______________________________________________
*_उपोसथ_*
_________________________________________________
_त्यावेळी इतर मताचे
परिव्राजक चतुर्दर्शी पौर्णिमा आणि दोन्ही पक्षाच्या अष्टमीला एकत्रित होऊन
धर्मोपदेश करीत असत. पुष्कळ लोक त्यांच्याकडे धर्मोपदेश ऐकण्यासाठी त्यांच्याजवळ
जात असत. त्यामुळे लोकांची भावना त्या मतांच्या परीव्राजाकांप्रती वाढत असे.
त्यामुळे ते श्रेद्धेने तेथे जात असत आणि त्या परीव्राजकांना पण नवीन अनुयायी मिळत
असत._
_तेव्हा *महाराज सेनिय
बिंबसाराच्या* मनात एक विचार आला कि, “भगवान बुद्धांच्या भिक्षूंनी पण तसं का करू
नये? हा विचार भगवान बुद्धांजवळ सांगायला पाहिजे म्हणून दुसर्या दिवशी महाराज
सेनिय बिंबिसार भगवान बुद्ध राजगृहाच्या गृधकुट पर्वतावर राहत होते तेथे जाऊन
त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला. एकीकडे बसल्यावर मगधराज सेनिय बिंबिसाराने
तथागतांना सांगितले “भगवान, माझ्या मनात असा विचार आला कि, *राजगृहात इतर मताचे
परिव्राजक वद्य चतुर्दशी, पौर्णिमा आणि दोन्ही पक्षाच्या अष्टमीला एकत्रित होऊन
धर्मोपदेश करतात.* लोक त्यांच्याजवळ धर्म ऐकण्यासाठी जातात. त्यामुळे इतर मतांच्या
परीव्राजकांप्रती लोकांची भावना श्रद्धामय होऊन त्यांच्याप्रती आकर्षण निर्माण
होते आणि लोक त्यांचे अनुयायी होतात. *तर भगवान, मला असे वाटते कि, आपल्या श्रमनांनी
पण वद्य चतुर्दशी, पौर्णिमा आणि दोन्ही पक्षाच्या अष्टमीला एकत्रित होऊन धम्माचा
उपदेश लोकांना का देऊ नये? भगवान, चांगले होईल जर भिक्षू लोकांना जर वद्य चतुर्दशी,
पौर्णिमा आणि दोन्ही पक्षाच्या अष्टमीला लोकांना एकत्रित करून धम्मोपदेश दिला तर.”*_
_तेव्हा तथागतांनी
मगधराज सेनिय बिंबीसारास धार्मिक कथा सांगून समुत्तेजीत केले. महाराज बिंबीसार कथा
ऐकून समुत्तेजीत होऊन आसनावरून उठले आणि भगवंताना त्रिवार अभिवादन करून प्रदक्षिणा
घालून निघून गेले. *तथागतांनी त्याचवेळी भिक्षुंना संबोधित करून सांगितले “भिक्षुंनो,
मी तुम्हाला अनुमती देतो कि, तुम्ही पण वद्य चतुर्दशी, पौर्णिमा आणि दोन्ही
पक्षाच्या अष्टमीला सर्वांनी एकत्रित होऊन लोकांना धम्मोपदेश द्यावे.”*_
*महेश कांबळे*
*०१/०८/२०२१*
*संदर्भ :* *उपोसथ क्खन्धक*
*विनयपिटक*
No comments:
Post a Comment