✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_निर्वाण काय आहे?_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2025/03/blog-post_59.html
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
भगवानांनी याविषयी सांगितले-
_जेथे (निर्वाणिक स्थितीत) पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू थांबत नाहीत (ही अवस्था या महाभूतांच्या पलीकडील आहे) तेथे शुक्र ग्रहाचा प्रकाश नसतो आणि सूर्याचाही प्रकाश नसतो, तेथे चंद्रही उगवत नाही; पण तेथे अंधकारही नसतो. जेव्हा कोणी क्षीणास्त्रव भिक्षु या स्थितीचा स्वतः साक्षात्कार करतो तेव्हा तो रूप ब्रह्मलोक किंवा अरूप ब्रह्मलोकापासून (म्हणजे लौकिक क्षेत्राचा सर्वोच्च लोक) मुक्त होतो. म्हणजे त्यांचे अतिक्रमण करतो, त्याची सर्व सुख-दुःखापासून मुक्ती होते, म्हणजे त्याचे भवसंसरण समाप्त होते. जोपर्यंत भवसंसरण चालू राहते तोपर्यंत केव्हा सुख, केव्हा दुःख येतच राहते; पण त्या लोकोत्तर अवस्थेत लौकिक सुख नाही व लौकिक दुःखही नाही._
_एका शैक्ष्य भिक्षुने भगवानांना विचारले की काय खरोखर अशी अवस्था आहे की जेथे जन्म नाही व मृत्यही नाही? तेव्हा भगवानांनी सांगितले -_
*_अत्थि, भिक्खवे, अजातं अभूतं अकतं असङ्खतं,..._* *_(- उदान ७३)_*
_- भिक्षूनो, आहे! अवश्य आहे! जी अजात, अभूत, अकृत, असंस्कृत आहे. भिक्षूंनो, जर अजात, अभूत, अकृत आणि असंस्कृत नसते तर जे जात आहे, भूत आहे, कृत आहे, संस्कृत आहे त्याचे कधी अतिक्रमण करु शकलो नसतो, (विपश्यनेद्वारा) त्यापासून निस्सरण झाले नसते. हे भिक्षूनों, कारण ते अजात, अभूत, अकृत आणि असंस्कृत आहे. म्हणून जे जात आहे, भूत आहे, कृत आहे, संस्कृत आहे त्याचे अतिक्रमण केले जाऊ शकते. त्यापासून निस्सरण होऊ शकते. *त्या निस्सरण अवस्थेला स्वानुभूतीद्वारे जाणता येते. म्हणजे अनित्याच्या पलीकडील नित्यापर्यंत, मृत्यूच्या पलीकडील अमृत अवस्थेपर्यंत पोहोचणेच अंतिम लक्ष्य आहे.*_
*_कसे पोहोचणार?_*
*_अमृत निर्वाणापर्यंत पोहोचण्यासाठी भगवानांनी शील, समाधी, प्रज्ञेच्या आठ अंगाच्या आर्य मार्गावर चालण्याचा उपदेश दिला आहे._*
*_अमृताचा दरवाजा उघडला_*
_सम्यकसंबोधी बरोवर जे अमरत्व प्राप्त झाले ते वाटण्याचा निर्णय करीत असतांना भगवान बुद्धांनी ही घोषणा केली-_
*_अपारुता तेसं अमतस्स द्वारा।_* *_(- दीघनिकाय २.७१)_*
*_जो आपल्या अंधविश्वासाचा त्याग करुन श्रद्धापूर्वक ऐकण्यासाठी तयार आहे, त्याच्यासाठी अमृताचा दरवाजा उघडला._*
_ऐकेल तरच समजेल. समजले तरच अमृताकडे नेणाऱ्या मार्गावर चालेल. स्वतः मार्गावर चालेल तरच अमृताचा साक्षात्कार करु शकेल._
*_अमृत काय आहे?_*
_अमृत एक स्थिती आहे. जी *(निब्बान)* निर्वाण आहे, जी *(अक्खय)* अक्षय आहे, जी *(अक्खर)* अक्षर आहे, *(सिव)* शिव आहे, *(अच्युत)* अच्यूत आहे, अजर आहे, अचल आहे, *(धुव)* ध्रुव आहे, *(सस्सत)* शाश्वत आहे, *(अनुप्पाद)* अनुत्पाद आहे, *(अजाति)* अजन्मा आहे, *(अनिमित्त)* निरालंब आहे, *(अगति)* भव-संसरणाच्या गतीपासून मुक्त आहे, *(सन्तिपद्)* शांतीपद आहे, परमसुख आहे, विरज आहे, विमल आहे, अमल आहे, अविपरिणाम धर्मा आहे. निर्वाणासाठी न जाणो असे आणखी किती पर्यायी शब्द बुद्ध वाणीत वापरलेले आहेत, जे या अपरिवर्तनीय, कूटस्थ अवस्थेचे द्योतक आहेत._
ही अवस्था समजावत असतांना भगवानांनी सांगितले
_*रागक्खयो दोसक्खयो मोहक्खयो इदं वुच्चति अमतं... निब्बानं ॥*_ *_(- संयुत्तनिकाय २.४.३१५)_*
_जी रागक्षय, द्वेषक्षय आणि मोहक्षय अवस्था आहे तिला अमृत म्हणतात, निर्वाण म्हणतात._
*_छन्दरागविनोदनं निब्बानपदमच्युतं ।_* *_(- सुत्तनिपात १०९२)_*
_- आसक्तीच्या तृष्णेतून मुक्त होणे हे अच्युत निर्वाणपद आहे._
*_निक्खन्त वानतो'ति निब्बानं।_* *_(-मज्झिमनिकाय अट्ठकथा १.२८१)_*
_- तृष्णेतून बाहेर निघून जाणे निर्वाण आहे._
*_निब्बानं परमं वदन्ति बुद्धा ।_* *_(- दीघनिकाय २.९०)_*
_बुद्धांनी निर्वाणाला श्रेष्ठ (अवस्था) म्हटले आहे._
_बुद्ध वाणीत अनेकदा निर्वाणाच्या श्रेष्ठपणाचे वर्णन आहे. जसे-_
*_यो च वस्ससतं जीवे, अपस्सं अमतं पदं।_*
*_एकाहं जीवितं सेय्यो, पस्सतो अमतं पदं।_*
*_धम्मपद ११४_*
_अमृत पदाला (निर्वाणाला) न पाहणाऱ्याच्या शंभर वर्षाच्या जीवनापेक्षा अमृतपद पाहाणाऱ्याचे एक दिवसाचे जीवन श्रेयस्कर असते._
_याच नित्य, ध्रुव, शाश्वत अमृतपदाच्या प्राप्तीसाठी भगवानांनी जीवन'भर उपदेश दिले. केवळ त्यांनी उपदेशच दिले नाहीत; उपदेश देणारे तर आपल्या देशात अनेक झालेत पण या महापुरुषाने त्या उपदेशांचा सक्रिय अभ्यास करायला शिकविले. त्यासाठी उपयुक्त विधी सांगितली. हे अमृतपद कोणाच्या कृपेने, अनुकंपेने, आशीर्वादाने, वरदानाने प्राप्त होत नाही. उलट असे सांगितले की मुमुक्षुला स्वतः अप्रमादी राहून परिश्रम, पराक्रम, पुरुषार्थ करावा लागतो. त्यांनी हेच करणे शिकविले आणि म्हटले-_
_*तुम्हेहि किच्चमातप्पं, अक्खातारो तथागता।*_*_धम्मपद २७६_*
_- तप तर तुम्हालाच करावे लागेल, तथागत तर केवळ (मार्ग) आख्यात करतात._
_तेव्हा म्हणाले- *अप्पमादो अमतं पदं ।*_ *_(धम्मपद २१)_*
_प्रमाद न करणे अमृत (निर्वाण) पद आहे. म्हणजे प्रमादरहित होऊन आणि सतत सजग राहूनच अमृतपद प्राप्त करु शकतो. त्यासाठी त्यांनी मार्ग प्रशस्त केला. जसे वसंत ऋतूत वृक्ष-वेली फळाफुलांनी बहरून येतात-_
*_तथूपमे धम्मवरं अदेसयि, निब्बानगामि परमं हिताय। - खुद्दकपाठ ६.१३_*
_- त्याच प्रकारे (फळ देणारा) उत्तम धर्म शिकविला; जो परम हितकारी आहे, निर्वाणाकडे घेऊन जाणारा आहे._
*_सो धम्मं देसेति आदिकल्याण मज्झेकल्याण परियोसानकल्याण ..। - दीघनिकाय १.१९०_*
_असा धर्म शिकविला जो सुरुवातीला कल्याणकारी आहे. मध्ये कल्याणकारी आहे आणि शेवटीही कल्याणकारी आहे._
*_आदिम्हि सीलं दस्सेय, मज्झे मग्गं विभावये। परियोसानम्हि निब्बानं...। -दीघनिकाय अट्ठकथा १.१९०_*
_- सुरुवातीला शील धारण कसे करावे ते शिकविले. मध्ये मार्गावर कसे चालावे ते शिकविले आणि शेवटी निर्वाणापर्यंत कसे पोहोचावे हे शिकविले._
_भगवानांनी जे-जे शिकविले ते सर्व कल्याणकारीच आहेत. सर्वांचे एकच उद्दिष्ट हेच आहे की साधक विपरिणामधर्मी अनित्यच्या बंधनातून मुक्त होऊन नित्य, शाश्वत, ध्रुव, अपरिणामी सत्याचा स्वतः साक्षात्कार करो._
_*विमुत्तिसारा सब्बे धम्मा* भगवानांनी शिकविलेले सर्व धर्म विमुक्तीसाठीच आहेत आणि ते सर्व सार रूपात आहेत._
_*अमतोगधा सब्बे धम्मा-* सर्व धर्म अमृतात डुबकी मारण्यासाठी आहे._
_*निब्बानपरियोसाना सब्बे धम्मा* सर्व धर्म शेवटी निर्वाणासाठी आहेत._ *अङ्गुत्तरनिकाय ३.१०.५८*
_मार्गाचे शेवटचे पोहोचण्याचे ठिकाण निर्वाण आहे._
*_ते यन्ति अच्युतं ठानं, यत्थ गन्त्वा न सोचरे। - धम्मपद २२५_*
_ते त्या पतन-रहित अच्युत (शाश्वत) स्थानाला (निर्वाण) प्राप्त करतात तेथे पोहोचल्यावर शोक असत नाही._
_मार्गाचे अंतिम लक्ष्य म्हणजे हीच अवस्था आहे की ती-_
*_अजरं अमरं खेमं, परियेसिस्सामि निब्बुतिं । - बुद्धवंस अट्ठकथा ७, सुमेधपत्थनाकथावण्णना_*
_अजर आहे, अमर आहे, क्षेमपूर्ण आहे, निर्वाणापर्यंत घेऊन जाणारी आहे. जिच्या शोधात आहे ती हीच अवस्था आहे. तिचा साक्षात्कार झाल्यावर-_
*_न च ते पुनमुपेन्ति गब्भसेय्यं, परिनिब्बानगता हि सीतिभूता। - विमानवत्यु ९०९_*
_ते सीतलीभूत परिनिर्वाण प्राप्त झाल्यानंतर *"पुनरपि जननी जठरे शयनम् "* च्या भयंकर दुःखात पडत नाही._
*_त्यासाठी भगवानांनी कोणाची प्रार्थना करणे शिकविले नाही तर आर्य अष्टांगिक मार्गावर चालायला शिकविले._*
*_अट्ठङ्गिको च मग्गानं, खेमं अमतगामिनन्ति। -मज्झिमनिकाय २.२१५-१६_*
_अष्टांगिक मार्ग क्षेमपूर्ण अमृत अवस्थेपर्यंत घेऊन जातो._
_हाच *अमतोगंध मग्ग-* अमृतात डुबकी लावणारा मार्ग आहे._
_हाच *निब्बानगामिनी पटिपदा* निर्वाणाकडे नेणारा मार्ग आहे._
_म्हणून सतिपट्टानची विपश्यना साधना शिकवित असतांना सांगितले की ही विद्या-_
_*सत्तानं विसुद्धिया-* लोकांच्या विशुद्धीसाठी, विमुक्तीसाठी आहे._
_*सोकपरिदेवानं समतिक्कमाय* दुःख आणि संताप यांचे चांगल्याप्रकारे अतिक्रमण करण्यासाठी आहे._
_*दुक्खदोमस्सानं अत्थङ्गमाय-* दुःख आणि दुर्भावना मावळण्यासाठी आहे._
_*आयस्य अधिगमाय-* श्रेष्ठ ज्ञानाच्या प्राप्तीसाठी आहे._
_*निब्बानस्स सच्छिकिरियाय* निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी आहे._ *दीघनिकाय, २.४०५*
परंतु त्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात.
*_ते झायिनो साततिका, निच्चं दळ्हपरक्कमा ।_*
_- ते जे सतत ध्यान करणारे आहेत. नित्य दृढ पराक्रम करणारे आहेत._
*_फुसन्ति धीरा निब्बानं, योगक्खेमं अनुत्तरं। -धम्मपद २३_*
_- ते धीरोदात्त पुरुष उत्कृष्ट योगक्षेम असलेले निर्वाण प्राप्त करतात._
_*बुद्धांचा उपदेश कोणत्या वाद-विवादी दार्शनिक मान्यतेच्या तर्क-वितर्कासाठी नाही.* कोणाला नीच लेखून स्वतःला उच्च दाखवण्यासाठी नाही. ती पूर्णपणे भव विमुक्त झालेल्या महाकारुणिकाची स्वानुभूतीजन्य अमृतवाणी आहे. त्या करुणानिधीची हीच करूण इच्छा होती की भव-संसरणाने होरपळलेला मानव ही लोकहितकारिणी विद्या शिकून आणि त्यात परिपक्व होऊन नित्य शाश्वत, ध्रुव, अमर, अचल, अटल निर्वाणाचा साक्षात्कार करून "पुनरपि जननम् पुनरपि मरणम्, पुनरपि जननी जठरे शयनम्" च्या दुःखद संसार-संसरणातून मुक्त होवो. जो त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालतो *तो न हि जातुगब्भसेय्यं पुनरेति* पुन्हा-पुन्हा गर्भात पडण्याच्या दुःखातून पूर्णपणे मुक्त होतो. *- खुद्दकपाठ ९.१०*
_बुद्धांनी उपदेश केलेल्या या सक्रिय व्यावहारिक विद्येचा लाभ घेऊन त्यांच्या जीवनकाळातच अनेक लोक भव-मुक्त झाले. त्या हजारोंपैकी काहींचे उद्गार पाहा-_
*_अज्झगा अमतं सन्ति, निब्बानं पदमच्युतं ।_"
_मला अमृताची शांती आणि निर्वाणाच्या अच्युतपदाची प्राप्ती झाली._
*_धम्मोसधं पिवित्वान, विसं सब्बे समूहनिं।_*
_धर्माचे औषध सेवन करुन सर्व (सांसारिक) विषाला दूर केले._
*_अजरामर सीतिभावं, निब्बानं फस्सयिं अहं।_* *_- अपदान १.२०६, ४९५, १२_*
_- त्या अजर, अमर शीतल निर्वाणाला मी प्राप्त केले._
*_येन ञाणेन पत्तोसि, अच्चुतं अमतं पदं।_* *_- विमानवत्थु ८६०_*
_- त्या ज्ञानाने मी अच्युतपद प्राप्त केले._
_*पत्ता ते अचलट्ठानं* मला अचल स्थान (निर्वाण) प्राप्त झाले._
*_कतन्तं पच्चवेक्खन्ता, इममत्थमभासिसुं।_* *_थेरगाथा निदानगाथा_*
_- त्याचा साक्षात्कार करीत असतांना हे सत्य प्रकट केले जात आहे. जो कोणी या मुक्तीमार्गावर चालतो तो -_
*_संयोजनानि पहाय सच्छिकरिस्सति । -अङ्गुत्तरनिकाय २.६.६८_*
_संयोजनांचे बंधन नष्ट करुन (निर्वाण) चा साक्षात्कार करुन घेतो._
_मुक्तीच्या या मार्गावर जे भूतकाळात चालले, जे आज चालत आहेत आणि जे भविष्यात चालतील त्यांना अशीच प्राप्ती झाली आणि होईल. कारण -_
_*निब्बानभावं न जहतीति* निर्वाण आपला निर्वाणभाव सोडत नाही._
काय आहे निर्वाणाचा सहज निर्वाणभाव?
*_निब्बानं निच्चं धुवं सस्सतं अविपरिणामधम्मन्ति । - कथावत्थु २८६_*
_निर्वाण नित्य आहे, ध्रुव आहे, शाश्वत आहे, अविपरिणाम धर्मा आहे._
_भगवान बुद्धांच्या वाणीत निर्वाणाची चर्चा भरपूर आहे. निर्वाणापर्यंत पोहोचण्याच्या मार्गाचा आणि निर्वाणापर्यंत पोहोचलेल्या मुमुक्षेच्या अनुभूतीची चर्चासुद्धा भरपूर आहे. आजसुद्धा या विद्येचे लाभ स्पष्ट आहेत. जो जेवढा जेवढा पुरुषार्थ करतो तेवढा-तेवढा तो अंतिम उद्दिष्टाच्या म्हणजे निर्वाणाच्या जवळ पोहोचतो._
_*दुर्भाग्याने भगवानांच्या मूळ वाणीचे विपुल साहित्य आणि त्यांच्या कल्याणाचा मार्ग दाखविणारी विपश्यना विद्या दोन्हीही या देशातून पूर्णपणे विलुप्त झाले.* नाही तर विवेकानंदजीसारख्या उच्च कोटीच्या आणि बुद्धिमान संताला जर हे उपलब्ध झाले असते तर ते काय म्हणू शकले असते की चार्वाकवादीप्रमाणे बुद्धांच्या उपदेशातसुद्धा अपरिवर्तनशील काहीही नाही. नित्य, शाश्वत, ध्रुव काहीही नाही? किंवा दाक्षिणात्य बौद्धाजवळ अपरिवर्तनशील काहीही नाही? उलट त्या देशात प्रत्येक बुद्धानुयायी अपरिवर्तनशील निर्वाणाला जीवनाचे अंतिम उद्दिष्ट समजतो. (आत्मकथन भाग दोन मधून साभार)_
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_लेखक :- श्री सत्यनारायण गोयंका गुरुजी_*
_बुद्धवर्ष २५६३, भाद्रपद पौर्णिमा, १४ सप्टेंबर, २०१९, वर्ष ३, अंक ६_
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* २४/०३/२०२५
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment