🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*_गृहस्थाची
आचार संहिता_*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*_नमस्कार कोणाला करावा ?_*
_मगध देशाची राजधानी राजगृह. श्रेष्ठीपुत्र सिगाल सकाळीच उठून नगराबाहेर स्नानासाठी गेला. ओली वस्त्रे व ओल्या केसांनी पूर्व, दक्षिण पश्चिम, उत्तर, खाली व वर अशा सहाही दिशांना हात जोडून नमस्कार करू लागला. त्या वेळच्या अनेक पूजा विधी व कर्मकांडापैकी हे पण एक असावे. त्याच वेळी भगवान वेणुवन विहारातून बाहेर पडून राजगृह नगरात भिक्षाटनासाठी निघाले. रस्त्यात श्रेष्ठीपुत्र सिगाल यास सहा दिशांना नमस्कार करतांना बघून विचारले “गृहपती पुत्रा, हे काय करीत आहेस?"_
_सिगाल उत्तरला “भंते! भगवान! दिशांना नमस्कार करीत आहे.” माझ्या पित्याने मरतेवेळी उपदेश केला होता की दिशांना नमस्कार करावा. म्हणून वडिलांच्या शेवटच्या उपदेशाचे पालन करीत आहे._
_*भगवान म्हणाले “गृहपतीपुत्रा! आर्य धर्मात अशा प्रकारे सहा दिशांना नमस्कार नाही केला जात.”*_ 'ठीक आहे. भगवान, कृपया मला आर्य धर्माचे ज्ञान द्या'.
_श्रेष्ठीपुत्र सिगालने प्रार्थना केल्यावर त्यावेळी भगवानांनी जो उपदेश केला तो केवळ सिगालसाठीच नाही तर सर्व गृहस्थांसाठी अतिशय कल्याणकारी आहे. गृहस्थांसाठी ही आचार संहिता शुद्ध आर्य-धर्माप्रमाणे सार्वजनिक आहे, सार्वदेशिक आहे. सार्वकालिक आहे. आजच्या कोणत्याही सद्गृहस्थासाठी तितकीच ग्रहणयोग्य आहे जितकी २६०० वर्षापूर्वी सिगालसाठी होती._
_या! भगवानांचा हा मंगल उपदेश समजून घेऊ या!_
*_भगवान म्हणाले, हे गृहपतीपुत्रा! आर्य गृहस्थ चार कर्मक्लेशापासून दूर राहतो. चार प्रकारच्या दूषित चेतनांवर आधारित पापकर्माचा त्याग करतो. सहा प्रकारच्या विनाशकारी आचरणापासून आपला बचाव करतो. अशा तऱ्हेने चौदाप्रकारे संयमित जीवन जगून सहा दिशा आच्छादित करून पूर्णतया सुरक्षित होतो आणि आपला इहलोक व परलोक दोन्ही सुधारतो. हे जीवन सफल करून त्याचे सार्थक करतो आणि शरीर त्यागून मेल्यानंतर चांगली गती प्राप्त करतो._*
_*"हत्या, चोरी, व्यभिचार व असत्य भाषण हे चार कर्मक्लेश आहेत, वाईट कर्म आहेत. अशी कामे की ज्यामुळे दुःखच वाढते.”*_
*_"ही चार वाणी व शरीराची दुष्कर्मे आहेत. त्यामुळे व्यक्ती इतर प्राण्यांचे सुख हिरावून घेते, त्यांच्या दुःखाचे कारण बनते आणि याचा परिणाम म्हणजे स्वतः पण दुःखी राहते.”_*
*_"या चारांपासून दूर राहून एक सद्गृहस्य साधनेद्वारा आपल्या मनाला केवळ वशच करीत नाही तर ते निर्मळ देखील करतो, विकारविहीन करतो व अशा तऱ्हेने राग (लोभ), द्वेष, मोह व भय या चार दूषित भावनांवर आधारित कोणतेही पापकर्म करीत नाही."_*
*_"या आठ प्रकारच्या दोषांपासून दूर रहाणारा सद्गृहस्य बुद्धिपूर्वक आपल्या जमविलेल्या धन-संपत्तीचे रक्षण करतो. संपत्ती नष्ट होणाऱ्या सहा कारणापासून दूर राहतो. धनाचा विनाश करणारी ही सहा कारणे आहेत_*
१) मद्यपान
२) अवेळी गल्ली-बोळातून फिरणे
३) खेळ-तमाशा बघणे
४) जुगार खेळणे
५) पापी मित्रांची वाईट संगत
६) आळस
_समजूतदार गृहस्थ ही बाब चांगल्याप्रकारे जाणतो की या सर्व वाईट सवयी विनाश व पतनाला कारणीभूत असतात."_
_*धन बिनाशाची सहा कारणे*_
*_१) मद्यपानाच्या व्यसनामुळे_*
अ) डोळ्यांसमोर बघता बघता धन नष्ट होते.
आ) भांडण-तंटे वाढतात.
इ) निरनिराळे रोग सुरू होतात.
ई) अपयश मिळते.
उ) निर्लज्जपणा येतो.
(ऊ) प्रज्ञा क्षीण होते.
*_२) गल्ली-बोळात अवेळी फिरल्यामुळे_*
अ) स्वतः असुरक्षित बनतो.
आ) घरी असलेली बायको व मुले असुरक्षित होतात.
इ) संपत्ती असुरक्षित होते.
ई) कोणी दुसऱ्याने केलेल्या पापकर्माचा स्वतः संशयित बनतो.
उ) खोटे आरोप लागतात.
ऊ) वस्तुतः अनेक दुःखदायक दुष्कर्मे केली पण जातात.
*_३) खेळ-तमाशाच्या व्यसनामुळे_*
_नेहमी याच चिंतेत व्याकुळ असतो की आज कोठे नाच, कोठे गाणे, कोठे कथा-कथन कोठे मृदंग व तत्सम वाद्यांचे कार्यक्रम आहेत? रोज नव-नवीन नाच-गाणी, खेळ-तमाशे, सिनेमा-नाटके, नाइट क्लबला जाण्याचे व्यसन धन चारित्र्य व आरोग्य तिन्हींचा नाश करते._
*_४) जुगाराच्या व्यसनामुळे_*
अ) जिकले तर वैर उत्पन्न होते.
आ) हारल्यास धन गमविण्याचा शोक होतो.
इ) बघता-बघता डोळ्यांसमोर धन-हानी होते.
ई) त्याच्या बोलण्यावर समाजात कोणी विश्वास ठेवत नाहीत
उ) चांगले मित्र व बरोबरचे लोक तिरस्कार करतात.
ऊ) अविवाहित असल्यास कोणी पिता आपली मुलगी देत नाही कारण त्यांना समजते की हा आपली पत्नी व मुले यांचे संगोपन करू शकणार नाही.
*_५) पापी मित्रांच्या कुसंगतीमुळे_*
_कोणी चांगला माणूस त्याला साथ देत नाही. केवळ धूर्त, व्यभिचारी, दारुडे, गुंड, धोकेखोर आणि लंपटच त्याच्या संगतीत राहतात. दुर्जनांच्या संगतीने आणि सज्जनांची संगत नसल्यामुळे जमा केलेली संपत्ती गमावतो आणि नाना तऱ्हेच्या दुःखांचा भागीदार होतो._
*_६) आळसाचा गुलाम असल्याने_*
अ) खूप थंडी आहे.
आ) खूप उकडत आहे.
इ) खूप वेळ झाला.
ई) अजून पहाट आहे.
उ) फार भूक लागली आहे.
ऊ) खूप खाल्ले आहे.
_इत्यादी कारणे काढून करण्यायोग्य काम करीत नाही. याचा परिणाम असा होतो की नसलेली संपत्ती मिळत नाही व असलेली संपत्ती घालवतो._
*_खऱ्या मित्राची ओळख_*
_संपत्ती विनाशाच्या या सहा कारणांपैकी पापी मित्राची वाईट संगत या पाचव्या कारणाला भगवंतांनी फार महत्त्व दिले खरोखर नेहमी सत्संगतीचा अभाव व वाईट संगत लागल्यानेच घरातील मुले नाना प्रकारच्या दुःखदायक व्यसनांचे गुलाम होतात. म्हणून गृहपती-पुत्राने हे जाणणे गरजेचे आहे की कोणती व्यक्ती मित्राच्या रुपात त्याची वैरी आहे आणि कोण खरा मित्र आहे._
भगवान म्हणाले,
“हे गृहपती पुत्रा! या चारजणांना मित्राच्या रूपातील वैरी समजले पाहिजे -
*_१) परधन-हारक मित्र –_* अशी लोभी व्यक्ती -
अ) दुसऱ्याचे धन अपहरण करण्याच्या उद्देशानेच मैत्री करते
आ) थोडे देऊन जास्त लुबाडण्याची इच्छा करते.
इ) अशी कामे करते त्यामुळे नाना तऱ्हेच्या आपत्ती उत्पन्न होतात.
ई) आपता मतलब साधण्यासाठी बरोबर राहते.
*_२) वाचाळ मित्र -_* अशी व्यक्ती काहीही उपयोगी पडत नाही. केवळ गप्पाच करते. ती –
अ) भूतकाळात मदत करण्यास किती उत्सुक होती याबद्दल खोट्या बढाया मारते,
आ) भविष्यात जरूर पडल्यास कसे सहाह्य करेल याबद्दल मोठमोठ्या गप्पा मारते.
इ) वर्तमानातील संबंधांबद्द्ल हवेत पूल बांधते.
ई) परंतु खरोखर प्रसंग आल्यास तोंड दाखवत नाही.
*_३) खुशामती मित्र -_* अशी व्यक्ती -
अ) वाईट कामात देखील होता हो ला हो करते.
आ) चांगल्या कामातसुद्धा हो ला हो म्हणते.
इ) समोर प्रशंसा करते.
ई) पाटीमागे निंदा करते.
*_४) विनाश सहायक मित्र-_* अशी व्यक्ती -
अ) नशापानाच्या व्यसनात फसण्यासाठी साथ देते.
आ) अवेळी गल्ली-बोळात बदमाशी करण्यात साथ देते.
इ) खेळ तमाशात रंगून जाण्यास साथ देते.
ई) प्रमादकारी जुगाराच्या व्यसनात साथ देते.
_भगवानांनी सांगितले की या चारही श्रेणीतील व्यक्ती मित्राच्या रूपातील वैरी समजून त्यांची संगत लवकरात लवकर सोडण्यात हित आहे._
याच प्रकारे चार तऱ्हेच्या खऱ्या मित्रांना आपले हितैषी मानून त्यांची संगत करण्यात भलाई आहे.
*_१) उपकारी मित्र -_* अशी व्यक्ती -
अ) उन्मत्त झालेल्या मित्राला संकटातून वाचवते.
आ) उन्मत्त झालेल्या मित्राची संपत्ती नष्ट होऊ देत नाही.
इ) संकटग्रस्त मित्राला आश्रय देते.
ई) जरूर पडल्यास मित्राला आवश्यकतेच्या दुप्पट देते.
*_२) समान सुख-दुःखी मित्र -_* असा सुख दुःखाचा साथी
अ) आपल्या गोपनीय गोष्टीही मित्राला सांगतो.
आ) मित्राची गोपनीय गोष्ट इतरापासून गुप्त ठेवतो,
इ) संकटात मित्राची साथ सोडत नाही.
ई) आवश्यक झाल्यास मित्रासाठी प्राण देण्याससुद्धा तयार असतो.
*_३) हितैषी मित्र -_* चांगले वाईट सांगणारी अशी व्यक्ती -
अ) मित्राला पापापासून याचवते.
आ) मित्राला पुण्यकामात लावते,
इ) मित्राने न ऐकलेता धर्म त्याला ऐकवते.
ई) मित्राला सद्रतीचा मार्ग दाखवते.
*_४) अनुकंपक मित्र -_* सहानुभूती असलेली अशी व्यक्ती-
अ) मित्र निर्धन झाल्यास प्रसन्न होत नाही.
(आ) मित्र श्रीमंत झाल्यावर प्रसन्न होते.
इ) मित्राची निंदा करणाऱ्यांना थांबवते.
ई) मित्राची स्तुती करणाऱ्यांना उत्तेजन देते.
_अशी वरील चार प्रकारच्या वाईट मित्रांची सोबत सोडून चार चांगल्या प्रकारच्या मित्रांची संगत करणारा गृहस्थ संकटातून वाचतो, संपत्ती-संपन्न होतो._
*_नैसर्गिक सहा दिशा_*
_त्यानंतर भगवानांनी श्रेष्ठीपुत्र सिगालला *आर्य धर्मात सहा दिशांची योग्यप्रकारे पूजा करण्याचा विधी शिकवला, समजावून दिला.* कोणतीही व्यक्ती कशाप्रकारे दिशांना आच्छादित करून म्हणजे धर्मपूर्वक जीवन जगून सगळ्या दिशांना आपली सुरक्षितता प्रस्थापित करते._
*_सहा दिशा कोणत्या ?_*
_*माता-पित्याला पूर्व दिशा, शिक्षकांना दक्षिण दिशा, पत्नी मुलांना पश्चिम दिशा, मित्र-साथींना उत्तर दिशा, नोकर-चाकरांना खालची दिशा आणि सापक-ब्राह्मणांना वरची दिशा जाणावे.*_
*_१) माता-पिता यांची सेवा_*
मुलाने आई-वडिलांची पाच प्रकारे सेवा करावी.
(क) यांनी माझे लालनपालन केले म्हणून मी यांचे भरण-पोषण केले पाहिजे
(ख) यांनी माझ्याबद्दलचे कर्तव्य पूरे केले. मलादेखीत त्यांच्याबद्दलचे कर्तव्य पार पाडले पाहिजे
(ग) यांनी कुल-वंश कायम ठेवला मला पण कुलवंश कायम ठेवला पाहिजे.
(घ) त्यांनी मला वारसा ठेवला आहे. मी देखील वारसा प्रतिपादित केला पाहिजे.
(ड्) मृत पितरांना पुण्य मिळावे म्हणून दान दिले पाहिजे.
अशी पाच प्रकारे सेवा झाल्याने माता-पिता पुत्रावर पाच प्रकारे कृपा करतात.
च) त्याला पापकर्मापासून वाचवतात
(छ) त्याला पुण्यकर्म करावयास लावतात.
ज) त्याला कला शिकवतात.
न) योग्य मुलीबरोबर त्याचा विवाह करतात
अ) वेळ आल्यावर त्याला वारसा करतात.
_या पाच प्रकारे झालेली माता-पिता रूपी पूर्व दीशा पुत्रावर कृपा करते आणि अशाप्रकारे गृहस्थासाठी पूर्व दिशा प्रतिच्छत्र होते, सावली देणारी, झाकली जाते, योगक्षेमपूर्ण, भयरहित होते._
*_२) गुरुजनांची सेवा_*
शिष्यांनी पाच प्रकारे आचार्यांची सेवा केली पाहिजे
क) तत्परतेने उठून
ख) जरूर असेल तेव्हा हजर राहून
ग) शुश्रूषा करून
घ) परिचर्या करून
ड) विद्या शिकून
या पाच प्रकारांनी सेवा झालेले आचार्य शिष्यावर पाच प्रकारे कृपा करतात.
च) त्याला विनयशील करतात
छ) त्याला उत्तम रीतीने चांगले शिक्षण घेण्यास शिकवितात
ज) विद्या-कला नष्ट होऊ नये, या योग्य व्यक्तीद्वारा टिकून राहावी या उद्देशाने त्याला नीटपणे समजावून देतात.
प्र) मित्राजवळ त्याची प्रशंसा करून त्याला प्रोत्साहन देतात
अ) प्रत्येक दिशेला सुरक्षित राहता येईल यासाठी अनुकूल असे शिक्षण त्याला देतात.
_उपरोक्त पाच प्रकारांनी शिष्याकडून सेवा घेऊन दक्षिण दिशारूपी आचार्य त्याच्यावर पाच प्रकारची कृपा करतात आणि अशा रीतीने दक्षिण दिशा प्रतिच्छन्त्र, सावली देणारी, झाकलेली, सुरक्षित क्षेमयुक्त आणि भयविहीन होते._
*_३) पत्नीची सेवा_*
पतीने पत्नीची पाच प्रकारे सेवा केली पाहिजे
क) तिचा सन्मान करून,
ख) तिचा अपमान न करून,
ग) व्यभिचार न करून,
घ) तिला ऐश्वर्य व मोठेपणा देऊन,
ङ) तिला दागिने देऊन.
अशा पाच प्रकारांनी सेवा झालेली पत्नी, पाचप्रकारे पतीवर कृपा करते.
च) घर चालवण्याचे कर्तव्य योग्य प्रकारे पूर्ण करते.
छ) नातेवाईक ओळखीची मंडळी, नोकर-चाकर सर्वांना योग्य प्रकारे संतुष्ट ठेवते.
ज) व्यभिचार करीत नाही.
झ) पतीने कमावलेली संपत्ती सुरक्षित ठेवते,
अ) सर्व घरकामात निरासपणे लक्ष घालते.
_या पाच प्रकारांनी पतीकडून सेवा झाल्याने पश्चिम दिशारूपी पत्नी पतीवर पाच प्रकारे कृपा करते आणि अशा रीतीने पश्चिम दिशा प्रतिच्छन्न, सावली देणारी, झाकलेली सुरक्षित व भयरहित होते._
*_४) मित्राची सेवा_*
पाय प्रकारे मित्राची सेवा केली पाहिजे
क) देऊन
ख) गोड बोलून
ग) भले करून
घ) समानतेचा भाव प्रगट करून
ङ्) वचन-पालनाने विश्वास उत्पन्न करून
_अशा प्रकारे पाच तऱ्हेने सेवा झालेले मित्र त्याच्यावर बदल्यात कुलीनपुत्र असलेल्या गृहस्थावर पाच प्रकारे कृपा करतात_
(च) प्रमत्त झाल्यास त्याचे रक्षण करतात
(छ) प्रमत झाल्यास त्याच्या संपत्तीचे रक्षण करतात
ज) संकट समयी त्याला आश्रय देतात
(झ) विपत्ती आल्यास त्याला सोडत नाहीत
(ञ) त्याच्या परिवारातील इतर व्यक्तींचा देखील आदर करतात.
_अशा तऱ्हेने पाच प्रकारे सेवित होऊन उत्तर दिशारूपी मित्र त्याची फेड म्हणून पाच तऱ्हेने कृपा करतात. याप्रकारे उत्तर प्रतिच्छन्न, सावली देणारी, झाकलेली, सुरक्षित, भयरहित होते._
*_५) नोकरांची सेवा_*
मालकाने पाच प्रकारे नोकरांची सेवा केली पाहिजे
क) त्याला शक्तिनुसार काम देऊन,
(ख) त्याला जेवण-खाण व पगार देऊन,
ग) आजारी पडल्यास त्याची शुश्रूषा करून,
(घ) चांगल्या जेवणात त्याला सहभागी करून घेऊन,
(7) त्याला वेळेवर रजा देऊन,
पाच प्रकारे सेवित झालेला सेवक मालकावर पाच प्रकारे कृपा करतो.
च) मालकाच्या आधी उठतो.
छ) मालकाच्या नंतर झोपतो.
ज) चोरी करीत नाही, दिले असेल तेवढेच घेतो.
झ) चांगल्या प्रकारे काम करतो.
ञ) यश, कीर्ती पसरवितो.
_*अशा प्रकारे सेवित होऊन, खालची दिशारूपी सेवक, मालकावर पाच तऱ्हेने कृपा करतो. याप्रमाणे खालील दिशा प्रतिच्छन्न, सावली देणारी, झाकलेली सुरक्षित, क्षेमपूर्ण, मयविहीन होते.*_
*_६) श्रमण ब्राह्मणांची सेवा_*
कुलवंत पुत्रांनी पाच प्रकारे श्रमण व ब्राह्मणांची सेवा केली पाहिजे
क) मैत्रीपूर्ण शारीरिक कामे करून,
(ख) मैत्रीपूर्व वाचिक कर्म करून,
ग) मैत्रीपूर्ण मानसिक कर्म करून,
(घ) मोठ्या मनाने आगत-स्वागत करून,
ड) त्यांच्या ऐहिक आवश्यकता पूर्ण करून.
पाच प्रकारे सेवित श्रमण व ब्राह्मण सहा प्रकारे कुलीन मुलांवर कृपा करतात,
(च) पापकर्मापासून वाचवतात.
(छ) चांगली कामे करवून घेतात.
ज) कल्याण व्हावे म्हणून कृपा करतात.
भ) न ऐकलेला धर्म ऐकवतात.
ड) ऐकलेल्या धर्माचे शोधन करून पुष्ट करतात.
न) सद्गतीचा मार्ग दाखवतात
*_अशा पाच प्रकारांनी सेवित वरची दिशारूपी श्रमण-ब्राह्मण संत गृहस्थावर सहा प्रकारची कृपा करतात आणि अशा तऱ्हेने वरची दिशा प्रतिच्छन्न, सावली देणारी, झाकलेली, सुरक्षित, क्षेमपूर्ण, भयविहीन होते._*
_*सद्हस्थ सद्धर्माची आचार-संहिता धारण करून अशाप्रकारे सहाही दिशांनी भयमुक्त होतो. भगवानांचा हा मंगल उपदेश ऐकून श्रेष्ठीपुत्र सिगाल आनंदित झाला. परंपरेने निर्जीव झालेल्या निष्प्राण रूढीतून मुक्त होऊन सद्धर्माच्या जिवंत व्यावहारिक मार्गाने आपला इहलोक व परलोक दोन्ही सुधारू शकला.*_
_*या गृहस्य साधकहो! आपण सुद्धा याच तऱ्हेने मंगलमयी गृहस्याची आचार-संहिता धारण करून आपला इहलोक आणि परलोक दोन्हीही सुधारू या आणि खऱ्या अर्थाने मंगललाभी होऊ या.*_
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*_संदर्भ : - दिघनिकाय ३.२४२-२७४, सिगालसुत्त_*
*_संकलन : - महेश कांबळे_*
*_०९-०३-२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/03/blog-post_9.html
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
|