➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_मोराला न पाहिल्यामुळें कावळ्याचा गौरव करण्यांत आला_*
*_(बावेरू जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_प्राचीन काळीं नावाडी लोक आपल्या जहाजांवर एक पाळींव कावळा ठेवीत असत. त्याला दिशाकाक असें म्हणत. जहाज कोणत्या दिशेकडे गेलें आणि जमीन किती दूर राहिली हें न समजून नावाडी घोटाळ्यांत पडले असतां या कावळ्याला सोडून देत असत. तो आकाशांत उंच जाऊन आसपास जमीन दिसली, तर ज्या दिशेला जमीन असेल त्या दिशेकडे प्रयाण करी. नावाडी त्या बाजूला जहाज हाकारून जमीन गांठीत असत. त्या वेळीं असा एक कावळा बरोबर घेऊन कांहीं नावाडी आपल्या जहाजांतून व्यापारासाठीं बावेरू नांवाच्या एका राष्ट्राला गेले. त्या राष्ट्रांत पक्षी मुळींच नव्हते. तेथील लोकांनीं या कावळ्याला पाहून त्याचें मोठें कौतुक केलें आणि ते नावाड्यांना म्हणाले, ''असा सुंदर पक्षी आम्ही कधीं पाहिला नाहीं. तुम्ही आमच्या देशांत व्यापार करण्यासाठीं आलां आहांत तेव्हां हा पक्षी आम्हांला नजराण्या दाखल द्या.''_
_पण नावाड्यांनीं तो मोठा उपयोगी आहे असें सांगून त्याला देण्याचें नाकारलें. शेवटीं त्याची किंमत वाढवत वाढवत त्या लोकांनीं शंभर कार्षापणापर्यंत नेली. तेव्हां स्वदेशी परत गेल्यावर वाटेल तेवढे कावळे मिळतील असा विचार करून नावाड्यांनीं शंभर कार्षापणांला तो कावळा बावेरूवासी लोकांना देऊन टाकला. त्यांनीं कावळ्यासाठीं एक मोठा सोन्याचा पिंजरा तयार करून त्यांत त्या कावळ्याला ठेवून त्याची फारच बडदास्त ठेविली. उत्तम अन्न त्याला देण्यांत येत असे, आणि केवळ त्याच्या दर्शनासाठीं दूरदूरचे लोक येत असत._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*०२/०२/२०२१*
https://mikamblemahesh.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment