलेले ताट सप्रेम भेट म्हणून पाठविले. बिम्बिसार फारच प्रसन्न झाला. अर्थात त्या मोबदल्यात आपल्या मित्रालाही काही उपहार पाठविणे आवश्यक होते. रत्नेआभूषणांचा उपहार पाठविणेच रास्त ठरले असते. पण अशा प्रकारची भेट यापूर्वी अनेकदा पाठविली होती. यावेळी काही. तरी विशेष भेट पाठवणे जरुरीचे आहे असे त्याला वाटले. आता तो बुद्धांच्या चरणी विनम्र झाला होता. लगेच ही गोष्ट त्याच्या लक्षात आली._
_*यं किञ्चि वित्तं इध वा हुरे वा, सग्मेसु वा यं रतनं पणीतं ।*_
_*न नो समं अत्त्थि तथागतेन, इदम्पि बुद्धे रतनं पणीतं ।*_
_*इदम्पि धम्मे रतनं पणीतं । इदम्पि संघ रतनं पणीतं ॥*_
_*- ही जी भौतिक संपत्ती [जड-जवाहर] माझ्याजवळ आहे तशीच माझ्या मित्राजवळही आहे, अथवा स्वर्गात जी याहूनही बहुमूल्य संपत्ति आहे, त्यापैकी त्याही रत्नाशी तुलना करता येणार नाही, असे रत्न भगवान बुद्धांमध्ये आहे. धर्मामध्ये आहे. संघामध्ये आहे. असे सर्वोत्तम रत्न, सर्वांचे मांगल्य करणारे अनुपन रत्न आपल्या मित्राला का बरे पाठवू नये?*_
_म्हणून त्याने एका कुशल कलाकाराला बोलावले. आणि भगवान बुद्धांच्या जीवनावर एक चित्र कथा तयार करवून घेतली. भगवान बुद्ध, जे अरहंत आणि सम्यक् संबुद्ध आहेत, शाक्य वंशाच्या राजघराण्यात जन्माला आले. सत्याचा शोध घेण्यासाठी राजप्रासाद सोडून वनवासी झाले. विविध प्रकारच्या साधना तपःश्चर्या करूनही त्यांना त्यांचे लक्ष्य साध्य झाले नाही. तेव्हा स्वतःच अहर्निश प्रयत्न करून विपश्यना साधना पद्धती शोधून काढली. व त्या पद्धतीने अभ्यास करून सम्यक् संबुद्ध बनले. करुणचित्ताने वाराणसीच्या मृगदाय वनांत धर्मचक्र प्रवर्तन केले आणि मग लोकांवर अनुकम्पा करीत बहुजन सुखाय, बहुजन हिताय, लोककल्याणकारी वृत्तीने राजा आणि प्रजेच्या भलाईसाठी अशा शुद्ध धर्माची प्रज्ञापना करीत आहेत, प्रतिष्ठापना करीत आहेत. जो प्रारंभी, मध्यभागी आणि अंतीही कल्याणकारी आहे असा धर्म केवळ परिपूर्ण, केवळ परिशुद्ध आहे. परिपूर्ण या अर्थाने की शील-समाधी - प्रज्ञा असलेल्या या आर्य अष्टांगिक मार्गात आणखी काहीही जोडण्याची आवश्यकता नाही, कारण यांत कोणतीही उणीव नाही. केवळ परिशुद्ध अशा अर्थानि की यातून काहीही काढावे लागत नाही. कारण या साधनेत किंचितही अशुद्धता नाही. भगवान केवळ शाब्दिक स्तरावरच नव्हे तर अर्थाच्या स्तरावर समजावून चांगल्या प्रकारे विवेचन करतात. केवळ सिद्धांत मांडत नाहीत तर तो व्यावहारिक पातळीवर प्रकाशमान करतात. या ब्रह्माचरणाला, धर्माचरणाला स्वतः आपल्या जीवनात अंगीकारून प्रकाशित करीत असतात._
_असा धर्म जो भल्याप्रकारे सुआख्यात आहे, सांदृष्टिक आहे, ज्यात काल्पनिक मान्यतेला काहीच स्थान नाही, जे अकालिक आहे म्हणजे ज्याचे पालन केल्याने इथेच फळ मिळते. कुणीही यावे, स्वतः अनुभवून पहावे म्हणजे त्याला सहजतेने कळेल की मुक्तीसाठी हा अत्यंत सुलभ मार्ग आहे. प्रत्येक समंजस व्यक्ती स्वतःच याचा अनुभव घेऊ शकते._
_असे आहेत अशा विशुद्ध मार्गावर चालणारे साधकसंय जे स्रोतापन्न, सकदागामी, अनागामी आहेत अथवा अरहंत आहेत. म्हणून पूजनीय आहेत अनुत्तर पुण्यक्षेत्र आहेत._
_असे आहे हे अनुत्तर धर्मशासन! असे आहेत त्या सद्धर्माचे महाकारुणिक शास्ता! आणि असा आहे ह्या शास्त्याद्वारा अनुशासित निर्मळ श्रावक संघ !_
_आणि नंतर एका सुवर्णपत्रावर प्रतीत्य समुत्पादाचा सिद्धांत कोरून काढविला. सहा इंद्रियांचा तत्संबंधी विषयांशी संस्पर्श होताच ज्या संवेदना निर्माण होतात तेव्हा अविद्येमुळे राग-द्वेषमयी तृष्णा जागृत होते. आणि असा दुःखाला प्रारंभ होतो. आपल्याच अज्ञानामुळे त्या दुःखाचे संवर्धन होते. दुसरीकडे विपश्यना साधनेद्वारे या सहा इंद्रियांचा निरोध झाल्याने या इंद्रियांच्या विषयांशी होणाऱ्या स्पर्शाचा आपोआपच निरोध होतो, पूर्ण थांबतो. या इंद्रियातीत, वेदनातीत अवस्थेत तृष्णेचा निरोध होऊ लागतो तर दुःखाचाच निरोध होतो. नवे कोणतेही संस्कार निर्माण होत नाहीत. जुने संग्रहित संस्कार क्षीण होऊन समूळ नष्ट होतात. तेव्हा साधक स्वतःच विमुक्त अवस्था प्राप्त करून घेतो._
_सार्वजनिक, सार्वकालिक, सार्वदेशिक धर्माच्या नियमांचा हा सिद्धांत सुवर्ण पत्रावर कोरवून घेतला. ही चित्रकथा आणि सुवर्णाक्षरांकित पत्र आपला मित्र तिष्य याजकडे पाठवून दिले. ते अनमोल रत्न असल्याने मित्रासाठी अत्यंत कल्याणकारी झाल्याचे सिद्ध झाले._
_जेव्हां तिष्याने हा धर्मरत्न संदेश वाचला तेव्हा त्याच्या मनांत प्रबल धर्मसंवेग जागृत झाला. या जगांत कुणी बुद्ध उत्पन्न झाला आहे आणि मुक्तीदायक शुद्ध धर्म शिकवीत आहे. हजारो लोक त्याचे अध्ययन करीत आहेत व विमुक्त अवस्थेची अनुभूती याच जीवनात घेत आहेत. हा संदेश खरोखरच मोठा प्रेरणादायक होता. तिष्याने आपला राजप्रासाद सोडला. घरदार सोडले. आणि राजगिरीला येऊन भगवान बुद्धांना शरण आला. प्रव्रजित होऊन तो विपश्यना साधना शिकला. कठोर परिश्रम करून अल्पावधितच मुक्त अवस्थेला पोचला. तिष्य स्थविर अरहंतापैकी एक बनला. मुक्त झालेल्या त्या अवस्थेत त्याच्या तोंडून सहजस्फूर्त उद्गार बाहेर पडले._
*_हित्वा सतपलं कंसं सोवण्णं सतराजिकं ।_*
*_अग्गहिं मत्तिकापत्तं इदं दुतिया' भिसेचनं ॥_*
_मूल्यवान कांस्य-पात्राचा आणि बहुमूल्य सुंदर सुचित्रित सुवर्ण पात्रांचा परित्याग करून हे जे मातीचे भिक्षापात्र मी हाती घेतले हाच माझा दुसरा अभिषेक आहे._
_पहिला अभिषेक तो वेगवेगळ्या नद्यांच्या जलाने आणि राजपुष्करिणीच्या जलाने केला गेला होता. तो राज्याभिषेक किती नश्वर आणि निःसत्व होता. परंतु हा दुसरा अभिषेक शुद्ध धर्मामृताने केला गेला आहे, जो किती कल्याणकारी, स्वस्तिमुक्ती प्रदायक सिद्ध झाला आहे._
_*धन्य आहे हा दुसरा अभिषेक! धन्य आहे ही सन्मित्राने पाठवलेली अमूल्य भेट ! धर्माचा उपहार ! किती अर्थपूर्ण! किती फलदायक !*_
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- २३/१०/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_23.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment