🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_व्यक्तिपूजेपासून अलिप्त राहा_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_लोकशाहीचे अस्तित्व टिकविण्यासाठी आपणाला दुसरी जी गोष्ट करावयाची आहे ती ही की लोकशाहीचा झेंडा सतत उंच ठेवण्यास जे उत्सुक आहेत त्यांच्यासाठी *जॉन स्टुअर्ट* याने जो भयसुचक संदेश दिलेला आहे तो पाळणे, हे होय. तो संदेश असा - *"आपल्यातील एखादा माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या चरणी आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याची सुमने वाहू नयेत."*_
_ज्यांनी आयुष्यभर आपल्या मायभूमीची सेवा केलेली आहे, अशा थोर व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे यात काही चूक नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्याला सुद्धा काही मर्यादा आहेत. याबाबतीत *आर्यलँडच्या देशातील डॅनियल ओ कोनेल याने मार्मिकपणे म्हटलेले आहे की, "स्वाभिमानाचा बळी देऊन कोणताही मनुष्य कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही, शिलाचा बळी देऊन कोणतीही स्त्री कृतज्ञ राहू शकणार नाही, आणि स्वातंत्र्याचा बळी देऊन कोणतेही राष्ट्र कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही."*_
_*या भयसुचक संदेशाची जरुरी इतर कोणत्याही देशापेक्षा भारत देशाला जास्त आहे. याचे कारण असे की भारताच्या राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती महात्म्यपूजा ही भावना जितकी थैमान घालते तितकी जो जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात घालीत नाही. एखाद्याने धार्मिक बाबतीत भक्ती दाखवली तर ती त्याची जन्म-मरणाच्या फेऱ्यातून कायमची मुक्तता करू शकेल; परंतु एखाद्याने राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती महात्म्यपूजा दाखविली तर ती त्या राजकीय पंथात हुकूमशाहीची सत्ता प्रस्थापित करेल.*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*संदर्भ :*
*दिल्ली मध्ये घटना समितीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या भाषणातील काही भाग*
*संकलन : महेश कांबळे*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment