🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*आर्यसत्य*
*३. दुःख निरोध*
*तृष्णेविषयी संपूर्ण वैराग्य, त्या तृष्णेचा निरोध, त्याग, परित्याग, त्या तृष्णेपासून मुक्ती, अनासक्ती हेच दुःखनिरोधाच्या विषयीचे आर्यसत्य आहे.* _दुःखनिरोध म्हणजेच निर्वाण (पाली निब्बाण). *व्युत्पत्तीशास्त्राच्या दृष्टीने 'निर्वाण' ह्या शब्दाचा अर्थ नि+वाण म्हणजेच तृष्णेपासून मुक्ती किंवा तृष्णेपासून दूर जाणे असा केला जातो. निर्वाण शब्दाचा दुसरा अर्थ निर+वा म्हणजे वाहणे थांबणे, अस्तंगत होणे किंवा विझणे असाही केला जातो.* ज्याला निर्वाण प्राप्त झाले आहे तो तृष्णेपासून संपूर्णपणे मुक्त झाला आहे. त्याच्यात कसल्याही प्रकारचा लोभ, द्वेष किंवा मोह राहिला नाही. *लोभ, द्वेष आणि मोह हे तृष्णेचेच तीन निरनिराळे पैलू आहेत.*
*लोभ*
*_लोभ म्हणजेच अपुरेपणाची, गरजेची, हावरेपणाची आणि अतृप्ततेची स्वतःलाच निरंतर जागृत ठेवणारी एक मानसिक स्थिती आहे. ती अतृप्ततेला तृप्त करून कायमचे समाधान मिळविण्याचा प्रयत्न करीत असते. पण लोभ कधीही तृप्त होत नसतो._* द्वेष आणि मोहाच्या तुलने लौकिक दृष्ट्या त्याचप्रमाणे कर्मिकदृष्ट्या लोभ कमी हानिकारक आहे.
*_अभिरुची, इच्छा, ओढ, आवड, माया, प्रितह्म, लालसा, हाव, विषयलोलुपता, स्वामित्व, द्रव्यलोभ, पंचेंद्रियांविषयाची इच्छा, संपत्तीलोभ, किर्तीलोभ इ. सर्व लोभांची कमी-अधिक तीव्रतेची विविध अंगे आहेत._*
*द्वेष*
*द्वेष ही अशी एक मानसिक असमाधानाची स्थिती आहे की जिच्यामुळे अंतर्गत असमाधानाचा रोष बाह्य परिस्थितीवर किंवा माणसावर काढला जातो.*
*_धम्मसंगिणी नावाच्या अभिधम्माच्या टीका ग्रंथानुसार_* द्वेषाने पेटल्यामुळे एखादा मनुष्य आपल्या आईबापांच्या, भावाच्या, बहिणीच्या, श्रमणांच्या बाबतीत महापातक करू शकेल असा महापातकी मनुष्य कुठेही गेला तरी दोष आणि दृष्कीर्ती त्याच्या मागे जातात. लौकिक दृष्ट्या आणि कर्मिक दृष्ट्या द्वेष फार दोषपात्र आहे, पण द्वेष लवकर नष्ट होऊ शकतो. द्वेष व्यक्तीच्या आणि समाजाच्या अनंत दुःखांची जननी आहे. द्वेष स्वभावाने चवताळलेल्या नागासारखा क्रूर असतो. द्वेषापासून सुटका करून घेण्याची ज्याची मनापासून इच्छा आहे, त्याला द्वेष भावना जास्त वाढण्याचा अगोदर तिच्यावर ताबा ठेवता येणे शक्य आहे.
*_तिटकारा, प्रतिक्षोभ, गैरमर्जी, चीड, विरोध, तिरस्कार, क्रोध, सूड इ. द्वेषाची कमीअधिक तीव्रतेची अंगे आहेत. अपेक्षाभंग, उदासीनता, निराशा, धास्ती इ. मनाच्या वृत्ती द्वेषाच्या दुसऱ्या बाजूशी संलग्न आहेत. वस्तुमात्रांच्या अस्थिरतेमुळे, असुरक्षिततेमुळे आणि असमाधानकारकतेमुळे त्या वृत्ती उत्पन्न होतात. वस्तुमात्रांचे ठीक आकलन न झाल्यामुळेच मनाची अशी अवस्था होत असते._*
*मोह*
*_मोह म्हणजे अज्ञानाच्या स्वरूपातील गोंधळ करून टाकणारी वैफल्याची आणि असहायतेची मानसिक स्थिती. चुकीच्या मतप्रणालीमुळे मोह हटवादी, जहाल किंवा अगदी भूत संचारल्यासारखेसुद्धा स्वरूप धारण करू शकतो. मोहामुळे लोभ आणि द्वेष उत्पन्न होऊ शकतात. लोभ आणि द्वेषाचा मोह हा सोबती आहे._*
अनिर्बंध लोभाने आणि पूर्वग्रहकलुषित मनाने किंवा मिथ्यादृष्टीने जर एखादी गोष्ट केली, तर तो लोभ लवकर जात नाही. द्वेषाबरोबर मिथ्यादृष्टीचा मोहसुद्धा असेल तर ती द्वेषाला अधिकच चेतावतो. मोह असल्याशिवाय लोभ किंवा द्वेष उत्पन्न होऊ शकत नाही. *लोभ आणि मोह, किंवा द्वेष आणि मोह यांची अकुशल मुळे नेहमीच एकमेकांसमवेत उद्भवतात, मोह मात्र लोभाषिवाय आणि द्वेषाशिवाय येऊ शकतो. एकटा राहून सुद्धा मोह पाप आणि दुःखाचे जबरदस्त कारण होऊ शकतो.
*_मूर्खपणा, मंदबुद्धी, गोंधळ, अज्ञान (चार आर्यसत्याचे) पूर्वग्रहकलुषितता, कल्पनासृष्टीतील हटवाद, जहालमतवाद, मिथ्यादृष्टी, अहंभाव इ. सर्व मोहांची कमीअधिक तीव्रतेची विविध अंगे आहेत. धम्मसंगिणीनुसार लौकिक दृष्टीने आणि कर्माच्या दृष्टीने मोह असणे हा फार मोठा दोष आहे. मोहामुळे जर एखादे कर्म केले तर त्या कर्मापासून त्या माणसाची सुटका अगदी हळूहळू, खूप वेळाने होईल._*
*लोभ, द्वेष आणि मोह यांना मुळापासून नष्ट केल्याने जिवंतपणीही मनुष्य निर्वाण प्राप्त करू शकतो, अशा अर्हताचे पंचस्कंध कार्यान्वित असल्यामुळे त्याला सुखदुःखाचे अनुभव येत असतात, पण तो बंधनातून मुक्त झाला असल्यामुळे त्याचा आपपर भाव नष्ट झाला असल्यामुळे, ते सुखदुःखाचे अनुभव तो तटस्थ वृत्तीने पाहतो. त्या भावनांचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. लोभ, द्वेष आणि मोह यांचा पूर्णपणे नाश करून अर्हतपद प्राप्त केलेला पुरुष किंवा स्त्री अकुशल कर्म करू शकत नाही*
अर्हताने आपली आध्यात्मिक उन्नती इतकी केलेली असते की जगाच्या सर्व सामान्य व्यवहाराच्या पलीकडे तो गेलेला असतो. लोभ, द्वेष आणि मोह या त्रयींच्यामूळे येणारी मानसिक मलीनता त्याच्यात राहिलेली नसल्यामुळे निर्वाणपद प्राप्त झाल्यावर त्याच्या दैनंदिन व्यवहारामुळे 'संस्कार' निर्माण होत नाहीत आणि म्हणूनच त्याच्या दैनंदिन व्यवहारातून 'कर्म' उत्पन्न होत नाही. *भिक्खुंना प्रवचन करताना सारिपुत्र म्हणाले, "निर्वाण हे परमसुख आहे". तेचा उदायीने शंका काढली की, 'जर बिरवण अवस्थेत सुख-दुःखांच्या भावनांचा अनुभव होत नाही तर निर्वाण हे परमसुख कसे असू शकेल?" धर्मसेनापती सारिपुत्र उत्तरले की निर्वाण अवस्थेत सुखदुःखाच्या भावना नाहीत हेच खरे परम सुख आहे.*
_निर्वाण प्राप्त करणव ही साधी गोहत नाही. धम्मपदात म्हटल्याप्रमाणे 'माणसांत फार थोडे लोक असे असतात की जे पलीकडचा तिर गाठतात. बाकीचे लोक तर नुसती तिरावरच धावपळ करीत असतात. *तृष्णेचा म्हणजेच लोभ, द्वेष आणि मोह यांचा समूळ नाश केल्याने निर्वाण प्राप्त होते.* पण तृष्णेचा नाश करण्याची नुसती इच्छा केली म्हणजे तृष्णेचा नाश होत नाही. कदाचित अशा प्रबळ इच्छेने मनुष्य तृष्णेला काही कालपर्यंत दाबून ठेवू शकेल, पण अशा तऱ्हेने दाबून ठेवलेली तृष्णा संधी मिळताच तितक्याच जोमाने प्रकट होईल. म्हणून *तृष्णेला जोरजबरदस्तीने दाबून टाकण्याचा प्रयत्न करणे अहितकारक आहे.* हे जग जसे आहे तसे यथार्थ दृष्टीने पाहिले आणि त्याचा अनुभव घेतला म्हणजे दुःख, अनित्यता आणि अनात्मता यांचा प्रज्ञेने बोध होतो. माणसातील 'आत्मभाव' गळून पडतो. 'मी' 'माझे' ह्या अहंकार आणि ममकार दर्शविणाऱ्या शब्दांतील फोलपणाची त्याला जाणीव होते. त्याच्यात लोभ, द्वेष, मोह करण्यासारखे काहीच उरत नाही, तो निर्वाणपदाला गेलेला असतो. अशा तऱ्हेने *निर्वाणपदाला जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच आर्यअष्टांगीक मार्ग.*_
*क्रमशः*
*संकलन : महेश कांबळे*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*आर्यसत्य*
*३. दुःख निरोध*
*तृष्णेविषयी संपूर्ण वैराग्य, त्या तृष्णेचा निरोध, त्याग, परित्याग, त्या तृष्णेपासून मुक्ती, अनासक्ती हेच दुःखनिरोधाच्या विषयीचे आर्यसत्य आहे.* _दुःखनिरोध म्हणजेच निर्वाण (पाली निब्बाण). *व्युत्पत्तीशास्त्राच्या दृष्टीने 'निर्वाण' ह्या शब्दाचा अर्थ नि+वाण म्हणजेच तृष्णेपासून मुक्ती किंवा तृष्णेपासून दूर जाणे असा केला जातो. निर्वाण शब्दाचा दुसरा अर्थ निर+वा म्हणजे वाहणे थांबणे, अस्तंगत होणे किंवा विझणे असाही केला जातो.* ज्याला निर्वाण प्राप्त झाले आहे तो तृष्णेपासून संपूर्णपणे मुक्त झाला आहे. त्याच्यात कसल्याही प्रकारचा लोभ, द्वेष किंवा मोह राहिला नाही. *लोभ, द्वेष आणि मोह हे तृष्णेचेच तीन निरनिराळे पैलू आहेत.*
*लोभ*
*_लोभ म्हणजेच अपुरेपणाची, गरजेची, हावरेपणाची आणि अतृप्ततेची स्वतःलाच निरंतर जागृत ठेवणारी एक मानसिक स्थिती आहे. ती अतृप्ततेला तृप्त करून कायमचे समाधान मिळविण्याचा प्रयत्न करीत असते. पण लोभ कधीही तृप्त होत नसतो._* द्वेष आणि मोहाच्या तुलने लौकिक दृष्ट्या त्याचप्रमाणे कर्मिकदृष्ट्या लोभ कमी हानिकारक आहे.
*_अभिरुची, इच्छा, ओढ, आवड, माया, प्रितह्म, लालसा, हाव, विषयलोलुपता, स्वामित्व, द्रव्यलोभ, पंचेंद्रियांविषयाची इच्छा, संपत्तीलोभ, किर्तीलोभ इ. सर्व लोभांची कमी-अधिक तीव्रतेची विविध अंगे आहेत._*
*द्वेष*
*द्वेष ही अशी एक मानसिक असमाधानाची स्थिती आहे की जिच्यामुळे अंतर्गत असमाधानाचा रोष बाह्य परिस्थितीवर किंवा माणसावर काढला जातो.*
*_धम्मसंगिणी नावाच्या अभिधम्माच्या टीका ग्रंथानुसार_* द्वेषाने पेटल्यामुळे एखादा मनुष्य आपल्या आईबापांच्या, भावाच्या, बहिणीच्या, श्रमणांच्या बाबतीत महापातक करू शकेल असा महापातकी मनुष्य कुठेही गेला तरी दोष आणि दृष्कीर्ती त्याच्या मागे जातात. लौकिक दृष्ट्या आणि कर्मिक दृष्ट्या द्वेष फार दोषपात्र आहे, पण द्वेष लवकर नष्ट होऊ शकतो. द्वेष व्यक्तीच्या आणि समाजाच्या अनंत दुःखांची जननी आहे. द्वेष स्वभावाने चवताळलेल्या नागासारखा क्रूर असतो. द्वेषापासून सुटका करून घेण्याची ज्याची मनापासून इच्छा आहे, त्याला द्वेष भावना जास्त वाढण्याचा अगोदर तिच्यावर ताबा ठेवता येणे शक्य आहे.
*_तिटकारा, प्रतिक्षोभ, गैरमर्जी, चीड, विरोध, तिरस्कार, क्रोध, सूड इ. द्वेषाची कमीअधिक तीव्रतेची अंगे आहेत. अपेक्षाभंग, उदासीनता, निराशा, धास्ती इ. मनाच्या वृत्ती द्वेषाच्या दुसऱ्या बाजूशी संलग्न आहेत. वस्तुमात्रांच्या अस्थिरतेमुळे, असुरक्षिततेमुळे आणि असमाधानकारकतेमुळे त्या वृत्ती उत्पन्न होतात. वस्तुमात्रांचे ठीक आकलन न झाल्यामुळेच मनाची अशी अवस्था होत असते._*
*मोह*
*_मोह म्हणजे अज्ञानाच्या स्वरूपातील गोंधळ करून टाकणारी वैफल्याची आणि असहायतेची मानसिक स्थिती. चुकीच्या मतप्रणालीमुळे मोह हटवादी, जहाल किंवा अगदी भूत संचारल्यासारखेसुद्धा स्वरूप धारण करू शकतो. मोहामुळे लोभ आणि द्वेष उत्पन्न होऊ शकतात. लोभ आणि द्वेषाचा मोह हा सोबती आहे._*
अनिर्बंध लोभाने आणि पूर्वग्रहकलुषित मनाने किंवा मिथ्यादृष्टीने जर एखादी गोष्ट केली, तर तो लोभ लवकर जात नाही. द्वेषाबरोबर मिथ्यादृष्टीचा मोहसुद्धा असेल तर ती द्वेषाला अधिकच चेतावतो. मोह असल्याशिवाय लोभ किंवा द्वेष उत्पन्न होऊ शकत नाही. *लोभ आणि मोह, किंवा द्वेष आणि मोह यांची अकुशल मुळे नेहमीच एकमेकांसमवेत उद्भवतात, मोह मात्र लोभाषिवाय आणि द्वेषाशिवाय येऊ शकतो. एकटा राहून सुद्धा मोह पाप आणि दुःखाचे जबरदस्त कारण होऊ शकतो.
*_मूर्खपणा, मंदबुद्धी, गोंधळ, अज्ञान (चार आर्यसत्याचे) पूर्वग्रहकलुषितता, कल्पनासृष्टीतील हटवाद, जहालमतवाद, मिथ्यादृष्टी, अहंभाव इ. सर्व मोहांची कमीअधिक तीव्रतेची विविध अंगे आहेत. धम्मसंगिणीनुसार लौकिक दृष्टीने आणि कर्माच्या दृष्टीने मोह असणे हा फार मोठा दोष आहे. मोहामुळे जर एखादे कर्म केले तर त्या कर्मापासून त्या माणसाची सुटका अगदी हळूहळू, खूप वेळाने होईल._*
*लोभ, द्वेष आणि मोह यांना मुळापासून नष्ट केल्याने जिवंतपणीही मनुष्य निर्वाण प्राप्त करू शकतो, अशा अर्हताचे पंचस्कंध कार्यान्वित असल्यामुळे त्याला सुखदुःखाचे अनुभव येत असतात, पण तो बंधनातून मुक्त झाला असल्यामुळे त्याचा आपपर भाव नष्ट झाला असल्यामुळे, ते सुखदुःखाचे अनुभव तो तटस्थ वृत्तीने पाहतो. त्या भावनांचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. लोभ, द्वेष आणि मोह यांचा पूर्णपणे नाश करून अर्हतपद प्राप्त केलेला पुरुष किंवा स्त्री अकुशल कर्म करू शकत नाही*
अर्हताने आपली आध्यात्मिक उन्नती इतकी केलेली असते की जगाच्या सर्व सामान्य व्यवहाराच्या पलीकडे तो गेलेला असतो. लोभ, द्वेष आणि मोह या त्रयींच्यामूळे येणारी मानसिक मलीनता त्याच्यात राहिलेली नसल्यामुळे निर्वाणपद प्राप्त झाल्यावर त्याच्या दैनंदिन व्यवहारामुळे 'संस्कार' निर्माण होत नाहीत आणि म्हणूनच त्याच्या दैनंदिन व्यवहारातून 'कर्म' उत्पन्न होत नाही. *भिक्खुंना प्रवचन करताना सारिपुत्र म्हणाले, "निर्वाण हे परमसुख आहे". तेचा उदायीने शंका काढली की, 'जर बिरवण अवस्थेत सुख-दुःखांच्या भावनांचा अनुभव होत नाही तर निर्वाण हे परमसुख कसे असू शकेल?" धर्मसेनापती सारिपुत्र उत्तरले की निर्वाण अवस्थेत सुखदुःखाच्या भावना नाहीत हेच खरे परम सुख आहे.*
_निर्वाण प्राप्त करणव ही साधी गोहत नाही. धम्मपदात म्हटल्याप्रमाणे 'माणसांत फार थोडे लोक असे असतात की जे पलीकडचा तिर गाठतात. बाकीचे लोक तर नुसती तिरावरच धावपळ करीत असतात. *तृष्णेचा म्हणजेच लोभ, द्वेष आणि मोह यांचा समूळ नाश केल्याने निर्वाण प्राप्त होते.* पण तृष्णेचा नाश करण्याची नुसती इच्छा केली म्हणजे तृष्णेचा नाश होत नाही. कदाचित अशा प्रबळ इच्छेने मनुष्य तृष्णेला काही कालपर्यंत दाबून ठेवू शकेल, पण अशा तऱ्हेने दाबून ठेवलेली तृष्णा संधी मिळताच तितक्याच जोमाने प्रकट होईल. म्हणून *तृष्णेला जोरजबरदस्तीने दाबून टाकण्याचा प्रयत्न करणे अहितकारक आहे.* हे जग जसे आहे तसे यथार्थ दृष्टीने पाहिले आणि त्याचा अनुभव घेतला म्हणजे दुःख, अनित्यता आणि अनात्मता यांचा प्रज्ञेने बोध होतो. माणसातील 'आत्मभाव' गळून पडतो. 'मी' 'माझे' ह्या अहंकार आणि ममकार दर्शविणाऱ्या शब्दांतील फोलपणाची त्याला जाणीव होते. त्याच्यात लोभ, द्वेष, मोह करण्यासारखे काहीच उरत नाही, तो निर्वाणपदाला गेलेला असतो. अशा तऱ्हेने *निर्वाणपदाला जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच आर्यअष्टांगीक मार्ग.*_
*क्रमशः*
*संकलन : महेश कांबळे*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment