*_प्रश्न ६- बुवांचे खरे सामर्थ्य कशात? त्यांच्या हुशारीत की लोकांच्या मूर्खपणात?_*
*उत्तर* *बुवांचे खरे सामर्थ्य लोकांच्या अगतिकतेत आहे* . शिक्षण पूर्ण झाले, पण नोकरी मिळेल
की नाही याची शाश्वती नाही. हुंड्याच्या बाजारात टिकाव लागतो की नाही, याविषयी मनात भीती आहे. गुंड घरावर कधी हल्ला
करतील याचा नेम नाही. जातीय तणाव वाढून घरे कधी पेटतील याचा नेम नाही. साऱ्या
जीवनात असुरक्षितता आली आहे. ही असुरक्षितता, अगतिकता
हेच बुवांचे खरे सामर्थ्य आहे.
*अगतिकता बुद्धी पांगळी करते. मग
बुवांची चलाखी सुरु होते.* अलीकडे बुवाबाजीची नवी तंत्रे व विज्ञानाच्या फसव्या
भाषेचा उपयोग ही मंडळी करू लागली आहेत. या अर्थी बुवा हुशार किंवा चाणाक्ष आहेत.
‘ज्योतिष शास्त्रातील अमोल संशोधन’, ‘बोलका
पत्थर’ अशी पानभर जाहिरात पेपरमध्ये दिली जाते. या पत्थरांमधून किरणे व स्पंदने
बाहेर पडतात व ती कवचकुंडलांप्रमाणे पत्थर जवळ बाळगणाऱ्याचे संरक्षण करतात. मग
लग्न जुळते, कोर्टात विजय होतो, नोकरी मिळते, परदेशगमन
सुलभ होते इत्यादी खोट्या कल्पना विज्ञानाच्या आवरणाखाली बेमालूमपणे ही चलाख मंडळी
खपवित राहतात. *अगतिक लोक फसव्या प्रचाराला बळी पडतात.*
लोक मूर्ख असतात हे खरेच.
पूर्वसंस्कारांची जळमटे त्यांच्या मनाला व्यापून असतात. ही जळमटे तशीच राहावी
यासाठी बुवाबाजीला पोषक तत्वज्ञानाचा पद्धतशीर प्रचार मोठ्या चलाखीने बुवा मंडळी
करत असतात. अलीकडे ज्योतिषी त्यांची संमेलने भरवू लागले आहेत व ज्योतिष हे शास्त्र
आहे असा प्रचार करू लागले आहेत. कदाचित त्यांच्या दिंड्याही निघू लागतील.
*लोकांना चंगले जगण्याची हमी, स्त्रियांना समान वागणूक, सर्वांना आरोग्य सेवा असे सर्व अंगांनी
परिवर्तन झाले, तर बुवाबाजीला मोठ्या प्रमाणात पायबंद
बसेल*
*डॉ.
नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*
*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment