✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_शांतीचे महान वैज्ञानिकः बुद्ध_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2025/04/blog-post.html
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
(विश्व विपश्यनाचार्य श्री सत्यनारायण गोयंका द्वारे संबंधित मूळ विषय 'शांतीचे महान वैज्ञानिक बुद्ध' यावर प्रमुख वक्त्याच्या रूपात दिले गेलेले प्रवचन)
अमेरिकेतील संयुक्त राष्ट्र महासभेने बुद्धांच्या त्रिविध पावन वैशाख पौर्णिमा (जी बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती तसेच महानिर्वाण प्राप्तीची सूचक आहे) ला आंतरराष्ट्रीय मान्यता प्रदान करून जो "वैशाख महोत्सव" साकार केला त्यात विश्व विपश्यनाचार्य श्री गोयंकाजी यांना प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित केले गेले. या कार्यक्रमाला बर्मा व श्रीलंका संघाच्या स्थानिक मिशनने २९ मे २००२ ला संयुक्त राष्ट्रांमध्ये आयोजित केले होते, ज्यात श्रीलंका, कंबोडिया आणि बर्माच्या स्थानिक मिशनचे राजदूत श्री गोयंकाजी यांच्या अगोदर थोडक्यात बोलले.
डेग हैदरस्कोड लायब्ररी सभाग्रहात राजदूत, संयुक्त राष्ट्राचे अन्य गणमान्य सदस्य, सहयोगी, आदरणीय भिक्षु गण आणि काही विपश्यी साधक श्रोतागण यांना संबोधित केले गेले. ऐतिहासिक बुद्धाची आधुनिक संदर्भात उपयुक्तता मांडल्याबद्दल या भाषणाचे सर्वच श्रोत्यांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक केले गेले. से.)
प्रिय शांतीप्रेमी मित्रांनो आणि आदरणीय भिक्षूंनो,
मी 'संयुक्त राष्ट्र' यांना तसेच या भव्य वैशाख महोत्सवाच्या आयोजकांना विशेष करून बर्मा तसेच श्रीलंकेच्या शिष्टमंडळाला धन्यवाद देत आहे, ज्यांनी मला या आंतरराष्ट्रीय सन्मान्य सभेला संबोधित करण्याची संधी प्रदान केली.
जगात जे होत आहे ते पाहून हृदय दुःखाने भरून जात आहे. मनुष्यच मनुष्याचा शत्रू झाला आहे. ही व्यक्तिगत शत्रुता नाही, लोक यासाठी मारले जात आहेत कारण ते एका विशेष धार्मिक संप्रदायाचे अथवा समुदायाचे आहेत, ते एका विशेष मानवजातीच्या समूहाचे आहेत किंवा विशेष देशाचे आहेत. निर्दयता इतक्या निम्न स्तराची झाली आहे की एक व्यक्ती दुसऱ्याला मारत आहे जरी ती निर्दोष आहे, असहाय आहे, जरी स्त्रिया व मुलेही आहेत. ही दुःखद हिंसा आधुनिक प्रौद्योगिक कारणामुळे अधिक भयानकरित्या विध्वंसकारी झाली आहे, जसे आधी कधी नव्हते. मानवी इतिहासामध्ये शक्यतो याच्या आधी असे कधी झाले नाही म्हणूनच अशा प्रतिकूल भावनांनी उत्पन्न झालेल्या या मानवी घोर अपराधांपासून मानवतेच्या रक्षणासाठी आज मौलिक परिवर्तनाची आवश्यकता आहे.
_*सारे विश्व घृणा, चिंता आणि भयरोगाने आक्रांत झाले आहे. याला एखाद्या असाधारण वैद्याकडून चिकित्सेची गरज आहे. बुद्ध असेच एक असाधारण वैद्य होते. सुख आणि शांतीचे खूप मोठे वैद्य. त्यांचा शांती आणि मैत्रीचा संदेश आजही तितकाच प्रासंगिक आहे जितका २६०० वर्षांपूर्वी होता, जेव्हा त्यांनी धर्मचक्राचे प्रवर्तन केले होते.*_ उलट आज तो अधिक प्रासंगिक झाला आहे. आज मध्यान्ह काळी आपण मानवी इतिहासातील या विशिष्ट व्यक्तीच्या संदेशाला सन्मान देण्यासाठी एकत्र झालो आहोत. आपण पाहूया की त्यांची शिकवण अशा निर्दयी विध्वंसात्मक मनोभावांना कसे मुळातून उखडून फेकते आणि कसे याचे रूपांतरण रचनात्मक करूणेमध्ये होते. *_अधिकतर अंधभक्ती आणि आपल्या दृष्टीप्रती गहन आसक्तीच अशा निषेधात्मक मनोभावांचे कारण आहे, जी क्रमशः या प्रकारच्या निर्दयतेला जन्म देते._*
जेव्हा मी विपश्यनेचे पहिले शिबिर आपली मातृभूमी बर्मा मध्ये केले तेव्हा बुद्धांच्या वास्तविक शिक्षणाला योग्यरीतीने समजू शकलो. मला आठवते की शिबिर सुरू होण्याआधी माझ्या आचार्यांनी मला एक पुस्तक वाचायला दिले होते. त्याच्या पहिल्या पानावरच *_कालामांना बुद्धांनी केलेल्या उपदेशाचे एक उदाहरण होते. बुद्धांनी त्यांना सांगितले होते की, "कोणत्याही गोष्टींना यासाठी स्वीकारू नका-_*
१. *_कारण तुम्ही त्यांना खूप वेळा ऐकले आहे,_*
२. *_कारण अनेक पिढ्यांनी यावर परंपरागत रुपाने विश्वास ठेवला आहे,_*
३. *_कारण हे खूप लोकांना (जनतेला) मान्य आहे,_*
४. *_कारण हे तुमच्या धर्मग्रंथानुसार आहे,_*
५. *_कारण हे तर्कसंगत आहे,_*
६. *_कारण हे तुमच्या विश्वासाबरोबर जुळत आहे,_*
७. *_कारण हे तुमच्या गुरुद्वारा उद्घोषित आहे ज्यांचे व्यक्तित्व आकर्षक आहे आणि त्यांच्याप्रती तुम्हाला खूप आदरभाव आहे किंवा सांगणारा श्रमण तुमचा पूज्य आहे._*
👉 *_नाही ! तर तुम्ही याला तेव्हाच स्वीकारा जेव्हा तुम्ही स्वतः आपल्या अनुभवाद्वारे त्याचा साक्षात्कार करून घ्याल आणि जाणून घ्याल की हे केवळ तुमच्यासाठीच नाही तर सर्वांनाच ते हितकारक आणि लाभकारक आहे._*
👉 *_तेव्हा मात्र याला फक्त स्वीकारू नका तर त्यानुसार जीवन जगा, याला आपल्या आचरणात उतरवा."_*
त्यांच्या या संदेशामध्ये एक चुंबकीय आकर्षण होते. *_मी ज्या परंपरेमध्ये जन्मलो आणि माझे पालनपोषण झाले होते ती भिन्न होती. जेथे मला हे शिकवले गेले होते की आपल्या धर्मग्रंथांमध्ये जे काही लिहिले आहे आणि धर्मगुरू जे सांगत आहेत ते कोणतेही प्रश्न न करता स्वीकारले पाहिजेत. ३१ वर्षाच्या वयामध्ये बुद्धांच्या ज्या पहिल्या शब्दांशी माझा संपर्क आला ते हेच शब्द होते, जे वाचून मी गदगद झालो._*
मानवी इतिहासामध्ये हे आत्मस्वातंत्र्याचे पहिले आणि अनोखे घोषणापत्र (सनद) होते. मला ही गोष्ट स्पष्ट स्वरुपात लक्षात आली की *_संम्यक संबुद्धांच्या या शिकवणुकीमध्ये विवेकशून्य विश्वासाला आणि अंधश्रद्धेला कोठेही स्थान नाही._* मी खुल्या मनाने अनुभवाच्या आधारावर सत्याचा स्वीकार करून याला आजमावण्याचा निश्चय केला. जस जसे मी धर्म पथावर चाललो मला प्रत्येक दिवशी जे अनुभव आले त्याने मी हेच जाणले की हा मार्ग बुध्दीसंगत, वैज्ञानिक आणि अत्यंत व्यावहारिक आहे. विचार न करता स्वीकारण्याची इथे काही आवश्यकता नाही, यामध्ये काही शंका राहिली नाही की त्यालाच मी सत्य मानू ज्याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे. मी हे पण जाणले की या मार्गावर उचलले गेलेले प्रत्येक पाऊल विश्वजनीन आणि असांप्रदायिक आहे, त्यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला.
*_दहा दिवसांच्या शिबिराअंती मी जाणले की बुद्धांची ही शिकवण परिपूर्ण आणि सद्यः फलदायी आहे. हे शिबिर माझ्यासाठी मानसिक तसेच अध्यात्मिक दृष्टीने खूपच लाभदायक सिद्ध झाले. शेवटी मी याला पूर्ण मनाने स्वीकारले आणि त्यानंतर सम्बुद्धांद्वारे सांगितलेल्या या मार्गावर चालत राहिलो._*
दीड दशकानंतर माझ्या आचार्यांनी मला भारतवर्ष तसेच पूर्ण जगामध्ये विपश्यना शिकवण्यासाठी अधिकृत केले. याच्या अभ्यासाने भिन्नभिन्न देशांच्या, भिन्नभिन्न संप्रदायांच्या, भिन्नभिन्न परंपरांच्या लाखो लोकांना एक सारखाच लाभ प्राप्त झाला आहे. सर्व वर्गाचे लोक याकडे आकर्षित झाले आहेत कारण की ही विद्या संपूर्णपणे असांप्रदायिक तसेच सद्यः फळ देणारी आहे.
*_भगवान बुद्धांची शिकवण आणि त्यांचा धर्म_*
*_बुद्धांनी या पथाचे निम्नलिखित गुण सांगितले आहेत.... हा सोपा आहे, चांगल्या प्रकारे लक्षात येण्यायोग्य आहे, कोणत्याही बौद्धिक अडचणी शिवाय कोणीही याचा अभ्यास करू शकतो. यावर उचलले गेलेले प्रत्येक पाऊल वर्तमानातील क्षणाच्या सत्यतेवर आधारित आहे. यामध्ये कोणतीही कल्पना नाही, कोणती अटकळबाजी नाही, व्यर्थ चिंतन नाही, कोणती आत्मसूचना अथवा बाह्यसूचना नाही. प्रत्येक पाऊल इथे याच जीवनामध्ये चांगले परिणाम देणारे आहे. या पथावर केले गेलेले कोणतेही प्रयत्न व्यर्थ जात नाहीत. शिकवण या गोष्टीवर भर देते की या आणि स्वतः पहा, सत्याचा स्वतः अनुभव घ्या. पथ एकदम सरळ (ऋजू) आहे. यावर उचलले गेलेले प्रत्येक पाउल आपल्याला दुःख मुक्तीचे अंतिम लक्ष निर्वाणाच्या समीप घेऊन जाते. प्रत्येक समुदायाच्या प्रत्येक समजदार व्यक्तीसाठी स्वानुभवाने सत्याचा साक्षात्कार करण्यासाठी आहे._*
जेव्हा कोणी या पथावर चालतांना भगवान बुद्धांच्या गोष्टी वाचतो तेव्हा ही गोष्ट अधिक स्पष्ट होते की या शिकवणीचा उद्देश लोकांना एका धार्मिक संप्रदायातून दुसऱ्या धार्मिक संप्रदायामध्ये धर्मांतरित करण्यासाठी नाही. वस्तुतः या शिकवणीचे धार्मिक संप्रदायाशी काही देणे घेणे नाही. याचा अभ्यास सर्वजण करू शकतात.
*_जेव्हा कोणी बुद्ध साहित्य वाचतात किंवा त्यावर लिहिलेल्या अट्ठकथा आणि टीका वाचतात तेव्हा हे जाणून आश्चर्य होते की या संपूर्ण वाङ्गयात 'बौद्ध' किंवा 'बौद्धधर्म' यासारखे शब्द अजिबात सापडत नाहीत. बुद्धांनी या शब्दांचा प्रयोगच केला नाही. काही शतकांपर्यंत त्यांच्या अनुयायांनी देखील या शब्दांचा प्रयोग केला नाही. बुद्धांनी आपल्या शिकवणीला 'धम्म' असे म्हटले, याचा अर्थ होतो प्रकृतीचा नियम (ऋत), स्वानुभूतीजन्य सत्य. त्यांनी आपल्या अनुयायांना देखील 'धम्मी', 'धम्मीट्ठो', 'धम्मिको', 'धम्मचारी', 'धम्मविहारी' असे म्हटले आहे. आजच्या भाषांमध्येच 'बुद्धिज्म', 'बुद्धिस्ट', 'बौद्ध' असे शब्द आढळतात, ज्यांचे पर्याय विस्तृत पाली वाङ्गयात कुठेच मिळत नाहीत._*
जर बुद्धांच्या शिकवणीसाठी 'बुद्धिज्म' किंवा 'बौद्ध' शब्दाचा प्रयोग झाला असता तर ती एका विशेष संप्रदायापुरती मर्यादित झाली असती , परंतु 'धम्म' तर असीम आहे.... *'अप्पमाणो धम्मो'.* हा कोणत्या संप्रदाय विशेष किंवा धर्मावलंबियांसाठी नाही, 'धर्म' सर्वांसाठी आहे, आणि आपण सर्व जाणतो की आता हा शब्द या अर्थाने घेतला जात आहे की जो प्रयोग करण्यासाठी सुविधाजनक आहे. खूप सारे लोक जे या शब्दाचा प्रयोग करीत आहेत ते खूप चांगल्या रीतीने समजतात की ते याचा प्रयोग सार्वजनीन धम्म किंवा धर्मासाठी करीत आहेत.
आपण समजूयात की बुद्धांची शिकवण काय आहे. हा 'आर्य अष्टांगिक मार्ग आहे. या मार्गाला 'आर्य' असे याकरिता म्हटले जाते की परिश्रमपूर्वक या मार्गावर जो चालतो तो आर्य होतो, संत होतो, शुद्ध चित्ताचा व्यक्ती होतो. आर्य अष्टांगिक मार्गाचे तीन भाग आहेत.
प्रथम शील आहे, ज्याला संक्षेपात निम्नलिखित रूपात म्हणू शकतो...
_सर्व पापकर्मापासून तसेच सर्व कायिक आणि वाचिक अकुशल कर्मापासून दूर रहा, ज्याने दुसऱ्याला दुःख पोहोचते तसेच त्यांची शांती आणि समता भंग होते._
दुसरी समाधी अर्थात कुशल चित्ताची एकाग्रता, याला संक्षेपात निम्नलिखित रुपात म्हणू शकतो- _कुशल चित्ताच्या एकाग्रतेने कुशल कर्म करा._
तिसरी पञ्ञा (प्रज्ञा) आहे जिला संक्षेपात निम्नलिखित रुपात म्हणू शकतो- _प्रज्ञा विकसित करून, प्रज्ञेची भावना परिपूर्ण करून चित्त विशुद्ध करणे._ या तीनही शिकवणी भूतकाळातील सर्व बुद्धांच्या शिकवणी आहेत आणि भविष्यातील सर्व बुद्धांच्या शिकवणी असतील.
*_बुद्धांची व्यावहारिक शिकवण_*
प्रत्येक चांगला धर्म शील सदाचाराचे जीवन जगण्याची शिकवण देतो. हेच आध्यात्मिक शिक्षणाचे सार आहे, मर्म आहे, पण बुद्धांचा उद्देश केवळ नैतिक जीवन जगण्याचा उपदेश देण्यापुरताच मर्यादित नव्हता. त्यांनी आर्य अष्टांगिक मार्गाच्या दुसरा मैलाचा दगड 'समाधी' चा अभ्यास करणे शिकवले. त्यासाठी कोणत्या तरी आलंबनाची आवश्यकता असते. खूप सारी आलंबन आहेत ज्याने कोणीही आपल्या मनाला नियंत्रित करू शकतो, ज्यावर कोणी आपल्या मनाला टिकवून ठेवू शकतो. बुद्धांनी देखील खूप सारी आलंबन दिली. एक लोकप्रिय आलंबन जे त्यांनी दिले ते आहे आपला श्वास-प्रश्वास. याला त्यांनी *'आनापानसति' (आनापान स्मृती)* म्हटले. _*याचा अर्थ आहे श्वास तसेच प्रश्वासाप्रति जागरूकता विकसित करणे. सर्व मनुष्यामध्ये मग ते कोणत्याही संप्रदायाचे असोत, श्वासाचे येणे जाणे चालूच असते. कोणीही श्वास-प्रश्वासाप्रति जागरूकतेचा अभ्यास करण्यासाठी करण्यासाठी हरकत घेऊ शकत नाही. कोणी कसे म्हणू शकतो की हा श्वास मुस्लिम आहे की हिंदू आहे, की इसाई आहे की यहुदी, बौद्ध आहे की जैन, शिख आहे की पारशी, कॉकेशियन आहे की आफ्रिकन की एशियन, पुरुष आहे की स्त्री.*_
👉 *_'आनापानसती'चा अर्थ आहे की नाकाच्या खाली आणि वरच्या ओठावरील क्षेलावरून जो श्वास येत-जात आहे, त्या प्रती जागरूक राहून वरच्या ओठाच्या वर आणि नाकाच्या खालच्या जागेवर मनाला एकाग्र करणे._*
जस-जसे मन या छोट्याशा क्षेत्रावर एकाग्र होते तेव्हा ते अधिक सूक्ष्माहून सूक्ष्मतर आणि अधिकाधिक संवेदनशील होत जाते. केवळ तीन दिवसांच्या अभ्यासानंतर, साधक शरीराच्या या भागामध्ये शारीरिक संवेदनांचा अनुभव करू लागतो. तत्पश्चात तो प्रज्ञेला विकसित करण्याकडे लक्ष देतो. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीरात संवेदनांना पाहतांना साधक अनुभव करतो _*सर्व संवेदना नाम आणि रूपाने पूर्णपणे जोडल्या आहेत. नाम आणि रूप एक दुसऱ्याला प्रभावित करत असतात.*_ हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यांनी प्रभावित झालेल्या संवेदनांच्या निरीक्षणाने हे स्पष्ट होते की जेव्हा कोणी व्यक्ती अकुशल विकार कर्म करते तेव्हा ते ते करण्याआधी मनामध्ये कोणता ना कोणता विकार जागवावा लागतो. हत्या करण्याआधी तिला भयंकर द्वेष उत्पन्न करावा लागतो. चोरी करण्याआधी लोभ जागवावा लागतो. यौन दुराचार करण्यासाठी त्याला खूप कामवासना जागवावी लागते. कोणा दुसऱ्याची हानी करण्याआधी व्यक्ती स्वतःची हानी करून घेते. क्रोध, लोभ, द्वेष, ईर्षा, घमेंड आणि भय इत्यादी विकृती मनुष्याला तत्काळ दुःखी, अभागी, दयनीय आणि उग्र बनवतात. _*तो अशांत होऊन जातो. आणि जेव्हा तो अशांत होतो तेव्हा तो आपली अशांती स्वतः पुरतीच मर्यादित न ठेवता दुसऱ्यांनाही अशांत बनवतो. समाजातील दुसऱ्या लोकांची हानी करणे सुरू करतो. प्रकृतीच्या या नियमाला कोणीही आपल्या या साडेतीन हाताच्या कायेमध्ये स्वतः अनुभव करू शकतो.*_
अकुशल कर्म करतेवेळी बाहेरून कोणी सुखी आहे असे दिसू शकते, पण त्याची वास्तविक स्थिती त्या निखाऱ्यासारखीच आहे जो वरून राखेने झाकला गेलेला असतो. मानसिक विकारांमुळे तो आतल्या आत जळत राहतो आणि तरीही त्याला याची शुद्ध नसते की आत मध्ये काय चालू आहे? यालाच अविद्या (अविज्जा) तसेच मोह म्हणतात. *बुद्धांच्या अनुसार कोणत्या दार्शनिक मान्यतेचे ज्ञान न होणे ही अविद्या नाही. त्याच्या आतमध्ये काय होत आहे? हे न जाणणे म्हणजेच अविद्या आहे.* या अविद्येरुपी आवरणामुळेच तो जाणू शकत नाही तो दुःखी का आहे. कोणीही दुःखी राहू इच्छित नाही परंतु तरीही तो तृष्णा अर्थात आसक्ती आणि द्वेषाला निरंतर उत्पन्न करण्यामुळे दुःखी राहतो. कारण की प्रत्येक वेळी तो संवेदनांप्रति प्रतिक्रीया करत असतो. जस-जशी अविद्या दूर होते आणि तो आत डोकावून पाहू लागतो तेव्हा अनुभव करतो की पहा, मी या संवेदनांप्रति प्रतिक्रिया करूनच स्वतःसाठी दुःख जागवीत आहे. जेव्हा या संवेदना सुखद असतात तेव्हा मी आसक्ती जागवतो आणि जेव्हा या दुःखद असतात तेव्हा द्वेष जागवतो. दोन्हीही मला दुःखी बनवतात. आणि आता पहा! मला याचे समाधान मिळाले आहे, जेव्हा मी संवेदनांच्या अनित्य स्वभावाला समजून तटस्थ राहतो, त्यांना साक्षीभावाने पाहतो, अर्थात प्रतिक्रिया करत नाही तेव्हा माझ्यात तृष्णा जागत नाही, न आसक्ती जागते न द्वेष जागतो. मनाचा जुना स्वभाव (बिहेवियर पॅटर्न) बदलू लागला आहे आणि मी दुःखचक्राच्या बाहेर पडत आहे.
बुद्धांच्या अनुसार हीच विद्या (विज्जा) आहे, हीच प्रज्ञा आहे. हिचे कोणत्याही दार्शनिक किंवा सांप्रदायिक विचारधारेशी काही देणेघेणे नाही. कुठे दूर-दूरही संबंध नाही. आपल्या सुखदुःखांशी संबंधित या सत्यतेला अष्टांगिक मार्गावर चालत, विपश्यना करत साधक स्वतः आपल्या आत मध्ये अनुभव करू शकतो. चार आर्यसत्य केवळ दार्शनिक सिद्धांत नाहीत. हे तर आपल्या बाबतीत वास्तविक यथार्थ आहेत ज्याला साधक आपल्या आतमध्ये अनुभव करू लागतो. आर्य सत्य वस्तुतः आर्य सत्य तेव्हाच होते जेव्हा कोणी आपल्या आतमध्ये अनुभव करताना आर्य बनू लागतो.
*_जेव्हा साधक संवेदनांबरोबर काम करतो तेव्हा तो मनाच्या गहनतेत काम करतो. साधक पाहतो मनात जेव्हा एखादा विचार उठतो, शरीरावर तत्काळ त्याच्या अनुरूप संवेदना होतात. हाच बुद्धांचा अत्यंत महत्त्वपूर्ण आविष्कार होता._*
_*बुद्धांचा दुसरा मोठा आविष्कार हा होता की आपण या संवेदनाप्रति आसक्ती आणि द्वेष उत्पन्न करतो.*_ बुद्धांच्या आधी, त्यांच्यावेळी किंवा त्यांच्यानंतरही दुसरे आचार्य या गोष्टीला जाणत नव्हते. ते लोकांना हाच सल्ला देत राहिले की सहा इंद्रियांच्या द्वारावर जे इन्द्रीय विषय आलंबनांच्या रूपात येतात त्यांच्या प्रति प्रतिक्रिया करू नका. अर्थात डोळे जेव्हा रूप पाहतील, नाक जेव्हा गंध घेईल आणि कान जेव्हा शब्द ऐकतील तेव्हा प्रतिक्रिया नाही केली पाहिजे. ते लोक शिकवीत होते की जेव्हा इन्द्रीय वस्तू भिन्न भिन्न इंद्रियांच्या संपर्कामध्ये येतात तेव्हा त्यांना चांगले अथवा वाईट मानून आसक्ती किंवा द्वेषाची प्रतिक्रिया करू नका. असे उपदेश अस्तित्वात होते. परंतु बुद्धाने सांगितले की वस्तुतः तुम्ही या आलंबनांच्या प्रति प्रतिक्रिया करत नाही आहात. त्यांनी काळा सांड तसेच पांढऱ्या सांडाचे उदाहरण देऊन समजावले की यापैकी एक प्रतीक आहे इन्द्रीय द्वाराचे आणि दुसरे इंद्रिय विषयांचे. दोन्हीही दोरीने बांधले आहेत. ना तर काळा सांड बंधन आहे आणि ना ही पांढरा सांड बंधन आहे, बंधन तर दोरी आहे. *_बुद्धांनी सांगितले की आसक्ती (तृष्णा) दोरी बंधन आहे आणि व्यक्ती संवेदनाप्रति प्रतिक्रिया करूनच आसक्तीला आणि द्वेषाला जन्म देते. हा सम्यक सम्बुद्धांचा मोठा शोध होता, महान अविष्कार होता. या शोधामुळेच ते सम्यक सम्बुद्ध झाले._*
दुसरे खूप जण होते जे म्हणत होते की इन्द्रीय वस्तूंच्या (आलंबनांच्या) प्रति प्रतिक्रिया केली नाही पाहिजे. परंतु तरीही ते 'बुद्ध' होऊ शकले नाहीत. काही आचार्य असे होते जे हे शिकवत होते की कोणी आसक्ती आणि द्वेष जागवला नाही पाहिजे. *_बुद्धांनी सांगितले की आसक्ती आणि द्वेष तोपर्यंत राहील जोपर्यंत मोह आहे. त्यामुळे त्यांनी मोहाच्या बाहेर पडण्याचा विधि शिकवला. मोह काय आहे? मोह अविज्जा (अविद्या) आहे._* आपण जाणत नाही की आत काय होत आहे. आपण लोभआसक्ती आणि द्वेषाच्या खऱ्या कारणांना जाणत नाही. आपण पृथकजन आहात, अज्ञानी आहात, अनभिज्ञ आहात. आपण याच्या बाहेर कसे येऊ शकाल ? समस्येच्या मुळावरती प्रहार करा आणि संवेदनाबरोबर काम करत दुःखाच्या बाहेर या. जोपर्यंत आपण संवेदना प्रति जागरूक नाही आहात तोपर्यंत आपणाला त्याची शुद्ध नाही. आपण बाह्य वस्तूंबरोबर भांडत राहता... या विचाराने की हे कुरूप आहे, हे कुरूप नाही. आपण केवळ वरवरच्या धरातलावर काम करत राहता. आपण विचार करता की काळा सांड बंधनाचे कारण आहे किंवा सफेद सांड बंधन आहे. बंधन तर आसक्ती आणि द्वेष आहेत, जे स्वतः संवेदनाप्रति प्रतिक्रिया करून उत्पन्न करतात. एक दारूडी व्यक्ती विचार करते की त्याला दारूची सवय आहे. परंतु वस्तुतः त्याला सवय लागली आहे, त्या संवेदनांची ज्या दारू पिताना तो अनुभवतो.
जेव्हा कोणी तटस्थभावाने संवेदनांना पाहतो, तेव्हा तो अज्ञानतेतून, बेहोशीतून बाहेर येऊ लागतो. संवेदनांच्या अनित्यतेचे ज्ञान जागवून प्रतिक्रिया न करता प्रज्ञा पुष्ट करतो. हा प्रकृतीचा नियम आहे. या सांवृतिक सत्याच्या स्वाभाविक क्रमाच्या मागे धर्म नियामतेचा नियम आहे. बुद्ध राहोत की न राहोत, धर्मनियामता तर असतेच. हा नियम शाश्वत आहे. ही एका महान वैज्ञानिकांची सुस्पष्ट उद्घोषणा आहे.
_*बुद्ध म्हणतात की.... मी प्रकृतीच्या या 'प्रतित्य-समुत्पाद' नियमाचा आपल्या आतमध्ये अनुभव घेतला आहे. स्वतः अनुभव घेऊन पूर्णपणे समजल्यानंतरच मी ही उद्घोषणा करीत आहे, याचा उपदेश करीत आहे, त्याला स्पष्ट करीत आहे, याला प्रतिष्ठापित करीत आहे, याला स्वतः पूर्णपणे समजल्यानंतरच मी दुसऱ्यांना सांगत आहे, म्हणत आहे. हे ठीक अशाप्रकारे आहे जसे- न्यूटन असो की नसो गुरुत्वाकर्षणाचा नियम सत्य आहे. न्यूटनने त्याचा आविष्कार करून पूर्ण जगाला सांगितले. तसेच गॅलिलिओ असो की नसो त्याचा हा आविष्कार की, पृथ्वी सूर्याभोवती चारी बाजूने फिरते, हे सत्यच राहते.*_
संवेदनांचा अनुभव जिथे होतो ते एक निर्णायक जंक्शन (संधिस्थान) आहे जेथून साधक एक दुसऱ्याच्या विपरीत जाणाऱ्या दोन रस्त्यांवर चालू शकतो. जर कोणी अज्ञानाने सुखद आणि दुःखद संवेदनाप्रति प्रतिक्रीया करत असतो तेव्हा तो आपल्या दुःखाला कित्येक पटींनी वाढवून घेतो आणि जेव्हा सुखद तसेच दुःखद संवेदनाप्रति तटस्थ रहायला शिकतो तेव्हा तो मनाच्या गहनतेमध्ये जाऊन आपल्या स्वभाव-शिकंज्याला बदलवू लागतो आणि दुःखाच्या बाहेर येऊ लागतो. *संवेदनाच मुळ आहेत, जड आहेत. जोपर्यंत मुळाची, जडाची उपेक्षा करत राहाल तोपर्यंत विषवृक्ष वाढतच राहील, जरी त्याच्या धडाला, फांद्यांना, पानांना कापले तरी. बुद्धाने सांगितले.... जसा एखादा वृक्ष ज्याची मुळे सहीसलामत असतील, तर कापल्यानंतर ही पुन्हा अंकुरित होऊन विकसित होऊ लागतो. त्याच प्रमाणे जोपर्यंत आतील आसक्ती समूळ नष्ट होत नाही तोपर्यंत दुःख वारंवार उत्पन्न होतच राहते. अशा प्रकारे या महान वैज्ञानिकाने हा आविष्कार केला की मानसिक विकारांपासून पूर्णपणे मुक्त होण्यासाठी मनाच्या मुळापर्यंत जाऊन काम करावे लागेल. प्रत्येक व्यक्तीला ही जड कापावीच लागेल, मुळाचा उच्छेद करावाच लागेल.*
चांगल्यासाठी समाजात सुधारणा होवो, यासाठी प्रत्येक व्यक्तीला सुधारावे लागेल. जेव्हा पूर्ण जंगलच सुकले असेल तर प्रत्येक वृक्षाचे परिपोषण करावे लागेल, त्याच्या मुळांना रोग मुक्त करावे लागेल आणि पाण्याने सिंचन करावे लागेल, तेव्हा पूर्ण जंगल हिरवेगार होईल, फुलून जाईल. त्याच प्रकारे समाजाला सुधारण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला शांत व्हावे लागेल. व्यक्तीच समाज सुधारणेची किल्ली आहे. आपण इच्छितो की पूर्ण विश्वात शांती व्हावी, तेव्हा त्यासाठी प्रत्येक देशाला आणि प्रत्येक समाजाला शांत व्हावे लागेल. इथे मी पुन्हा *_बुद्धांच्या एका महत्वपूर्ण उपदेशाचे उदाहरण देऊ इच्छितो जे त्यांनी लिच्छवीच्या वज्जी गणतंत्राला दिले होते. बुद्धांनी निम्नलिखित व्यावहारिक शिकवण दिली ज्यामुळे लिच्छवीयांना अपराजेय बनवले._*
१. *_जोपर्यंत ते लोक बैठक करत राहतील आणि ठरलेल्या वेळी भेटत राहतील, ते अजेय राहतील._*
२. *_जोपर्यंत ते लोक एकत्र होऊन भेटतील एकत्र होऊन उठतील आणि एकत्र राहून कर्तव्य-पालन करतील, तोपर्यंत अजेय राहतील._*
३. *_जोपर्यंत ते लोक चांगल्या प्रशासनाच्या प्राचीन नीतीचे आणि आपल्या न्याय-प्रणालींचे अतिक्रमण करणार नाहीत, ते अजेय राहतील._*
४. *_जोपर्यंत ते लोक वयस्कर व्यक्तींचा आदर-सन्मान करतील, त्यांच्यावर श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मान्य करतील, ते अजेय राहतील._*
५. *_जोपर्यंत ते लोक आपल्या स्त्रिया आणि मुलांचे रक्षण करतील, ते अजेय राहतील._*
६. *_जोपर्यंत ते आपल्या गणातंत्राच्या आतील आणि बाहेरील पूजास्थळांची तसेच पुजनियांची पूजा करतील, उपासना करतील आणि आर्थिक सहाय्यतेने त्यांचे रक्षण करतील ते अजेय राहतील._*
७. *_जोपर्यंत ते लोक अर्हतांचे चांगल्याप्रकारे रक्षण करतील, ते अजेय राहतील._*
त्याकाळी देखील खूप सारे संप्रदाय (पंथ) होते ज्यांची आप-आपली मंदिरे आणि पूजा स्थळे होती. हुशारी याच गोष्टींमध्ये आहे की त्या सर्वांना खूष आणि संतुष्ट ठेवले जावे. कुणालाही त्रास देऊ नये. त्रास दिल्यामुळेच लोक राष्ट्राचे (राज्य) शत्रू होण्यासाठी बाध्य होतात. त्यांच्या पूजा स्थळांना समुचित संरक्षण मिळाले पाहिजे. जोपर्यंत शासक सत्पुरुषांना संरक्षण देतील आणि त्यांचे पालन पोषण करतील, ते अजेय राहतील.
*_बुद्धांची ही विवेकपूर्ण शिकवण विश्वामध्ये शांती आणि सामंज्यस्य स्थापित करण्यासाठी आज पण तितकीच उपयोगी आहे. जर आम्हाला खरोखरच विश्वामध्ये शांती आणायची असेल तर धर्मासंबंधी समस्यांची उपेक्षा करून चालणार नाही._*
प्रत्येक सरकारचे हे कर्तव्य असते की त्याने बाहेरील आक्रमणापासून आपल्या लोकांचे रक्षण करावे. आपले क्षेत्र (राज्य) आणि लोकांच्या सुरक्षेसाठी शक्य तेवढे प्रयत्न करावे. असे करताना ही गोष्ट अवश्य लक्षात ठेवली पाहिजे की अशी कार्यवाही समस्यांचे स्थायी समाधान नाही. सर्वांप्रती सद्भाव आणि करुणा हेच विद्वेषाला मुळापासून दूर करण्यासाठी सक्षम आहे, जे कोणत्याही मताला मानणाऱ्या व्यक्तीद्वारे केले जाणाऱ्या कार्याच्या मुळांमध्ये सामावले गेले आहे. भारत तसेच अमेरिकेसहित विश्वातील विभिन्न जेलमध्ये होणाऱ्या विपश्यना शिबिरांमध्ये आम्ही पाहतो की लोकांमध्ये कसे बदल घडून येतात. आतंकवादाचे मुळ आतंकवाद्यांच्या मनामध्ये आहे. आम्ही लोकांनी हे पाहिले आहे की यातील काही कसे बदलले आहेत. त्यांच्यामध्ये अविश्वसनीय सुधारणा झाली आहे. क्रोध, भय, बदला घेण्याची भावना आणि घृणा द्रवीभूत होऊन विलीन झाली आहे आणि त्याचे स्थान शांती आणि करुणेने घेतले आहे.
सर्वप्रथम आम्ही जेलच्या काही अधिकाऱ्यांना विपश्यना शिकण्यासाठी सांगतो आणि त्यानंतरच तेथील कैद्यांसाठी शिबिर लावले जाते. त्याचा आश्चर्यकारक परिणाम होत आहे.
बुद्धांच्या शिक्षणामध्ये आम्हाला असा एक सेतू मिळतो जो विभिन्न मतांना आणि पंथाना जोडू शकतो. बुद्धांच्या शिक्षणातील तीन मौलिक भाग.... शील, समाधी आणि प्रज्ञा सर्व धर्मांचा आणि आध्यात्मिक पंथाचा सार आहे. शील, समाधी आणि प्रज्ञा सर्व धर्मांमध्ये सर्वनिष्ठ आहे. लाभप्रद जीवन जगण्यासाठी ज्या तीन मूलभूत बाबी आवश्यक आहेत त्यांच्याविषयी काही वाद होऊच शकत नाही. बुद्धांची शिकवण या तिन्हींच्या अभ्यासावर जोर देते, जेणे करुन जीवनात याचा उपयोग केला जाऊ शकेल. हे तर प्रत्येक धर्माचे हृदय आहे, मर्म आहे. या मर्माला महत्त्व न देता आपण बाहेरील सालांना महत्त्व देऊन भांडत राहतो. बाहेरील सालांसारखी कर्मकांड किंवा अनुष्ठान तर प्रत्येक धर्माची वेगवेगळी होऊच शकतात.
इतिहास साक्षी आहे की भगवान बुद्धांची ही सार्वजनीन तसेच असांप्रदायिक शिकवण जेव्हा कोणत्याही ठिकाणी किंवा कोणत्याही समुदायांमध्ये गेली तेव्हा तेथील स्थानिक संस्कृती आणि समुदायाशी हिचा कधी संघर्ष झाला नाही. उलट अशाप्रकारे मिसळून गेली जशी दुधात साखर, बुद्धांची शिकवण हळूहळू समाजाच्या अभिवृद्धीला तसेच त्याला मृदु आणि मधुर बनविण्यासाठी आत्मसात केली गेली. आपण सर्वजण जाणतो की आजच्या कडवटपणाने भरलेल्या जगाला शांती आणि सद्भावनेच्या मधुरतेची किती आवश्यकता आहे. सम्यक संबुद्धांची शिकवण जास्तीत जास्त लोकांच्या जीवनात शांती आणि सुख आणो आणि जगाच्या विभिन्न समाजाचे जास्तीत जास्त लोक सुखमय तसेच शांतीमय जीवन जगोत.... हीच मंगल कामना आहे.
*_भवतु सब्ब मंङ्गल ! सर्व प्राणी सुखी हो! सर्वांची स्वस्ति मुक्ती हो !_*
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_लेखक :- श्री सत्यनारायण गोयंका गुरुजी_*
_*बुद्धवर्ष २५६५, वैशाख पौर्णिमा (ऑनलाइन), २६ मे, २०२१, वर्ष ५, अंक २*_
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* ०१/०४/२०२५
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment