Sunday, 23 March 2025

काय आहे बुद्धांची शिकवण - भाग ५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_काय आहे बुद्धांची शिकवण_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/03/blog-post_23.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लोकधातू आणि धर्मधातू_*

_बुद्धांच्या उपदेशात आम्ही लोकधातू आणि धर्मधातूमध्ये फरक मानतो. *धातूचा अर्थ आहे स्वभाव तत्व किंवा स्वभाव शक्ती. म्हणून लोकधातूचा अर्थ झाला 'भौतिक जगात व्याप्त प्राकृतिक तत्व किंवा प्राकृतिक शक्ती. आणि धर्मधातूचा अर्थ झाला चित्त, चित्तवृती आणि प्रकृतीची सूक्ष्म मौलिक तत्व, जी भौतिक जगाऐवजी मानसिक जगाशी संबंधित आहेत.* आधुनिक विज्ञान लोकधातुपर्यंतच मर्यादित आहे. लोकधातू मनोजगताच्या धर्मधातूचा आधारस्तंभ आहे. बस, लोकधातूच्या वर एक पाऊल चढलो की मनोजगात पोहोचलो. परंतु आधुनिक विज्ञानाच्या ज्ञानाने नाही, तर धर्माच्या व्यावहारिक ज्ञानाद्वारेच असे होऊ शकते._

_*"परिपक्व चित्त" नावाच्या पुस्तकाचे लेखक श्री. एच. ए. ओवरस्ट्रीट (प्रकाशक डब्लू. डब्लू. नोर्टन एंड कं. इंक... न्यूयार्क) परिपक्व चित्त असणाऱ्या मानवाच्या उज्वल भविष्याप्रती खूप आस्थावान दिसतात.* ते म्हणतात-_

_"आमच्या शताब्दीचे विशिष्ट ज्ञान मनोवैज्ञानिक आहे. भौतिक आणि रसायन शास्त्रात आम्ही जी काही प्रगती केली ती मुख्यतः संशोधनाच्या नवनवीन पद्धतींच्या प्रयोगाद्वारेच केली. परंतु आमच्या ह्या युगात मानवी स्वभाव आणि अनुभूतींप्रती जो (आध्यात्मिक) दृष्टीकोन उत्पन्न झाला तो पूर्णपणे नवीन आहे."_

_परंतु हा दृष्टीकोन या पूर्वी उत्पन्न होऊच शकला नसता. हा उत्पन्न होण्यापूर्वी खूप लांब काळापर्यंतची तयारी आवश्यक होती. प्रथम शरीरविज्ञान प्रगत होणे आवश्यक होते कारण मनोवैज्ञानिक मनुष्य शरीर वैज्ञानिक सुद्धा तर आहे. त्याचे चित्त निरनिराळ्या वस्तूंबरोबर असा एक भौतिक पदार्थसुद्धा आहे की, ज्यामध्ये ज्ञानतंतू, स्नायू-नाडी, ग्रंथी तसेच स्पर्श, गंध आणि दृष्टीसंबंधीची ज्ञानेंद्रिये सामील आहेत. *सत्तर वर्षापूर्वी प्रसिद्ध शरीर शास्त्रज्ञ विलियम बुड्ट ने आपल्या प्रयोग शाळेत मनोवैज्ञानिक शरीर शास्त्राच्या संशोधनास सुरुवात केली होती. या पूर्वी हे शक्यच नव्हते कारण तो पर्यंत शरीर-विज्ञानच पर्याप्त प्रमाणात प्रगत झालेले नव्हते आणि शरीर विज्ञानापूर्वी जीव-विज्ञान परिपक्व होणे आवश्यक होते.* कारण मेंदू, नाड्या, स्नायू, ग्रंथी आणि बाकी सर्व जीव कोषाच्या विकासावर अवलंबून असतात. म्हणून एक समर्थ शरीर-विज्ञान प्रकट होण्यापूर्वी जीव-कोष विज्ञानाचे परिपक्व होणे आवश्यक होते."_

_"परंतू जीव-विज्ञानापूर्वी रसायन शास्त्र आणि रसायनशास्त्रापूर्वी भौतिकशास्त्र आणि भौतिकशास्त्रापूर्वी गणितशास्त्र पाहिजे होते. अशा प्रकारच्या तयारींचे हे दीर्घ तारतम्य गेल्या काही शतकापासून चालत आले आहे."_

_*"थोडक्यात आम्ही सांगू शकतो की विज्ञानालासुद्धा कालक्रम आहे. प्रत्येक विज्ञानाला जो पर्यंत त्याची वेळ येत नाही तो पर्यंत प्रतीक्षा करावी लागते. आज मनोविज्ञानाची वेळ आली आहे. ह्या दिशेत एका नव्या ज्ञानाची सुरुवात होत आहे."*_

_"वास्तविकतः ह्या नवीन विज्ञानाप्रती लोकांची आवड खूप जुनी आहे. परंतु ह्या क्षेत्रात संशोधनाची सूक्ष्म यथार्तता नवीनच आहे. न्याय-तर्काचा एक कठोर नियम याचे नियंत्रण करतो. आपल्या विशिष्ट यथार्ततेसाठी (बिनचुकपणासाठी) प्रत्येक विज्ञानाला तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागते जोपर्यंत त्याच्या आधीचे ती सगळी तथ्य आणि उपकरण त्याला देत नाही ज्यामुळे ही यथार्तता बनते. आज विज्ञानाच्या ह्या काळात एक नवी घंटा वाजविली आहे. एक नवी अंतदृष्टी आमच्या सेवेसाठी हजर झाली आहे."_

_*मी हे सांगू इच्छितो की मानवी स्वभावाचे जे सत्य आहे त्याच्या संशोधनासाठी जी नवीन अंतदृष्टी पाहिजे तिला प्राप्त करण्यासाठी आम्हां सगळ्यांना बुद्ध-शिकवणुकीचा अभ्यास करायला पाहिजे. जितके मानसिक विकार मानवाला प्रभावित करतात त्या सगळ्यापासून सुटका मिळविण्याचा उपाय बुद्ध शिकवणुकीत विद्यमान आहे.* विश्वाच्या वर्तमान स्थितीचे उत्तरदायित्व भूत आणि वर्तमानाच्या अकुशल मनोवृत्तीवरच आहे. जवळ जवळ दोन वर्षापूर्वी बर्मावर जेव्हा मोठे संकट आले होते तेव्हा लोकांनी बुद्ध उपदेशाप्रती दृढ आस्था उत्पन्न केली होती. म्हणूनच आम्ही ती संकटग्रस्थ स्थिती पार करु शकलो होतो._

_आजकाल जिकडे पाहावे तिकडे असंतोष पसरलेला दृष्टीस पडतो. असंतोषामुळे दुर्भावना उत्पन्न होते. दुर्भावनेमुळे घृणा उत्पन्न होते, घृणेमुळे शत्रूत्व उत्पन्न उत्पन्न होते, शत्रूत्वामुळे युद्ध उत्पन्न होते, युद्धामुळे शत्रु उत्पन्न होतात. शत्रूंमुळे पुन्हा युद्ध उत्पन्न होते आणि युद्धापासून पुन्हा शत्रु. अशा प्रकारे जग दुष्टतेच्या दुष्चक्रात फसते. असे का होते? *कारण मानव आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही.*_

_शेवटी मानव काय आहे? मानवी मनोवृत्तींचे केवळ अभिव्यक्तीकरणच आहे. अशा प्रकारे पदार्थ काय आहे? पदार्थसुद्धा मनोवृत्तींचे केवळ शरीरीकरण आहे. धनात्मक (कुशल) आणि ऋणात्मक (अकुशल) शक्तींच्या प्रतिक्रियांचा परिणाम आहे. भगवानांनी सांगितले *"चित्तेन नीयति लोको" संसार चित्ताचीच उत्पत्ती आहे म्हणून चित्तच प्रधान आहे.* सर्वात प्रमुख आहे. म्हणून आम्हाला चित्त आणि त्याच्या विशिष्ट वैशिष्ट्यांचा अभ्यास करायला पाहिजे, ज्यामुळे आम्ही विश्वाच्या समस्यांचे योग्य समाधान शोधू शकू._

_*बुद्ध शिकवणुकीत व्यावहारिक प्रयोगात्मक संशोधनासाठी खूप मोठे क्षेत्र आहे.* ज्यांना आमच्या अनुभवांचा लाभ घ्यायचा आहे, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करु._

_आदरणीय महिलांनो आणि सज्जनांनो मी ह्या गोष्टीचा प्रयत्न केला आहे की आपल्याला बुद्ध शिकवणुकीतील सगळी वैशिष्ट्ये सांगावी जी मला ज्ञात आहेत. आपण माझ्या व्याख्यानाला हजर राहून रुची दाखविली यासाठी मी आपले आभार मानतो. मला येथे व्याख्यान देण्याची परवानगी दिली म्हणून गिरजाघरच्या पादरींना पुन्हा एकदा धन्यवाद देतो._

*_सब्बे सत्ता सुखी होन्तु!।_*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- सयाजी ऊ बा खिन_*

_बुद्धवर्ष २५६२, ज्येष्ठ पौर्णिमा, २४ जून, २०१८, वर्ष २, अंक ३_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २३/०३/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...