Wednesday, 19 October 2022

अभया भव भय मुक्त झाली

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अभया भव भय मुक्त झाली_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

                    _*अभयमातेची एक जोडीदारीण, तिच नाव अभया.* असे दिसते की त्यांचे स्नेहसंबंध फारच घनिष्ट असावेत. त्यामुळे तीसुद्धा *अभयमातेबरोबर उज्जैनीहून राजगिरीला आली आणि प्रव्रजित होऊन भगवानांच्या भिक्षुणीसंघात सामील झाली.*_

                _हे खात्रीने सांगता येत नाही की, अभया कुणी गृहिणी होती अथवा अभयमाताबरोबर व्यवसाय करणारी कुणी गणिका. परंतु *विपश्यना साधना करण्यासाठी अभ्यासातील एक भाग म्हणून तिला राजगिरीतील शीतवन नावाच्या स्मशानात जाऊन शवदर्शन करण्याची आज्ञा दिली गेली आहे.* ह्यावरून असे अनुमान काढता येते की, ती सुद्धा आपल्या मैत्रिणीप्रमाणे कामवासनेच्या विकाराने पीडीत असावी. तिलासुद्धा भौतिक शरीराबद्दल आसक्ती राहिली असावी. संगतीचा परिणाम होणे स्वाभाविक आहे. *अशा साधकांसाठी शरीराबद्दल घृणा आणि निर्वेद भाव जागण्यासाठी स्मशानात प्रेतांचे निरीक्षण करणे लाभदायक ठरते. शवदर्शनासोबतच शरीरदर्शन केल्यानंतर अनित्यबोधिनी विपश्यनेचा अभ्यास सुरळित होऊ लागतो.*_

                    _स्मशानात तिने एक फुगलेले मृत शरीर बघितले आणि तिच्या मनात तीव्र संवेग जागला. आणि तशातच तिला भगवानांची कल्याणी वाणी ऐकू आली. तिला वाटले जणू साक्षात भगवान तिच्यासमोर आहेत आणि समजावीत आहेत._

*_अभये भिदुरो कायो, यत्थ सत्ता पुथुज्जना ।_*

                 _*अभये, बघ हे शरीर किती भंगुर आहे! ह्यात मूर्ख लोक आसक्त रहातात!*_ 

            _भगवानांच्या वाणीने तिच्यात धर्मबळ जागले आणि ती विपश्यनेत दृढतापूर्वक मग्न झाली आणि दृढसंकल्प केला की,_

*_निक्खिपिस्सामि 'मं देहं सम्पजाना सतीमती ।_*

                 *_मी सजगता आणि संप्रज्ञानाच्या आधारे कायोत्सर्ग करीन!_*

                   _आपल्या अविरत पुरुषार्थाद्वारे म्हणजेच अभ्यासाच्या अथक परिश्रमाद्वारे अरहंत अवस्थेला ती प्राप्त झाली. मुक्तीच्या हर्षउल्हासात उदानवचन प्रकट झाले, जे ह्या पुरातन साहित्यात उपलब्ध आहे. त्याच्या आधी वरीलप्रमाणे गाथा गायली आणि त्याच्यानंतर आपल्या विजयाची घोषणा करीत म्हणाली._

_*बहूहि दुक्खधम्मेहि, अप्पमादरताय मे ।*_

*_तण्हक्खयो अनुप्पत्तो कतं बुद्धस्स सासनं ॥_*

                     _- अनेक दुःखांमधून जात जात संप्रज्ञानयुक्त सजगतेद्वारा अप्रमादी राहून मी अंतिमतः तृष्णा नष्ट झालेल्या निर्वाणिक अवस्थेला प्राप्त करून घेतले. अशा प्रकारे मी भगवानांचे शासन म्हणजेच त्यांचा उपदेश पूर्ण ग्रहण केला._ 

                     _स्थविरी अभयानेसुद्धा अन्य स्थविरी भिक्षुणींप्रमाणे पूर्वजन्म जाणण्याची *'स्मृति-सिद्धी'* प्राप्त करून आपले पूर्वजन्म बघितले आणि म्हणाली की ह्या *भद्रकल्पाच्या एकतीस कल्पांपूर्वी अरुणानगरीत मी अरुणराजाची प्रमुखराणी होते. त्यावेळी लोकात भगवान सिखि सम्यक संबुद्ध उत्पन्न झाले होते.* मी एके दिवशी सात नीलकमळांनी त्यांची पादपूजा केली. एकतीस कल्पांपर्यंत देव-मनुष्यात जन्ममृत्यूचे फेरे करीत राहिल्यानंतर त्या पुण्यफळाच्या प्रतापामुळे आता ह्या भगवान गौतमबुद्धांकडून सतिपट्ठान विपश्यना मिळाली. सात बोधीचे अंग परिपूर्ण करण्याची साधना मिळाली आणि स्वतःच्या पराक्रम पुरुषार्थाने मी सगळ्या आस्त्रवांचा क्षय केला. सगळे संस्कार नष्ट झाले आता माझा पुनर्जन्म नाही._

*_नत्थिदानि पुनब्भवो ।_*

                     *_अभया भवबंधनमुक्त झाली. कृतकृत्य झाली. नगरवधु पद्मावतीच्या संगतीमुळे कधी तरी तिने भले वाईट जीवन घालविले असेल परंतु तिच्याच संगतीमुळे आणि आपल्या पूर्वपुण्याईमुळे तिला शुद्ध धर्माची मुक्तिदायिनी विपश्यना विद्या मिळाली, जिच्या आधारे तिने नितांत दुःखविमुक्त अवस्था. वीतराग अवस्था प्राप्त करून घेतली आणि मानवजीवन सफल केले._*

                   *_अशी मांगलिक सफलता सर्वांना मिळो !_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- १९/१०/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_19.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...