Sunday, 1 November 2020

खरे कारण समजले म्हणजे भांडण मिटते

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*_खरे कारण समजले म्हणजे भांडण मिटते_*

                        *_(मालुत जातककथा)_*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖  

                _एकदा बोधिसत्त्व तपस्वी होऊन एका टेकडीच्या पायथ्याशी राहत होता. त्या वेळी त्या पर्वताच्या एका गुहेत एक सिंह आणि वाघ परस्परांशी मित्रत्वाने एकत्र राहत होते. पण एके दिवशी त्या दोघांत थंडीच्या  विषयावर जोरात भांडण झाले. वाघाचे म्हणणे *'थंडी कृष्णपक्षांत वाढत असते'* असे होते, तर सिंह *'थंडी शुक्लपक्षांतच वाढते'* असे म्हणे. त्या दोघांचे भांडण विकोपाला जात असताना ते दोघेही बोधिसत्त्वाजवळ जाऊन त्याला म्हणाले *"भो तापस, आमच्या ह्या भांडणाचा योग्य निकाल लावा"*_

           _बोधिसत्त्वाने प्रथम त्यांचे भांडण कश्या संदर्भात होते हे नीट समजावून घेतले आणि त्या दोघांना म्हणाला, "कृष्णपक्ष असो किंवा शुक्लपक्ष असो, ज्या वेळी वारा वाहत असतो त्या वेळी थंडी वाढत असते. म्हणून थंड वारा हेच थंडीची अधिक बाधा होण्याचे कारण होय. तेव्हा काही अंशी आपणा दोघांचे म्हणणे खोटे नाही. ह्या भांडणात कोणाचाही पराजय झाला नाही असे मी समजतो."_

           _बोधिसत्त्वाच्या उपदेशाने त्या दोघांची तुटू पाहणारी मने पुनः मिलाफ झाली. *ज्या गोष्टीसंबंधाने वाद होतो तिचे खरे कारण समजले असता किती तरी भांडणे मिटतील!*_         


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


*संदर्भ : - जातक कथा संग्रह*


*संकलन :- महेश कांबळे*

*०१/११/२०२०*


https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...