Friday, 1 April 2022

शील धर्म

 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*_शील धर्म_*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


                  _शील धर्म पालन करणे म्हणजे सामाजिक व्यवस्थेचे पालन करणे. संपूर्ण समाजाची व्यवस्था कोणत्याही एका संप्रदाय विशेषाची व्यवस्था नाही. म्हणून शीलधर्मावर कोणत्याही एका संप्रदाय-विशेषाचा एकाधिकार नाही. शील-सदाचाराचे पालन सर्व संप्रदायांना मान्य आहे. मनुष्य एक सामाजिक प्राणी आहे. समाजाची सुव्यवस्था कायम राखण्यात त्याची स्वतःची सुरक्षितता निश्चित आहे. समाजाची सुख-शांती राखण्यात त्याची स्वतःची सुख-शांती निश्चित आहे._

              _जेव्हा एखादी व्यक्ती हत्या करते, दुसऱ्याची वस्तू चोरते. व्यभिचार करते, खोटे बोलते, मद्याने धुंद होते तेव्हा सामाजिक व्यवस्था अस्ताव्यस्त करते. सामाजिक सुख-शांती भंग करते. याच्या उलट जेव्हा ती पंचशील पालन करते तेव्हा ती सामाजिक सुव्यवस्था स्थिर करण्यात मदत करते. सामाजिक सुख-शांती कायम राखण्यात मदतनीस होते. परंतु असे केल्याने ती कोणावर उपकार करीत नाही. इतरांबरोबर आपले देखील भले करते. हाच शीलधर्म आहे. सामाजिक धर्म आहे. म्हणूनच सर्वधर्म आहे._

             _पंचशीलाचे योग्यप्रकारे पालन करण्यासाठी मन वश करणे आणि ते विकार-विहीन ठेवणे, निर्मळ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी विपश्यना आहे. तिच्या अभ्यासाने मन संयमित होते, निर्मळ, शुद्ध होते, सद्गुणसंपन्न होते. विपश्यनेमुळे शीलपालन सोपे होते. शील पालनाने साधना करणे सोपे जाते. दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. साधनेचा अभ्यास पुष्ट करण्यासाठी जेव्हा आम्ही काही दिवस इतर सर्व प्रवृत्ती बंद करून गंभीरतेने निरंतर अभ्यास करण्याचा निर्णय घेतो तेव्हा एखाद्या साधना शिबिरात भाग घेतो. परंतु लागोपाठ पुष्कळ दिवस एखाद्या शिबिरात वारंवार जाणे शक्य नसेल तर आठवड्यात, पंधरवड्यात अथवा महिन्यात तरी एक दिवस घरी अथवा एखाद्या निवांत जागी साधनेचा निरंतर अभ्यास करणे आवश्यक आहे. अशावेळी पाच शील तर पाळावीच परंतु या व्यक्तीरिक्त आणखी तीन शील ग्रहण करतात - विकाल भोजन म्हणजे दुपारनंतर जेवत नाहीत, शृंगार प्रसाधने व आमोद-प्रमोद यांचा त्याग करतात, विलासी बिछान्यावर झोपत नाहीत. यामुळे साधनेत खूप मदत मिळते._

          _वरील पाच शीलाप्रमाणे ही तीन शीलही सार्वजनिक सामाजिक व्यवस्थेमध्ये यांचा सरळ संबंध नसेल परंतु व्यक्ती-व्यक्तीला सुधारण्यात यांचा मोठा वाटा आहे. यामुळे मन संयमित होते. साधेपणाचा सद्गुण पुष्ट होतो. त्याग भावना प्रबळ होते आणि सर्वात प्रमुख गोष्ट ही की यांच्या मदतीने साधनेत घहनता गाठणे शक्य होते. त्यामुळे साधक सर्व तर्हेचे लाभ प्राप्त करतो व्यक्तिला लाभ झाला तर समाजाला लाभ होतो. व्यक्ती-व्यक्तित सुधारणा झाली तर संपूर्ण समाज सुधारतो._

      _शील पालन केल्याने प्रत्यक्षात आपले जीवन सुधारते, लोक सुधारतो, लोक सुधारल्याशिवाय परलोक कसा सुधारणार? म्हणून असा विश्वास ठेवता येतो की शील पालनाने जर आपला लोक सुधारत असेल तर परलोक देखील सुधारत असणार._

         _ज्या शिलांचे पालन केल्याने व्यक्ती आणि समाज दोन्ही सुधारतात, लोक परलोक दोन्ही सुधारतात त्यांचे पालन करण्यात हजार संकटे आली तरी आपण त्यांचा सामना केलाच पाहिजे. जोपर्यंत सर्व शिलांचे पालन करण्यात संपूर्ण यश मिळत नाही तोपर्यंत जितक्या शिलांचे पालन करणे शक्य असेल तितकी मनापासून पाळावीत आणि बाकीच्यांचे पालन करण्याचा प्रयत्न करीत रहावे; व हळू हळू धर्म पथावर पुढे जाण्याचा दृढ संकल्प करावा, यातच आपले सर्वांचे मंगल सामावले आहे._

_*मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!*_

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*_संदर्भ :- मंगलमय गृहस्थ जीवन_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_०१/०४/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/04/blog-post.html

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹



No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...