Thursday, 4 August 2022

भगवान बुद्ध आणि शास्त्रज्ञ

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_भगवान बुद्ध आणि शास्त्रज्ञ_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

             _भौतिक सत्य बदलत असते. याची अनुभूति भगवान बुद्धांनी स्वनिरीक्षण करीत असताना घेतली. *आपल्या मनाच्या तीक्ष्ण एकाग्रतेने, बुद्धांनी आपल्या मनाच्या खोलीत शिरून सत्याचा तळ गाठला. त्यात त्यांना असे आढळले की, आपले शरीर हे लहान लहान परमाणूंचे बनलेले आहे. ते परमाणूसारखे उत्पन्न व नष्ट होत असतात. हाताची चुटकी वाजेपर्यंत किंवा डोळ्याची पापणी लवेपर्यंत त्यातील प्रत्येक परमाणू शत सहस्त्र कोटी [एकावर बारा शून्ये,] इतक्या वेळा जन्मतो व मृत्यू पावतो असे त्यांना आढळले.*_

          _ज्यांना शरीरासंबंधीचे वरवरचे सत्य बघण्याची सवय आहे, ज्यांना शरीर नित्य व अगदी मजबूत वाटते, त्यांना तर हे अविश्वसनीयच वाटेल. आपल्याला तर 'शत सहस्त्र कोटी' हा वाक्प्रचार म्हणजे शब्दश: सत्य नसून, एक वाक्प्रचार वा म्हणच वाटलं. पण अलीकडेच आधुनिक शास्त्रज्ञांनी तो वाक्प्रचार शब्दशः खरा असल्याचा शोध लावला आहे. हे विधान पूर्ण खरे असल्याची ग्वाही दिली आहे._

       _*काही वर्षांपूर्वी एका अमेरिकन शास्त्रज्ञाला भौतिकशास्त्रातले नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी फार काळ भौतिकशास्त्राचा, जगाचे मूळ घटक असणाऱ्या परमाणूंचा त्यांच्या गुणधर्माचा अभ्यास केला. त्यावर वेगवेगळे प्रयोग केले. त्यावेळपर्यंत हे परमाणू कण अखंडपणे, प्रचंड वेगाने उत्पन्न व लय पावत असतात हे ज्ञात झालेले होते. ह्या शास्त्रज्ञांनी या परमाणूंची एका सेकंदात होणारी उत्पत्ती व लय मोजण्याचे एक यंत्र शोधून काढले. त्यांनी ह्या यंत्राचे 'बुडबुड्यांची खोली' असे अगदी योग्य नामकरण केले, आणि एका सेकंदात हा भौतिक परमाणू "दहावर बावीस शून्ये' इतक्या वेळा उदय व लय पावतो हे दाखवून दिले.*_

      _*भगवान बुद्धांनी शोधलेले सत्य व त्या शास्त्रज्ञांनी शोधलेले सत्य अगदी तंतोतंत बरोबर जमते हे खरे आहे ना? पण त्या दोघांत किती फरक पडला. काही अमेरिकन विद्यार्थ्यांनी भारतातील प्रशिक्षण पूर्ण करून मायदेशी परतल्यानंतर त्या शास्त्रज्ञांची भेट घेतली होती. त्यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते की, ह्या शास्त्रज्ञांनी भौतिक जगतातील अंतिम सत्याचा शोध लावून सुद्धा ते मुक्त झालेले नाहीत. त्यांच्याजवळ आपणा सामान्य माणसाजवळ असणाराच सर्वसाधारण दुःखाचा साठा आहे. आपल्या इतकेच तेही दुःखी आहेत.*_

          _नाही, हे शास्त्रज्ञ ज्ञानी झाले नाहीत. ते दुःखमुक्त पण झाले नाहीत. याचे प्रमुख कारण, त्यांना स्वानुभवावर स्पष्ट सत्याची प्रचीती झाली नाही. त्यांना जे काही समजले, ते बुद्धीच्या कक्षेतील ज्ञान होते. त्यांनी ह्या सत्यावर विश्वास ठेवला, कारण, त्यांनी तयार केलेल्या साधनावर त्यांचा भरवसा होता. पण त्यांनी स्वतःच सत्याचा अनुभव घेतला नव्हता. फरक पडला तो ह्यामुळेच!_

         _आपण कोणीही ह्या व्यक्तींच्या किंवा आधुनिक शास्त्राच्या विरोधात नाही, तथापि एखाद्याने फक्त बाह्य जगातले शास्त्रज्ञ होऊ नये, तर भगवान बुद्धांसारखे अंतः सृष्टीच्या सत्याचा स्पष्ट अनुभव घेण्यासाठी अंतर्जगातील शास्त्रज्ञ व्हावे. स्वानुभवाने सत्याचे ज्ञान झाल्यावर आपोआपच आपल्या मनाची, सवयीने चालत आलेली विचारपद्धती बदलून, सत्यावर आधारित जीवनपद्धतीचा स्वीकार ते मन करील आणि त्याची प्रत्येक क्रिया ही त्याच्या व इतरांच्या भल्याकडेच नेणारी ठरेल._

           _अशा प्रकारच्या अंतर्ज्ञानाचा अभाव असल्यास शास्त्राचा उपयोग विनाशासाठी करण्याची बुद्धी होण्याची शक्यता असते. पण जर आपण आपल्या अंतर्विश्वाचे शास्त्रज्ञ होऊन सत्याचा ठाव घेऊ लागलो तर ते शास्त्र, ते संशोधन आपल्या व जगाच्या कल्याणाचे व मंगलतेचे साधन होत राहील हे निश्चित!_

*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जगण्याची कला_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०४/०८/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/08/blog-post_80.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...