🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_दोन टोकांच्या मध्ये मध्यममार्ग_*
*_[ अतिरेक नको ]_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_त्या काळात लोक दोन प्रवाहात वहात होते. *दोन अतिरेकाच्या दोन धारा एक प्रवृत्तीची व दुसरी निवृत्तीची.* पण दोन्ही प्रवाह कमालीचे दूषित झाले होते. प्रवृत्ती मार्गातील लोक, काम-भोग विलासांच्या चिखलात गळ्यापर्यंत रुतलेले होते आणि निष्पाप पशूंच्या हत्या करवून भिन्न प्रकारचे रक्तरंजित यज्ञ धंदेवाईक पुरोहितांकडून करवून घेत आणि असे मानत की यामुळे अग्नि देव, इंद्र, ब्रह्म इत्यादी प्रसन्न होऊन आपल्याला अमरत्व प्रदान करतील. निश्चितच हा मार्ग शुद्ध धर्माच्या विरोधी व पापे वाढविणाराच होता. म्हणून त्याला_
*_हीनो गम्मो पोथुज्जनिको अनरियो अनत्थसंहितो_*
_- म्हटले गेले. म्हणजे हीन, अडाणी, पृथकजनांचा आनार्यांचा अनर्थकारक मार्ग._
_दुसरा मार्ग निवृत्तीमार्ग. त्याने देखील एकांतिक टोक गाठले होते._
*_'अत्तकिलमथानुयोगो दुक्खो अनरियो अनत्थसंहितो'_*
_दुःखदायक आत्मक्लेशांचा मार्ग अनार्यांचा अनर्थ संग्राहक मार्गच बनला आहे. मुक्ती मार्गाला सर्वथैव प्रतिकूल. भगवान बुद्धांनी या दोन्ही एकांतिक मार्गाहून भिन्न असा पुरातन, सनातन मध्यममार्ग स्वीकारला व तोच सर्वांना कल्याणकारक मंगल मार्ग सिद्ध झाला. जे लोक अति एकांतिक मार्गावर सैरभैर भटकत होते, त्यांना मुक्तीचा सन्मार्ग मिळाला. दृढतापूर्वक या सन्मार्गाने जाऊन धर्मासंबंधी निःशंक होऊन मुक्त झाले व त्यांनी आपले कल्याण करून घेतले._
_या संदर्भात भगवानांच्या जीवन कालातील एक श्रवणीय घटना ती अशी :-_
_*जम्बुक नांवाचा एक अत्यंत गरीब घराण्यात जन्मलेला माणूस. युवावस्थेत येताच प्रव्रजित होऊन मुक्ती प्राप्तीसाठी त्याने आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारला आणि चुकीच्या मार्गाने 'मुक्ती' पासून दूरच होत गेला. या आत्यंतिक आत्मक्लेशांच्या मार्गालाच तो 'मुक्ती'चा मार्ग समजू लागला. अत्यंत शारीरिक यातना सहन करणे हाच मनाच्या शुद्धिकरणाचा एक साधना मार्ग समजू लागला.* जीवनाचा अधिकांश वेळ याच मिथ्या मार्गाचा अवलंब करू लागला. पण काहीच फळ त्याच्या पदरी पडले नाही._
_एक दिवस त्याच्या सुदैवाने भगवान बुद्ध त्या मार्गाने जात होते. त्याची दयनीय दशा पाहून त्यांनी त्याला मंगलमय मध्यम मार्गाचा निर्दोष-प्रतिपदाचा उपदेश केला. पूर्व जन्माच्या कोणत्या तरी सत्कर्माचे फळ म्हणून तो उपदेश त्याच्या चांगला पचनी पडला, त्याला मानवला. चुकीचा एकांतिक मार्ग सोडून तो विपश्यना साधनेचा अभ्यास करू लागला. थोड्याच दिवसांत स्रोतापन्नाचे फल प्राप्त झाले. त्यामुळे त्याचा उत्साह आणखीनच वाढला. सातत्याने अखंड साधना करू लागला. योग्य वेळ येताच तो परम विमुक्त अरहंत अवस्थेला पोचला. समस्त सांसारिक दुःख यातनातून नितांत विमुक्त झाला. जीवनाच्या तर सायंकाली-वृद्धावस्थेत जेव्हा शरीरत्याग करण्याची वेळ आली तेव्हा त्याला आपल्या निरर्थक क्लिष्ट जीवनाचा त्याग करून सम्यक् मार्गाने जाऊन विमुक्त होण्याची गतायुष्याची घटना आठवली आणि धर्मासंबंधी कृतज्ञता विभोर होऊन त्या अंतःकाली खालील आनंदोद्गार बाहेर पडले._
*_पञ्चपञ्ञसवस्सानि रजोजल्लमधारयिं ।_*
_पंचावन्न वर्षे पर्यंत स्नान न करता धूळ मातीने शरीर माखीत राहिलो._
*_भुञ्जन्तो मासिकं भत्तं केसमस्सुं अलोचयिं ।_*
_एक एक महिना केवळ एक वेळच बाहेरचे भोजन करीत राहिलो आणि डोक्याचे दाढी मिशांचे केस हातांनी उपटीत राहिलो._
*_एक पादेन अट्ठासिं आसनं परिवज्जयिं ।_*
_आसनाचा त्याग करून इतकी वर्षे दोन्ही हात वर करून एका पायावर उभा राहिलो होतो._
*_सुक्खगूथानि च खादिं उद्देसञ्च न सादियिं ।_*
_अधून मधून सुकी विष्ठा खाल्ली पण कुणाही गृहस्थाचे [भोजनाचे ] निमंत्रण स्वीकारले नाही._
*_एतादिसं करित्वान बहुं दुग्गतिगामिनं ।_*
_अशाप्रकारे अनेक प्रकारची दुःख देणारी कर्मे मी करीत राहिलो._
*_वुय्हमानो महोघेन बुद्धं सरणमागमं ।_*
_अशा प्रकारच्या महादुःखांच्या प्रवाहात असतांनाच भगवान बुद्धांना मी शरण गेलो. - *सरणगमनं परस पस्स धम्मसुधम्मतं।*_
_आणि पहा! या कल्याणकारी शरणागमनाची महत्ता [मोठेपणा] पहा. मुक्तीविधायक धर्माची महत्ता तर पहा!_
*_तिस्सोविज्जा अनुष्पत्ता कतं बुद्धस्स सासनं_*
_मी आम्रवहीन अवस्थेच्या तीनही विद्या प्राप्त केल्या आणि बुद्धांचे शासन पूर्ण केले, म्हणजे त्यांची शिकवण पूर्ण केली._
_*"धन्य बुद्ध ! धन्य शुद्ध धर्म! "धन्य सफल झालेला तो धर्मपथिक!"*_
_याच संदर्भात भगवान बुद्धांच्या जीवन कालातील आणखी एक घटना -_
_*हिमवंतच्या नजिक उत्कट्ट [उत्कृष्ट] नगरांत एका वैभव संपन्न घराण्यात अंगणिक भारद्वाज नावांचा ब्राह्मण जन्मला होता. युवावस्थेपर्यंत अनेक प्रकारच्या लोकीय विद्या आणि शिल्पकलेत म्हणजे हस्तकलेत निष्णात बनला परंतु अकस्मात विरक्तीभाव निर्माण झाल्यामुळे संन्यासी बनून अमरत्व प्राप्तीसाठी तपस्या करण्याकरिता घराबाहेर पडला. शास्त्रोक्त विधिप्रमाणे अनेक प्रकारांनी अग्नीची उपासना केली आणि शारीरिक कष्टावर आधारित क्लेशदायक असे बाह्यतप केले. त्याची अशी समजूत होती की या उपासना मार्गानी चित्ताची निर्मलता वाढेल. संसार बंधनातून मुक्ती होईल. पण तसं घडलं नाही. सुदैवाने भगवान बुद्ध यात्रा करीत त्या प्रदेशातून चालले होते. त्या तरुण तपस्व्याने त्यांचे धर्म प्रवचन ऐकले आणि प्रभावीत होऊन तो त्यांना शरण गेला. प्रव्रजा घेतली आणि विपश्यना साधनेचा विधि शिकला. दीर्घ कालपर्यंत त्याने स्मृति आणि संप्रज्ञान यांचा सतत अभ्यास केला आणि शेवटी अरहंत अवस्थेत पोचला. विमुक्तीच्या सुखाने आनंदविभोर होऊन तो आपल्या जन्मगांवी परतला. आणि आपल्या पूर्वपरिवारातील अशा अनेक लोकांना उत्साहित करून खऱ्या धर्मात प्रतिष्ठित करून देण्यात तो सफल झाला.*_
_निःष्प्राण निर्जीव कर्मकांड आणि आत्मक्लेशयुक्त मिथ्या तप यांच्या खोट्या बंधनात जखडलेल्या अनेक लोकांच्या विषयी अपार करुणा भावनेने प्रेरीत होऊन त्यांना या खोट्या मिथ्या मार्गातून मुक्त करून सन्मार्ग दाखविण्याच्या कल्याणकारी सदिच्छेने भगवान बुद्धाप्रमाणे त्याने भ्रमण यात्रा-चारिक आरंभिली. कुरु प्रदेशातील कुण्डिय नावाच्या भागापासून काहीशा दूर अशा अरण्यातून जात असताना तो उत्तरेकडे वळला तेव्हा एके ठिकाणी त्याने ब्राह्मणांचा एक समूह एकत्र पाहिला. त्यांतील काहीजण त्याच्या पूर्व परिचयातील होते. त्यांनी विचारले, *“भो! भारद्वाज! आपल्याला हे काय सुचलंय ? आपली [ब्राह्मण] परंपरा सोडून तुम्ही ही श्रमण परंपरा का अंगिकारलीत ?*_
_*अंगणिक भारद्वाज त्यांना अत्यंत करुणचित्ताने म्हणाला "भव विमुक्तिसाठी मनाला निर्मल करण्याची आवश्यकता असते. या पूर्वी त्यासाठी या वनात मी अग्नीची उपासना करीत होतो! पण अनेक प्रकारच्या आत्मक्लेशप्रद तपश्चर्या करूनही त्या साऱ्या निरर्थकच ठरल्या. मी त्यात अडकून पडलो होतो कारण मनाच्या शुद्धिकरणाचा योग्य मार्ग मला मुळीच माहित नव्हता. आणि जेव्हा खराखुरा कल्याणकारी मार्ग सापडला तेव्हा मी सर्व त-हेने तृप्त झालो. कृतकृत्य झालो व मानव जीवन सफल झाले."*_
_"मी एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात एका तपोवनातून दुसऱ्या तपोवनात अशा प्रकारचे पोकळ कर्मकांड, आत्मक्लेशदायक तप त्यामुळेच करीत राहिलो. [कारण खरा मार्ग सापडला नव्हता. ]_
_*तं सुखेन सुखं लद्धं पस्स धम्मसुधम्मतं ।*_
_*तिस्सो विज्जा अनुप्पत्ता कतं बुद्धस्स सासनं ॥*_
_विपश्यनेचा विशुद्धि-मार्ग शारीरिक क्लेशदायक तपाचरणापेक्षा तौलनिक दृष्ट्या अत्यंत सुखद मार्ग आहे. साधकाने एकांतिक टोकाचा मार्ग सोडून सुखाचा मध्यम मार्ग स्वीकारला की परम सुखमय निर्वाण पदाची प्राप्ती त्याला होते. म्हणून म्हणतोय की, 'मी सुखाच्या मार्गाने परम सुखास पोहोचलो. पहा धर्माचे महात्म्य कसे आहे! मी मुक्तीच्या तीन विद्या उपलब्ध केल्या आणि भगवान बुद्धांचे शासन स्वीकारले, पूर्ण केले. त्यांनी दिलेले सर्व शिक्षण प्रारंभापासून अंतापर्यंत आचरणात आणले आणि जीवनाचे उद्दिष्ट गाठले.'_
_त्यानंतर सत्यदर्शी ब्राह्मण भारद्वाज आपल्या निर्मल अंतःकरणाने लोककल्याणासाठी उद्घोषणा करतांना म्हणतो :_
*_ब्रह्मबंधु पुरे आसिं इदानि खो 'म्हि ब्राह्मणो_*
*_तेविज्जो न्हातको चम्हि सोत्थियो चम्हि वेदगू ॥_*
*_प्रथम मी फक्त नावाचा ब्राह्मण होतो. ब्राह्मणी नावाच्या आईच्या पोटी जन्मलो म्हणून मी स्वतःला अहंकाराने ब्रह्मबंधु म्हणत होतो. परंतु आता माझा नवा जन्म झाला आहे. त्या भगवान सम्यक् सम्बुद्धाच्या अंतःकरणातून निर्माण झालो, आणि त्यांचा औरस पुत्र आहे जे की ब्रह्मकाय, ब्रह्मभूत आहेत. धर्मभूत आहेत, धर्मकाय आहेत. धर्माने मला नवा जन्म दिला आहे. आता मी धर्मनिर्मित आहे. ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्मजीवन जगत आहे म्हणून अर्थानि ब्राह्मण झालो आहे._*
*_प्रथम केवळ तीन वेदांचे ग्रंथ वाचल्याने फक्त नावाचा त्रिवेदी होतो. परंतु आता तीनही विद्यांना पूर्णपणे आत्मसात करून खऱ्या अर्थाने त्रिवेदी आहे. केवळ दिव्य दृष्टी आणि पूर्वजन्मांची स्मृतीच नव्हे तर त्या दोहोंहूनही उन्नत विद्या - तिसरी विद्या आम्रवक्षयाचा पूर्ण साक्षात्कार घडवून आणणारी विद्या प्राप्त झाल्यामुळे खराखुरा त्रिवेदी झालो आहे._*
_"पहिल्यांदा तर कोणत्याही नदीत स्नान केल्याने अथवा एकाद्या धर्म शास्त्राचे पारायण करून स्वतःला स्नातक म्हणवत असे. केवळ नावाचा स्नातक होतो परंतु आता पवित्र धर्मगंगेत अवगाहन केल्यामुळे राग, द्वेष, मोह इ. वासनांचे निर्मूलन-प्रक्षालन करून अक्षय निर्वाणाच्या मुक्ती महासागरांत बुडी घेतल्यामुळे खन्या अर्थाने स्नातक बनलो आहे."_
_'श्रुति-स्मृती ग्रंथांचे वाचन केल्यामुळे मी स्वतःला श्रोत्रिय म्हणवत असे पण आता मुक्ती मार्गाच्या प्रवाहात येऊन पूर्णपणे मुक्त झालो आहे. म्हणुन खरा श्रोत्रिय झालो आहे._
_“वेदांचे अध्ययन-पारायण करून स्वतःला नावाने वेदगू म्हणवत होतो. पण आता स्ववेदनांच्या आधाराने आत्मज्ञान जागवून आपल्या मनावरील किल्मिषे दूर करून संपूर्ण इंद्रिय जगतच नव्हे इंदियातीत अनंत अक्षय परमसत्व स्वानुभूतीच्या आधारे जाणून संवेदनांच्या आधारे वेदनांच्या पार झालो. म्हणजे वेदपारगू, अर्थातच वेदगू झालो आहे."_
_"म्हणून तर म्हणतो आहे की आधी मी केवळ नाममात्र होतो. पण आता तसा नाही. खरा ब्राह्मण, त्रैविद्य, स्नातक, श्रोत्रिय आणि वेदगू आहे."_
_धन्य आहे तो खरा ब्राह्मण, खरा त्रिवेदी, खरा स्नातक! धन्य आहे तो खरा श्रोत्रिय आणि खरा वेदगू! धन्य आहे योग्य साधनेचा योग्य सफल साधक !!_
यावे. साधकांनो आपण देखील असेच खरेखुरे ब्राह्मण, त्रिवेदी, स्नातक, श्रोत्रिय, वेदगू बनून संसार चक्राच्या भोवऱ्यांतून पूर्ण मुक्त होऊन आपले कल्याण करून घेऊ या._
*_कल्याणकारी मार्ग सर्वांना लाभो !_*
*_मुक्तीदायिनी प्रेरणा सर्वांत जागृत हावो.._*
*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- १७/०९/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/09/blog-post_17.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment