*_प्रश्न ८३ –_*
*_अ) साप डूक धरतो काय? मंत्राने सापाचे विष उतरवले जाते असे आम्ही पाहिले आहे. तुमचे मत काय?_*
*_ब) ज्या ठिकाणी धन असते तेथे भुजंग बसलेला असतो हे खरे काय?_*
*उत्तर 👉*
अ) साप डूक धरतो, माणसाचा धक्का लागल्यास त्याचा आवाज लक्षात ठेवतो, तलवारीने डोके तोडले तरी डोके माग काढीत बुटात येऊन बसतो व चावतो. नांगराच्या फाळाने नागिणीची पिल्ले चुकून जरी मेली, तरी नागीण नांगरणाऱ्याचा बदला घेते *या सर्व समजुती खोट्या आहेत.*
सापाला कान नसतात. त्यामुळे त्यास ऐकू येत नाही. आवाज ऐकू येत नसेल तर बदला घेणार कसा? सापाला कुत्र्यासारखी घानेंद्रीय नसतात. त्यामुळे कुत्रा जसा वासावरून मार्ग काढतो तसा सापाला काढता येत नाही. सापाची दृष्टी मंद असते. तीन फुटांपलीकडचे त्याला स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे चेहरा ओळखणे सापाला शक्य नाही. सापाचे तुकडे झाले तर दोन्ही तुकडे मरून पडतात. सापाला थोडी जरी जखम झाली तरी जखमेला मुंग्या लागनू साप मरतो.
*वरील सर्व कारणे लक्षात घेता साप डूक धरण्याची मुळीच शक्यता नाही.*
*मंत्राने सापाचे विष उतरिवले जाते, ही घातक अंधश्रद्धा आहे.* एकट्या भारतात दरवर्षी पाऊण लाख लोक साप चावनू मरतात. त्यांपैकी बहुतेक लोकांचा बळी मंत्रावरची अंधश्रद्धा घेते.
*भारतात सापडणाऱ्या सापांपैकी ८० टक्के साप बिनविषारी असतात. महाराष्ट्रात विषारी सापाच्या फक्त चारच प्रमुख जाती आहेत. नाग, मण्यार, घोणस व फुरसे.*
बऱ्याच बाबतीत व्यक्तीस चावलेला साप बिनविषारी असतो. अपवादात्मक बाबतीत विषारी साप चावला तर विषाची शरीरात गेलेली मात्रा व्यक्ती मरण्याइतकी नसते. याचा फायदा मांत्रिकांना मिळतो. मात्रा पुरेशी असेल, तर विषारी सर्पदंशाने व्यक्ती हमखास मरते. अशा वेळी थातुरमातुर कारण देवनू मांत्रिक हात झटकतो.
ब) *भुजंग नावाचा सापच नाही.* मोठ्या कोणत्याही सर्पाचे आयुष्य १० वर्षांपेक्षा कमी असते (५ ते ८ वर्षे ). त्यामुळे गुप्त धनावर भुजंग पहारा करीत बसलेला असतो, हे खोटे आहे.
*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*
*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment