🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*आर्यसत्य*
*४. दुःख निरोधगामिनी प्रतिपदा*
*आर्य अष्टांगिक मार्ग*
*८. सम्मासमाधि - सम्यक समाधी*
_*सम्यक समाधी म्हणजे ठीक समाधी किंवा यथार्थ समाधी. समाधी म्हणजे मनाची एककेंद्रीकरण किंवा चित्ताची एकाग्रता. सम्यक समाधीच्या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ ध्यान अशा पायऱ्या आहेत. समाधीच्या विषयात जो चित्ताचा प्रथम प्रवेश त्याला वितर्क असे म्हणतात. त्या विषयात रस येऊ लागला म्हणजे त्याला विचार असे म्हणतात. त्यापासून जो आनंद होतो ती प्रीती, त्यामुळे जे शरीराला समाधान वाटते ते सुख, त्या विषयात जी चित्ताची एकवाक्यता ती एकाग्रता आणि त्या विषयाच्या अत्यंत परिचयाने उत्पन्न होणारा जो निर्धास्तपणा किंवा निष्कंपताती उपेक्षा समजावी. वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता या पाच चित्तवृत्तींचे पहिल्या ध्यानात प्राधान्य असते. दुसऱ्या ध्यानात वितर्क आणि विचार राहत नाहीत; प्रीती, सुख आणि एकाग्रता या तीनच मनोवृत्तींचे प्राधान्य असते. तिसऱ्या ध्यानात प्रीती राहात नाही केवळ सुख आणि एकाग्रता यांचे प्राधान्य असते, चवथ्या ध्यानात सुख राहत नाही, उपेक्षा आणि एकाग्रता यांचे प्राधान्य असते.*_
बौद्ध ध्यानभावनांचे स्थूलमानाने दोन प्रकार केले जातात - *एक समथा भावना आणि दुसरी विपश्यना भावना* मन शांत करण्याचे कार्य समथा किंवा समाधीचे आहे. मन शांत करणे म्हणजे चित्तवृत्ती एकाग्र करणे. एका विशिष्ट विषयावर चित्त एकाग्र केले असता ते इकडे तिकडे बहकत नाही आणि अशा तऱ्हेने ते शांत होते. *समथा भावना करणाऱ्याने सम्यक स्मृतीत सांगितल्याप्रमाणे १) कायानुपश्यना २) वेदनानुपश्यना ३) चित्तानुपश्यना ४) धम्मानुपश्यना ह्या चार स्मृती उपस्थानावर मन एककेंद्रीत करावयाचे असते. चार स्मृती उपस्थानांवर मन एकाग्र करण्यासाठी सम्यक व्यायामात सांगितल्याप्रमाणे १) अष्टांग मार्गाशी विरोधी अशा चित्तवृत्तींचा प्रतिरोध करावा २) अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील त्या दाबून टाकाव्यात ३) अष्टांग मार्गाला आवश्यक अशा चित्तवृत्ती उत्पन्न कराव्यात ४) अशा प्रकारच्या चित्तवृत्ती जर अगोदरच अस्तित्त्वात असतील तर त्याचा विकास करावा. यांना अनुक्रमे संहार, प्रहण, भावना आणि अनुरक्खण सम्यक प्रधान असे म्हणतात.*
_*मज्झिमनिकायातील चूलवेदल्लसुत्तात म्हटले आहे की*, "भिक्खुंनो, चित्ताची एकाग्रता म्हणजेच समाधी होय. या आठ गोष्टींचा अंगिकार करणे, अभ्यास करणे आणि त्यांची पुनरावृत्ती व वाढ करणे म्हणजेच समाधी भावना होय." ह्यावरून सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी एकमेकांना कसे पूरक आहेत हे लक्षात येईल._
*विपश्यना / विपस्सना म्हणजे खोलीत जाऊन सुस्पष्टपणे पाहणे. वस्तुमात्र आहेत तसे यथार्थ रूपाने पाहणे म्हणजे विपश्यना*. विपश्यना भावना करणारा साधक प्रथम स्वतःला यथार्थ रूपाने पाहत असतो. याचाच अर्थ *_तो आपल्यातील अनित्यता, दुःख आणि अनात्मता या तीन लक्षणांना पाहतो आणि त्यांचा अनुभव घेतो._* अशा तऱ्हेचा अनुभव घेत असताना त्याचा लोभ आणि द्वेष लयाला जातात. त्याचे अज्ञान नष्ट होते. तो सत्य पाहतो, त्याला ज्ञान प्राप्त होऊन तो निर्वाण पाहतो.
*_शीलवान साधकच सम्यक समाधीचा लाभ घेऊ शकतो. सम्यक समाधीसाठी "विसुद्धीमग्गात" दहा प्रतिबंधकारक गोष्टी आणि चाळीस कम्मस्थाने सांगितली आहेत. परिस्थिती अनुकूल असली तरी जोपर्यंत बुद्धीची पाच आवरणे नष्ट झाली नाहीत तोपर्यंत समाधी मार्गात एकही पाऊल पुढे पडणे शक्य नाही._*
_ज्याचे चित्त कामच्छन्द, व्यापाद (क्रोध), आळस, भ्रांतता आणि संशयग्रस्ता या पाच आवरणांपासून विमुक्त झाले असेल त्यालाच आत्मपरहित यथार्थतया समजते._ *या आवरणांना पाली भाषेत 'निवरणे' असे म्हणतात.* ज्याचे चित्त वारंवार भ्रात होत असते त्याने *प्रथम आनापानस्मृती भावना करावी.*
_असे म्हटले जाते की, काही विशिष्ट पद्धतीने मन एकाग्र केले असता अशी एक स्थिती येते की ह्यावेळी शरीर आणि न बधिर झालेले असते. त्यावेळी शरीराला टाचणी टोचली किंवा भाजले तरी त्याची जाणीव होत नाही *अशा प्रकारची मनाची एकाग्रता म्हणजे सम्यक समाधी नव्हे.* त्याचप्रमाणे मनात कसल्याही प्रकारचा विचार न आणता एक प्रकारची एक प्रकारची जागृत निंदा आणणे म्हणजेही *सम्यक समाधी नव्हे.*_
_*श्वासोच्छ्वास दाबून देहाला पीडा देणे हा एक अंत आणि ज्यामुळे कामविकार उद्दीपित होतात अशा विषयाचे ध्यान करणे हा दुसरा अंत. या दोहोंच्या मधील समाधी म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गातील समाधी. बुद्ध धम्मातील समाधी ही आत्म्याला परमात्म्यात विलीन करण्यासाठी नाही, किंवा काही अचाट अगाध करण्याची ताकद मिळविण्यासाठी नाही, तर केवळ मनातील अशुद्धता काढून टाकून मन शुद्ध करण्यासाठी आहे. चित्तं शुद्ध ठेवणे हा बुद्ध धम्माचा गाभा आहे.*_
*_माणसाच्या मनातील तृष्णा म्हणजेच लोभ, द्वेष आणि मोह नष्ट झाले म्हणजे माणसाला ह्याच जन्मात निर्वाण मिळते. लोभ, द्वेष आणि मोहाला नष्ट करण्याचा एकच मार्ग म्हणजे शील, समाधी आणि प्रज्ञेने युक्त असा आर्य अष्टांगिक मार्ग. चार आर्यसत्यांची किंवा आर्य अष्टांगिक मार्गाची नुसत्या बौद्धिक स्तरावर माहिती करून घेतल्याने निर्वाण प्राप्त होत नसते तर त्याप्रमाणे आचरण केल्यानेच निर्वाण प्राप्त होते._* ज्याप्रमाणे चुकीचा मार्ग अनुसरला तर निर्वाण प्राप्त होणे शक्य नाही, त्याचप्रमाणे केवळ *पुस्तकी ज्ञानाने निर्वाण प्राप्त होणे शक्य नाही.* आर्य अष्टांगिक मार्गाप्रमाणे योग्य आचरण करणारा मनुष्यच आपला इतका विकास करू शकतो की तो स्वतः बुद्ध बनू शकतो. *_पारंपरिक बुद्धधम्मामध्ये नरक, प्रेतलोक, प्राणिलोक, मनुष्यलोक आणि देवलोक अशा माणसाच्या विकासाप्रमाणे अस्तित्त्वाच्या निरनिराळ्या पातळ्या सांगितल्या आहेत. ह्या निरनिराळ्या अस्तित्त्वांचा अनुभव घेण्यासाठी माणसाला जन्ममृत्यूंच्या फेऱ्यातून जाण्याची आवश्यकता नाही. स्वतःच्या आचारणानेच तो कोणत्या पातळीवरचे जीवन जगत आहे हे ठरत असते. चोऱ्यामाऱ्या करणारा नेहेमी शिवीगाळ करणारा आणि व्यसनाधीन, दारुड्या मनुष्य जिवंतपणीच नरकात असतो, तर स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी सतत झटणारा मनुष्य देव लोकातील जीवन जगत असतो._*
*_"पाली भाषेत भगवान बुद्धांच्या धम्माचे वर्णन 'स्व'खातो भगवंता धम्मो सन्दिठ्ठिको अकालिको एहि पस्सिको ओपनाय्यिको पच्चत वेदितब्बो विञ्ञूहीती' असे केलेले आहे, म्हणजेच भगवान बुद्धांचा धम्म सर्वसामान्य माणसांना समजेल अशा भाषेत समजावून सांगितलेला आहे तो ह्याच जन्मात फळ देणारा आहे त्याला काळाचे बंधन नसून तो शास्त्रीय दृष्ट्या तपासणी करून घेता येण्यासारखा आहे. तो प्रगतिशील असून पंडितांना स्वतःचा मार्ग स्वतःचा चालण्यास सांगणारा आहे. म्हणून बहुजनांच्या हिताकरिता, लोकांवर अनुकम्पा करण्यासाठी, देव-मनुष्याच्या सुखाकरिता, त्या धम्माचा प्रसार करावा अशी आज्ञा भगवान बुद्धांनी त्यांच्या अनुयायांना केली आहे._*
*समाप्त*
*संकलन : महेश कांबळे*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*आर्यसत्य*
*४. दुःख निरोधगामिनी प्रतिपदा*
*आर्य अष्टांगिक मार्ग*
*८. सम्मासमाधि - सम्यक समाधी*
_*सम्यक समाधी म्हणजे ठीक समाधी किंवा यथार्थ समाधी. समाधी म्हणजे मनाची एककेंद्रीकरण किंवा चित्ताची एकाग्रता. सम्यक समाधीच्या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ ध्यान अशा पायऱ्या आहेत. समाधीच्या विषयात जो चित्ताचा प्रथम प्रवेश त्याला वितर्क असे म्हणतात. त्या विषयात रस येऊ लागला म्हणजे त्याला विचार असे म्हणतात. त्यापासून जो आनंद होतो ती प्रीती, त्यामुळे जे शरीराला समाधान वाटते ते सुख, त्या विषयात जी चित्ताची एकवाक्यता ती एकाग्रता आणि त्या विषयाच्या अत्यंत परिचयाने उत्पन्न होणारा जो निर्धास्तपणा किंवा निष्कंपताती उपेक्षा समजावी. वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता या पाच चित्तवृत्तींचे पहिल्या ध्यानात प्राधान्य असते. दुसऱ्या ध्यानात वितर्क आणि विचार राहत नाहीत; प्रीती, सुख आणि एकाग्रता या तीनच मनोवृत्तींचे प्राधान्य असते. तिसऱ्या ध्यानात प्रीती राहात नाही केवळ सुख आणि एकाग्रता यांचे प्राधान्य असते, चवथ्या ध्यानात सुख राहत नाही, उपेक्षा आणि एकाग्रता यांचे प्राधान्य असते.*_
बौद्ध ध्यानभावनांचे स्थूलमानाने दोन प्रकार केले जातात - *एक समथा भावना आणि दुसरी विपश्यना भावना* मन शांत करण्याचे कार्य समथा किंवा समाधीचे आहे. मन शांत करणे म्हणजे चित्तवृत्ती एकाग्र करणे. एका विशिष्ट विषयावर चित्त एकाग्र केले असता ते इकडे तिकडे बहकत नाही आणि अशा तऱ्हेने ते शांत होते. *समथा भावना करणाऱ्याने सम्यक स्मृतीत सांगितल्याप्रमाणे १) कायानुपश्यना २) वेदनानुपश्यना ३) चित्तानुपश्यना ४) धम्मानुपश्यना ह्या चार स्मृती उपस्थानावर मन एककेंद्रीत करावयाचे असते. चार स्मृती उपस्थानांवर मन एकाग्र करण्यासाठी सम्यक व्यायामात सांगितल्याप्रमाणे १) अष्टांग मार्गाशी विरोधी अशा चित्तवृत्तींचा प्रतिरोध करावा २) अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील त्या दाबून टाकाव्यात ३) अष्टांग मार्गाला आवश्यक अशा चित्तवृत्ती उत्पन्न कराव्यात ४) अशा प्रकारच्या चित्तवृत्ती जर अगोदरच अस्तित्त्वात असतील तर त्याचा विकास करावा. यांना अनुक्रमे संहार, प्रहण, भावना आणि अनुरक्खण सम्यक प्रधान असे म्हणतात.*
_*मज्झिमनिकायातील चूलवेदल्लसुत्तात म्हटले आहे की*, "भिक्खुंनो, चित्ताची एकाग्रता म्हणजेच समाधी होय. या आठ गोष्टींचा अंगिकार करणे, अभ्यास करणे आणि त्यांची पुनरावृत्ती व वाढ करणे म्हणजेच समाधी भावना होय." ह्यावरून सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी एकमेकांना कसे पूरक आहेत हे लक्षात येईल._
*विपश्यना / विपस्सना म्हणजे खोलीत जाऊन सुस्पष्टपणे पाहणे. वस्तुमात्र आहेत तसे यथार्थ रूपाने पाहणे म्हणजे विपश्यना*. विपश्यना भावना करणारा साधक प्रथम स्वतःला यथार्थ रूपाने पाहत असतो. याचाच अर्थ *_तो आपल्यातील अनित्यता, दुःख आणि अनात्मता या तीन लक्षणांना पाहतो आणि त्यांचा अनुभव घेतो._* अशा तऱ्हेचा अनुभव घेत असताना त्याचा लोभ आणि द्वेष लयाला जातात. त्याचे अज्ञान नष्ट होते. तो सत्य पाहतो, त्याला ज्ञान प्राप्त होऊन तो निर्वाण पाहतो.
*_शीलवान साधकच सम्यक समाधीचा लाभ घेऊ शकतो. सम्यक समाधीसाठी "विसुद्धीमग्गात" दहा प्रतिबंधकारक गोष्टी आणि चाळीस कम्मस्थाने सांगितली आहेत. परिस्थिती अनुकूल असली तरी जोपर्यंत बुद्धीची पाच आवरणे नष्ट झाली नाहीत तोपर्यंत समाधी मार्गात एकही पाऊल पुढे पडणे शक्य नाही._*
_ज्याचे चित्त कामच्छन्द, व्यापाद (क्रोध), आळस, भ्रांतता आणि संशयग्रस्ता या पाच आवरणांपासून विमुक्त झाले असेल त्यालाच आत्मपरहित यथार्थतया समजते._ *या आवरणांना पाली भाषेत 'निवरणे' असे म्हणतात.* ज्याचे चित्त वारंवार भ्रात होत असते त्याने *प्रथम आनापानस्मृती भावना करावी.*
_असे म्हटले जाते की, काही विशिष्ट पद्धतीने मन एकाग्र केले असता अशी एक स्थिती येते की ह्यावेळी शरीर आणि न बधिर झालेले असते. त्यावेळी शरीराला टाचणी टोचली किंवा भाजले तरी त्याची जाणीव होत नाही *अशा प्रकारची मनाची एकाग्रता म्हणजे सम्यक समाधी नव्हे.* त्याचप्रमाणे मनात कसल्याही प्रकारचा विचार न आणता एक प्रकारची एक प्रकारची जागृत निंदा आणणे म्हणजेही *सम्यक समाधी नव्हे.*_
_*श्वासोच्छ्वास दाबून देहाला पीडा देणे हा एक अंत आणि ज्यामुळे कामविकार उद्दीपित होतात अशा विषयाचे ध्यान करणे हा दुसरा अंत. या दोहोंच्या मधील समाधी म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गातील समाधी. बुद्ध धम्मातील समाधी ही आत्म्याला परमात्म्यात विलीन करण्यासाठी नाही, किंवा काही अचाट अगाध करण्याची ताकद मिळविण्यासाठी नाही, तर केवळ मनातील अशुद्धता काढून टाकून मन शुद्ध करण्यासाठी आहे. चित्तं शुद्ध ठेवणे हा बुद्ध धम्माचा गाभा आहे.*_
*_माणसाच्या मनातील तृष्णा म्हणजेच लोभ, द्वेष आणि मोह नष्ट झाले म्हणजे माणसाला ह्याच जन्मात निर्वाण मिळते. लोभ, द्वेष आणि मोहाला नष्ट करण्याचा एकच मार्ग म्हणजे शील, समाधी आणि प्रज्ञेने युक्त असा आर्य अष्टांगिक मार्ग. चार आर्यसत्यांची किंवा आर्य अष्टांगिक मार्गाची नुसत्या बौद्धिक स्तरावर माहिती करून घेतल्याने निर्वाण प्राप्त होत नसते तर त्याप्रमाणे आचरण केल्यानेच निर्वाण प्राप्त होते._* ज्याप्रमाणे चुकीचा मार्ग अनुसरला तर निर्वाण प्राप्त होणे शक्य नाही, त्याचप्रमाणे केवळ *पुस्तकी ज्ञानाने निर्वाण प्राप्त होणे शक्य नाही.* आर्य अष्टांगिक मार्गाप्रमाणे योग्य आचरण करणारा मनुष्यच आपला इतका विकास करू शकतो की तो स्वतः बुद्ध बनू शकतो. *_पारंपरिक बुद्धधम्मामध्ये नरक, प्रेतलोक, प्राणिलोक, मनुष्यलोक आणि देवलोक अशा माणसाच्या विकासाप्रमाणे अस्तित्त्वाच्या निरनिराळ्या पातळ्या सांगितल्या आहेत. ह्या निरनिराळ्या अस्तित्त्वांचा अनुभव घेण्यासाठी माणसाला जन्ममृत्यूंच्या फेऱ्यातून जाण्याची आवश्यकता नाही. स्वतःच्या आचारणानेच तो कोणत्या पातळीवरचे जीवन जगत आहे हे ठरत असते. चोऱ्यामाऱ्या करणारा नेहेमी शिवीगाळ करणारा आणि व्यसनाधीन, दारुड्या मनुष्य जिवंतपणीच नरकात असतो, तर स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी सतत झटणारा मनुष्य देव लोकातील जीवन जगत असतो._*
*_"पाली भाषेत भगवान बुद्धांच्या धम्माचे वर्णन 'स्व'खातो भगवंता धम्मो सन्दिठ्ठिको अकालिको एहि पस्सिको ओपनाय्यिको पच्चत वेदितब्बो विञ्ञूहीती' असे केलेले आहे, म्हणजेच भगवान बुद्धांचा धम्म सर्वसामान्य माणसांना समजेल अशा भाषेत समजावून सांगितलेला आहे तो ह्याच जन्मात फळ देणारा आहे त्याला काळाचे बंधन नसून तो शास्त्रीय दृष्ट्या तपासणी करून घेता येण्यासारखा आहे. तो प्रगतिशील असून पंडितांना स्वतःचा मार्ग स्वतःचा चालण्यास सांगणारा आहे. म्हणून बहुजनांच्या हिताकरिता, लोकांवर अनुकम्पा करण्यासाठी, देव-मनुष्याच्या सुखाकरिता, त्या धम्माचा प्रसार करावा अशी आज्ञा भगवान बुद्धांनी त्यांच्या अनुयायांना केली आहे._*
*समाप्त*
*संकलन : महेश कांबळे*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment