Wednesday, 29 June 2022

बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव आणि गांधीजींची तीन माकडे

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_गांधीजींच्या तीन माकडांवर बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

     _भारतीय लोकांच्या मनावर गांधी तत्त्वज्ञानाचा खुप मोठा प्रभाव आहे आणि त्यातल्या त्यात गांधीजींनी सांगितलेल्या तीन माकडांच्या तत्त्वज्ञानाचाही प्रभाव जनमानसात आजही आहे. गांधीजींची तीन माकडे खुप मोठे तत्त्वज्ञान सांगतात जसं की, वाईट ऐकू नये, वाईट बोलू नये आणि वाईट बघू नये. *पण प्रत्यक्षात ही तीन माकडे ही गांधीजींची स्वतःची स्वकृती नाही तर ती त्यांनी जपानमधील एका बुद्ध विहारातून या तीन माकडांचे प्रतिकात्मक रूप घेतले आहे.*_

            _*जपानमधील निक्को शहरातील शिन्टो विहाराच्या भिंतींवर या तीन "माकडांच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत. ही तीन माकडे झेन गुरूंच्या उपदेशांचे भाग होते.* ज्याप्रमाणे बुद्ध धम्म चीनमध्ये लाओस्ते ताओ यांच्या सह जुळून मोठा झाला त्याचप्रमाणे जपानमध्ये शिन्टो मत यांच्या सह जुळून मोठा झाला. भगवान बुद्धांनी एक वर्षावास जंगलातील प्राणी पक्षांसोबत केला होता. त्यांची करुणा-मैत्री प्राणीमात्रांविषयी होती. पशु योनीमध्ये भटकणाऱ्या प्राण्यांवर दया करण्यासाठी तथागतांनी जंगलात वर्षावास केला. *एका अख्यायिकेनुसार तथागतांनी सांकेतीक भाषेत जंगलातील प्राण्यांना पशुयोनीतून मुक्त होण्याचे उपाय सांगितले.* सांकेतिक भाषेतून कानावर हात ठेवून सांगितले की वाईट ऐकू नये, तोंडावर हात ठेवून सांगितले की आणि डोळ्यावर हात ठेवून सांगितले की वाईट बघू नये. त्यांनी या सांकेतिक भाषेतून - खुणांतून माकडांना शील पालनाचा उपदेश केला. *ही अख्यायिका भारतातून प्रवास करीत करीत चीनला पोहोचली आणि तिकडे पोहोचून कन्फ्युशियसच्या शिकवणुकीचा भाग बनली, त्यांनतर चीनमधून प्रवास करीत करीत ही अख्यायिका जपानमध्ये पोहोचून तेथील बौद्ध गुरूंच्या शिकवणुकीचा एक घटक बनली. अशाप्रकारे ही तीन माकडे जपानच्या शिन्टो विहाराच्या भिंतीवर प्रतिकात्मकरित्या कोरली गेली.* १६-१७ व्या शतकात जपानमधील बुद्धानुयायी सम्राट तोकुगाव लेयासू यांच्यावर तीन माकडांच्या प्रतिकांचा खूप प्रभाव होता. त्यांच्या निधनानंतर लोकांनी त्यांच्या समाधीच्या परिसरात मुख्य दारावर या तीन माकडांच्या प्रतिकृती बनवल्या._

*जपानी भाषेत या माकडांना कीकाजारू, मीजारू, ईवाजारू म्हणतात.*  

    १) ज्या माकडाने कानावर हात ठेवले आहेत ते किकाजारू, 

    २) डोळ्यावर आहे ने मीजारु आणि 

    ३) तोडावर हात ठेवला आहे ते ईवाजारू.

१६ व्या शतकातील शिन्टो चैत्य, विहार आज युनेस्कोच्या जागतीक वारसामध्ये सामावलेले आहे. शिन्टो चैत्याच्या भिंतीवरील कोरलेले तीन माकडे भारतातील गांधीजीचे तीन माकडे झाले यावरून गांधीधींवर बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव दिसून येतो.

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_महेश कांबळे_*

*२९/०६/२०२२*

*संदर्भ : -*

*१) मैत्री संपूर्ण धम्म आहे*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/06/blog-post_29.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼



Thursday, 16 June 2022

जातक

 *जातक* 


जातक हा सुत्तपिटकाच्या खुद्दकनिकायातील दहावा ग्रंथ आहे. इतिहास, वाड़्मय आणि धम्माच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण ग्रंथ आहे. ह्या मध्ये भगवान बुद्धांच्या पूर्व जन्मासंबंधीच्या गाथा आहेत. जातक शब्दाचा अर्थच आहे जन्मासंबंधी. जातक कथा २२ निपांतामध्ये विभक्त झालेल्या आहेत. ज्या मध्ये १५०, १००, ५०,५०, २५, २०,२१,१०,१२,१६,९,१०,१०,१३, १४,१०,५,३,२,२,५,१० या क्रमानुसार ५४७ जातक गाथेच्या स्वरूपात आहेत. या जातकाचे विस्तृत वर्णन जातकट्ठकथा मध्ये केलेले आहे. *जातकट्ठकथेशिवाय  या जातकांच्या गाथांचा अर्थ स्पष्ट होत नाही.* त्यामुळे जातक कथा समजून घेण्यासाठी जातकट्ठकथा सुध्दा अभ्यासाव्या लागतात. 

जातकट्ठकथांमध्ये जातक कथेच्या प्रारंभापूर्वी निदान कथा येतात. या निदान कथांमध्ये तथागतांच्या जिवन चरित्राबरोबर त्यांच्या पूर्वीच्या २४ बुद्धांचे जिवनचरित्र येते. 

जे बुद्धवंस या ग्रंथातून घेण्यात आले आहे. 


प्रत्येक जातक कथा चार भागांमध्ये विभक्त आहेत. 

१. पच्चुपन्नवत्थु 

२. अतीतवत्थु

३. अत्थवण्णना 

४. समोधान 


*पच्चुपन्नवत्थुचे* तात्पर्य आहे वर्तमान कथा./अर्थात भगवान बुद्धांच्या समयीच्या घटना. 

*अतीतवत्थुचे* तात्पर्य आहे भगवान बुध्दांव्दारा सांगितलेल्या पूर्वजन्माच्या कथा. 

*अत्थवण्णनाचे* तात्पर्य आहे जातकातील गाथांच्या व्याख्या ज्यामध्ये गाथांचे शब्दार्थ आणि त्यांच्या विस्तृत व्याख्या असतात. 

*समोधान* शेवटी येते ज्यामध्ये भगवान बुद्ध सांगतात की पूर्वजन्मामध्ये कथेच्या मुख्य पात्रात कोण होते ? आणि ते स्वयं त्या कथेत कोणत्या योनित उत्पन्न झाले होते ? 


संपूर्ण जातकट्ठकथा तीन भागांत विभक्त आहे. 

१. दूरे निदान 

२. अविदूरे निदान 

३. सन्तिके निदान 


*दूरे* निदानात बोधिसत्व सुमेध तपस्वीच्या जन्मात भगवान दिपंकरच्या समयी बुद्धत्व प्राप्तीसाठी प्रार्थना करण्याच्या वेळेपासून वेस्सन्तराचे शरीर सोडून तुषित स्वर्गात उत्पन्न होईपर्यंतच्या कथा आल्या आहेत.

*अविदूरे* निदानात तुषित लोकांतून महामाया देवीच्या गर्भात उत्पन्न होउन बुद्धत्व प्राप्ती पर्यंतच्या कथा आल्या आहेत.

आणि *सन्तिके* निदानात त्या त्या स्थानांचा उल्लेख आला आहे, जिथे जिथे भगवान बुद्धांनी विहार करतेसमयी काही जातक उच्चारले आहेत. 


जातक कथा एक ते नऊ *निपात* वग्गात विभक्त आहेत. ह्या वग्गांमध्ये काहींचे नाम त्या वग्गांच्या अगोदर जातकानुसार आहे. 

जसे की.. अपण्णक वग्ग 


काहींचे नाम त्या वग्गात आलेल्या विषयानुसार आहे. 

जसे की .. इत्थीवग्ग 

परंतु त्या इत्थीवग्गात ( = स्त्री वर्ग ) कुदाल पण्डिताची कथा आहे. ज्याचा इत्थिवग्गाशी काही संबंध नाही. 


ह्या ग्रंथाचे जे महत्व आहे ते जातकट्ठकथेच्या अध्ययनाने ज्ञात होते. त्याच्या प्राचीनतेचे उदाहरण आज सुध्दा भरहुत, सांची इत्यादि स्थानांवर चित्तारलेल्या जातक कथांमध्ये आहे. 


जातक कथांचा मुख्य उपदेश जरी धम्म उपदेश असला तरी त्यातून भारताचे इसवी सन पूर्व सहाव्या शतकातील सामाजिक, आर्थिक, भौगोलिक व ऐतिहासीक परिस्थितीचे दर्शन होते. 


पूज्य भदन्त आनन्द कौसल्यायन यांनी त्यांच्या हिंदी जातकात जातक कथेच्या उपयोगितेसंबंधी उल्लेख करताना असे लिहिले आहे की - 

*यदि मनोरंजन के साथ साथ उपदेश ग्रहण करना हो, यदि ह्रदय की अपार तथा शुध्द बनाने वाली कथाओंके साथ साथ बुद्धीको प्रखर करनेवाली कथाएं पढनी हो, यदि अपने देश की प्राचीन आर्थिक, धार्मिक,राजनितिक तथा सामाजिक अवस्थासे परिचित होना हो तो हम जातक कथाओंसे बढकर किसी दूसरे साहित्यकी सिफारिश नही कर सकते।* 


जातक साहित्य ( वाङ्मय ) खऱ्या अर्थाने  लोकवाङ्मय आहे. ह्या मध्ये आपले उठणे, बसणे, खाणे पिणे, अंथरणे इतक्या साधारण गोष्टींपासून ते आपली शिल्पकला, कारागिरी, व्यापारनिती, अर्थनिती, राजनिती व आपल्या सामाजिक संघटनेचा विस्तृत इतिहास आहे. 

त्या काळातील भूगोल या विषयी पर्याप्त माहिती उपलब्ध आहे. विशेषकरून त्या काळातील जलमार्ग व पथमार्थ. 

*भारतीय जिवनाचा असा कोणताच पैलू नाही की ज्याचे उल्लेख जातक कथेत मिळत नाही.*


जातकांच्या अनेक कथा त्रिपिटकाच्या अन्य ग्रंथांत सुध्दा मिळतात. 


चरियापिटकाच्या सर्व कथा या जातकांतूनच घेतल्या आहेत. 


*लेखक*- भिक्षू धर्मरक्षित 

पालि साहित्य का इतिहास ( हिंदी )


*भाषांतर* - अरविंद भंडारे 

पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई

16 जून 2018

Thursday, 9 June 2022

अनाथपिंडकाचा पुत्र काळ

 *_अनाथपिंडकाचा पुत्र काळ_*


एक मोठा दानी होता होता. त्याचे नाव होते, 'अनाथपिंडक.' तो अनाथांचा मोठा आधार होता. लोकांना तो मनापासून आधार देत होता. त्याला काळ नावाचा पुत्र होता. अनाथपिंडक सदैव भगवान बुद्धांचा उपदेश ऐकण्याकरिता जात असे. परंतु काळ केव्हाच बुद्धांचा उपदेश ऐकण्यास गेला नाही. 


*_'काळ' शब्द देखील सुंदर आहे. 'अनाथपिंडक' याचा अर्थ होतो. देणारा, दान देणारा, अनाथांना सनाथ करणारा. आणि 'काळ' याचा अर्थ होतो 'वेळ' किंवा 'मृत्यू'. ना 'वेळ' बुद्धांचा उपदेश ऐकायला जात होता ना 'मृत्यू'. कारण दोघे ही बुद्धांना घाबरतात. वेळ क्षणभंगुर आहे. शाश्वता जवळ जाण्यास घाबरणारच. मृत्यू तर जीवनासमोर टिकूच शकत नाही. तुम्ही तर मृत्यूला सामोरे जाऊच शकत नाही. बुद्ध पुरुषांसमोर जाण्यास मृत्यू घाबरतो. ही बुद्धांची महानता आहे._* 


बापाला वाटत होते मुलाने बुद्ध प्रवचन ऐकावे परंतु मुलगा जुमानत नव्हता. एकदा अनाथपिंडक म्हणाला, 'जर तू बुद्ध प्रवचन ऐकावयास गेलास तर मी तुला शंभर सुवर्ण मुद्रा देईन. 'पैशाच्या लालसेने तो गेला. त्याने बुद्ध प्रवचन ऐकले, परत आला. आल्या बरोबर म्हणाला 'कोठे आहेत शंभर सुवर्ण मुद्रा ? प्रथम त्या द्या ! नंतरच भोजन करेन. कारण माझा कोणावरही विश्वास नाही. सुवर्णमुद्रा मोजल्यावरच तो जेवला. तो तर त्याच्याकरिता गेला होता. त्याला बुद्धांशी काही देणे - घेणे नव्हते. जेव्हा तो बुद्धांचे प्रवचन ऐकत होता तेव्हा तो मनात सुवर्णमुद्रा मोजत होता. विचार करत होता वडील देतील की नाही की बुद्धांकडे जाण्यासाठी काही चालबाजी तर केली नाही ना ? बुद्धांजवळ पाठविण्याचा बहाणा तर केला नाही ना ? 


दुसऱ्या दिवशी अनाथपिंडक आपल्या मुलाला म्हणाला, 'आज हजार सुवर्णमुद्रा देईन परंतु एक अट आहे की बुद्ध प्रवचन केवळ ऐकायचेच नव्हे तर ते सर्वच्या सर्व मला जसेच्या तसे पुन्हा सांगायचे. 


हजार सुवर्णमुद्रा डोळ्यासमोर नाचू लागल्या. बेटा गेला खरा, परंतु फसला ! जसेच्या तसे लक्षात ठेवण्याने गडबड केली. ध्यान देऊन एकाग्रतेने ऐकावे लागले. लक्षात ठेवायचे होते. शब्द न शब्द आठवावा लागला की चूक होऊ नये. कारण बाप पक्का बाप होता. काही चूक झाल्यास एक हजार सुवर्णमुद्रातून तो काही मुद्रा वजा करेल. त्यामुळे तो मन लावून ऐकत होता. शब्द नी शब्द तो मनात साठवत होता. क्षणात तो हजार सुवर्णमुद्रा विसरला. आणि इथेच फसला. घोटाळा झाला. तो खोल बुडाला. 


घरी गेलाच नाही. रात्र झाली अनाथपिंडक धावत आला. भानगड काय झाली ? 

काळ तर डोळे बंद करून बसला होता. वडील म्हणाले, 'घरी चल.' 


काळ म्हणाला, 'ऐकलं, आता कोठे येणे, आणि कोठे जाणे.' 


अनाथपिंडक म्हणाला, 'एक हजार सुवर्णमुद्रा तुझी वाट पाहत आहेत.' 


काळ म्हणाला. 'तुम्हीच आता त्या संभाळून ठेवा. ह्या कालच्या शंभर मुद्रा ज्या तुम्ही दिल्या होत्या त्या देखील परत घेऊन जा.' 


अनाथपिंडक आश्चर्यचकित झाला. कारण तो ही बुद्धांना सतत ऐकत आला होता. बुद्धांचे प्रवचन ऐकून दान देखील देत होता. परंतु त्याने असे कधी ही ऐकले नव्हते जसे आज त्याच्या पुत्राने ऐकले. 


अनाथपिंडक म्हणाला, 'हे फारच झाले, मला वाटले तू प्रवचन ऐकशील, परत येशील, थोडा समजूतदार बनशील, धार्मिक होशील, प्रतिष्ठा वाढेल. परंतु हे फारच झाले. सांग, काय इरादा आहे, तुझे काय मत आहे ? 


काळ म्हणाला, कसला इरादा, कसले मत ! सगळं संपलं आहे. मी भगवान बुद्धांचा झालो आहे. बुद्ध माझ्या अंतरंगात उतरले आहेत. 


अनाथपिंडक बुद्धांना म्हणाला, 'ही काय भानगड आहे ? मी अनेक वर्षांपासून तुमचा उपदेश ऐकतोय. या माझ्या मुलाने तुम्हाला फक्त दोनच वेळा ऐकले. ते देखील पैशाच्या लालसेने. 


*_तथागत म्हणाले, 'हा तुझा पुत्र तुझा राहिला नाही. तो माझा पुत्र झाला आहे. ज्यांनी मला खऱ्या अर्थाने ऐकले ते माझे झाले आहेत. आता हा माझा पुत्र आहे. तो तुझा आहे हा दावा तू करू शकत नाहीस. तू1 त्याला चक्रवर्ती राजाची संपत्ती दिलीस तरी तो परत घरी येऊ शकणार नाही._*


अनाथपिंडक म्हणाला, 'याला काय झाले आहे ?'


*_बुद्ध म्हणाले, 'तो सोतापन्न झाला आहे. तो ध्यानाच्या सरितेत उतरला आहे._* 


या प्रसंगी तथागतांनी ही गाथा कथन केली...

*_पठव्या एकरज्जेन सग्गस्स गमनेन वा ।_* 

*_सब्ब लोकधिपच्चेत सोतापत्तिफलं वरं ।।_*


*'पृथ्वीचा एकटा राजा होण्यापेक्षा, स्वर्गात प्रवेश करण्यापेक्षा किंवा सर्व लोकांचे अधिपती होण्यापेक्षा हे सोतापत्ति - फल सर्व श्रेष्ठ आहे.'*


एस धम्मो सनंतनो 

प्रवचन 67

PRI

Tuesday, 7 June 2022

आर्यसत्य सत्य आहे

 *_आर्यसत्य सत्य आहे._*

इमानि खो, भिक्खवे, चत्तारि अरियसच्चानि, तथानि, अवितथानि, अनञ्ञथानि, तस्मा 'अरियसच्चानी'ति वुच्चन्ति ।

( संयुक्त निकाय ३.५.१०९७ तथसुत्त ) 


*_अर्थ :- भिक्खुंनो, ही चार आर्यसत्य तथ्य आहेत. असत्य नाहीत, किंवा अन्य काही नाहीत, म्हणूनच त्यांना आर्यसत्य म्हटले जाते._* 


ही सत्यापासून वेगळी नाहीत. कोऱ्या कल्पना नाहीत. कोणा संप्रदायाची अंधविश्वासाने बरबटलेली मान्यता नाही. हे जीवनातील असे सत्य आहे ज्याचा साक्षात्कार कोणत्याही संप्रदायातील कोणताही व्यक्ती करू शकतो व परिणामी तो भवमुक्त होऊ शकतो. या चार आर्यसत्यांचा अंतिम लाभ म्हणजे दुःखनिरोध आर्यसत्य आहे. हेच इंद्रियातीत निर्वाण आहे ज्याचा प्रथम साक्षात्कार होताच सोतापन्न अवस्था प्राप्त होते व साधक अनार्यातून आर्यपद प्राप्त करतो, मग तो कोणत्याही जाती, वर्ण, गोत्र व संप्रदायाचा असला तरीही.  ज्या सत्याच्या साक्षात्काराने कोणताही व्यक्ती आर्य बनू शकतो, त्याला आर्यसत्य म्हणणे उचित आहे. 


लोके.... तथागतो अरियो, तस्मा 'अरियसच्चानी'ति वुच्चन्ति ।

( संयुक्त निकाय ३.५.१०९८, लोकसुत्त ) 

*_अर्थ :- लोकांत तथागत आर्य आहेत. त्यामुळेच त्यांनाही आर्यसत्य म्हटले जाते._* 


जे स्वतः आर्य असतील व ज्या अनुभूतीजन्य सत्यांना प्रकाशमान करेल / प्रचार करेल ते ही आर्यसत्यच म्हणवले जातील. 

या युगात, मिथ्या कल्पनांना सोडून सत्याच्या मार्गावर चालून तथागतच पहिले व्यक्ती जे आर्य बनले. इतरांनी याच सत्याचे दर्शन करून त्याचे अनुसरण केले व ते ही आर्य बनले. 


इमेसं खो, भिक्खवे, चतुन्नं अरियसच्चानं यथाभूतं अभिसम्बुद्धत्ता तथागतो 'अरहं सम्मासम्बुद्धो'ति वुच्चति ।

( संयुक्त निकाय ३.५.१०९३ सम्मासम्बुद्धसुत्त)


*_अर्थ :- या चार आर्यसत्यांचे यथाभूत दर्शन करूनच तथागत सम्यक सम्बुद्ध म्हणविले जातात._*


#संदर्भ :- तिपिटक में सम्यक संबुद्ध

हिंदी - मराठी अनुवाद - अरविंद भंडारे 

26/07/2020

बुद्ध पूजेत कच्चा धागा, पाणी आणि वृक्षाची पाने यांचे महत्त्व

 पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. 


बुद्ध पूजेत कच्चा धागा, पाणी आणि वृक्षाची पाने यांचे महत्त्व.


जेव्हा आपण बुद्ध पूजा करतो तेव्हा बुद्ध वंदना आपण पालि भाषेत असलेल्या गाथांमधून उच्चारतो. 

बुद्ध वंदना पालि भाषेत उच्चारताना कंपन ( ध्वनी लहरी )तयार होतात. 


पालि बुद्ध वंदनेला Rhythm / ताल लावण्याची काही गरज नसते. 

पालि भाषेतील बुद्ध वंदनेला स्वतःचीच एक Rhythm आहे. 


उदा. नमो तस्स भगवतो अरहतो 

ही पूर्ण गाथा उच्चारून पहा. 


ती बुद्ध वंदना किंवा इतर गाथा जेव्हा एखादा शीलवान भिक्खू अथवा उपासक उच्चारतो तेव्हा ती सहजपणे तुमच्यापर्यंत ( शरीरपर्यंत / मनापर्यंत ) पोहचावी हा उद्देश असतो. त्याचा दुवा म्हणून कच्चा धागा वापरला जातो. 


कच्चा धागा कंपन / ध्वनी लहरी कशा वाहून नेतो याचे शास्त्रीय कारण 

लहानपणी आपण 2 काडेपेटीतील आतल्या भागाला धागा जोडून आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला असाल. 


तांब्यात / माठात पाणी का घेतात याचे शास्त्रीय कारण पुढील लिंकवर जाऊन पहा. 


तुमचे शब्द / गाथा पाण्याला कश्या चिकटतात याचे उदाहरण


https://spiritualityhealth.com/blogs/heart-health/2015/06/04/bess-oconnor-16-ways-change-your-vibration-water


आता राहिला प्रश्न पिंपळाची पाने का वापरतात ? 


पिंपळाचीच नाही तर कोणतीही त्या आकारातील ( तेवढी मोठी ) पाने चालतात. 

अगदी नागवेलीची सुद्धा. 


झाडाची पाने ही तांब्यातील / माठातील पाण्यात antenna ( अँटेना ) चे काम करतात. 

पाना द्वारे ध्वनी लहरी पकडून त्या कच्च्या धाग्याद्वारे तुमच्या पर्यंत पोहचतात. 


आता म्हणाल झाडाची पाने ध्वनी लहरी कश्या पकडतील ?


जर झाडाची पाने वातावरणातील

1. कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊ शकतात. 

2. सूर्यकिरणे शोषून त्याद्वारे हरितद्रव्य बनवू शकतात. 

तर ध्वनी लहरी का शोषू ( absorb ) शकत नाहीत ?


बुद्ध धम्मात प्रत्येक गोष्ट कोणीतरी घुसडलेय कोणीतरी घुसडलेय असे म्हणण्यापेक्षा संशोधन करणे हे केव्हाही उचितच. 





अरविंद भंडारे 

पालि संशोधन संस्था

Monday, 6 June 2022

त्रिरत्न चिन्हाचे महत्व

 *त्रिरत्न चिन्हाचे महत्व* 









The Importance of Triratna symbol


बुद्धांच्या शिकवणुकीचे भंडार त्रिपिटकमध्ये ओतप्रोत भरलेले आहे. त्रिपिटक मध्ये बुद्धांच्या उपदेशा शिवाय दुसरे काहीही नाही. दुःख मुक्त जीवन, आदर्श जीवन कसे जगावे याची इत्यंभूत माहिती त्यामध्ये आहे. ज्यांनी या त्रिपिटकाचा अभ्यास केला तो मोठा ज्ञानी झाला. त्रिपिटकाचा आणि बुद्ध तत्वज्ञानाच्या चिन्हे-रूपके यांचा अभ्यास म्हणजे मनाची मशागत करणे होय,असे समजावे. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बुद्ध तत्त्वज्ञान विविध चिन्हाद्वारे अंकित करण्यात आले. धम्माचा प्रसार करण्यासाठी या चिन्हांची खूप मदत झाली. जेथे-जेथे ही धम्माची रूपके आढळून आली तेथे तेथे बुद्धिझम बहरला होता, हे ध्यानी ठेवावे. 


इ.स. पूर्व चौथ्या शतकापासून बुद्ध तत्वज्ञान चिन्हांच्या स्वरूपात दर्शविण्याची कला निर्माण झाली. आणि मग बोधिवृक्ष, धम्मचक्र, बुद्धपदकमल आणि त्रिरत्न या चिन्हांद्वारे हीनयान पंथाचा धम्मप्रसार होऊ लागला. त्यानंतर इ.स. पहिल्या शतकापासून मानवी आकृतीत बुद्धांना साकारणे सुरू झाले. महायान पंथाची मथुरा आणि गांधार कलासंस्कृती ही त्याची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. अनेक धार्मिक कार्यक्रमात ही चिन्हे रेखाटली जाऊ लागली. कोरली जाऊ लागली. घडविली जाऊ लागली. कमलपुष्प, धम्मचक्र ही जशी बौद्ध संस्कृतीची महत्त्वाची रूपके आहेत तसेच बुद्ध, धम्म आणि संघ यांचे प्रतीक म्हणून त्रिरत्न चिन्ह ही महत्वाचे आहे. 


या त्रिरत्न चिन्हांबाबतची माहिती बौद्ध साहित्यात नसली तरी अनेक शिल्पात ती दृग्गोचर झाली आहे. अशिया खंडात त्रिरत्न चिन्ह वेगवेगळ्या आकारात व  प्रतीकात तेथील संस्कृती प्रमाणे दाखविले गेले आहे. महाराष्ट्रातील लेण्यांमध्ये, चैत्यगृहात त्रिरत्न क्वचितच कोरलेले आढळून येते. धम्मचक्र मात्र अनेक ठिकाणी दृष्टीस पडते. गांधार कलासंस्कृतीची जी शिल्पे आहेत त्याठिकाणी त्रिरत्न चिन्हे भरपूर आढळून येतात. तसेच सांची व इतर स्तूपावर अनेक ठिकाणी त्रिरत्न चिन्हे दिसून येतात. पाली भाषेत त्रिरत्नाला ति-रतना असे म्हटले आहे. बुद्ध, धम्म व संघ यांची ही प्रतीके आता जगभर माहिती झाली आहेत. बहुतेक ठिकाणी धम्मचक्रावर 'अ' आकाराच्या कमल पाकळ्या दाखवून वरती त्रिरत्न चिन्ह दर्शविण्यात आले आहे. 


त्रिरत्न चिन्हे कमलपुष्पा प्रमाणेच अत्यंत महत्त्वाचे भाष्य करतात. बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांना शरण जाणे हेच मानव जातीचे उद्दिष्ट असले पाहिजे. हाच बोध त्यातून होतो. गांधार शैलीत काही ठिकाणी बुद्ध-धम्म-संघ ही त्रिरत्ने धम्मचक्र स्वरूपात दाखविण्यात आली आहेत. ही तीन धम्मचक्रे देखील त्रिपिटकांचे ( सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक ) महत्त्व अधोरेखित करतात. त्रिरत्न चिन्हाचे खालील मुख्य भाग पडतात. 

१)कमलपुष्प चक्र

२) वज्र 

३) 'अ ' आकाराच्या कमलपुष्प पाकळ्या.

तळाचे कमलपुष्प चक्र हे धम्मचक्र दर्शविते. त्यावरील दोन्ही बाजूस तुळवीप्रमाणे असलेला भाग हा वज्रासन दर्शवितो. आणि मग त्यावर असलेल्या तीन कमल पाकळ्या तीन रत्नांचे स्थान दर्शवितात. काही ठिकाणी यावर धम्मचक्र दाखविली गेली आहेत.


तक्षशीलेच्या नाण्यावर सुद्धा त्रिरत्न चिन्ह अंकित केले आहे. सांची स्तुपाच्या तोरणामध्ये असलेले देखणे त्रिरत्न चिन्ह आजही स्पष्टपणे दिसून येते.बुद्धांच्या पदकमल शिल्पावर देखील त्रिरत्न चिन्हे स्पष्ट दिसतात. राजा अझेस-२ च्या काळातील नाण्यांवर देखील त्रिरत्न चिन्हे दिसतात. इ.स. पूर्व तिसर्‍या शतकातील राजा कुन्नीदास यांच्या नाण्यांवर देखील त्रिरत्न चिन्ह आढळून येते. अमरावती स्तूप येथे देखील त्रिरत्न चिन्ह दिसते. धम्माचा प्रसार या त्रिरत्न चिन्हांद्वारे खूप झाला. व अजूनही होत आहे. जगन्नाथपुरी यात्रा ही मूळ त्रिरत्नाचे प्रतीक आहे हे अनेकांना ज्ञात असेल. ख्रिस्ती धर्मात त्रिरत्नचे Trinity झाले. हिंदू धर्मातील 'ओम' शब्दाचा उगम या त्रिरत्न चिन्हांवरून झालेला आहे, हे सांगितले तर आश्चर्य वाटेल. त्रिरत्न चिन्ह आडवे केले की ते स्पष्ट दिसून येते. बौद्ध संस्कृतीची अनेक चिन्हे-रूपके आज इतर धर्मात काल्पनिक पौराणिक कथेच्या आड व धार्मिक व्यवहारात सामावून गेली आहेत.( उदा. स्वस्तिक चिन्ह, श्रीपाद म्हणजेच सिरिपाद-बुद्ध पदकमल, मंगळसूत्र म्हणजेच मंगलसू्त्त इ.) आणि त्यांचा अभ्यास करायला जावे तर शेवटी सगळी बौद्ध संस्कृतीच ठासून भरलेली दिसून येते.


--- संजय सावंत ( नवी मुंबई )


⚛⚛⚛


कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...