*_बुद्ध व बोधिसत्व म्हणजे काय?_*
*'बुद्ध' शब्दाचा अर्थ:-*
बुद्ध म्हणजे
ज्याला सम्यक संबोधीची प्राप्ती झालेली आहे असा: समयकसंबुद्ध किंवा ज्याला
परिपूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे असा. . बुद्ध हे व्यक्तीचे नाव नव्हे. ते मनाच्या
स्थितीचे किंवा अवस्थेचे नाव आहे. मनाची अशी अवस्था की, जी मानसिक विकासाच्या
अत्युच्च शिखरावर पोहोचलेली आहे.
बोधिसत्व म्हणजे बुद्ध होण्याचा
प्रयत्न करणारा मनुष्य ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता. बोधिसत्व
आपल्या जीवनाच्या अवस्थेत क्रमाक्रमाने प्रगति करीत, दहा पारमितांचा परिपूर्ण
अभ्यास करीत, सम्यक संबुद्ध होती,. पहिल्या अवस्थेत “मुदिता” (आनंद), दुसर्या अवस्थेत ‘विमलता’ (शुद्धता), येणेप्रमाणे ‘प्रभाकारी’ (तेजस्विता), अर्चिष्मति’ (अग्निप्रमाणे तेजस्वी
बुद्धिमत्ता), ‘सुदूर्जया’ (जिंकण्यास कठीण), ‘अभिमुखी’ (पदार्थाची उत्क्रांतीव तिच्या कारणांची बारा निदाने जाणणे), ‘दूरग्ङमा (दूर जाणे), “अचल’ (अढळ), ‘साधूमती’ (धर्माच्या सर्व दिशा जाणणे) आणि दहाव्या अवस्थेत तो ‘धर्ममेध’ होतो व त्याला बुद्धाची दिव्यदृष्टी
प्राप्त होते.
*बोधीसत्वाचा अर्थ :-*
बोधी म्हणजे महान ज्ञान आणि सत्व
म्हणजे प्राणी. बोधिसत्व म्हणजे जो कधी ना कधी निश्चितपणे बुद्ध किंवा महाज्ञानी बनेल असा बुद्धत्व प्राप्ती करीता
प्रयत्नशील माणूस. बोधीसत्वाला सतत दहा जन्मांपर्यंत 'बोधिसत्व' राहावे लागते. *जन्म म्हणजे मानसिक
परिवर्तन.* (_जन्म म्हणजे कायेचा मृत्यू होऊन पुन:
जन्म घेणे नव्हे. जेव्हा बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बुद्ध धम्माची
दीक्षा घेतली तेव्हा त्यांनी म्हटले, “माझा पुनर्जन्म झाला आहे.’ म्हणजेच मानसिक विचारांची क्रांति घडून आली आहे._) ज्ञान प्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता. ज्ञान प्राप्तीनंतर
ते ‘बुद्ध’ झाले.
*बोधिसत्व कोणाला
म्हणावे? आणि बोधिसत्व म्हणजे काय?*
बोधिसत्व प्राप्त
होण्यासाठी त्या व्यक्तीने दहा पारिमितांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. दहा
पारिमितांचे पालन करताना बोधिसत्वाकडे स्थित्यांतर सुरु होते.
*_१० पारमिता_*
*१) शील:-* शील म्हणजे नितिमत्ता, पापभिरुता, वाईट गोष्टी न करणे, अपराध करण्याची लाज वाटणे.
*२) दान:-* म्हणजे निस्वार्थ, परोपकार अर्थात तन, मन धनानी दुस-याची भलाई करणे.
*३) उपेक्षा:-*
म्हणजे अलिप्तता, अनासक्ति, आवड-नावड नसणे, फलप्राप्तिने विचलीत न होणे, निरपेक्षतेने सतत प्रयत्नशील राहणे.
*४) नैष्क्रम्य:-*
म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग करणे.
*५) वीर्य:-* योग्य
प्रयत्न करणे, हाती घेतलेले काम माघार न घेता पूर्ण सामर्थ्याने पूर्ण करणे.
*६) शांती:-*
म्हणजे क्षमाशीलतात, द्वेषाला द्वेषाने उत्तर ने देणे. द्वेषाने द्वेष शमत नसून
क्षमाशीलतेने शमते.
*७) सत्य:-* कधीही
खोटे न बोलणे, कोणाचीही चुगली न करणे, कोणाचीही निंदा नालस्ती न करणे.
*८) अधिष्ठान:-*
ध्येय गाठण्याचा द्रृढ निश्चय म्हणजे अधिष्ठान.
*९) करुणा:-* समस्त
प्राणिमात्रा विषयी प्रेमपुर्ण व दयाळू व्यवहार म्हणजे करुणा होय.
*१०) मैत्री:-*
प्राणिमात्र, मित्र, शत्रू ते सर्व जीव जंतू बद्दल बंधूभाव बाळगणे म्हणजे मैत्री होय.
_वरील दहा पारिमितांचा सराव करता करता बोधिसत्वाची स्थीती सुरु
होते. ती सुद्धा दहा टप्य्यात असते. हे दहा टप्पे म्हणजे बोधिसत्वाची अवस्था. एकदा
का हे दहा टप्पे पुर्ण झाले की मग जी अवस्था प्राप्त होते तीला बुद्धत्व म्हणतात.
तर दहा पारिमितांच्या सरावाने बोधिसत्व प्राप्त करुन देणारे ते दहा टप्पे कोणते ते
पाहू या._
बोधिसत्व आपल्या
जीवनाच्या *पहिल्या अवस्थेत ‘मुदिता’ (आनंद) प्राप्त करून घेतो.* सोनार
ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता
काढून टाकल्यावर असा विचार करु लागतो की, प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर
पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि
त्याला सर्व प्राणिमात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते.
जीवनाच्या *दुसर्या
अवस्थेत त्याला ‘विमलता’ (शुद्धता) प्राप्त होते.* या वेळी बोधिसत्वाने कामवासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले
असतात. तो दयाशील होतो. तो सर्वांना दया दाखवितो. तो लोकांच्या दुर्गुणाची खुशामत
करीत नाही किंवा त्याच्या सदगुणाविषयी त्यांना नाउमेद करीत नाही.
जीवनाच्या *तिसर्या
अवस्थेत ‘प्रभाकारी' अवस्था (तेजिस्वता) प्राप्त करून घेतो.* या वेळी बोधिसत्वाची
बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. अनात्म व अनित्यता यांच्या सत्याचे त्याला
पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते. आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळविण्याची
इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग
करण्यास तयार असतो.
जीवनाच्या *चवथ्या
अवस्थेत तो ‘अर्चिष्मती’ (अग्नीप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता) प्राप्त करून घेतो.*
या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग, चतुर्विध ध्यान, चतुर्विध व्यायाम, चतुर्विध इच्छाशक्ती आणि पंचशील यांच्यावर आपले चित्त केन्द्रित
करतो.
जीवनाच्या *पाचव्या
अवस्थेत तो ‘सुदुर्जया’ (जिंकण्यास कठीण अशी स्थिती) प्राप्त करून घेतो.* सापेक्ष
आणि निरपेक्ष यांच्यातील सबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते.
जीवनाच्या *सहाव्या
अवस्थेत तो ‘अभिमुखी’ होतो.* या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती
आणि तिचे कारण याची ‘बारा निदाने’ पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते; आणि ‘अभिमुखी’ नावाच्या त्या ज्ञानामुळे
अविद्येने अंध झालेल्या सर्व
प्राणिमात्रां विषयी त्याच्या अंत:करणात अगाध करुणा उत्पन्न होते.
जीवनाच्या *सातव्या
अवस्थेत बोधिसत्व ‘दूरग्ङमा’ (दूर जाणे) ही अवस्था प्राप्त करतो.* बोधिसत्व आता
दिक्कालातीत असतो; तो अनंताशी एकरूप झालेला असतो. तथापि, सर्व प्राणिमात्रां विषयी वाटणार्या
करुणेमुळे त्याने आपले नाम-रूप अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत मात्र तो
इतरांच्यापेक्षा अगदी निराळा असतो. कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही
त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहात नाही. तो आपल्या सहचारांतील तृष्णा
शांत करतो. परोपकारबुद्धी, सहनशीलता, व्यवहारचातुर्य, शक्ती, शांत वृत्ती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा याची तो जोपासना करतो.
या अवस्थेत असताना
त्याला धर्माचे ज्ञान होते, परंतु लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्याची त्यांना ओळख करून देतो
आपण व्यवहारचातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते. लोकांनी
त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो; कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी
त्याच्या हेतुबद्दल गैरसमज करून घेतले आहेत हे त्याला कळत असते. परंतु त्याच वेळी
प्राणिमात्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह यत्किंचतही कमी होत नाही
किंवा प्रज्ञेकडेही तो पाठ फिरवीत नाही, म्हणून दुर्दैव त्याला सन्मार्गावरून कधीही च्युत करु शकत नाही.
जीवनाच्या *आठव्या
अवस्थेत तो ‘अचल’ होतो.* या अढल अवस्थेत
बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट
संपतात. जे जे चांगले आहे ते ते तो स्वाभाविकतःच अनुसरतो; तो जी जी गोष्ट करील त्या त्या
गोष्टीत तो यशस्वी होतो.
जीवनाच्या *नवव्या
अवस्थेत तो ‘साधुमति’ होतो.* ज्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्रे आणि सर्व
दिशा जिंकल्या आहेत, आणि त्यांचे त्याला पूर्ण आकलन झालेले असून जो कालातीत होतो अशाची ‘साधुमति’ ही अवस्था असते.
जीवनाच्या *दहाव्या
अवस्थेत तो ‘धर्ममेध’ होतो.* बोधिसत्वा ला
बुद्धाची दिव्यदृष्टी प्राप्त होते.
*_बोधिसत्व ही दहा सामर्थ्ये प्राप्त करून घेतो; कारण बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता
असते. बोधीसत्वा ची स्थित्यंतरे होत
असताना त्याने ही दहा सामर्थ्ये मिळविली पाहिजेत, इतकेच नव्हे तर त्याने ‘दहा पारमितां’ चाही परिपूर्ण अभ्यास केला
पाहिजे. एक ‘पारमिता’ ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे.
पारमितांचा खास व्यासंग पायरीपायरीने केला पाहिजे. एका जीवनावस्थेत एकच पारमिता
असली पाहिजे. एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये. अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी
तयारी झाल्यानंतरच तो ‘बुद्ध’ होतो. ‘बुद्ध’ हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय._*
संकलित माहिती
No comments:
Post a Comment