Tuesday, 28 September 2021

डॉ. रखमाबाई राऊत

 डॉ. रखमाबाई राऊत... काळात बाईच्या तोंडून शब्दही बाहेर पडणं कठीण होतं, त्या काळात हिनं एक मोठ्ठा उठाव केला. भारतातली ती पहिली महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर... आणि घटस्फोट घेणारी ती पहिली महिला... नो मिन्स नो हे तिनं १८८० सालीच निक्षून सांगितलं होतं.

भारतातली पहिली प्रॅक्टिसिंग डॉक्टर

               त्याकाळात बाईला ब्र काढणंही मुश्कील होतं, तो हा काळ.... त्यावेळी बंड करणारी, अनिष्ट चाली-रुढींविरोधात एल्गार पुकारणारी आणि त्यासाठी न्यायाव्यवस्थेला गदगदा हलवणारी ही बाई... डॉ. रखमाबाई भिकाजी राऊत... भारतात डॉक्टरकी म्हणून व्यवसाय करणारी पहिली डॉक्टर अशीही तिची ओळख... भारतातल्या पहिली डॉक्टर होण्याचा मान जरी आनंदीबाई जोशींना मिळत असला, तरी आनंदी जोशींनी डॉक्टरकीची प्रॅक्टिस केली नाही... भारतातली पहिली प्रॅक्टिसिंग डॉक्टर म्हणून डॉ. रखमाबाई राऊत हेच नाव इतिहासात लिहिलं गेलं.

'मी माझ्या विठ्ठलाबरोबर राहणार नाही'

               रखमाबाईची गोष्ट प्रचंड प्रेरणादायी... अठराव्या शतकात मी माझ्या विठ्ठलाबरोबर राहणार नाही, हे सांगण्याचं धाडस या रखमेनं दाखवलं... रखमाबाईची ही गोष्ट सुरू होते मुंबईत... रखमाबाईंच्या आईचं १४ व्या वर्षी लग्न झालं, १५ व्या वर्षी मूल झालं आणि १७ व्या वर्षी त्या विधवा झाल्या... अवघ्या चार वर्षांत आईची झालेली पानगळ रखमाला माहीत होती... तीच कदाचित बालविवाहाविरोधातल्या असंतोषाची ठिणगी होती... तरीही ११ व्या वर्षी रखमाबाईंचं लग्न १९ वर्षांच्या दादाजी भिकाजी यांच्याशी लग्न लावून देण्यात आलं. त्यानंतर रखमाच्या आईनं दुसरं लग्न केलं. रखमाचे सावत्र वडील डॉक्टर सखाराम अर्जुन हे सुदैवानं मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारे होते... लग्न झाल्यावरही रखमा माहेरीच राहात होती... आणि शिकतही होती. रखमाचा नवरा अतिशय वाईट प्रवृत्तीचा आणि बाहेरख्याली होता... म्हणूनच त्याच्याबरोबर राहायचं नाही, असा निर्णय रखमानं घेतला.

भारतातला पहिला घटस्फोटाचा खटला

          रखमा आपल्याबरोबर राहात नाही म्हणून तिच्या नवऱ्यानं बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली. १८८४ साली भारतातल्या पहिल्या घटस्फोटाचा खटला बॉम्बे हायकोर्टात सुरू झाला... मी माझ्या नवऱ्याबरोबर राहणार नाही, हे रखमेनं कोर्टाला ठासून सांगितलं. कोर्टानं रखमेला दोन पर्याय दिले... 'एक तर तू तुझ्या नवऱ्याबरोबर त्याच्या घरी राहायला जा... नाही तर कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नाहीस तर तुरुंगात जा...' त्यावेळी, या लग्नामध्ये राहण्यापेक्षा मी तुरुंगात जाईन, असं रखमाबाईंनी कोर्टाला ठणकावलं.

रखमाचा अभूतपूर्व युक्तीवाद

              'नो मिन्स नो' हा अलीकडच्या पिंक सिनेमातला अमिताभचा गाजलेला डायलॉग रखमेनं अठराव्या शतकातच वापरला होता. त्या काळी हा खटला प्रचंड गाजला. तत्कालीन ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी त्याला प्रचंड प्रसिद्धी दिली होती. 'लग्न म्हणजे काय, हे कळण्याचंही माझं वय नाही, त्या वयात माझ्यावर हे लग्न लादलं गेलं, त्यामुळे माझ्यावर या लग्नाची जबरदस्ती केली जाऊ शकत नाही' हा तिचा युक्तीवाद त्याकाळी अभूतपूर्व ठरला.

विचारवंतांची मिळाली साथ

              तत्कालीन समाजाला सणसणीत चपराख देणारा हा युक्तीवाद होता. बॉम्बे हायकोर्टात सर्वाधिक गाजलेल्या खटल्यांमध्ये या युक्तीवादाचा समावेश होतो. या खटल्यात रखमेला साथ देण्यासाठी अनेक समाजसुधारक पुढे आले. बेहरामजी मलबारी, रमाबाई रानडेंनी पुढे येऊन रुकमाबाई संरक्षण समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून रखमाबाईंची खटला जगापुढे आणण्याचा आणि बालविवाहाविरोधात जनजागृती करण्यात आली. त्यावेळी पंडिता रमाबाई लिहितात... 'मुलींसाठी शिक्षण आणि त्यांचं सबलीकरण सरकारनं सुरू केलंय, पण जेव्हा एखादी महिला गुलामी करणं नाकारते, त्यावेळी मात्र सरकार तिचं खच्चीकरण करतं... आणि कायदाही त्या महिलेचे पाय खेचण्याचंच काम करतो'

'लग्न लादलं जातंय'

          हा खटला सुरू असताना २६ जून १८८५ ला रखमाबाईंनी 'टाईम्स ऑफ इंडिया'ला एक पत्रंही लिहिलं, त्यात त्या म्हणतात... 'बालविवाहाची या अनिष्ट प्रथेनं माझ्या आयुष्यातला आनंदच हिरावून घेतलाय. मला जे काही शिकायचंय, आयुष्यात बरंच काही करायचंय, पण हे लग्न त्या सगळ्याच्या आड येतंय. माझा काहीही दोष नसताना माझ्यावर हे लग्न लादलं जातंय'

घटस्फोटाचा इतिहास

        चार वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला... या लग्नातून रखमेला मुक्त करण्यासाठी दादाजीनं पैसे घेतले.... आणि रखमा या लग्नातून मोकळी झाली. तिथेही इतिहास घडला... आताच्या काळातही नवऱ्याकडून बायकोला पोटगी मिळते. पण भारतातल्या पहिल्या घटस्फोटाच्या खटल्यात रखमेनं तिच्या नवऱ्याला पैसे दिले आणि सेटलमेंट केली. त्यावेळी रखमेला अनेक समाजसुधारकांनी खटल्यासाठीचे पैसे देण्याची तयारी दाखवली, पण रखमेनं ती नाकारली... ब्रिटीशांचं राज्य असलेल्या भारतातला हा खटला अनेकार्थानं ऐतिहासिक ठरला... लग्नावेळी मुलीचं वय, सहमती आणि तिची निवड याबद्दल यानिमित्तानं पहिल्यांदाच बोललं गेलं.

फिनिक्स भरारी

          या लग्नातून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या रखमेनं त्यानंतर फिनिक्स भरारी घेतली. रखमेनं आधी इंग्रजीचं शिक्षण घेतलं आणि १८८९ साली London School of Medicine for Women मध्ये तिनं प्रवेश घेतला. १८९४ साली डॉक्टर होऊन ती भारतात परतली. सूरतमध्ये मुख्य आरोग्य अधिकारी म्हणून तिनं भूमिका बजावली. तिनं परत लग्न केलं नाही आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत सामाजिक कार्यात ती सक्रिय राहिली. ९१ व्या वर्षी डॉ. रखमाबाई राऊत यांचं निधन झालं.

प्रेरणादायी प्रवास

           डॉ. रखमाबाई राऊतांचा हा प्रवास, हा लढा अनेक महिलांसाठी प्रेरणा देणारा ठरला... रखमाबाईच्या न्यायालयीन लढ्यामुळे १८९१ सालचा Age of Consent Act प्रत्यक्षात आला. रखमाबाईंकडून प्रेरणा घेऊन त्या काळात अनेक महिलांनी डॉक्टरकीची आणि सामाजिक कार्याची वाट धरली... अठराव्या शतकात जी अशक्य कोटीतली गोष्ट होती, ती रखमेनं करुन दाखवली... 

तिचा तो उठाव, ते बंड आणि

 तो आत्मविश्वास यामुळेच

 भविष्यातलं चित्र बदललं.

संकलीत

लोकशाहीस आवश्यक गोष्टी

 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷       

                   *_लोकशाहीस आवश्यक गोष्टी_*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


           *लोकशाहीची* व्याख्या निरनिराळ्या ग्रंथकारांनी निरनिराळी केलेली आहे. *_वॉल्टर बजेट याने "लोकशाही म्हणजे विचारविनिमय, चर्चा करून सरकार चालविणे" अशी केली आहे. तर अब्राहम लिंकन याने "लोकांचे लोकांनी व लोकांकरिता चालविलेले सरकार"_* अशी व्याख्या केली आहे. माझी लोकशाहीची व्याख्या निराळी आहे.

       *_लोकशाही म्हणजे जिच्यामुळे रक्तपात न होता आर्थिक व सामाजिक क्षेत्रात बदल घडून आणता येतात अशी पद्धत किंवा सरकार होय. ही गोष्ट घडून आली तरच ती खरी लोकशाही होय._*


         *_लोकशाहीस आवश्यक गोष्टी._*

    लोकशाहीमध्ये खालील गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत :

     

            *१.  वर्गभेद नकोत*

      _लोकशाही विशिष्ट अधिकार असलेला, पिळवणूक झालेला, दबलेला असे वर्ग नसावे. वर्ग विग्रहावर आधारलेले समाज अस्तित्वात असेल तर रक्तमय क्रांती होईल. *दुभंगलेले घर एकटे उभे राहू शकत नाही, असे लिंकन म्हणतो. लोकशाहीला हे भेद म्हणजे मोठी अडसर आहे.*_


         *२. विरोधी पक्ष हवाच*

       _*लोकशाही यशस्वी होण्यास चांगला विरोधी पक्ष हवा.* इंग्लडमध्ये पक्षनिष्ठ राजकारणास कमी भाव आहे. आपल्याकडे दर पाच वर्षांनी मतदारांकडे जाण्याची सवलत ठेवली आहे. *विरोधी पक्षाला सरकारने कृत्याची खात्री करून दिली पाहिजे. आपल्याकडील विरोधी पक्षाला कमी प्रसिद्ध देतात; व सरकारी पक्षाची फाजील प्रसिद्धी करतात.* हे कसे काय घडते ते समजत नाही. *लोकशाहीला हा पक्षपात पोषक ठरत नाही. शिवाय वृत्तपत्रे तर विरोधी पक्षाला अगदी तुच्छ लेखतात* याच्याउलट, इंग्लडमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्याला पगार देण्यात येतो. *विरोधी पक्षामुळे सरकार कुठे चुकते ते कळते.* त्यामुळे तिकडे त्यासाठी पैसे खर्च करण्यात येतात._


      *३. शासन समता*

     _*लोकशाहीत तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कायद्यात व राज्यव्यवस्थेत समानता असली पाहिजे.* एखाद्याला व्यापार करावयाचा तर लायसेन्स हवे ते तत्व मान्य असते. एकदा इसम लायसेन्स मागण्यासाठी मंत्र्याकडे गेला तर तो मंत्री अगोदर त्याच्या टोपीकडे पाहतो. आपल्या पक्षाचा असला की त्याला चटकन लायसेन्स मिळते. दुसरा कोणी गेला तर मिळत नाही. तीच गोष्ट कायद्याच्या बाबतीत. आपल्या पक्षांच्या सभासदावर खटला असला तर तो काढून टाकावा किंवा दुसरीकडे चालवावा असे प्रयत्न होतात. *अशा गोष्टी झाल्या तर मोठा गोंधळ उडेल.* अमेरिकेतही पूर्वी अशी पद्धत होती पण ती लोकशाहिस पोषक नसल्याचे आढळून आल्याने ती बंद झाली आहे._


      *४. तत्वांस नीती  धैर्याची जोड*

       _*लोकशाहीला घटनात्मक पण नैतिक मूल्यांचा आदर असला पाहिजे.* अध्यक्षपदासाठी जॉर्ज वॉशिंग्टनने दुसऱ्या तिसऱ्यांदा उभे राहण्यास नकार दिला होता. तो म्हणाला, *वंशपरंपरेने मला अध्यक्ष व्हावयाचे नाही किंवा हुकूमशाही व्हावयाचे नाही. दरवर्षी मीच उभा राहिलो तर घटनेतील तत्वांना किंमत काय राहणार?"* लोकांच्या अलोट भक्तीमुळे जॉर्ज वॉशिंग्टन पुन्हा निवडून आला पण त्याने घटनेतील तत्वांचा विसर पडू दिला नाही._


 *५. बहुमतवाल्यांची अल्पमतवाल्यांवर हुकूमत नको*

      _*लोकशाही राबवायची असेल तर बहूमतवाल्या पक्षाची अल्पमतवाल्या पक्षावर सारखी हुकूमत असता कामा नये. अल्पमतावाल्यांना त्याबद्दल भयही वाटता कामा नये. आपण अल्पसंख्यांक असलो तरी सुरक्षित आहोत असे त्यांना वाटले पाहिजे.*_


       *६. सामाजिक नीतिमत्ता*

     _लोकशाहीस सामाजिक नितीमत्ताही लागते. सामाजिक जीवनात कायद्याची ढवळाढवळ नको असे लोकांना वाटते. *आपल्याकडे सामाजिक नीतिमत्ता पार गेलेली आहे.*_


       *७. अन्यायाविरुद्ध प्रतिकार*

     _*जनतेने नेहमी अन्यायाविरुद्ध जागरूकता दाखविली पाहिजे.* दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहात आज गोरेही सामील होतात, याचे कारण अन्यायाची चीड आहे. *ज्यांच्यावर अन्याय होत आहे, ते लोक अन्याय दूर न झाल्यास क्रांतीच्या मार्गाने जाण्याचे ठरवितात. तशी प्रवृत्ती होते.*_


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*संदर्भ :*

*_प्रबुद्ध भारत ता. ०२/०३/१९५७ (पुणे येथे १९४५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले भाषण)_*

*संकलन : महेश कांबळे*

*२९/०९/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Monday, 27 September 2021

व्यक्तिपूजेपासून अलिप्त राहा

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

             *_व्यक्तिपूजेपासून अलिप्त राहा_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
              _लोकशाहीचे अस्तित्व टिकविण्यासाठी आपणाला दुसरी जी गोष्ट करावयाची आहे ती ही की लोकशाहीचा झेंडा सतत उंच ठेवण्यास जे उत्सुक आहेत त्यांच्यासाठी *जॉन स्टुअर्ट* याने जो भयसुचक संदेश दिलेला आहे तो पाळणे, हे होय. तो संदेश असा - *"आपल्यातील एखादा माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या चरणी आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याची सुमने वाहू नयेत."*_
           _ज्यांनी आयुष्यभर आपल्या मायभूमीची सेवा केलेली आहे, अशा थोर व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे यात काही चूक नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्याला सुद्धा काही मर्यादा आहेत. याबाबतीत *आर्यलँडच्या देशातील डॅनियल ओ कोनेल याने मार्मिकपणे म्हटलेले आहे की, "स्वाभिमानाचा बळी देऊन कोणताही मनुष्य कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही, शिलाचा बळी देऊन कोणतीही स्त्री कृतज्ञ राहू शकणार नाही, आणि स्वातंत्र्याचा बळी देऊन कोणतेही राष्ट्र कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही."*_
         _*या भयसुचक संदेशाची जरुरी इतर कोणत्याही देशापेक्षा भारत देशाला जास्त आहे. याचे कारण असे की भारताच्या राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती महात्म्यपूजा ही भावना जितकी थैमान घालते तितकी जो जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात घालीत नाही. एखाद्याने धार्मिक बाबतीत भक्ती दाखवली तर ती त्याची जन्म-मरणाच्या फेऱ्यातून कायमची मुक्तता करू शकेल; परंतु एखाद्याने राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती महात्म्यपूजा दाखविली तर ती त्या राजकीय पंथात हुकूमशाहीची सत्ता प्रस्थापित करेल.*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*संदर्भ :*
*दिल्ली मध्ये घटना समितीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या भाषणातील काही भाग*

*संकलन : महेश कांबळे*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Saturday, 25 September 2021

गृहस्थाचे खरे हितशत्रू व खरे मित्र

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


          *_गृहस्थाचे खरे हितशत्रू व खरे मित्र_*

    🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼                    

                          *_हितशत्रू_*

*(१)* घरी आल्यावर काहींना काही घेऊन जाणारा

*(२)* शब्दांनीच उपकार करू पाहणारा

*(३)*  हांजी हांजी करणारा

*(४)* पापकर्मात सहाय्य करणारा


                      *_हितैषी / खरे मित्र_*

*(१)* उपकार करणारा

*(२)* दुःखाने दुःखी व सुखाने सुखी होणारा

*(३)* सदुपदेश करणारा

*(४)* अनुकंपा करणारा


*संदर्भ :*

१) बौद्धधम्मावरील चार निबंध

२) बौद्धधम्म जिज्ञासा

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  *संकलन : महेश कांबळे*

   २६/०९/२०२१

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Wednesday, 22 September 2021

७ अरहन्तवग्गो

 

 

 

 *_धम्मपद_*  

*_७ अरहन्तवग्गो_*

 

 

*_गतद्धिनो विसोकस्स विप्पमुत्तस्स सब्बधि ।_*

*_सब्बगन्थप्पहीणस्स परिलाहो न विज्जति ।।१।।_*

*_मार्ग समाप्त केलेला / अंताला पोचलेला, शोक-रहित, सर्वथा मुक्त,_*

*_सर्व-बंधन-क्षीण मानवास परिताप होत नाही. (१)_*

 

*_उय्युञ्जान्ति सतीमन्तो न निकेते रमन्ति ते ।_*

*_हंसा'व पल्ललं हित्वा ओकमोकं जहन्ति ते ।।२।।_*

*_विचारवंत उद्योग करतात, घरात /सामान्य गोष्टीत रमत नाहीत,_*

*_जसा हंस लहान तलाव सोडून जातो, तसेच घरातले 'घर' सोडून जातात. (२)_*

 

*_येसं सन्निचयो नत्थि ये परियातभोजना ।_*

*_सुञ्ञतो अनिमित्तो च विमोक्खो यस्स गोचरो ।_*

*_आकासे'व सकुन्तानं गति तेसं दुरन्नया ।।३।।_*

*_जे संचय करीत नाहीत, जे भोजनाची योग्य मात्रा जाणतात,_*

*_शून्य-स्वरूप, निमित्त-रहित विमुक्ती ज्याच्या दृष्टीपथात आहे,_*

*_त्यांची गती, आकाशात पक्षांची असते तशी, अज्ञेय असते. (३)_*

 

*_यस्सा'सवा परिक्खीणा आहारे च अनिस्सितो ।_*

*_सुञ्ञतो अनिमित्तो च विमोक्खो यस्स गोचरो ।_*

*_आकासे'व सकुन्तानं पदं तस्स दुरन्नयं ।।४।।_*

*_ज्यांचे आश्रव / विकार क्षीण आहेत, आहाराविषयी जो आसक्त नाही,_*

*_शून्य - अनिमित्त असा मोक्ष ज्याच्या दृष्टिपथात आहे,_*

*_त्यांचा मार्ग आकाशातील पक्षाच्या मार्गाप्रमाणे शोधणे कठीण आहे. (४)_*

 

*_यस्सिन्र्दियानि समथं गतानि अस्सा यथा सारथिना सुदन्ता ।_*

*_पहीनमानस्स अनासवस्स देवापि तस्स पिहयन्ति तादिनो ।।५।।_*

*_सारथ्याने उत्तम रीतीने तयार करून ताब्यात ठवलेल्या घोड्यांप्रमाणे ज्याची इंद्रिये शम पावली आहेत, ज्याने अभिमान सोडला आहे व ज्याचे आश्रव म्हणजे विकार नाहीसे झाले आहेत, अशा पुरुषाचा देव देखील हेवा करतात. (५)_*

 

*_पठवीसमो नो विरुज्झति इन्दखीलूपमो तादि सुब्बतो ।_*

*_रहदो व अपेतकद्दमो संसारा न भवन्ति तादिनो ।।६।।_*

*_जो पृथ्वीप्रमाणे कोणाचा प्रतिकार करीत नाही, जो नगरद्वारासमोरच्या स्तंभाप्रमाणे स्थिर असा सुव्रत,_*

*_जो चिखल नाहीसा झालेल्या डोहाप्रमाणे / निर्मल त्याच्या सारख्याल संसार नाही. (६)_*

 

*_सन्तं तस्स मनं होति सन्ता वाचा च कम्म च ।_*

*_सम्मदञ्ञा विमुतस्स उपसन्तस्स तादिनो ।।७।।_*

*_शिणलेले मन, वाचा, कृती शांत होतात...._*

*_सुजाणतेमुळे विमुक्त होऊन, तसे चित्तं शांत होते. (७)_*

 

*_अस्सद्धो अकतञ्ञू च सन्धिच्छेदो च यो नरो ।_*

*_हतावकासो वन्तासो स वे उत्तमपोरिसा ।।८।।_*

*_अश्रद्धा, अकृतज्ञता यांच्याशी संबंध छेदनारा मानव,_*

*_शुभ-अशुभाच्या मर्यादा त्यागलेला, तो उत्तम मानव. (८)_*

 

*_गामे वा यदि वा रञ्ञे निन्ने वा यदि थले ।_*

*_यत्थारहन्तो विहरन्ति तं भूमिं रमणेय्यकं ।।९।।_*

*_गाव किंवा जंगल, खोल जमीन किंवा पठार,_*

*_जेथे अर्हत राहतात ती भूमी रमणीय / आनंददायी. (९)_*

 

*_रमणीयानि अरञ्ञानि यत्थ न रमते जनो ।_*

*_वितरागा रमिस्सन्ति न ते कामगवेसिनो ।।१०।।_*

*_जेथे सामान्य लोक रममाण होत नाहीत, तेथे अरण्यात सुजन रमतात,_*

*_तेथे वैरागी रमतात, कारण ते भोगाचा शोध घेत नाहीत. (१०)_*

 

 

­­­­­­­­­­­­

*प्रतिज्ञा आपण करूया*

*१) जीवसृष्टी आहे असीम; ती भवसागरपार नेण्याची*

*२) आपणांत दोष असंख्य; ते नष्ट करण्याची*

*३) आहेत सत्य अनंत, पूर्ण आकलण्याची*

*४) भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची*

 

*डॉ बाबासाहेब आंबेडकर*

*बुद्ध आणि त्याचा धम्म*

 

 

*_सर्व प्राणी सुखी होवोत, सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, कोणालाही दुःख न होवो, सर्वांचे मङ्गल हो!!_*

*_साधु साधु साधु_*

*महेश कांबळे*

 

 

६ पण्डितवग्गो

 

 

 

 *_धम्मपद_*  

*_६ पण्डितवग्गो_*

 

 

*_निधीनं व पवत्तारं यं पस्से वज्ज दस्सिनं ।_*

*_निग्गय्हवादिं मेधाविं तादिसं पण्डितं भजे ।_*

*_तादिसं भजमानस्स सेय्यो होति न पापियो ।।१।।_*

*_जो दोषाची बाजू दाखविणाऱ्याला संपत्तीच्या अस्तित्वासम समजतो,_*

*_मनोनिग्रही, प्रज्ञावान, बुद्धिवाना सारख्यांची संगत करतो,_*

*_तशा चित्ताच्या संगाने श्रेष्ठ / भले होते, वाईट होत नाही. (१)_*

 

*_ओवदेय्यानुसासेय्य असब्भा च निवारये ।_*

*_सतं हि सो पियो होति असतं होति अप्पियो ।।२।।_*

*_जो उपदेश करतो, अनुशासन करतो, अनुचिताचे निवारण करतो,_*

*_ते सुजनांना प्रिय असतात, दुर्जनांना अप्रिय असतात. (२)_*

 

*_न भजे पापके मित्ते न भजे पुरिसाधमे ।_*

*_भजेथ मित्ते कल्याणे भजेथ पुरसुत्तमे ।।३।।_*

*_दुराचारी मित्राची संगत नको, अधम माणसाची संगत नको,_*

*_कल्याणकारी मित्राची संगत करावी, उत्तम माणसाची संगत करावी. (३)_*

 

*_धम्मपीति सुखं सेति विपस्सनेन चेतसा ।_*

*_अरियप्पवेदिते धम्मे सदा रमति पण्डितो ।।४।।_*

*_सदाचारावर श्रद्धा / प्रीती असणारा सुखाने, निश्चिन्त मनाने झोपतो,_*

*_बुद्धिमान सुजनांनी सांगितलेल्या सिद्धांतात रममाण असतात. (४)_*

 

*_उदकं हि नयन्ति नेत्तिका उसुकारा नमयन्ति तेजनं ।_*

*_दारूं नमयन्ति तच्छका अत्तानं दमयन्ति पण्डिता ।।५।।_*

*_पाणी नेणारा पाणी नेतो, बाणकार बाण बनवितो,_*

*_सुतार लाकूड बनवितो, बुद्धिमान स्वतःला कष्टवितात. (५)_*

 

*_सेलो तथा एकघनो वातेनं न समीरति।_*

*_एवं निन्दापसंसासु न समिञ्जन्ति पण्डिता ।।६।।_*

*_जसे मोठा पर्वत वाऱ्याने हलत नाही,_*

*_तसेच बुद्धिमंत निंदा वा प्रशंसेने विचलित होत नाही. (६)_*

 

*_यथापि रहदो गम्भीरो विप्पसन्नो अनाविलो ।_*

*_एवं धम्मानि सुत्वान विप्पसीदन्ति पण्डिता ।।७।।_*

*_जसे अथांग, स्थिर तलाव नितळ-स्वच्छ असतात,_*

*_तसे बुद्धिमंत 'सदाचार सिद्धांत' / धम्म ऐकून नितळ / स्पष्ट होतात. (७)_*

 

*_सब्बत्थ वे सप्पुरिसा चजन्ति न कामकामा लपयन्ति सन्तो ।_*

*_सुखेन पुट्ठा अथवा दुखेन न उच्चावचं पण्डिता दस्सयन्ति ।।८।।_*

*_सत्पुरुष सर्वस्व त्यागतात, सुजन इच्छा-भोगा संबंधी बोलतही नाहीत,_*

*_सुखाने वा दुक्खाने विचारले / ग्रासले तरी बुद्धिमंत उच्च-नीचता पहात नाहीत / विकृत होत नाहीत. (८)_*

 

*_न अत्त हेतु न परस्स हेतु न पुत्तमिच्छे न धनं न रट्ठं।_*

*_न इच्छेन अधम्मेन समिद्धिमत्तनो ।_*

*_स सीलवा पञ्ञ वा धम्मिको सिया ।।९।।_*

*_न स्वतःसाठी, न दुसऱ्यासाठी, न पुत्राच्या इच्छेने, न राज्यासाठी,_*

*_स्वतःच्या समृद्धीसाठी, दुराचाराची / अद्धमाची इच्छा करतो,_*

*_तो शीलवान, प्रज्ञावान, सदाचारी / धम्मीक असतो. (९)_*

 

*_अप्पका ते मनुस्सेसु ये जना पारगामिनो ।_*

*_अथायं इतरा पजा तीरमेनुधावति ।।१०।।_*

*_जे लोक पार जातात ते मानवात कमीच,_*

*_तेंव्हा इतर प्रजा किनाऱ्यावरच धावत असतात. (१०)_*

 

*_कण्हं धम्मं विप्पहाय सुक्कं भावेथ पण्डितो ।_*

*_ओका अनोकं आगम्म विवेके यत्थं दूरमं ।।११।।_*

*_काळा / वाईट स्वभाव सोडून बुद्धिमानांनी शुभ-सवय करावी,_*

*_घरातून बेघर होउन, विचाराने दूर जाऊन / एकाकी व्हावे...... (११)_*

 

*_ये च खो सम्मदक्खाते धम्मे धम्मानुवत्तिनो ।_*

*_ते जना पारमेस्सन्ति मच्चुधेय्यं सदुत्तरं ।।१२।।_*

*_परंतु जे खरोखर धर्म सम्यक उपदेशीला असता त्या धर्माप्रमाणे वर्तन करतात,_*

*_ती माणसे मृत्यूच्या सुदूस्तर अशा लक्ष्याच्या / क्षेत्राच्या पार जातात. ।।१२।।_*

*_तत्राभिरतिमिच्छेय्य हित्वा कामे अकिञ्चनो ।_*

*_परियोदपेय्य अत्तानं चित्तक्लेसेहि पण्डितो ।।१३।।_*

*_वासनांचा त्याग करून, तेथेच रहाण्याची इच्छा करावी,_*

*_स्वतःच्या चित्तातले क्लेश स्वच्छ करावे. (१३)_*

 

*_येसं सम्बोधि अङगेसु सम्मा चित्तं सुभावितं ।_*

*_आदान पटिनिस्सग्गे अनुपादाय ये रता ।_*

*_खीणासवा जुतीमन्तो ते लोके परिनिब्बुता ।।१४।।_*

*_ज्यांचे चित्तं सर्वांगाने सुबुद्ध, योग्य असते,_*

*_विचार न करता निश्चयाने ग्रहणाच्या परित्यागात रममाण असतात,_*

*_वाईट-विचार-क्षीण, प्रभावंत मानव या लोकात निर्वाण प्राप्त करतात. (१४)_*

 

 

 

­­­­­­­­­­­­

*प्रतिज्ञा आपण करूया*

*१) जीवसृष्टी आहे असीम; ती भवसागरपार नेण्याची*

*२) आपणांत दोष असंख्य; ते नष्ट करण्याची*

*३) आहेत सत्य अनंत, पूर्ण आकलण्याची*

*४) भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची*

 

*डॉ बाबासाहेब आंबेडकर*

*बुद्ध आणि त्याचा धम्म*

 

 

*_सर्व प्राणी सुखी होवोत, सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, कोणालाही दुःख न होवो, सर्वांचे मङ्गल हो!!_*

*_साधु साधु साधु_*

*महेश कांबळे*

 

 

 


कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...