*_प्रश्न ८६ – श्रद्धा म्हणजे काय? विश्वास म्हणजे काय? अंधश्रद्धा कशाला म्हणावे? अंधश्रद्धेचा दुरुपयोग करून स्वार्थासाठी फसवणकू करणे हा नीचपणा आहे हे मान्य, पण अंधश्रद्धा सर्वत्र त्याज्य आहे काय? देशावरची, देवावरची, श्रद्धा अंधश्रद्धा आहे काय? अंधश्रद्धेमुळे त्यांना चांगले फळ मिळाले त्यांना तुमचे काय सांगणे आहे? उदा. मार्क्सवादावरील श्रद्धेमुळे रशियात समाजवाद आला. सावरकरांची देशाच्या स्वातंत्र्यावर श्रद्धा होती, म्हणून कठोर देहदंड त्यांनी सोसला. अशा श्रद्दाळूंना अंधश्रद्धाळू समजून निर्बद्ध म्हणणार काय?_*
*उत्तर 👉* अंधश्रद्धा
निर्मुलनाच्या क्षेत्रात या स्वरूपाचे प्रश्न सतत विचारले जातात श्रद्धा, अंधश्रद्धा, विश्वास
या बाबी समजावून घेताना मनात उठणारे विचार -कल्लोळ व काहीशी भावना- प्रक्षुब्धता याचे प्रतिबिंब त्यात पडलेले असते. मानवाचे
व्यक्तिमत्व हे विचार व भावना यांच्या संतुलनाने घडलेले असते. विश्वास, श्रद्धा, अंधश्रद्धा
यामध्ये विचार व भावना यांचे प्रमाण व त्याची
तीव्रता, परिणामकारक कमी अधिक असते.
विश्वासात विचारांचे संपूर्ण प्राधान्य असते. विज्ञानाचे
नियम, शास्त्रीय संशोधन,कार्यकारणभाव यांच्या आधारे विकास उभा असतो.
दोन अधिक दोन चार होतात. पोलिओ
लस दिल्याने पोलिओ होत नाही. विजेचा प्रवाह चालू असल्यास दिवा लागतो, पेट्रोलवर
गाडी चालते. पेनमध्ये शाई असेल, तर कागदावर अक्षर उमटते या बाबी वादातीतपणे सिद्ध झालेल्या असतात. त्यांना
आपण विश्वास म्हणतो. विश्वासात भावनेची गुंतवणकू नसते वा सर्वात कमी असते.
अंधश्रद्देत नेमके याच्या उलट स्थिती असते. विज्ञानाचे
नियम डावलनू , कार्यकारणभावाचा
विचार सोडून देऊन, घटना स्वीकारलेली असते. गुप्तधनासाठी वा पुत्रप्राप्तीसाठी नरबळी देणे, देवाला
सोडलेली देवदासी, देवीच्या कोपाने देवी रोग होतो, हे मानणे अथवा कॉलरा झाल्यावर मरीआईचा कोप
झाला समजून गाडा ओढणे,या बाबी आज आपण वादातीत मूर्खपणाच्या, चुकीच्या म्हणून च अंधश्रद्धा समजतो. मात्र
ती मानणाऱ्या व्यक्तींच्या वा समुदायाच्या लेखी ती बाब महत्वाची असते. विचारांकडे
दुर्लक्ष वा डोळेझाक करून व्यक्तीने वा समुदायाने त्यात भावनिक गुंतवणकू केलेली असते. म्हणनू
देवाला मुली सोडण्याच्या घटना व नरबळी कृत्ये होत राहतात. गावकरी
गावात घडणाऱ्या घटनांचे कारण चेटुक समजनू व एखाद्या स्त्रीला चेटकीण समजून तिची नग्न करून धिंड काढू शकतात. अथवा पाऊस पडला नाही तर देवाचा गाभारा पाण्याने वा दुधाने काढू शकतात.
घडणाऱ्या घटनेस ज्ञानाच्या, अनुभवाच्या साहाय्याने प्रश्न विचारले असता,
जिचा खरेपणा टीकतो, तीचा कार्यकारणभाव समजतो,
तिला विश्वास म्हणतात. जिचा खरेपणा टीकत नाही तिला
अंधश्रद्धा समजतात. प्रत्यक्ष अशी कसोटी घेणे अनेक बाबतीत अवघड
वा अशक्य होते. कारण अंधश्रद्धेचे एक वैशिष्ट्य असे आहे कि ती
बाळगणारी व्यक्ती वा समहू तीची चिकित्सा करत नाहीत व इतरांनी ती केली तर त्यांना ती
चालत नाही. तसे करणे हा त्या व्यक्तीला वा समुहाला स्वतःच्या
व्यक्तिमत्वावर हल्ला वाटतो. अंधश्रद्धेमध्ये व्यक्तीने अज्ञानालाच
ज्ञान समजून त्यावर भावनेची कवचकुंडले चढवलेली असतात.चिकित्सेच्या
साहाय्याने त्याचा भेद करण्याचा प्रयत्न व्यक्तीला वा
समूहाला दुःखदायकही वाटतो व स्वत:ला असुरक्षित बनिवणारा वाटतो. असे असनू ही समाजातनू काही अंधश्रद्धा जात आहेत हे आपण बघतो. हे कसे घडते?
एकतर ज्या अंधश्रद्धा भौतिक घटनांशी संबंधित
असतात त्या विज्ञानाच्या प्रकाशझोतात आपोआप
निष्प्रभ होतात. पाऊस पडणे वा न पडणे, भूकं प होणे, ज्वालामुखीचा उद्रेक वा रोगांच्या साथी
या बाबी एकेकाळी दैवी कोपच मानल्या गेल्या
होत्या. आज त्या तशा मानणे हे अंधश्रद्दांत जमा होते.
दुसरे म्हणजे, बदलत्या समाजाच्या गतीशीलतेमुळे
काही अंधश्रद्धा गळून पडणे अपरिहार्य बनते. मासिक पाळीत स्त्री
अपवित्र असते, तिला
अस्पर्शी समजनू बाजूला बसवावी ही गोष्ट मानणे
आजच्या गतीमान व स्त्री-पुरुष समानतेच्या युगात अशक्य व अयोग्य असल्याने ती अंधश्रद्धा
बननू तो आपोआप
बाजूला पडते.
तिसरे म्हणजे, ज्या अंधश्रद्धा उघडपणे शोषणावर, मानवी मूल्यांना
पायदळी तुडवून उभ्या असतात, उदाहरणार्थ- सती, देवदासी या प्रथा, त्यांच्या
पालनासाठी जनमानसाचा पाठिंबा ज्या प्रमाणात उरत नाही त्या प्रमाणात कमी होतात.
तरीही या सर्व प्रयत्नांना पुरुनही अनेक अंधश्रद्धा उरतात. जत्रांच्या मध्ये आजही पाळले जाणारे अनेक आचार, प्रथा,
रुढी हे त्यांचे सामुहिक पातळीवरचे ढळढळीत रुप आहे. परंतु याबद्दल बोलणे जनमानसाला रुचत नाही मग बदलणे तर दूरच राहिले.
या बहुसंख्य अंधश्रद्धांत आजही या ना त्या स्वरूपात देव संकल्पनेचाच
आधार असतो, हेही विसरता येत नाही.
ज्ञानाच्या क्षेत्रात ज्याची तड लागली आहे, वादातीतपणे ज्या सिद्ध झाल्या त्या घटनांना
विश्वास समजणे व वादातीतपणे ज्यांची अशास्त्रीयता सिद्ध झाली त्यांना अंधश्रद्धा समजणे
हे दोन टोकांकडचे असल्याने सोपे आहे. परंतु समाजजीवनाच्या
क्षेत्रात प्रत्येक गोष्टीची अशी तड लागत नाही. विचाराच्या क्षेत्रात
ज्याबद्दल मतभेद आहेत, मतिभन्नता आहे, त्याबाबत
व्यक्ती वा समहू आपापला निर्णय एका बाजूने घेतात, त्या
निर्णयात भावनिक गुंतवणूक करतात. त्या वेळी श्रद्धा निर्माण होते. म्हणजेच श्रद्धांचे हे
विषय समाज-जीवनातील समाजधारणांच्या विचारांचे प्रवाह दाखवतात.
स्वतःच्या जीवनाची वा राष्ट्राची उभारणी कशा प्रकारे करायची?
धर्माचे राष्ट्र अशी करावयाची, कि धर्मनिरपेक्ष
पद्धतीने करावयाची याबाबत मतिभन्नता आहे. विश्वाचे मूळ जडात आहे
व विश्व एका स्वयंकार्यकारणभावाने बद्ध आहे, का विश्वाच्या निर्मितीमागे
परमेश्वरी अधिष्ठान असून तो विश्वाचे नियंत्रण करतो, हा सदैव
वादाचा विषय आहे. हे
वाद विषय समाज जीवनात सदैव असतात व
असणार. समाजातल्या विवीध प्रसंगी विरोधी विचारांचे ते प्रतिनिधित्व करतात व करणार
यात शंकाच नाही.
अशा मतप्रवाहात माझ्या बाबतीत मी निर्णय अमुक
एका बाजूने घेतला आहे, असे व्यक्ती ठामपणे सांगते
वा समाज ठामपणे सांगतो, त्यांच्या लेखी तरी तो विचार
चिकित्सेने स्वीकारलेला विश्वास असतो. परंतु के वळ एखादी गोष्ट
मान्य केल्यावर सर्व प्रकारच्या हालअपेष्टांना, संकटांना तोंड
देऊन ती पार पाडण्याचे सामर्थ्य लाभत नाही. तसे घडण्यासाठी त्या
विचाराला भावनेचे इंधन पुरवावे लागते. यामधनूच विश्वासाला
श्रद्धेचे रूप मळते.
विश्वासामध्ये म्हणजेच विचाराच्या क्षेत्रात
बहुधा वादातीतता असते व भावनेची बहुधा गुंतवणूक नसते. याउलट श्रद्धेच्या क्षेत्रात आपण वादातीत
म्हणून स्वीकारलेला विषय हा मतभेदाचा आहे याची जाणीव असते. परंतु
स्वत: पुरता त्याचा होकरार्थी निर्णय करून व्यक्ती भावनेचे बल
एकवटून त्याच्या अंमलबजावणीसाठी धडपडत असते. ही श्रद्धा व अंधश्रद्धा
यातील सीमारेषा काढता येणे शक्य आहे का? श्रद्धा कोठे संपते व
अंधश्रद्धा कोठे सुरु होते? प्रत्येक श्रद्धेत कमीजास्त पण एक
अंधळेपणा नसतेच का? याचे व्यावहारिक उत्तर असेच आहे की,
एकेकाळच्या श्रद्धा या अंधश्रद्धा बनून समाज जीवनात अडथळा बनतात याची
मनमोकळी प्रामाणिक जाणीव ठेवावयास हवी. पृथ्वीच्या निर्मितीबाबत
सर्वच धर्मग्रंथांनी काही लिहून ठेवले आहे; ते मानणाऱ्या लोकांची
त्यावर श्रद्धाही आहे. याचाच अर्थ असा की, श्रद्धा बाळगणाऱ्या व्यक्तींनी हे मानावास हवे कि श्रद्धेच्या बाबींचा निवाडा
त्या वेळी होईल, त्या वेळी तो ज्ञानाच्या निकषावरच होईल.
श्रद्धा विषयाची अशी तपासणी
होईल, याची त्यांनी सदैव तयारी ठेवली पाहिजे. त्यामध्ये काही वेगळे निष्पन्न झाल्यास तपासणी करणाऱ्या लोकांना तो वेगळे निष्कर्ष
मांडणे व त्यासाठी लोकांना संघिटत करणे याची मुभा राहिली पाहिजे. त्याचा प्रतीवाद हिंसक पद्धतीने करण्याजोगी श्रद्धेच्या विषयातील आपली भावनिक
गुंतवणूक ती श्रद्धा बाळगणार्यांनी प्रक्षुब्ध करता कामा नये. हा विवेक बाळगला, तर ती श्रद्धा म्हणजे इतरांना काही
जणांना चुकीच्या वाटणाऱ्या पण स्वतःला योग्य वाटणाऱ्या गोष्टीसाठी खस्ता खाणे या स्वरूपाची होईल. परंतु हा
विवेक क्वचीतच बाळगला जातो. श्रद्धेची चिकित्सा स्वत: करणार नाही,
इतरांना करु देणार नाही, कोणी केलीच तर कोणत्याही
मार्गाने त्याचा प्रसार करु देणार नाही ही कृती मात्र अंधश्रद्धेत जमा होते.
मार्क्सवादाचे तत्वज्ञान वा सावरकरांचे हिंदू
राष्ट्र उभारणीचे विचार यांनी काहींना जरुर
बळ दिले आहे. परंतु तरीही त्यांची डोळस
समीक्षा करणे, त्यातील इष्टता,
अनिष्टता परखडपणे तपासणे, कालविसंगत गोष्टींचा त्याग करणे आणि
या तत्वज्ञानाच्या विरोधात उभे राहु इच्छिणाऱ्या विचारधारकांनाही त्याची मांडणी व संघटना
करण्यासाठी मोकळीक देणे आवश्यक आहे. असे घडले नाही तर त्याबाबतचे
त्या लोकांचे आग्रह ह्या अंधश्रद्धाच मानाव्या लागतील.
*डॉ.
नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*
*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment