Monday, 17 May 2021

अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ८०

 *_प्रश्न ८० - महाराष्ट्रात विविध ठिकाणी यात्रेच्या वेळी बारा गाड्या ओढण्याचा चमत्कार केला जातो. त्याचे रहस्य काय?_* 


 *उत्तर*  👉  एकापुढे एक अशा बारा गाड्या एकमेकीला जोडलेल्या असतात. यात्रेच्या वेळी देवाचा संचार झालेला पुजारी दैवी सामर्थ्याने एकटा बारा गाड्या ओढतो. 

 

          *दैवी सामर्थ्याने एकटा पुजारी बारा गाड्या ओढतो हे खरे नाही.*

  

           *_गाड्या ओढण्याच्या वेळी गाड्यांभोवती लोकांची खुप गर्दी झालेली असते. या गर्दीमुळे गाड्या नेमक्या कशा सुरु झाल्या हे लक्षात येत नाही. चाणाक्ष नजरेने हा प्रकार जवळून पाहिला असता या मागचे रहस्य लक्षात येते. गाड्या उतारावर उभ्या केलेल्या असतात. देवाचा जयजयकार करून जेव्हा पुजारी ताकद लावतो. त्याच वेळी अनेक सराईत भक्तगण (हे पूजाऱ्याचे मदतनीस असतात) देवाच्या नावानं चांगभलं करून गाड्यांवर चढतात. चढता-चढता ते खुबीने गाड्यांना धक्के देत असतात. सगळयांनी दिलेल्या धक्क्यांमुळे गाड्या सुरु होतात. एकदा गाड्यांना वेग आला की जडत्वाच्या नियमानुसार त्या गतिमान राहतात. रोलरला एकदम अनेकजणांनी बल लावले तर रोलर सुरु होतो. एकदा तो झाला की एकटा माणूस रोलरला ओढत ठेवतो. भौतिक शास्त्रातील न्यूटनच्या गतीच्या पहिल्या नियमानुसार हे घडते._*

   

        बारा गाड्या एकटा पुजारी दैवी सामर्थ्याने ओढत असेल, तर गाड्यांवर चढणारे लोक जे बल लावतात ते टाळून वाळूतून गाड्या ओढण्याचा प्रयोग का केला जात नाही? दैवी सामर्थ्याला हे अशक्य का व्हावे? आणि पुजारीच कशाला? देव बारा गाड्या आपोआप का गतिमान करत नाही?


 *-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार* 


https://mikamblemahesh.blogspot.com/

No comments:

Post a Comment

नवसुत्तं

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 "नवसुत्तं" https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_20.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _...