🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_गांधीजींच्या तीन माकडांवर बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_भारतीय लोकांच्या मनावर गांधी तत्त्वज्ञानाचा खुप मोठा प्रभाव आहे आणि त्यातल्या त्यात गांधीजींनी सांगितलेल्या तीन माकडांच्या तत्त्वज्ञानाचाही प्रभाव जनमानसात आजही आहे. गांधीजींची तीन माकडे खुप मोठे तत्त्वज्ञान सांगतात जसं की, वाईट ऐकू नये, वाईट बोलू नये आणि वाईट बघू नये. *पण प्रत्यक्षात ही तीन माकडे ही गांधीजींची स्वतःची स्वकृती नाही तर ती त्यांनी जपानमधील एका बुद्ध विहारातून या तीन माकडांचे प्रतिकात्मक रूप घेतले आहे.*_
_*जपानमधील निक्को शहरातील शिन्टो विहाराच्या भिंतींवर या तीन "माकडांच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत. ही तीन माकडे झेन गुरूंच्या उपदेशांचे भाग होते.* ज्याप्रमाणे बुद्ध धम्म चीनमध्ये लाओस्ते ताओ यांच्या सह जुळून मोठा झाला त्याचप्रमाणे जपानमध्ये शिन्टो मत यांच्या सह जुळून मोठा झाला. भगवान बुद्धांनी एक वर्षावास जंगलातील प्राणी पक्षांसोबत केला होता. त्यांची करुणा-मैत्री प्राणीमात्रांविषयी होती. पशु योनीमध्ये भटकणाऱ्या प्राण्यांवर दया करण्यासाठी तथागतांनी जंगलात वर्षावास केला. *एका अख्यायिकेनुसार तथागतांनी सांकेतीक भाषेत जंगलातील प्राण्यांना पशुयोनीतून मुक्त होण्याचे उपाय सांगितले.* सांकेतिक भाषेतून कानावर हात ठेवून सांगितले की वाईट ऐकू नये, तोंडावर हात ठेवून सांगितले की आणि डोळ्यावर हात ठेवून सांगितले की वाईट बघू नये. त्यांनी या सांकेतिक भाषेतून - खुणांतून माकडांना शील पालनाचा उपदेश केला. *ही अख्यायिका भारतातून प्रवास करीत करीत चीनला पोहोचली आणि तिकडे पोहोचून कन्फ्युशियसच्या शिकवणुकीचा भाग बनली, त्यांनतर चीनमधून प्रवास करीत करीत ही अख्यायिका जपानमध्ये पोहोचून तेथील बौद्ध गुरूंच्या शिकवणुकीचा एक घटक बनली. अशाप्रकारे ही तीन माकडे जपानच्या शिन्टो विहाराच्या भिंतीवर प्रतिकात्मकरित्या कोरली गेली.* १६-१७ व्या शतकात जपानमधील बुद्धानुयायी सम्राट तोकुगाव लेयासू यांच्यावर तीन माकडांच्या प्रतिकांचा खूप प्रभाव होता. त्यांच्या निधनानंतर लोकांनी त्यांच्या समाधीच्या परिसरात मुख्य दारावर या तीन माकडांच्या प्रतिकृती बनवल्या._
*जपानी भाषेत या माकडांना कीकाजारू, मीजारू, ईवाजारू म्हणतात.*
१) ज्या माकडाने कानावर हात ठेवले आहेत ते किकाजारू,
२) डोळ्यावर आहे ने मीजारु आणि
३) तोडावर हात ठेवला आहे ते ईवाजारू.
१६ व्या शतकातील शिन्टो चैत्य, विहार आज युनेस्कोच्या जागतीक वारसामध्ये सामावलेले आहे. शिन्टो चैत्याच्या भिंतीवरील कोरलेले तीन माकडे भारतातील गांधीजीचे तीन माकडे झाले यावरून गांधीधींवर बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव दिसून येतो.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_महेश कांबळे_*
*२९/०६/२०२२*
*संदर्भ : -*
*१) मैत्री संपूर्ण धम्म आहे*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/06/blog-post_29.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼