*२८ सामा-पहिली*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_कोशंबिमधील एका प्रतिष्टीत कुळांत हिचा जन्म झाला होता. कोशंबिचा राजा उदयन ह्याच्या पत्नीची ती मैत्रीण होती. उदयनाची पत्नी सामावती हि मरण पावल्यानंतर हि खूप दुःखी झाली आणि त्यामुळे तीने भिक्खुनीकडे जाऊन प्रव्रज्या घेतली. परंतु सतत चिंताग्रस्त राहिल्याने आर्यमार्गाचा सम्यक अभ्यास करू शकली नाही. ह्यातच पंचवीस वर्षे निघून गेली. शेवटी आनंद थेराचा उपदेश ऐकून चित्त एकाग्र करण्याचा खूप प्रयत्न केला. त्यानंतर तिला दिव्यज्ञानाचा साक्षात्कार झाला. स्वतःच्या पुर्वजीवनाचे अवलोक करीत असताना तिने ह्या गाथा म्हटल्या :-_
*_चार पाचदा विहारातून चित्तशांतीसाठी बाहेर पडले. परंतु चित्त ताब्यात नसल्यामुळे चित्ताला शांती मिळाली नाही. !!३७!!_*
*_माझी हि आठवी रात्र आहे, माझी तृष्णा समूळ नष्ट झाली. तेव्हापासून मी पुष्कळ दुःखद गोष्टीशी सामना करीत दक्ष राहून तृष्णेचा नाश केला आणि भगवान बुद्धांच्या शासनाप्रमाणे आचरण केले. !!३८!!_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*२३/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment