✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_'त्रिपिटकात सम्यक संबुद्ध' ची भूमिका_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2025/01/blog-post_21.html
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_अप्पमत्तो पमत्तेतु, सुत्तेसु बहुजागरो।_*
*_अवलस्संव सीघस्सो, हित्वा याति सुमेधसो ॥_*
_धम्मपद २९. अप्पमादवग्गो_
*_प्रमाद करणा-यात अप्रमादी (क्षीणास्त्रव) व (अज्ञानाच्या निद्रेत) झोपलेल्या लोकात अतिजागृत प्रज्ञावान (दुस-यांना) मागे टाकून (असा पुढे निघून जातो) जसा शीघ्रगामी अश्व दुर्बळ अश्वास._*
*_'त्रिपिटकात सम्यक संबुद्ध' ची भूमिका_*
_८३६ पृष्ठ व सहा भागात छापलेले पुस्तक 'त्रिपिटकात सम्यक संबुद्ध वस्तुतः विशाल त्रिपिटकाची भूमिकाच आहे. दीर्घ भूमिका आहे, जिला वाचकांच्या वाचन सुवेधेसाठी सहा भागात प्रकाशित केले गेले आहे. यासाठी अजून एक छोटीशी भूमिका लिहिणे आवश्यक समजले गेले. याच्या परिणाम स्वरूपात हे काही शब्द आहेत._
*_सुत्तन्तेतु असन्तेसु, पमुट्ठे विनयम्हि च।_*
*_तमो भविस्सति लोके, सूरिये अत्थाङ्गत्ते यथा ॥_*
*_धर्मसूत्र विद्यमान नसल्यावर व धर्मपालन (करण) विसरल्यावर जगात सूर्यास्ताप्रमाणे अंधकार पसरतो._*
*_सुत्तन्ते रक्खिते सन्ते, पटिपत्ति होति रक्खिता ।_*
*_पटिपत्तियं ठितो धीरो, योगक्खेमा न धंसति ॥_*
_(अङ्गुत्तरनिकाय अडकथा १.१.१३०. दुतिययमादादिवग्गवण्णना)_
*_धर्मसूत्र सुरक्षित राहिल्यावर पतिपत्ती म्हणजे साधनेचे प्रतिपादन सुरक्षित राहाते. प्रतिपादनात लागलेला धैर्यवान योगक्षेमापासून वंचित होत नाही._*
_जवळपास चाळीस वर्षापूर्वी सप्टेंबर, १९५५ मध्ये मी पहिल्यांदा परम पूज्य गुरुदेव सयाजी ऊ बा खिन यांच्या चरणात बसून विपश्यनेच्या शिबिरात भाग घेतला. *तेव्हा हे पाहून सुखद आश्चर्याने प्रभावित झालो की भगवान बुद्धांचे हे प्रयोगात्मक प्रशिक्षण किती निर्मळ आहे, निर्दोष आहे! किती निष्कपट आहे, निष्कलंक आहे किती सार्वजनिक आहे, सार्वभौमिक आहे! किती सार्वकालिक आहे, सनातन आहे व किती वैज्ञानिक व त्वरित फळ देणारे आहे ।*_
_लहानपणापासून हे ऐकत व मानत आलो होतो की भगवान बुद्ध ईश्वराचे नववे अवतार आहेत. या कारणामुळे आमच्यासाठी पूज्य आहेत, त्यामुळे भगवान बुद्धांप्रती सहज श्रद्धा होती. घरातील मोठ्या वयस्करांसोबत मांडलेत (ब्रह्मदेश) भगवान बुद्धांच्या महामुनी मंदिरात जाऊन त्यांच्या प्रतिमेच्या शांत, सौम्य, स्निग्ध चेहे-याचे दर्शन करून, सादर नमन करणे व अत्यंत भक्तिभावाने फूल चढवणे व दीप लावणे खूप प्रिय वाटायचे. परंतु सोबतच लहानपणात मनावर हाही एक लेप लावला गेला होता की भगवान बुद्ध परम पूज्य व वंदनीय आहेत, तरीही त्यांची शिकवण आमच्यासाठी ग्राह्य नाही, योग्य नाही. ही मान्यता किती खोटी सिद्ध झाली._
_नक्कीच एखाद्या जुन्या पुण्याचा फलोदय झाला, ज्यामुळे अशी परिस्थिती उत्पन्न झाली की दहा दिवसांसाठी विपश्यना मातेच्या सुखद मांडीवर जाऊन बसलो. काम, क्रोध व अहंकाराच्या अंतर तापामुळे सतत तापित, संतापित राहाणा-या मनाला दहा दिवसात जी शांती मिळाली, त्यामुळे हर्षविभोर झालो, शिबिरात सामील होण्यापूर्वी परम पूज्य गुरुदेवांनी विपश्यना विद्येची जी रूपरेखा समजवली, ती खूप निर्दोष वाटली. परंतु लहानपणापासून लागलेल्या जुन्या लेपांमुळे मनात काही संकोच होताच. परंतु दहा दिवस पूर्ण झाल्यावर हे पाहून मन खूप प्रसन्न झाले, संतुष्ट झाले की या मार्गात कुठेही काहीही दोष नाही. *विपश्यनेचा सारा मार्ग शुद्ध व निर्दोष आहे. त्यामुळे गृहस्थ असो वा संन्यासी सर्वांसाठी सर्वथा ग्राह्य आहे, उपयोगी आहे.*_
_*भगवान बुद्धांच्या अशा निर्दोष शिकवणुकीच्या प्रती मनात ज्या अनेक मिथ्या भ्रांती होत्या, त्यांचे निराकरण झाले. शेवटी शील सदाचाराचे जीवन जगण्यात काय दोष आहे बरे? सहज स्वाभाविक श्वासाच्या येण्या-जाण्याप्रती सतर्क राहून चित्ताला एकाग्र करून समाधिस्थ होण्यात काय दोष आहे बरे? शरीर व चित्ताच्या पारस्परिक प्रभाव क्षेत्राचे यथार्थ दर्शन करत, अंतर्मनाच्या सखोलतेत विकारांचे व त्यामुळे होणा-या व्याकुळतेच्या प्रजनन व संवर्धनाथे निरीक्षण करत, या प्रपंचाप्रती अनित्यबोधिनी प्रज्ञा जागवण्यात काय दोष आहे बरे? या अनुभवजन्य प्रज्ञेच्या आधारावर समतेत स्थिर होऊन मनाला विकार विमुक्त बनवण्यात व अशा निर्मळ चित्त झालेल्या साधकाद्वारे इंद्रियातीत नित्य, शाश्वत, ध्रुव अवस्थेचा साक्षात्कार करू शकण्याची क्षमता प्राप्त करण्यात काय दोष आहे ? या निर्दोष मार्गावर चाललेले प्रत्येक पाऊल कल्याणकारी आहे.*_
_एका धर्मभीरू परिवारात जन्मलो व वाढलो, या कारणामुळे खूप समजत होतो की शील-सदाचाराचे पालन अवश्य केले पाहिजे. यासाठी आवश्यक मनोबल वाढवण्याची विधी या शिबिरात शिकलो. चित्ताची एकाग्रता व विकार विमुक्तीचे लक्ष तर पूर्वीही होते, परंतु याला पूर्ण करू शकण्याचा सहज सरळ मार्ग या विधीने प्रशस्त केला. प्रज्ञेच्या बाबतीत खूप वाचले होते, खूप चिंतन-मननही केले होते, परंतु यामुळे जो लाभ मिळावयास पाहिजे होता, त्यापासून वंचित होतो. प्रज्ञेचा खरा अर्थच समजू शकलो नव्हतो तर लाभ मिळेलच कसा ? आतापर्यंत तर परोक्ष ज्ञानालाच प्रज्ञा समजत होतो. ऐकलेले, वाचलेले ज्ञान वस्तुता श्रुतज्ञान असते, ज्याला श्रद्धेद्वारे स्वीकार केले जाऊ शकते. चिंतन-मनन करून त्याला योग्य मानले तर तेच चिंतनज्ञान होते. परंतु ही दोन्हीही परोक्ष ज्ञान आहेत, परकी, दुस-यांची ज्ञान आहेत. स्वानुभूतीच्या स्तरावर प्रत्यक्ष ज्ञानच तर प्रज्ञान आहे. हीच प्रज्ञा आहे. विपश्यनेद्वारे या प्रत्यक्ष ज्ञानाचा अभ्यास केला. या अभ्यासाची निरंतरता कशी कायम ठेवायची, हेही शिकलो. या निरंतरतेत पुष्ट होणेच प्रज्ञेत स्थित होणे आहे, हेही खूप चांगले समजले. तेव्हा असे वाटले की ज्या स्थितप्रज्ञतेला आपल्या जीवनाचा आदर्श मानला होता, ती तर केवळ एक सैद्धांतिक बाब होती. खूप झाले तर त्यावर चिंतन-मनन केले. परंतु तिही केवळ बौद्धिक प्रक्रियाच झाली. विपश्यनेने प्रज्ञेच्या व्यावहारिक पक्षाचा प्रयोगात्मक मार्ग मोकळा केला. प्रज्ञाबळाने वीतराग, वीतद्वेष, वीतमोह, वीतभय होण्याचा व्यावहारिक पक्षाचा प्रयोगात्मक मार्ग प्रशस्त केला. *विपश्यना कोरा उपदेश नाही, कोरे चिंतन-मनन नाही, तर मनोविकारांना मुळापासून काढण्याची व्यावहारिक प्रक्रिया आहे, याचा स्पष्ट अनुभव आला.*_
_पहिल्याच शिबिरात शील, समाधी व प्रज्ञेच्या विशुद्ध सुधारसाचा जो थोडासा स्वाद चाखला व त्यामुळे जो आंतरिक प्रश्नब्दी व प्रशांतीचा अनुभव झाला, त्यामुळे मनात एक *धर्मसंवेग जागला की चित्त विशुद्धीच्या या कल्याणकारी साधनेच्या अभ्यासाला पुष्ट करत, याच्या सैद्धांतिक पक्षालाही जाणले पाहिजे. त्यामुळे बुद्धवाणी वाचण्याचा निश्चय केला. परंतु ती जवळपास पंधरा हजार पृष्ठांच्या विशाल साहित्यात लिहिलेली होती. तसेच ती पाली भाषेत होती, जिचे मला थोडेसेही ज्ञान नव्हते. सौभाग्याने महापंडित राहुल सांकृत्यायनजी, भिक्षु आनंद कौसल्यायनजी, भिक्षु जगदीश काश्यपजी, भिक्षु धर्मरत्नजी व भिक्षु धर्मरक्षितजींनी बुद्धवाणीच्या काही ग्रंथांचे हिन्दी भाषेत अनुवाद केले होते. त्यांना भारतातून मागवून वाचणे आरंभ केले. वाचतांना खूप प्रसन्नता वाटायची, विपश्यना साधनेला खूप बळ मिळायचे.*_
_सन १९६२ ते ६४ च्या दरम्यान एका अजून महान पुण्याचा फलोदय झाला, ज्यामुळे व्यवसाय व उद्योगाच्या संचालनासंबंधी उत्तरदायित्वापासून पूर्णपणे मुक्ती मिळाली. आता जीवनात रिकामा वेळच वेळ होता. *सन १९६९ पर्यंत बुद्धवाणीच्या हिंदी अनुवादालाच नाही, तर मूळ पालीच्या काही सूत्रांनाही वाचण्याची संधी प्राप्त झाली. मूळ पालीत या सूत्रांना वाचतांना अत्यंत प्रीती-प्रमोद जागायचा, तन-मन पुलक रोमांचाने भरुन जायचे. सामान्यतः पालीभाषा खूप सरळ वाटली, प्रिय वाटली व प्रेरणादायकही.* त्या सूत्रांच्या परम पूज्य गुरुदेवांद्वारे केल्या गेलेल्या व्याख्येचा मनावर खूप सखोल प्रभाव पडला. त्या व्याख्येच्या आधारावर विपश्यना साधनेचा अभ्यास करतांना जो अनुभव झाला, तो अद्भुत होता, अपूर्व होता. *परियत्ती म्हणजे बुद्धवाणी व पतिपत्ती म्हणजे त्याचा सक्रिय अभ्यास, यांच्या पावन संगमामुळे धर्माचे शुद्ध स्वरूप अधिक उजागर होत गेले.* या अमृतसागरात बुडी मारतांना पाहिले की विपश्यनेचा मार्ग अत्यंत शुद्ध आहे, पवित्र आहे, सुखशांतिदायक आहे. जातीपातीच्या भेदभावापासून, सांप्रदायिक बेड्यांपासून, गुंतवणाऱ्या दार्शनिक मान्यतांपासून व पोकळ कर्मकांडांपासून सर्वथा मुक्त आहे. या मार्गावर उचलले गेलेले प्रत्येक पाऊल कोणाही व्यक्तीसाठी इथेच याच जीवनात विकार विमुक्तीचे सुखद परिणाम देणारे आहे._
_मला वाटले की कल्याणकारी बुद्धवाणी व भगवती विपश्यनेला गमावून आमचा देश आपली एक अत्यंत गौरव, गरिमामय पुरातन अध्यात्मविद्या घालवून बसला. शुद्ध सनातन आर्यधर्म गमावला. भारताच्या त्या ऐतिहासिक महापुरुषाला घालवून बसला. जे नितांत निष्कपट होते, निष्प्रपंच होते, निष्कलुषित होते. जे अनंत मैत्री व करुणेचे साक्षात अवतार होते. एक अशा महामानवाला गमावले जे केवळ भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात अनुपम होते, अनुत्तर होते, अप्रतिम होते, अद्वितीय होते, असदृश होते. ज्यांच्या पावन शिकवणुकीमुळे भारत वस्तुतः विश्व गुरु बनला. भारताची भूमी विश्वाच्या करोडो लोकांसाठी पूजनीय तीर्थभूमी बनली. त्या *भगवान गौतम बुद्धांना व त्यांच्या कल्याणी वाणीला तसेच दुःख-विमोचनी विपश्यना विद्येला पुन्हा प्रकाशात आणणे आमच्यासाठी सवर्था लाभप्रदच लाभप्रद आहे.*_
_जवळपास २००० वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर सौभाग्याने सन १९६९ मध्ये विपश्यनेचे भारतात पुनरागमन झाले आहे. भारताच्या प्रबुद्ध लोकांनी हिचा सहर्ष स्वीकार केला आहे. साधकांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. पाहातो की *विपश्यना शिबिरात सामील होणारे अनेक साधक भगवान बुद्धांच्या मूळ उपदेशांशी अवगत होऊ इच्छितात.* मी त्यांच्या या धर्म जिज्ञासेला चांगला समजू शकतो, कारण मी स्वतःही या अवस्थेतून गेलो आहे. हेही जाणतो की आजच्या भारतात पालीभाषेत बुद्धवाणी उपलब्ध नाही. नव नालंदा महाविहाराने जवळपास ३५ वर्षांपूर्वी जे प्रकाशन केले होते, ते आता सर्वथा अनुपलब्ध आहे. परंतु ही प्रसन्नतेची बाब आहे की *विपश्यना विशोधन विन्यासाने केवळ बुद्धवाणीच नाही तर त्याच्या अर्थकथा, टीका व अनुटीकांच्या संपूर्ण पालीसाहित्याच्या प्रकाशनाचा निश्चय केला आहे. परंतु सर्व साधक तर पाली वाचू शकत नाहीत. हिंदी भाषी साधकांसाठी हिंदी अनुवाद आवश्यक आहेत. जे अनुवाद पूर्वी झाले होते, दुर्भाग्याने त्यापैकी अधिकांश आता उपलब्ध नाहीत. विपश्यना विशोधन विन्यासची एक योजना पुरातन पाली साहित्याचा हिंदी अनुवाद करण्याचीही आहे.* परंतु त्याला खूप वेळ लागेल._
_त्यामुळे *आपल्या सामर्थ्य सीमेला जाणूनही त्रिपिटकाची एक मोठी भूमिका लिहिण्याचे साहस केले, ज्यामुळे साधकांना हिंदी भाषेत भगवान बुद्ध व त्यांच्या शिकवणुकीबाबत जास्तीतजास्त व खरी-खरी माहिती मिळू शकेल. पाली त्रिपिटकातून काही अवतरण व प्रेरक प्रसंगांना एकत्र करू लागलो. मी जाणतो की आजच्या साधकांची तीच अवस्था आहे जी १९५५ मध्ये माझी होती. भगवान बुद्ध व त्यांच्या पावन शिकवणुकीबाबत त्यांचे ज्ञान अत्यल्प आहे व भ्रामकही. त्या भ्रांतींना दूर करण्यासाठी मूळ पालीत सुरक्षित बुद्धवाणीचाच आश्रय घेणे आवश्यक आहे. पाली भाषाच आम्हाला भगवान बुद्धांच्या जवळ पोहोचवते कारण ही त्यांची मातृभाषा कोशली होती, जी तत्कालीन विस्तृत व शक्तिशाली कोशल देशाची जनभाषा असल्यामुळे त्या संपूर्ण मध्यदेशात बोलली व समजली जात होती, जी भगवान बुद्धांची चारिका भूमी झाली. कालांतराने हिला सम्राट अशोकाने आपल्या प्रशासन व धर्मलेखांसाठी स्वीकारले कारण त्याची राजधानी पाटलिपुत्र मगधात होती व कोशल प्रदेशही मगध साम्राज्यात सामावला गेला होता. त्यामुळे हीच कोशली भाषा मागधी म्हणवली जाऊ लागली. हिने भगवान बुद्धांची वाणी सांभाळून ठेवली, पालन करुन ठेवली म्हणून पाली म्हणवली गेली.*_
_या सुरक्षित वाणीत सर्वत्र भगवान बुद्धांचे धर्मकायिक व्यक्तित्व सामावले आहे. त्यांच्याद्वारे प्रवाहित धर्माच्या अमृतवाणीचा कलकल निनाद सामावला आहे. त्यांच्या वाणीने प्रभावित होऊन व त्यांच्या सांगितलेल्या मार्गावर चालून संतुष्ट झालेल्या गृहत्यागी व गृहस्थांच्या आदर्श जीवनाचे भव्य दर्शन सामावले आहे, जे साधकांसाठी खूप प्रेरणादायक आहे._
_त्रिपिटकात त्यांच्याशी संबंधित प्रेरक सामग्री इतकी अधिक मात्रेत आहे की कोणी कितीही निवड करेल तरी तृप्ती होऊ शकत नाही. तसेच जसे की भगवान बुद्धांच्या जीवनकाळात त्यांचे गृहस्थ शिष्य हत्थक आळवकांनी म्हटले होते की-_
"भगवान, मी आपले दर्शन करत-करत अतृप्तच राहिलो."
"भगवान, मी आपली वाणी ऐकत-ऐकत अतृप्तच राहिलो."
_*त्रिपिटक भिन्न-भिन्न प्रकारच्या सुंदर व सुगंधित पुष्पांचे मोठे मनोहर उद्यान आहे.* मी त्यापैकी थोडीशी फूल निवडून त्यांची माला गुंफण्याचा प्रयत्न केला आहे. कुठे-कुठे अर्थकथांमधूनही बुद्धपुत्रांच्या वाणीचे एखादे दुसरे सुंदर फुल घेऊन गुंफलेले आहेत. हे सर्व तसेच झाले जसे की भगवान बुद्धांच्या गुणांचे गान करत *भावविभोर गृहपती उपालीने* म्हटले होते-_
_*सेय्यथापि, भन्ते, नानापुष्फानं महापुण्फरासि*_
*_जसे भंते, नाना प्रकारच्या पुष्पांची एक मोठी पुष्पपराशी असावी._*
*_तमेनं दक्खो मालाकारो वा मालाकारन्तेवासी वा_*
_- ज्यातून एखादा दक्ष माळी अथवा त्या माळ्याचा शिष्य, *विचित्तं मालं गन्थेय्य* सुंदर दिसणारी माला गुंफेल._
*_एवमेव खो, भन्ते, सो भगवा अनेकवण्णो, अनेकसतवण्णो_*
_याच प्रकारे भंते, ते भगवान अनेक प्रशंसनीय गुण असणारे आहेत, अनेक शत प्रशंसनीय गुण असणारे आहेत._
*_को हि, भन्ते, वण्णारहस्स वण्णं न करिस्सति ?_*
_(मज्झिमनिकाय २.७७, उपालिसुत्त)_
_भंते, प्रशंसनीयाची प्रशंसा कोण करणार नाही? गुणवंतांचे गुण कोण गाणार नाही?_
_त्याच गुणवंत भगवानांचे, त्यांच्या शिकवलेल्या धर्माचे, त्या धर्माला धारण करून निर्मळ चित्त झालेल्या संतांचे गुण गाण्याची इच्छा माझ्या अंतर्मनातही जागणे स्वाभाविक होती._
_याच भावाने बुद्धवाणीच्या काही सुंदर सुगंधी सुमनांना निवडून ही माला गुंफली गेली आहे; सद्धर्माच्या अगाध रत्नाकरातून काही अनमोल रत्न निवडून हे रत्नखचित आभूषण घडवलेले आहे; सद्धर्माच्या असीम सुधासागरातून अमृताचे काही थेंब घेऊन धर्मसुधारसाची ही घागर भरली गेली आहे._
_नित्य पठनीय ही पुस्तकमाला भगवानांबाबत निरुपित या गुणांचे *इतिपि सो भगवा अरहं सम्मासम्बुद्धो विज्जाचरण सम्पन्नो सुगतो लोकविदू अनुत्तरो पुरिसदम्मसारथि सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवा 'ति;* इत्यादी मराठी निरूपण आहे._
_कंप्यूटर व काही साधकांच्या सहयोगाने सहा भागांच्या शेवटी दिली गेलेली प्रयुक्त शब्दांची अनुक्रमणिका छापलेली आहे. जसे-_
- हिंदी शब्दानुक्रमणिका, पाली शब्दानुक्रमणिका,
_संदर्भ सूची, नावांची अनुक्रमणिका इत्यादी, संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व जिज्ञासूंसाठी खूप उपयोगी आहेत,_
ही सुंदर सुरभित सुमनांची माला, हे किमती रत्नजडित स्वर्णाभूषण, ही शांतिदायिनी सुधारस घागर, विपश्यी साधकांना व निरनिराळ्या शांतिप्रेमी पाठकांना धर्मपथावर आरूढ होण्यासाठी व उत्तरोत्तर पुढे चालत राहण्यासाठी -_
विपुल प्रेरणेचे कारण बनो, त्यांच्या अपरिमित हित्तसुखाचे कारण बनो ! त्यांच्या असीम मंगलकल्याणाचे कारण बनो ! त्यांच्या स्वस्तीमुक्तीचे कारण बनो ! हीच कल्याण कामना आहे.
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*
_बुद्धवर्ष २५५८, मार्गशीर्ष पौर्णिमा, ६ डिसेंबर, २०१४ वर्ष १ अंक ८_
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* २१/०१/२०२५
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment