🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_सत्कर्मे करण्यास भिऊ नये_*
*_(खदिरंगार जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_दुसरा एक ब्रह्मदत्त राजा वाराणसी नगरीत राज्य करीत असता बोधिसत्त्व तेथल्या महाश्रेष्टीच्या कुळांत जन्मला. लहानपणापासून तो हुशार असल्याने सोळाव्या वर्षात तो सर्व कलाकौशल्यात निपुण झाला. पुढे काही काळानंतर वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला वाराणशी नगरीतील श्रेष्टीस्थान मिळाले, व *त्याने आपल्या औदार्यनुरुप शहराच्या चारी बाजूस चार, मध्याला एक व आपल्या वाड्याशेजारी एक अशा गोरगरिबांसाठी सहा दानशाला स्थापन केल्या. त्याशिवाय तो शिलांचे पालन करीत असे आणि उपोसथाच्या दिवशी उपोसथ पाळीत असे.*_
_एके दिवशी दुपारच्या जेवणापूर्वी बोधिसत्त्वाच्या दारापाशी एक श्रमण येऊन उभा राहिला. त्याला पाहून बोधिसत्त्व आपल्या आसनावरून उठला व त्या श्रमनास वंदन करून आपल्या नोकरास हाक मारून आपल्या दारात उभ्या असलेल्या श्रमनाचे पात्र घेऊन येण्यास सांगितले._
_त्याचक्षणी माराने तेथे हल्ला केला (श्रमनास भिक्षा मिळू नये व श्रेष्टीच्या पुण्यकर्माला बाधा यावा अशी माराची ईच्छा होती.) म्हणून त्याने हा खळगा आपल्या सामर्थ्याने उत्पन्न केला. भिक्षापात्र आणण्यासाठी गेलेला नोकर खदिरांगार परिपुरीत अविचि नरकासारख्या जळजळणाऱ्या त्या खड्डयाकडे पाहून अत्यंत भयचकित होऊन मागे फिरला. बोधिसत्त्व त्याला मागे फिरण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला, "आपल्या दरवाज्यात भयंकर आगीचा खड्डा उत्पन्न झाला आहे तेथून मी कसा जाणार?" बोधिसत्त्वाने आपल्या प्रत्येक नोकरास काम सांगितले आणि त्यांनी तेच उत्तर दिले आणि ते घाबरून तेथून पळत सुटले._
_तेव्हा बोधिसत्त्व स्वतः श्रमनापाशी त्याचे पात्र आणण्यासाठी गेला व त्या जळणाऱ्या खड्याच्या काठावर उभा राहून त्याने इतस्ततः पाहिले. अंतराळी मार उभा होता त्याकडे वळून बोधिसत्त्व म्हणाला, "तू कोण आहेस?" "मी मार आहे" माराने उत्तर दिले."हा खड्डा तू निर्माण केला आहेस का?" श्रेष्टीने विचारले. माराने "होय" असे उत्तर दिल्यावर बोधिसत्त्वाने प्रश्न केला, "हा खड्डा तू कश्यासाठी निर्माण केलास?" मार म्हणाला, "तुझ्या दानाला अंतराय व्हावा व श्रमनास भिक्षा मिळू नये असा माझा उद्देश आहे." बोधिसत्त्व म्हणाला, *"या खड्डयांतच नव्हे तर भयंकर दुःखात देखील खाली डोके आणि वर पाय करून पडण्याला मी तयार आहे, परंतु सत्कृत्यापासून परावृत्त होण्यास मी तयार नाही."* असे बोलून श्रमनाकडे वळून बोधिसत्त्व म्हणाला, "भदंत, जेवण ग्रहण केल्यावाचून येथून जाऊ नका." असे बोलून बोधिसत्त्वाने आपल्या हातांत अन्नाने भरलेले ताट घेतले, व त्याने श्रमनाचे पात्र अन्नाने भरले._
*_भिक्षु - भिक्खुंनी - पंडितांना सत्कर्माच्या आड येणारी विघ्ने आनंदच देत असतात! आगीच्या खाई फुलांच्या राशीप्रमाणे वाटतात !!_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*१२/११/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment