पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या.
बुद्ध पूजेत कच्चा धागा, पाणी आणि वृक्षाची पाने यांचे महत्त्व.
जेव्हा आपण बुद्ध पूजा करतो तेव्हा बुद्ध वंदना आपण पालि भाषेत असलेल्या गाथांमधून उच्चारतो.
बुद्ध वंदना पालि भाषेत उच्चारताना कंपन ( ध्वनी लहरी )तयार होतात.
पालि बुद्ध वंदनेला Rhythm / ताल लावण्याची काही गरज नसते.
पालि भाषेतील बुद्ध वंदनेला स्वतःचीच एक Rhythm आहे.
उदा. नमो तस्स भगवतो अरहतो
ही पूर्ण गाथा उच्चारून पहा.
ती बुद्ध वंदना किंवा इतर गाथा जेव्हा एखादा शीलवान भिक्खू अथवा उपासक उच्चारतो तेव्हा ती सहजपणे तुमच्यापर्यंत ( शरीरपर्यंत / मनापर्यंत ) पोहचावी हा उद्देश असतो. त्याचा दुवा म्हणून कच्चा धागा वापरला जातो.
कच्चा धागा कंपन / ध्वनी लहरी कशा वाहून नेतो याचे शास्त्रीय कारण
लहानपणी आपण 2 काडेपेटीतील आतल्या भागाला धागा जोडून आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला असाल.
तांब्यात / माठात पाणी का घेतात याचे शास्त्रीय कारण पुढील लिंकवर जाऊन पहा.
तुमचे शब्द / गाथा पाण्याला कश्या चिकटतात याचे उदाहरण
https://spiritualityhealth.com/blogs/heart-health/2015/06/04/bess-oconnor-16-ways-change-your-vibration-water
आता राहिला प्रश्न पिंपळाची पाने का वापरतात ?
पिंपळाचीच नाही तर कोणतीही त्या आकारातील ( तेवढी मोठी ) पाने चालतात.
अगदी नागवेलीची सुद्धा.
झाडाची पाने ही तांब्यातील / माठातील पाण्यात antenna ( अँटेना ) चे काम करतात.
पाना द्वारे ध्वनी लहरी पकडून त्या कच्च्या धाग्याद्वारे तुमच्या पर्यंत पोहचतात.
आता म्हणाल झाडाची पाने ध्वनी लहरी कश्या पकडतील ?
जर झाडाची पाने वातावरणातील
1. कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊ शकतात.
2. सूर्यकिरणे शोषून त्याद्वारे हरितद्रव्य बनवू शकतात.
तर ध्वनी लहरी का शोषू ( absorb ) शकत नाहीत ?
बुद्ध धम्मात प्रत्येक गोष्ट कोणीतरी घुसडलेय कोणीतरी घुसडलेय असे म्हणण्यापेक्षा संशोधन करणे हे केव्हाही उचितच.
अरविंद भंडारे
पालि संशोधन संस्था
No comments:
Post a Comment