नाशिकचा काळाराम सत्याग्रह
पंचवटीतील काळाराम मंदिर प्रवेशासाठीचा डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी
केलेला संघर्ष सर्वश्रुत आहे. काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही क्रांतिकारक घटना होती.
फक्त सनातनी हिंदूंनाच जागे करण्यासाठी नाही तर त्यावेळच्या सत्ताधारी
इंग्रजांनाही जाग यावी आणि दलित-शोषितांना त्यांचे मूलभूत हक्क मिळावेत यासाठी
त्यांनी हा लढा उभारला होता. यातून जातीव्यवस्थेच्या बुरुजाला सुरुंग लावण्याचे काम
झाले. काळाराम मंदिर सत्याग्रह करण्याआधी बहिष्कृत भारतात बाबासाहेबानी एक झणझणीत अग्रलेख लिहला.
“सर्वच स्पृश्य हिंदुंच्या जनतेचे मतपरिवर्तन झाल्याशिवाय
मंदिर प्रवेश नसावा असे जर त्यांचे मत असेल तर अस्पृश्याना अनंत कालापर्यंत थांबावे
लागणार. सत्याग्रह करणे अपरिहार्य होऊन बसले आहे. आपण लवकरच मंदिर प्रवेशाची चळवळ हाती
घेणार. जो पर्यंत हिंदु म्हणुन या समाजाचा आहोत तो पर्यंत मंदिर प्रवेश हा आमचा अधिकार
आहे व तो आम्ही बाजावुनच दम घेऊ” अशा अर्थाचा अग्रलेखा
झडकल्यावर सारे सनातनी पेटुन उठले.
२५ जाने. १९३० रोजी त्र्येंबकेश्वरच्या निवृत्तीनाथाच्या यात्रेच्या वेळी एक
टोलेजंग सभा घेण्यात आली. या सभेत बाबासाहेब काही कारणास्तव येऊ न शकल्याने श्री. अमृतराव रणखांबे यानी
अध्यक्षपद भुषविले. भाऊसाहेब, देवराव नाईक, मिंदे पाटील इत्यादी नेत्यानी तडाखेबंद भाषण केले.
या वेळी सत्याग्रहाची एकुन रुपरेषा बाबासाहेबांच्या उपस्थीतीत अधिकृत करुन
घ्यावयाची होती पण ते न आल्याने हजर नेत्यांच्या संमतीने सत्याग्रहाची आखणी
करण्यात आली. सत्याग्रहाची नोंदणी, निधींची जमवाजमव पासुन सगळा कार्यक्रम ईथे संमत करुन घेतला. खेडोपाडयात
प्रचाराचे घोडे दौडु लागले. सत्याग्रहिंनी सगळा प्रांत पिंजुन काढला. नागपूर पासुन बेळगाव
पर्यंत जंगी प्रचार चालु झाला. जिकडे तिकडे फक्त याच सत्याग्रहाची चर्चा चालु
झाली. लोकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत होता. अपेक्षेपेक्षा जास्त लोकं सत्याग्राला
पाठिंबा देऊ लागली. बाबासाहेबांच्या कार्याला यश आल्यावाचुन राहणार नाही अन हा
आमचा नेता आमचा उद्धार करुन दम घेईल याची प्रत्येकाला खात्री वाटु लागली.
सत्याग्रहाची माहिती देण्यासाठी खेडयापाड्यातुन घेण्यात येणा-या लहान सहान सभाना
अलोट गर्दी होत असे.
बाबासाहेबांच्या चळवळीला लोकानी दिलेला प्रतिसाद हा
बाबासाहेबांच्या अंगभूत गुणांचा, संघटन कौशल्याचा अन
कळकळीने चालविलेल्या समाजसेवेची फलश्रूती होती. पण त्याच सोबत अटकावाच्या विरोधात
आकार घेणारा प्रतिकार अत्यंत वेगाने एकवटतो अन त्याचा उद्रेक होतो तेंव्हा सा-या
तटबंद्या उध्वस्त होतात. सत्याग्रही म्हणजे अशा
सा-या तटबंद्या तोडण्यास सज्ज झालेली, आपल्या नेत्याच्या
प्रति पराकोटीची निष्ठा बाळगणारी एक अत्यंत बलवान संघटना होती. गावावातुन वाहनारे
सत्याग्रहाचे वार सनातन्यांन्या अस्वस्थ करु लागले.
१३ फेब्रु. १९३० ला सनातन्यांची जाहिर सभा झाली. व्ही. बी.
आकूत (वकील) निळकंठ पाटणकर, श्रीधर अण्णाशास्त्री, व गोपाळशास्त्री
पुराणीक या सनतनी नेत्यांच्या नेतृत्वाखाली हि सभा भरविण्यात आली. दोन्ही
शास्त्रीबुवानी अस्पृश्यांचा कडाडून विरोध केला. महारानी मंदिरात येणे हे त्याना
अजिबात मान्य नव्हते. त्यांच्या पाठिशी सगळा सनातनी वर्ग उभा होता. सरसकट सगळ्याना आपण
दोष देतो पण या सभेत एक पुरोगामी ब्राह्मण होता ज्यानी सगळा विरोध झुगारुन
अस्पृश्याना मंदिरात प्रवेश देण्यात यावा असं स्पष्ट मत नोंदविलं. अस्पृश्याची
बाजु लावून धरणारा तो संवर्ण होता नीळकंठराव पाटणकर. त्यामुळे सभेत गदारोळ झाला. सनातन्यानी
या मताचा जोरदार निषेध केला. सभेत हल्ला कल्लोळ उडाला. अन आकूत मात्र तटस्थ
राहिले.
तिकडे याच दिवशी रात्री शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यानी संवर्णाची
सभा बोलावली. सनातनी फार भडकलेले होते. दिवसभर सत्याग्रहच चालला होता. महाराना धडा शिकवुन
सत्याग्रह फोडून काढण्याची भाषा सनातनी कार्यकर्ते बोलू लागले. काही झाले तरी
मंदिर खुले करायचे नाही या अटीवर सगळयांचे एकमत झाले. पाटणकरानी तसे
करण्यापेक्षा तडजोड करावी अशी सुचना दिली. त्यांच्या या सुचनेनी कार्यकर्त्यांनी हुल्लड घातली.
सुधारणेस अनुकूल सनातन्यांवर दगडफेक झाली. प्रक्षोभिक धर्मवेड्यानी जोडे फेकुन मारले.
शंकराचार्यानी तडजोडीच्या भानगडीत न पडता अलिप्त रहावे अशी धमकी वजा विनंती
करण्यात आली. एकंदरी परिस्थीती स्फोटक बनली होती. कधीहि प्रस्फ़ोट होईल अशा तंग
वातावरणामुळे शंकराचार्यानी सभा तहकुब करण्याचे जाहिर केले.
८ मार्च १९३० आयुक्त घोषाळ नाशिकला आले. गार्डन कडुन
वारंवार ईथल्या अस्पृश्यांच्या सत्याग्रहाबद्दल तक्रारी गेल्यामुळे आज आयुक्त
स्वत: ईथे हजर होते. त्यानी आधी बाबासाहेबांचे मत जाणुन घेतले. बाबासाहेब म्हणतात, “मी माझ्या लोकाना
हक्क मिळवुन देण्यासाठी लढा उभारला आहे, वाजवी तडजोड होत
असल्यास आम्ही सत्याग्रह तहकूब करायला तयार आहोत” असे घोषाळाना
सांगितले. बाबासाहेबांच्या एकंदरीत रवैय्यानी घोषाळ खुष झाले. नंतर त्यानी
सनातन्यांशी बोलणी केली. सनातन्यानी मंदिर खाजगी असल्याचा नवीन पिल्लू काढला.
मंदिराला दर वर्षी १०००/- रुपये सरकारी अनुदान मिळत असल्याचे लगोगल सिद्ध करुन हा
डाव हाणुन पाडण्यात आला. सनातन्यांच्या मुजोरीमुळे काहीच तडजोड होत नाही व
घोषाळसाहेब निराशपणे परत जातात. पण परत गेल्यावर
त्यानी आपला कावा दाखवला. आयुक्त घोषाळानी हॉटसन साहेबांस एक पत्र लिहले, “मी आताच नाशिकहुन
परतलो. मल आधी वाटत होते त्यापेक्षा हे प्रकरन खूपच गंभीर आहे. देवळाला सरळ सरळ
वेढा घालण्यात आला आहे. सकाळी मला तेथे आंबेडकर भेटले. महार तेथे गीत गात होते.
अधून मधून उंच आवाजात युद्ध घोषणा देत होते. तेथे ब-याच स्त्रीयाही होत्या. खाकी
पोषाक केलेले व हातात काठी घेतलेले लोकं पहारा देत आहेत. सत्याग्रहयांचा वेष
खादी व डोक्यावर गांधीटोप्या होत्या. त्या त्याना
नुकत्याच देण्यात आल्या होत्या. दर पाच दहा मिनटानी सत्याग्रह्यानी भरलेल्या लॉ-या
नाशिकात येत होत्या. सत्याग्रहात अडथळा आणणारा कुठलाही हुकूम पाळला जाणार नाही असे
आंबेडकरानी सांगितले आहे. श्री. गार्डन, श्री. रेनाल्डस
(पोलिस अधिक्षक) व मी सकाळी जेंव्हा तेथे गेलो तेंव्हा धरणे धरुन बसलेल्या महारांपैकी
कोणीच उठून उभे राहिले नाही. त्यापैकी बरेच जण खेड्यातुन आलेले वतनदार महार आहेत.
मी त्यांच्याशी बोलत असताना सुद्धा ते उठून उभे राहिले नाहित. परंतू आंबेडकर
येताक्षणीच ते उठून आनंदाणे उडया मारु लागले. त्याना सलाम करु लागले. सत्याग्रहाची
मोहिम कुणालाच आवडली नाही. केवळ ब्राह्मणच नाही तर व इतर सर्व हिंदु या
महारांचा व सत्याग्रहाचा विरोध करत आहेत. नाशिक परिसरातील महारांवर तेथील
संवर्णानी बहिष्कार घातलेला आहे. अशा परिस्थीतीत उत्तेजण देणे म्हणजे त्यांची खरी
सेवा करण्यासारखे नाही. या चळवळीचे स्वरुप धार्मिक असण्यापेक्षा, सामाजीक व राजकीय आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या
१४७व्या कलमानुसार गार्डनने ताबडतोब कारवाई करावी असे मला वाटते. खेडयातील वतनदर
महारही आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक याना
डरत नव्हते.”
मुजरे घेण्याची सवय असलेल्या साहेबांची आगपाखड या पत्रातुन
दिसुन येते. गो-या व काळ्या साहेबांना महारांचे वागणे कसे आवडत नव्हते हे
घोषाळांच्या पत्रावरुन स्पष्ट दिसते. बाबासाहेबानी मेलेल्या मुर्द्यांमधे
घातलेल्या स्वाभिमानाच्या फूंकरेचा जीवंत ठेवा घोषाळांच्या पुढे वाढला होता.
सनातनी दास्य झुगारुन देऊन आंबेडकरी रंगाने झडाडुन निघालेली नवचैतन्यानी भरलेली सत्याग्रहींची तुकडी बघुन घोषाळाचे
नेत्र दीपून गेले होते. बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणारी
महारांची भावी सेना कशी असेल याचा नांदी आज घोषाळाना नाशकात दिसली.
१४७ व्या कलमाखाली महारांवर कारवाई करण्याची घोषाळांची
सूचना मुंबई सरकारने फेटाळली. नाशिक सत्याग्रहा बद्दल त्यांच्या पत्रातुन ओझरणारा
दूराग्रह अचुक हेरल्यावर वरिष्ठानी घोषाळांवर नाराजी व्यक्त केली व २६ मार्च १९३०
रोजी तडकाफडकी त्यांची बदली केली. त्यांच्या जागी मध्यविभागाचे आयुक्त ए. डब्ल्यू
मॅकाय काम पाहु लागले. यानी सुत्र हाती घेताच मंदिराच्या पुजार्यांना बजावले की उत्तर
दरवाजाच्या बाजुने एक लहानसा दरवाजा होता जो पुजार्यांच्या घरात जात असे. त्या दरवाजातुन
पुजार्यांनी लोकाना आत
सोडल्याची तक्रार आली व तसे न करण्याची ताकिद दिल्या गेली. आता मात्र सर्व सनातनी
चवताळून उठले. ईकडे अस्पृश्यही दंड थोपटुन उभे ठाकले. पुजा-यानी नियम तोडल्यास त्यांच्या
खाजगी दरवाज्या जवळ सत्याग्रह करण्याची मागणी होऊ लागली.
No comments:
Post a Comment