Thursday, 31 March 2022

मित्राशी वागणूक

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

           *_मित्राशी वागणूक_*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

_*न भजे पापके मित्ते न भजे पुरिसाधमे |*_
_*भजेथ मित्ते कल्याणे भजेय पुरिसुत्तमे ||*_

_*पापी मित्रांना भजु नये, पुरुषाधमांना भजू नये, कल्याणकारक मित्रांना भजावे, पुरुषोत्तमांना भजावे ||*_
(धम्मपद - पण्डितवग्गो)

_जो आपल्या मांगल्यामध्ये साहाय्य करतो, कल्याणाकरिता मदत करतो. चांगल्यासाठी साथ देतो तोच खरा मित्र. अशी व्यक्ती कोणीही असो आपली हितेच्छुक आहे. तिच्याबद्दल कृतज्ञतेने मंगल मैत्रीचा भाव राखणे सर्वथा उपयुक्त आहे. सर्वथा उचित आहे._

_अशा एखाद्या मित्राबद्दल कोणत्याही कारणाने मनात दुर्भावना जागृत झाली तर ती आपल्या दूषित चित्ताचीच द्योतक आहे. *मित्राबद्दल दुर्भावनायुक्त असलेले आपले चित्त त्या मित्राचे काही वाईट करो वा न करो। पण आपले मात्र नक्कीच नुकसान करते. सामान्यतः आपले दूषित चित्त आपल्याला व्याकुळ करते. परंतु आपल्या एखाद्या उपकारक मित्राबद्दल दूषित झालेले चित्त तर अत्यंत व्याकुळ करते. हे अनुभवलेले सत्य आहे. अनुभवाला येणारे सत्य आहे.*_

_अशा एखाद्या मित्राबद्दल जेव्हा आपल्या मनात सद्भावना उत्पन्न होते तेव्हा ती आपल्या स्वच्छ, सरळ मनाची ग्वाही असते. *सद्भावनायुक्त मंगलकारी मन त्या मित्राचे जितके मंगल करते त्यापेक्षा कितीतरी अधिक आपले स्वतःचे हित करते. सामान्यतः आपले सद्भावनायुक्त चित आपल्याला आनंदाने पुलकित करते, परंतु आपल्या एखाद्या उपकारक मित्राबद्दल सद्भावनायुक्त चित्त आपल्याला अत्यंत आनंदाने पुलकित करते हे अनुभवलेले सत्य आहे, अनुभवाला येण्यासारखे सत्य आहे.*_
          _*असे होऊ शकते की एखादी व्यक्ती जी कधी आपला परम मित्र होती, आपली हितचिंतक होती ती काही कारणाने, गैरसमजाने, स्वार्थीपणाने किंवा आमच्याच एखाद्या चुकीमुळे आज आमची परम शत्रू झाली असेल, आमचा जीव घेण्यास उठली असेल तर तिला चुकीचे काम करण्यापासून परावृत्त करण्यासाठी अत्यंत कठोर व्यवहार करतांनादेखील आपल्या मनात तिच्याबद्दल अत्यंत मैत्रीभावनाच असली पाहिजे. हेच उपयुक्त आहे.*_

*_त्या व्यक्तीच्या सध्याच्या वागण्याला महत्त्व न देता पूर्वी त्याने आपल्यावर जे काही उपकार केले असतील त्यांची आठवण करावी. त्याने केलेले प्रेम, स्नेह, चांगली कामे आठवावी आणि या आठवणीच्या आधाराने आपले मन मृदु बनवून सद्भावनायुक्त राखावे. वरवर भले खडकाप्रमाणे कठोर व्हावे परंतु अंतरंगात मात्र झुळझुळणारा निर्मक झरा असला पाहिजे._*

_*मित्रांनो, मी जाणतो की हे सोपे नाही जेव्हा एखादी व्यक्ती गैर व्यवहार करू लागते तेव्हा तिच्यावर रागावणे सोपे आहे. परंतु मैत्रीभाव उत्पन्न करणे कठीण आहे. फार कठीण आहे. परंतु कठीण असले तरी तेच करणे योग्य आहे. हीच साधना आहे. हेच तप आहे. हाच संग्राम आहे. आपली आपल्याशीच लढाई आहे. आपल्या दुर्बलतेबरोबर लढाई. आणि ही लढाई जीवनभर चालते, खरे आहे. शूरांची लढाई दोन चार तासांचीच असते. रणांगणावर उतरला, दोन दोन हात झाले आणि संपले. पण साधकांची लढाई तर जीवनभर चालू असते. त्याला तर जीवनभर लढत रहावयाचे आहे.*_

*शूर संग्राम है घड़ी दो-चार का,*
*लड़-लड़ कर बीरगति पाई।*
*संत संग्राम है रात-दिन जूझना,*
*देह-परजंत का काम भाई ॥*

_शूर संग्राम आहे घडी दोन घडीचा,_
_लढलढून वीरगती मिळविली असे।_ 
_संतसंग्राम आहे रात्रंदिवस लढण्याचा,_
_देह अंतापर्यंतचे हे काम असे ॥_

_रात्रंदिवस लढावयाचे आहे. जिवात जीव असेपर्यंत लढावयाचे आहे. अनीती आणि अन्यायाच्या कठीण परिस्थिती जेव्हा जेव्हा जीवनात येतात तेव्हा तेव्हा एकीकडे त्यांचा जोरदार प्रतिकार करीत राहिले पाहिजे तर दुसरीकडे रोम रोमात मंगलभाव साठवून ठेवले पाहिजेत._

_*मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!*_

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*_संदर्भ :- मंगलमय गृहस्थ जीवन_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_३१/०३/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/03/blog-post_31.html

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...