पंचशील ध्वज
*_निळा, पिवळा, लाल, पांढरा, केशरी या पाच रंगाच्या उभ्या आडव्या पट्ट्या ने बनलेल्या झेंड्याला बौद्धांचा ध्वज म्हणतात. जो पंचशील झेंडा या स्वरुपात लोकप्रिय आहे._*
या झेंड्याची सुद्धा स्वतःची एक कथा आहे. *थिओसोफिकल सोसायटीचे संस्थापक कर्नल हेनरी स्टील ऑलकॉट आणि मॅडम ब्लावटस्की होते. हेनरी, अमेरीकन सैन्यातील सेवानिवृत्त कर्नल होते. थिओसोफिकल सोसायटी कोणत्याही एका धर्माला किंवा संप्रदायाला पोसणारी संस्था नव्हती. परंतु ती सर्व धर्म आणि पंथाच्या मूल्यांच्या समन्वायाचे स्त्रोत होती. म्हणूनच या संस्थेत पूर्वग्रह न ठेवता सर्व धार्मिक विचार प्रवाहांचा अभ्यास केला गेला, संशोधन केले गेले आणि त्यानुसार अनुसरण केले. अभ्यास व सराव करतांना कर्नल हेनरी बुद्धांच्या धम्माकडे आकर्षित होत गेले आणि शेवटी १८८० या वर्षी श्रीलंकेमध्ये त्यांनी बुद्ध धम्म आत्मसात केला आणि श्रीलंकेत बौद्ध धम्माच्या प्रगतीसाठी अर्थात उपक्रमात सक्रिय सहभाग सुरु केला. तेथे त्यांनी ५०० च्या जवळपास बौद्ध विद्यालय व महाविद्यालयांची स्थापना केली. त्यामधील काही बरेच प्रसिद्ध झाले आनंद, नालंदा, महिंद्र, ही त्यांनी स्थापलेल्या शाळांची नावे आहेत.*_
_त्यांच्या शांतता लोकशाही चळवळीद्वारे श्रीलंकेतील बौद्धांना १८८४ साली एक मोठे यश मिळाले. यश हे होते की, *ब्रिटिश सरकारने वेसाक डे म्हणजेच बुद्ध पौर्णिमा, सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केला. जे, १८८५ पासून लागू करण्यात आले.* या यशानंतर *श्रीलंकेच्या बौद्धांनी "कोलंबो समिती" नावाची एक संस्था स्थापन केली.* यामध्ये कर्नल हेनरी हे सुद्धा सदस्य होते. या समितीचा एक प्रस्ताव होता की, *बौद्धांचा एक ध्वज असावा.* हा ध्वज अभिमानाचे प्रतीक असेल. असे म्हणतात की, हा प्रस्ताव कर्नल हेनरी यांनी दिला होता आणि त्या प्रस्तावाला संपूर्ण समिती होकार होता. असे निश्चित झाले की, येणाऱ्या पौर्णिमेला२८ मे १८८५ रोजी धम्मध्वज फडकवला जाणार अशा प्रकारे कोलंबो समितीकडून तय्यार केलेला हा ध्वज अस्तित्वात आला. *आज त्याला पंचशील ध्वज म्हणतात.*_
*_बुद्ध पौर्णिमेला हा फडकवण्यापूर्वी २० एप्रिल १९८८५ रोजी कोलंबो समितीकडून या ध्वजाला सार्वजनिक स्वरूप आणि सर्वांची व संमती मिळाली होती. हा व्याज श्रीलंकेमध्ये कोटाईना देखील दीपदुपरस्या बुद्ध विहारात, १८८५ ला २८ मे रोजी पहिल्यांदा पूजनीय विद्र मिगतुक्त गुणानन्द देर यांच्या कडून मोठ्या जनसमुदाया समोर फडकवला गेला._*
*_त्यानंतर कर्नल हेनरी स्टील ऑलिकॉट यांच्या सल्ल्यानुसार वा व्यजाचा आकार राष्ट्रध्वजाच्या आकाराप्रमाणे निश्चित करण्यात आल यात बरेच बदल केले गेले. शेवटी त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. येत्या वर्षात १८८६ मध्ये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी फडकला गेला. आजच्या तारखे पर्यंत हा ध्वज एकसारखाच आहे. व संपूर्ण जगातील बौद्रांच्या अस्मितेची ओळख व अभिमानाचे प्रतीक आहे._*
या ध्वजाला जागतिक मान्यता देण्याचीही एक कथा आहे. _या मुख्य श्रेय प्रो. जी. पी. मलालसेकर यांना जाते, त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुढाकाराने कोलंबो मध्ये श्रीलंकेत प्रथम जागतिक बौद्ध फेलोशिप आयोजित करण्यात आली होती. २५ मे, १९५० ला, दाढ़ा बातु बौद्ध विहाराच्या सभागृहात या विहारात भगवंताच्या पवित्र दंत धातु प्रतिष्ठापित आहेत._
_पूजनीय भन्ते गलगेदर प्रज्ञानंदाचे मत आहे की, *प्रो. जी. मलालसेकर हे मुळचे श्रीलंकेचे होते. ते बहुभाषिक म्हणून प्रसिद्ध होते. सिंहली, पालि संस्कृत, इंग्रजी, लॅटिन, ग्रीक, फ्रांसीसी या भाषांमध्ये त्यांनी प्रकांड पांडित्य अवगत केले होते. ते जागतिक बौद्ध फेलोशिप या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. ते बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती खूप प्रभावित होते. त्यांनी बाबासाहेबांना २५ मे, १९५० ला आयोजित केलेल्या जागतिक बौद्ध फेलोशिप या परिषदेचे कोलंबो मध्ये येणाऱ्या बुद्ध पोर्णिमेसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.*_
*_२५ मे, १९५० ला श्रीलंकेतील या कार्यक्रमात जगातील सर्व बौद्ध संघाच्या समोर प्रो. डॉ. जी. पी. मलालसेकर यांनी बाबासाहेबांना “लिविंग बोधिसत्व" म्हणून हाक मारली. एक जिवंत बोधिसत्व.._*
_*प्रो. गुणपाल पियासेन (जी.पी.) मलालसेकर बुद्धिस्ट विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते. या व्यतिरिक्त "पालि सिंहली-इंग्रजी शब्दकोश" तसेच "गुणपाल सिंहली इंग्रजी शब्दकोश" हे त्यांचे अभिजात ग्रंथ आहेत. प्रो. डॉ. जी. पी. मलालसेकर, यांना हे श्रेय जाते, कारण २५ मे, १९५० रोजी. जागतिक बौद्ध फेलोशिप मध्ये सर्व जगातील बौद्ध संघासमोर, ज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. जपान चे झेन विद्वान डॉ.डी.टी.सुजुकी यांची ही उपस्थिती होती, त्यांनी सर्व बौद्ध जगताकडुन त्या बौद्ध ध्वजाला स्विकारण्याचा प्रस्ताव ठेवला. जो सर्वांनी साधुवाद देऊन स्विकारला असे म्हणू शकतो की, भारताच्या राष्ट्रीय झेंड्या मध्ये अशोक चक्रा समावेश करून त्याला बौद्ध स्वरूप देण्याचे श्रेय बाबासाहेबांना आहे आणि धम्म ध्वजाला जागतिक मान्यता दिल्याच्या घटनेत सुद्धा त्यांची उपस्थिती आहे. अधिकृतपणे या ध्वजाला आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वजाची मान्यता १९५२ मध्ये जागतिक बुद्धिस्ट काँग्रेसमध्ये मिळाली.*_
_या धम्मध्वजात पाच रंगाच्या उभ्या पट्टया आहेत म्हणून लोक याला पंचशील ध्वज म्हणतात, वस्तूत: यात पाच पट्टया नसून, सहा पट्टया आहेत. सहावी उभी पट्टी ज्यामध्ये पाचही रंगांचा समावेश आहे. याला पंचशील ध्वज म्हणणे, या गोष्टीकडे लक्ष वेधतो की, बौद्ध लोक पंचशीलाला किती महत्व देतात, जर संख्या भाषेत सांगायचे झाले तर, याला पंचशील न म्हणता, सहा रंगांचा झेंडा म्हणणे जास्त फायदेशीर ठरेल परंतु धम्म ध्वजाच्या स्वरुपात याला जागतिक मान्यता तसेच स्विकारलेले आहे. *बोलतांना पंचशील किवा सहा रंगांचा झेंडा म्हणून उपयोग करु शकतो, परंतु धम्मध्वज किंवा बुद्धिस्ट फ्लॅग है सार्वत्रिक नाव आहे.*_
_धम्मध्वजाच्या रंगांचा अर्थ पुढील प्रमाणे, बौद्ध ग्रंथांमध्ये असा उल्लेख सापडतो की, *भगवान बुद्धांच्या शरीरातून सहा रंगांचा प्रकाश परावर्तित होत होता. निळा, पिवळा, लाल, पांढरा, केशरी आणि सहा रंगांचा मिश्रण असलेला एक रंग ज्याला प्रभास्वर म्हणतात.* हे सहा रंग बुद्धत्व आणि धम्माच्या पूर्णत्वाचे प्रतीक, प्रतिकात्मक लक्षण आहे. बौद्धांना आठवण ठेवण्याकरीता, स्मरणपत्रासारखे आहेत. या झेंड्याचा सहा रंगांचा खालील प्रमाणे.....
*निळा:* असे म्हणतात की, निळ्या रंगांचा प्रकाश, भगवान बुद्धांच्या डोक्याच्या चारही बाजूला प्रकाशत होता. जो प्राणीमात्रां करिता त्याच्या अखंड करुणेचे प्रतीक होय. या प्रकारे निळा रंग मैत्री, करुणा व शांतीचे प्रतीक होय. आकाश आणि समुद्राचा निळा रंग व्यापकतेचा संदेश देतो. व्यापकता दर्शवतो.
*पिवळा:* पिवळा रंगाची आभा, प्रकाश भगवान बुद्धांच्या जवळ दिसतो. पिवळा रंग अनुपस्थिती, आणि शून्यता यांचे प्रतीक आहे मध्यम मार्ग म्हणजे टोकाच्या पलीकडे जाणारा न मधला रस्ता. लाल लाल रंग बुद्धांच्या त्वचेच्या रंगाचा प्रकाश हा रंग धम्माच्या अभ्यासाच्या जिवंतपणाचे व मांगल्याचे प्रतीक होय. हा समजूतदारपणा, सौभाग्य, सद्गुण व कर्तृत्वाचे लक्षण आहे.
*पांढरा किंवा सफेदः* बुद्धांचे दात, नखे, अस्थी धातूपासून पांढरा रंग प्रसारीत होतो. हा रंग शुद्धतेचे व पावित्र्याचे प्रतीक आहे. बुद्धांच्या शिकवणुकीचे प्रतीक आहे. अकालिकता, म्हणजे बुद्धांची शिकवण वेळेनुसार कालातीत होत नाही उलट नवनवीन होत राहते. ते काल जेवढे सत्य होते, तेवढेच आज सुद्धा आहे, व पुढे सुद्धा राहणार.
*कासाय, केशरी:* बुद्धांच्या हातात, पायांच्या टाचांमध्ये, ओठांवर, केशरी रंगांचा प्रकाश चमकतो. हा रंग बुद्धांच्या निरंतर शहाणपणाचे प्रतिक आहे. हा रंग वीर्य, मान व सन्मान, उत्साह दर्शवतो.
*पाचही रंगांचा एकत्रित प्रकाश म्हणजेच पाच रंगांची मिश्रित प्रभा म्हणजेच प्रभास्वर.* बुद्धांच्या देशनांची, शिकवणूकीची विविधतेचे, क्षमतेचे प्रतीक होय. ही मिश्रित प्रभा, प्रकाश दाखवतो की बुद्धांची शिकवण जाती, संप्रदाय, राष्ट्रीयत्व, भेदभावाच्या पलीकडे केवळ मानवप्राण्यांसाठीच नाही तर प्राणीमांत्रांना सुद्धा आहे.
_या प्रकारे हा झेंडा ध्वज मानवांच्या मूल्यांचे एक सार्वत्रिक चिन्ह, खुण होय. हा ध्वज कोणत्या एका राष्ट्राचा नाही, तर संपूर्ण विश्वाचा आहे. जरी याला बौद्धांच्या ध्वजासाठी आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असली तरी हा संपूर्ण मानवतेचा ध्वज आहे._
*धम्मध्वज वंदना*
वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या डोक्यावरील व दाढीवरील केसातून व डोळ्याच्या नीलस्थानातुन प्रभावित होणारा निळा रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।१।
वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या पिवळसर त्वचेतून व डोळ्यातील पिवळ्या स्थानातून प्रभावित होणार पिवळा रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।२।।
वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या मांसातील व डोळ्यातील रक्त वर्ण स्थानांतील आणि रक्तातून प्रभावित होणारा लाल रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।३।।
वज्रासारखा अभेद देह धारण कराणाऱ्या भगवान बुद्धाच्या दातांतून , अस्थितून , डोळ्यातील पांढऱ्या स्थळांतून प्रभावित होणारा शुभ्र रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापुन राहीला आहे ।।४।।
वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या निरनिराळ्या अवयवात मन प्रभावीत होणारा केसरी रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।५।।
वज्रासारखा अभेद्य देह आणि वरील रंगानी परिपूर्ण असलेल्या अनंतामध्ये फडकणाऱ्या व सदैव मनोहर दिसणाऱ्या भगवान बुद्धाच्या धम्मध्वजाला आम्ही काया , वाचा व मनाने वंदन करतो ।।६।।
*_कालांतराने
त्याला विश्व मान्यता प्राप्त झाली . याला पाली भाषेत ' षडरोशनी ध्वज ' किंवा ' धम्म ध्वज ' असे म्हणतात. याचे प्रमाण
उभे ५० सें . मी . व आडवे ७० सें.मी.आहे हा 'धम्मध्वज ' बौध्द जनांनी आपले घर,विहार,स्मारक, वन, धम्म परिषद , धम्म सभेचा मंच धम्म उत्साहाचे स्थळ इत्यादी
ठिकाणी सर्वांत उंच असेल असा फडकवावा. हा 'धम्म ध्वज बुध्द पोर्णिमा', धम्मचक्र प्रवर्तन दिन , धम्मक्रांती दिन व धम्म परिषदांचे वेळी
ध्वजस्तंभावर फडकवून वंदना करावी प्रत्येक बौध्द व्यक्तिने धम्म ध्वजाचा
सन्मान व अभिमान बाळगावा._*
हा पाच
रंगाचा ध्वज आहे म्हणून याला ' पंचशील ध्वज ' किंवा ' पंचरंगी ध्वज ' असे कदापी म्हणू नये.