Monday, 31 March 2025

मृत्यू मंगल

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_मृत्यू मंगल_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/03/blog-post_31.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_विपश्यी साधकासाठी मृत्यू मंगलकारी आहे! अमंगल नाही. आल्हाददायक आहे! भयावह नाही. अभिनंदनीय आहे! तिरस्करणीय नाही!_

_जेव्हा समय पक्व होतो आणि आयू-संस्कार पूर्ण होतात तेव्हा शरीर-च्युति अवश्यम्भावी आहे. नियतीच्या या अतूट नियमाला कोणी टाळू शकत नाही._

_*परिपक्व साधक या अपरिहार्य मृत्यू क्षणांना हसत हसत स्वीकारतो. चित्त धारेवर तीळमात्रही भय रहात नाही, शोक होत नाही, तो घाबरून जात नाही. मृत्युसमयी जरी पीडा झाली तरी चित्त विचलित होत नाही. जसे अधिष्ठानमध्ये बसलेला साधक शारीरिक पीडा झाल्या तरी चित्त विचलीत होऊ देत नाही, तसेच जरी मृत्युसमयी पीडा झाली तरीही अविचल राहतो, सजग, सचेत राहतो. अनित्य बोधाची चेतना जागरुक असते. अशा चित्त क्षणांमध्ये जेव्हा च्युती होते म्हणजे, शरीर सुटते तेव्हा पुढील क्षणाची प्रतिसंधि म्हणजे पुढील जीवनाचे प्रथम चित्त निःसंदेह कोणत्याही सद्गतीच्या क्षेत्रामध्ये होते. दुर्गतीची किंचितही आशंका नाही.*_

_जो साधक जेव्हापासून विपश्यना मिळाली तेव्हापासून शेष जीवनापर्यंत विपश्यनेचा अभ्यासी राहतो, तोच सद्धर्माचा पथिक आहे. *'औपनेय्यिको' म्हणजे, एक-एक पावलाने पुढेच जाणार आहे.* मृत्यू त्याच्या प्रगतीला रोखू शकत नाही. मृत्यूमुळे चित्त धारेमध्ये धर्म चेतनेचा अवरोध होत नाही. प्रगती कायम राहते. निष्ठावान साधकासाठी धर्म साधनेचा 'ओपनेय्यिको' स्वभाव मृत्यूच्या क्षणी सहाय्यक म्हणून उपस्थित होतो. उन्नत भविष्य सुरक्षित होते. सद्गती सुनिश्चित होते._

_म्हणूनच खऱ्या साधकाला मृत्यूचे भय राहत नाही. तो ना जीवनाची घृणा करत मृत्यूची कामना करतो आणि ना जीवनात आसक्त होऊन मृत्यूला घाबरतो. पूर्णपणे विश्वस्त असतो की *मृत्यु पदोन्नती आहे, प्रमोशन आहे. तेव्हा तो प्रसन्नतेचा विषय आहे, शोकाचा नाही. विलापाचा नाही. विपश्यी साधक जीवन जगण्याची कला शिकतो.* जीवन जगण्याच्या कलेमध्येच मंगल मृत्यूची कला सामावली आहे. तरीही मरणासन्न विपश्यीच्या निकट जे अन्य साधक असतील त्यांनी त्याची मदत केली पाहिजे. साऱ्या वातावरणाला समतामयी धर्मचेतनेने परिप्लावित ठेवले पाहिजे. *जर कोणी अस्थिर चित्ताची आणि दुर्बल हृदयाची अश्रू वाहणारी व्यक्ती जवळ असेल तर तिला शीघ्रतेने बाजूला केले पाहिजे. कारण ती मरणासन्न व्यक्तीच्या महत्त्वपूर्ण चित्त-संततीला दूषित करण्याचे कारण बनू नये.*_

*_मरणासन्न व्यक्ती खूप पक्व नसेल तर त्याने आपल्या परिवारातील कोणा व्यक्तीला शोकाकुल पाहून स्वतः शोक ग्रस्त न व्हावे आणि आपला परलोक बिघडवू नये. सर्व उपस्थित साधकांनी त्यावेळी मरणासन्न व्यक्तीच्या आजूबाजूला बसून विपश्यना केली पाहिजे. अनित्यबोधिनी चेतनेच्या धर्म तरंगांचे प्रजनन करावे अथवा रोग्याप्रति मंगल मैत्री करावी. त्यावेळी सारे वातावरण धर्म चेतनेच्या विद्युत तरंगांनी ऊर्मिल राहिले पाहिजे._*

_*मृत्यूनंतर कोणीही रडू नये, विलाप करू नये, उलट मृताच्या सद्गतीवर चित्ताला प्रसन्न ठेवावे. त्याच्याप्रति मंगल मैत्रीचे प्रजनन करावे, त्याला आपले पुण्य वितरणच करावे. यामुळे मृत व्यक्ती जेथे कुठे जन्मली असेल, तिच्या चित्तधारेमध्ये धर्म चेतनेचा स्पर्श होतो आणि त्याच्या परिणामाने त्याची चित्त-चेतना प्रशांत, प्रसन्न, प्रफुल्ल राहते. शोक आणि विलाप केल्याने आपल्या चित्ताची दुःख-जन्य तरंगे आपल्या प्रिय मृत व्यक्तीच्या चित्तधारेला शोक संतप्त करतात. तिला व्याकुळ बनवून तिच्या सुख-शांतीचे हनन करतात. न स्वतः शोक-संकुल व्हावे आणि ना अन्य कोणाच्या शोकाचे कारण व्हावे. स्वतः प्रसन्नचित्त राहावे आणि अन्य कोणाच्या चित्त प्रसन्नतेचे कारण व्हावे. मंगल-मृत्यूचे हेच मंगल विधान आहे !*_

*_भवतु सब्ब मङ्गलं !_*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- श्री सत्यनारायण गोयंका गुरुजी_*

_'विपश्यना' वर्ष ९, अंक १२, ज्येष्ठपौर्णिमा, दि २९/०५/१९८० मधून साभार_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* ३१/०३/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...