✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_बुद्धांचे उपदेश काय आहेत?_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2025/03/blog-post_17.html
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
_*दुसरे आर्य सत्य- दुःखाचा समुदय काय आहे? भगवानांनी सांगितले की दुःखाचा उदय होण्याचे कारण तृष्णा आणि तीव्र लालसा आहे.* एकदा कामनेचे बी पडले की ते लोभ आणि आसक्ती बनून उगवते. ते तृष्णा आणि लालसेच्या रुपात फुलु-फळू लागते. *तृष्णा धन संपत्तीची असो किंवा अधिकारांची. ज्यामध्ये हे बी पेरले गेले तो बिचारा तृष्णेचा गुलाम झालाच आणि जीवनभर तन-मनाने तिच्या इशाऱ्यावर नाचत राहिला.* परिणाम असा झाला की अंतर्मनात असलेल्या लोभ आणि द्वेषाच्या प्रेरणेने मन, वचन आणि कर्माद्वारा अकुशल वृत्तींची-पाप संस्कारांची-सदैव निर्मिती आणि संकलन करीत राहिला._
_दार्शनिक दृष्टीकोनातून पाहिले तर हेच दिसते की कर्म संस्कार वेळ येते तेव्हा त्या व्यक्तीवर आपली प्रतिक्रिया प्रकट करतात ज्याच्यामुळे त्यांची उत्पत्ती झालेली आहे. ह्याच कर्म संस्कारांमुळे नाम आणि रुपाची संयुक्त धारा वाहू लागते जी आंतरीक दुःखाची जन्मदात्री आहे._
*_दुःख-निरोध-गामिनी-प्रतिपदा (मार्ग)_*
_या, पाहू या, तो कोणता मार्ग आहे जो दुःखाचा निरोध करतो- हा तोच आर्य अष्टांगिक मार्ग आहे ज्याला भगवानांनी आपल्या पहिल्याच प्रवचनात सांगितले होते. ह्या आर्य अष्टांगिक मार्गाचे तीन स्कंध आहेत._
*_(अ) शील स्कंधः_*
(१) सम्मा वाचा, (२) सम्मा कम्मन्ता, (३) सम्मा आजीवा.
*_(आ) समाधि स्कंधः_*
(४) सम्मा वायामो, (५) सम्मा सति, (६) सम्मा समाधि.
*_(इ) प्रज्ञा स्कंध:_*
(७) सम्मा सङ्कप्पो, (८) सम्मा दिद्वि.
(अ) शील स्कंधाची तीन अंग आहेत.
_*(१) सम्मा वाचाः* सम्यक वाणी अशी वाणी बोलावी जी सत्य आहे, कल्याणकारी आहे. ती कटू नसावी, कठोर नसावी, कपटयुक्त नसावी, द्वेष युक्त नसावी._
_*(२) सम्मा कुम्मन्ताः* सम्यक् कर्मात सदाचाराच्या मूळ आधारानुसार नैतिक जीवनाचे पालन करणे, हिंसा, चोरी, व्याभिचार आणि मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे._
_*(३) सम्मा आजीवोः* सम्यक आजीविका उपजीविकेचे असे साधन स्वीकारावे की जे अन्य प्राण्यांना दुःखाचे कारण होणार नाही. गुलामांचा व्यापार, अस्त्र-शस्त्र निर्माण, मादक पदार्थाचा व्यापार इत्यादी इत्यादी पासून दूर राहणे._
_*ही आहे भगवानांची आचारसहिंता जी त्यांनी आपल्या पहिल्या उपदेशात प्रज्ञापित केली होती.* या नंतर यात वाढ केली. भिक्षु संघ तसेच गृहस्थ श्रावकांसाठी वेगवेगळी आचारसहिंता निर्धारित केली. भिक्षेच्या आचारसहिंतेवर येथे काही सांगणे मला आवश्यक वाटत नाही. आपण महानुभावांना गृहस्थांची सदाचार सहिंता अवश्य सांगण्याची इच्छा आहे. त्याला पंचशील म्हणतात -_
_*१) पाणातिपातः* प्राणी हिंसेपासून दूर राहण्याचा उपदेश. (ह्या शील विधानात सर्व प्राण्यांप्रती भगवान बुद्धांची अमर्यादित करुणा प्रकट होते)_
_*२) अदिन्नादानः* न दिलेली वस्तू घेण्यापासून दूर राहणे. (हे चोरी न करणे, आवश्यकतेपेक्षा अधिक न घेणे आणि अयोग्य संग्रह वृत्तीवर नियंत्रण आहे._
_*३) कामेसुमिच्छाचारः* काम संबंधी मिथ्याचरण (व्याभिचार) पासून दुर राहण्याचा उपदेश. (काम वासना मनुष्यात व्यापक आहे. याचा नितांत निरोध करणे प्रत्येकाला कठीण आहे म्हणून केवळ व्याभिचारापासून दूर राहण्याचे शील विधान आहे.)_
_*४) मुसावादः* खोटे बोलण्यापासून दूर राहण्याचा उपदेश (ह्या शील विधानात वाणीद्वारा सत्याची प्रतिष्ठा स्थापित केलेली आहे.)_
_*५) सुरामेरय्य:* मादक पदार्थ इत्यादी प्रमादकारी पदार्थाच्या सेवनापासून दूर राहण्याचा उपदेश. (नशेच्या सेवनाने मनुष्य आपल्या मनाची दृढता आणि विवेकबुद्धि हरवून बसतो. परमार्थ सत्याच्या साक्षात्कारासाठी ह्यापासून दूर राहणे अनिवार्य आहे.)_
_आम्ही पाहतो की उपरोक्त पंचशील समस्त कायिक आणि वाचिक कर्मांवर नियंत्रण राखण्यासाठी आहेत आणि हे समाधिसाठी मनाला पूर्णपणे एकाग्र करण्यासाठी नितांत आवश्यक आधार आहेत._
_*(आ) समाधी स्कंधः*_
_सज्जनांनो आणि सन्माननीय महिलांनो! आता आपण बुद्ध शिकवणुकीच्या मानसिक बाजूवर विचार करु. विश्वास आहे की है आपल्याला निश्चितच आवडेल. आर्य अष्टांगिक मार्गाच्या दुसऱ्या स्कंधात म्हणजे समाधीस्कंधात ह्या तिघांचा समावेश आहे._
_*१) सम्मा वाायामो सम्यक व्यायाम.*_
_*२) सम्मा सति सम्यक स्मृती.*_
_*३) सम्मा समाधि - सम्यक समाधी*_
_सम्यक स्मृतीसाठी म्हणजे एकाच गोष्टीचे वारंवार ध्यान करु शकण्यासाठी सम्यक व्यायाम म्हणजे चांगल्याप्रकारे प्रयत्न केला जाणे आवश्यक आहे. दृढतापूर्वक प्रयत्न केल्याविना कोणीही आपले अस्थिर मन स्थिर करुन विचारांच्या परिघाला संकुचित करु शकत नाही. याच्याविना सम्यक समाधी म्हणजे चित्ताची सूक्ष्म एकाग्रता आणि त्याचे सम्यक संतुलन असाध्य आहे. सम्यक समाधीच्या स्थितीत चित्त सगळ्या नीवरणांपासून - काम छंद इत्यादी अडथळ्यांसारख्या विघ्नबाधांपासून मुक्त होते. परम परिशुद्ध होते आणि प्रशांत ज्योतीने आत आणि बाहेरही चमकू लागते. ह्या अवस्थेत चित्त अत्यंत शक्तीशाली आणि उज्ज्वल होते. आतील उज्ज्वल मन बाहेर प्रतिबिंबित होते. ह्या प्रतिबिंबित प्रकाशाचे प्रमाण ताऱ्यापासून सूर्यापर्यंतच्या प्रकाशाइतके असू शकते. नितांत अंधारात अंतर्चक्षुसमोर जी ज्योत प्रकट होते ती दुसरी काहीही नाही, तर ती चित्ताची परिशुद्धता, प्रशांती आणि पवित्नतेची अभिव्यक्ती आहे._
_बाहेर दिसणारी ही ज्योती आतील परिशुद्ध चित्ताचेच प्रतिबिंब आहे आणि विशुद्ध चित्तच धार्मिक जीवनाचे सार स्वरुप आहे. मग तो बुद्धानुयायी असो, हिंदू असो, ख्रिस्ती असो किंवा मुसलमान असो. मनाची पवित्रता सर्व धर्मात समानरुपाने अपेक्षित आहे. मानवा-मानवामधील पारस्परिक एक्तेसाठी प्रेमाच्या सर्वोच्च अवस्थेची नितांत आवश्यकता आहे आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा मन परम पवित्रता आणि इंद्रियातीत परिशद्धीने परिपूर्ण होईल. इतरांच्या असंतुलित मनाला संतुलित करण्यासाठी प्रथम आपले मन संतुलित असले पाहिजे. भगवानांनी सांगितले आहे._
*_"फन्दनं चपलं चित्तं, दुरक्खं दुन्निवारयं ।_*
*_उजुं करोति मेधावि, उसुकारोव तेजनं ॥"_*
*_ह्या चंचल, चपल, सांभाळण्यास अवघड आणि नियंत्रणात ठेवण्यास कठीण असणाऱ्या चित्ताला प्रज्ञावंत व्यक्ती त्या प्रकारे सरळ करते जसा बाण बनविणारा बाणाला._*
_शारीरिक अभ्यासाप्रमाणेच मानसिक अभ्यासाची सुद्धा आवश्यकता आहे. या! मग कां न अभ्यासाद्वारे, साधने द्वारे मनाला दृढ आणि पवित्र करु नये की ज्यामुळे आंतरिक ध्यानिक शांतीचा आनंद प्राप्त करु शकू._
*_जशी जशी आंतरिक शांती मनात सामावली जाईल तसा तसा सत्याचा साक्षात्कार जवळ जवळ येत जाईल._*
_आपल्याला वाटले तर माना किंवा मानू नका परंतु आमचा अनुभव असे सांगतो की जर सद्गुरूंचा संयोग झाला तर प्रत्येक व्यक्ती आंतरिक शांती आणि ज्योतिसोबत चित्तविशुद्धी प्राप्त करु शकते. भलेही ती कोणत्याही धर्म सिद्धांताला मानणारी असो. परंतु, हो, उद्योग खऱ्या मनापासून आवश्यक आहे आणि साधना शिकण्याच्या काळापर्यंत गुरुप्रती संपूर्ण आत्म समर्पणसुद्धा आवश्यक आहे._
_निरंतर अभ्यासाद्वारे साधक आपल्या मनावर पूर्ण अधिकार प्राप्त करुन निर्विकल्प ध्यानिक स्थिती (अर्पणा समाधी) त प्रवेश करु शकतो. तो हळूहळू सर्व ध्यान समापत्ति प्राप्त करुन विभिन्न सिद्धी अधिकृत करतो, जसे की महाराज शुद्धोदनांचे गुरु ऋषि कालदेवलने केल्या होत्या. परंतू ही साधना संन्यासावस्थेमध्ये, गृहस्थांपासून दूर राहून कठोर तपश्चर्येद्वारेच शक्य आहे. जो पर्यंत मनात लेशमात्र वासना आहे तो पर्यंत हा मार्ग स्वीकारणे सुरक्षित नाही. *परंतु अशा लौकिक चमत्कारिक सिद्धीदानी साधनेला भगवानांनी केव्हाही प्रोत्साहन दिले नाही. त्यांच्या मार्गात समाधीच्या साधनेचा उद्देश्य आहे चित्ताची परम विशुद्धी आणि मानसिक शक्तींची उपलब्धी ज्यांच्या बळावर परमार्थ सत्या (निर्वाण) चा साक्षात्कार करता येईल.*_
_*आमच्या येथे बुद्धांच्या उपदेशात समाधी भावनेच्या चाळीस पद्धती आहेत, ज्यामध्ये आनापान पद्धतीच प्रमुख आहे, आनापान म्हणजे स्वाभाविक आश्वास-प्रश्वासावर ध्यान लावणे. सर्व बुद्धांनी स्वतः सुद्धा यालाच स्वीकारले होते.*_
*_(इ) प्रज्ञा स्कंधः_*
_आर्य अष्टांगिक मार्गाचा हा तीसरा स्कंध आहे. याला प्रज्ञा स्कंध म्हणतात. प्रज्ञा स्कंधाचे दोन विभाग आहेत._
*_१) सम्मा संङ्कप्पो - सम्यक संकल्प_*
*_२) सम्मा दिद्वि- सम्यक दृष्टी_*
_परमार्थ सत्याप्रती सम्यक दृष्टी प्राप्त करणेच बुद्धांच्या उपदेशांचे अंतिम लक्ष्य आहे आणि सम्यक संकल्पाद्वारे बाह्य आणि आंतरिक जड आणि चेतन यांचा यथार्थ विश्लेषणात्मक अभ्यास करुनच परमार्थ सत्याचा साक्षात्कार करता येतो._
_नाम आणि रुप म्हणजे चेतन आणि जड यांच्या संदर्भात आपण खूप वेळा ऐकले असेलच. मी ह्या संबंधी थोडेसे आणखी स्पष्टीकरण करुन देऊ इच्छितो. *नाम म्हणतात मनाला कारण की हे इंद्रिय विषयांकडे नमन करते नमति इतिनामे। रुप म्हणतात् पदार्थाला कारण हे निरंतर परिवर्तनशील असल्यामुळे क्षणभंगूर आहे- रुप्पती ति रुपं ।*_
_नामाच्या अंतर्गत हे चार भाग आहेत:_
१. *विज्ञान-* _इंद्रियांद्वारा विषयाशी प्रथम स्पर्श होताच जे ज्ञान होते त्याला विज्ञान म्हणतात._
२. *संज्ञा-* _इंद्रियजन्य विज्ञानाच्या नंतर जे विशेष रुपाने ज्ञान होते त्याला संज्ञा म्हणतात._
३. *वेदना-* _सुख-दुःख किंवा तशाच भावाची जी अनुभूती होते त्याला वेदना म्हणतात._
४. *संस्कार-* _विषयाच्या ज्ञानानंतर मनाच्या निश्चयात्मक शक्तीला संस्कार म्हणतात._
_*वरील चार आणि भौतिक क्षेत्राचे रुप मिळून पंचस्कंध म्हणतात. भगवान बुद्धांच्या अनुसार ह्या पंचस्कंधात समस्त मानसिक आणि भौतिक दृश्य आणि अदृश्य जग सामावलेले आहे. ज्याला सामान्य जनता आपले व्यक्तित्व किंवा अहं म्हणते, तो वस्तुतः मन आणि पदार्थाचा केवळ सामुहिक प्रवाहमाल आहे.*_
_*ज्या साधकाने सम्यक समाधीच्या अभ्यासाद्वारा मनाला एकाग्र करुन शक्तीशाली केलेले आहे तोच सम्यक संकल्पाद्वारा तीक्ष्ण अंतर्दृष्टीच्या मदतीने आत्मनिरिक्षण करु शकतो. असा साधक आंतरिक ध्यानाद्वारा प्रकृतीचा विश्लेषणात्मक अभ्यास करतो. प्रथम रुप (पदार्थ) चा आणि नंतर नाम (चित्त) चा. तो कलापांचा आपल्या वास्तविक स्वरुपात अनुभव करतो आणि केव्हा केव्हा त्यांना प्रत्यक्ष पाहातो सुद्धा. त्याला हा स्पष्ट अनुभव होऊ लागतो की नाम आणि रुप दोन्हीही अनित्य आहेत, सतत परिवर्तनशील आहेत, प्रवाहशील आहेत. जशी जशी त्याची एकाग्रता वाढत जाते तशी तशी आपल्या आंतरिक शक्ती त्याला आधिकाधिक स्पष्ट होतात. तो निश्चित रुपाने जाणतो की हा पंचस्कंध कार्य कारणांच्या नियमांनी बांधलेले केवळ दुःख आहे. आता त्याला कोणता संशय राहात नाही की आत आणि बाहेर सर्वत्र दुःखच दुःख आहे आणि अहं नावाची कोणतीही वस्तू नाही. तो ह्या दुःखमय स्थितीपासून मुक्ती प्राप्त करण्यासाठी तडफडू लागतो. तो हळूहळू दुःख निरोधाकडे जाऊ लागतो आणि दुःखाच्या बंधनातून विमुक्त होऊन, लौकिकपासून लोकोत्तर स्तराकडे येतो आणि स्रोतापन्न अवस्थेत स्थित होतो.*_
_स्रोतापन्न अवस्था ही आर्यांच्या चार पायऱ्यापैकी पहिली आहे. ही अवस्था प्राप्त होताच साधक_
१. सत्काय दृष्टी (आत्मबुद्धी),
२. विचिकित्सा (संशय) आणि
३. शीलव्रत परामर्श (कर्मकांडाप्रती मोह) च्या बंधनांपासून मुक्त होतो.
_आर्यांची दुसरी अवस्था सकदागामीची आहे, ही अवस्था प्राप्त करुन साधक काम आसक्ती आणि व्यापाद (द्वेष)ला क्षीणप्राय करतो._
_तिसरी अवस्था अनागामीची आहे, ही अवस्था प्राप्त करुन साधक काम आसक्ती आणि व्यापाद (द्वेष) संपूर्णपणे नष्ट करतो._
_*अंतिम अवस्था अरहंत आहे.* ती अवस्था प्राप्त करुन साधक सगळ्या दुःखांपासून मुक्त होतो. चारही आर्य अवस्थेत निर्वाण रसाचे आस्वादन केले जाऊ शकते. कोणताही साधक पाहिजे तेवढ्या वेळा स्रोतापन्न इत्यादींच्या फळ समापत्तिला प्राप्त करून निर्वाणिक शांतीचा अनुभव करु शकतो._
_ज्या "आंतरिक शांतीला" निर्वाण म्हणतात त्याची कोणती तुलना नाही. ती अनुपम आहे, लोकोत्तर आहे. ज्या ध्यानिक शांती आणि सुखाचा उल्लेख मी समाधी स्कंधात केला होता तो याच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे. निर्वाणाची शांती लोकोत्तर आहे. ती आम्हाला ३१ लोकांच्या पलीकडे घेऊन जाते. पण ध्यानाची शांती आम्हाला ह्या लोकीय क्षेत्रातच मर्यादित ठेवते. अधिकहून अधिक सूक्ष्मतम ब्रह्मलोकापर्यंत घेऊन जाते._
*_चित्त विशुद्धीची अशी अवस्था प्राप्त करु शकणे ज्यामुळे ज्योतिचे दर्शन होईल, जेव्हा पाहिजे तेव्हा ध्यानिक अवस्था प्राप्त करणे, निर्वाणाच्या शांतीचा अनुभव प्राप्त करु शकणे हे सर्व आपल्याला सुप्राप्य आहे. म्हणून कमीत कमी पहिल्या दोन अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न का करु नये! ह्या दोन्हीही आपल्या धर्म सिद्धांतांच्या अनुकूल आहेत. ह्यासाठी आवश्यक मदत करण्यासाठी मी तयार आहे._*
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_लेखक :- सयाजी ऊ बा खिन_*
_बुद्धवर्ष २५६२, वैशाख पौर्णिमा, ३० एप्रिल, २०१८ वर्ष २, अंक १_
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* १७/०३/२०२५
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment