Sunday, 22 December 2024

मध्यम मार्ग

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_मध्यम मार्ग_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_94.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_भगवान बुद्धांच्या वेळी देशात दोन परंपरा खूप प्रचलित होत्या._

_*एक- कामेसु-काम सुखल्लिकानुयोगो,* म्हणजे, काम-भोगातच सुख मानून त्यात आसक्त राहणे, जो निश्चितच हीन मार्ग होता. धर्ममार्गापासून दूर झालेल्या अज्ञानी म्हणजे अनार्याचा मार्ग होता. हा स्पष्टपणे अनर्थकारी होता._

_कामभोगातच जीवनाचे सुख मानणारी एक दूषित परंपरा अत्यंत प्राचीनकाळापासून प्रचलित होती, जी हे मानत नव्हती की मरणानंतर कोणत्याही प्राण्याचा पुनर्जन्म होतो. जन्म ह्याच जीवनासाठी होतो. त्यामुळे सुखभोगासाठी त्याचा जास्तीतजास्त लाभ घेतला पाहिजे. बुद्धांच्या जीवनकाळातील एक आचार्य अजित केसकंबल म्हणायचा की पशू-पक्षांच्यांत आई-वडिलांसोबत केलेल्या कामभोगावर काहीही प्रतिबंध नाही. पुत्र तरुण झाल्यावर आपल्या आईसोबत व पुत्री तरुण झाल्यावर आपल्या वडिलांसोबत कामभोग करतांना दिसून येतात. निसर्गाचा हा नियम सर्व प्राण्यांवर, पशु-पक्षी, कीटक-पतंग आणि सरपटणाऱ्या प्राण्यांवर लागू होतो. त्यामुळे निसर्गाचा हा नियम मनुष्य समाजावरही तसाच लागू होतो. ह्यावर कोणताही प्रतिबंध असू नये. म्हणून आजीवक काश्यप म्हणतो 'कुत्तो माता, कुतो पिता ?'_

_कामाचार आणि स्वेच्छाचाराची ही मान्यता अत्यंत प्राचीन काळापासून कमी-जास्त प्रमाणात चालत येत आहे. प्राचीन साहित्यात दासीसोबत मुनिंच्या अवैध यौन-संबंधांचे वर्णन सापडते. *एका जागी 'ब्रम्हस्पती' नावाच्या देवतेला प्रार्थना केली जाते की 'उसिज' नावाच्या एका कामुक दासीच्या गर्भातून उत्पन्न 'कक्षीवान' नावाच्या पुत्राला देवतांच्या श्रेणीत यज्ञभागी होण्यासाठी परिगणित करण्यात यावे. (ऋग्वेद-१-५-१८-१)*_

_*प्रजापती ब्रम्हाव्दारे आपल्या पुत्रीसोबत जबरदस्तीने केल्या गेलेल्या घृणित कामाचरणाचे विवरणही आढळते. (ऋग्वेद-१०-५-६१-७) असेच पिता-पुत्री व माता-पुत्राच्या कुत्सित आणि अवैध संबंधाचा उल्लेख सापडतो. (अथर्ववेद-८-६-७) ह्या प्रकारे ऋग्वेदात भाऊ-बहीण, यम-यमीच्या कामभोगोसंबंधी अशोभनीय वार्तालापाचे वर्णनही बहुविदित आहे. (ऋग्वेद-१०-१-१०-७/११)*_

_ह्या व्यतिरिक्त अवैध कामाचाराचे अन्य प्रसंगही आमच्या समोर आहेत. महर्षी परासरचे कोळी-कन्या सत्यवतीसोबत नावेत दुराचरण करणे. महर्षी विश्वमित्राव्दारे उर्वशीसोबतचे कामाचरणही सर्वविदित आहे._

_*काम एवैकः पुरुषार्थः । (बार्हस्पत्यसूत्र-५)*_

        _- काम-भोगच जीवनाचा एकमात्र पुरुषार्य आहे. त्यामुळे हेच श्रेयस्कर आहे._

*_अडंगनालिङ्गनाज्जन्यसुखमेव पुमर्थता । (सर्वदर्शनसंग्रह-१.४)_*

     _कामिनीच्या आलिंगनाने उत्पन्न सुख पुरुषार्थाचे लक्षण आहे._

_असे लोक उन्मुक्त कामभोगालाच जीवनातील सर्वात मोठे सुख मानत होते आणि ह्यातच लिप्त राहाण्याला जीवनाची सफलता मानीत होते._

_ह्याच अवैध मान्यतेचे दर्शन आम्हाला पुढेही होते. जसे एका भोगवादीने म्हटले-_

_*यावज्जीवेत् सुखं जीवेत्, ऋणं कृत्वा घृतं पिवेत् । भस्मीभूतस्य देहस्य, पुनरागमनं कुतः ॥ (बार्हस्पत्वसूत्र-४५)*_

_- जेव्हापर्यंत जगावे सुखाने जगावे. तूपच प्यावे, जरी ऋण काढावे लागले तरीही. भस्मीभूत देहाचे पुनरागमन कोठे होते ?_

_जेव्हा पुनर्जन्मच नाही मग कोणत्या कर्माला पाप मानून त्याच्या फळाला भ्यावे?_

_अनेक प्राचीन ग्रंथात जेथे निर्मळ सात्विक धर्माचा खूप उपदेश भरलेला आहे, तेथे ह्या प्रकारच्या अधार्मिक बाबींचे वर्णन हे सांगते की अशा दुराचाराचे प्रचलन प्राचीन काळापासून चालत येत आहे._

_बुद्धांच्या वेळीही अशा विचारधारेची कमी नव्हती, अशा स्वेच्छाचरणाचा प्रभाव अजित केसकंबलाच्या मान्यतेतही दिसून येतो. त्याच्या मतानुसार 'नत्थि माता, नत्थि पित्ता' सारखा कुत्सित यौनाचारही प्रचलित होता. सम्यक संबुद्धांनी ह्या प्रकारच्या सर्व कामाचरणाला अतिचा मार्ग संबोधले व याबाबत म्हटले *यो चायं कामेसु कामसुखल्लिकानुयोगो, हीनो गम्मो पोथुज्जनिको अनरियो अनत्थसंहितो, म्हणज कामसुखात तल्लीन राहणे हा हीन, ग्रामीण, धर्मापासून मार्गभ्रष्ट, पृथकजन (अज्ञानी) अनार्यांचा मार्ग होता, जो स्पष्टपणे अनर्थकारक होता. अतिच्या ह्या कुत्सित मार्गावर तपस्वी सिद्धार्थाने एक पाऊलही टाकून पाहिले नाही.*_

_दुसरा अतिचा मार्ग होता *अत्तकिलमथानुयोगो दुक्खो अनरियो अनत्थसंहितो, म्हणजे स्वतःला अत्याधिक कष्ट देणे. हा मार्ग अत्यंत दुःखाने भरलेला होता, अनार्याव्दारे सेवित, अनार्यांचा मार्ग होता आणि अनर्थकारी ही होता.*_

_त्या काळात उपाशी राहून शरीराला कष्ट देण्याला खूप चांगली तपस्या मानीत होते._

उदाहरणार्थ-

_*एखाद्या साधू-संन्याशाचे सर्वस्वी नग्न राहणे, सर्व आचार विचारांचा सर्वस्वी त्याग करणे, भोजनानंतर ताट व हात चाटणे, अतिथीला 'या भंते' म्हणणे, जाणाऱ्याला 'जा भंते' म्हणणे, ह्या प्रकारे म्हणणाऱ्याकडून भिक्षा न घेणे, न 'थांबा' म्हणून दिलेली, न निमंत्रित केलेली, न आपल्यासाठी शिजविलेली, न भांड्यातून सरळ काढून आणलेली, न उखळ, दंड अथवा मुसळाच्या मधून आणली गेलेली, न भोजन करणाऱ्या दोन व्यक्तींच्या मधून आणली गेलेली, न गर्भिणीव्दारे दिलेली, न मुलाला दूध पाजणाऱ्या महिलाव्दारे दिली गेलेली, न देतांना कोणा अन्य पुरुषाचे मधून निघून जाण्यावर, न अन्य पुरुषांच्या जवळ गेलेल्या दुःशील महिलेकडून न वर्गणी मागून बनविली गेलेली, न जिथे कुत्रा उभा असेल, माश्या घोंघावत असतील, न शिजविलेल्या मासोळ्या, न शिजविलेले मांस, न मद्य, न मेरय, न तुपोदक (तांदळाचे सडविलेले पाणी) घेणे.*_

*_ते संन्यासी एकाच घरातून भिक्षा घेत होते, एकच घास खायचे, दोन घरातून, दोन घास, सात घरांतून, सात घास. एकच पळी अथवा दोन वा सात पळीच घेत होते. ते. ते एक दिवस सोडून, दोन दिवस सोडून, सात दिवस सोडून अथवा अर्ध्या-अर्ध्या महिन्यात एकाच वेळी भिक्षा घेत होते._*

_काही श्रमण-ब्राम्हणांची अशीही मान्यता होती -_

_*ते केवळ भाजी-पालाच खायचे. केवळ हलके तांदूळ खाऊन गहायचे, केवळ निवार, दहुल, शेवाळ, कण, कांजी, पेंड, शेण, गवत व वनातील कंद-मूळ-फळ तोडून खायचे.*_

*_काही संन्यासी तागाचे वस्त्र घालीत असत, प्रेतांवरुन उतरविलेले, गल्लीत फेकले गेलेले सडलेले चिंघडे, वृक्षांची वल्कल, मृगचर्म, गवताचे बनलेले, चटईचे बनलेले, लाकडाचे बनलेले, केसांचे बनलेले, घुबडाच्या पंखांच बनलेले वस्त्र घालीत होते._*

*_केस, दाढी, मिशांचे केस ओढून काढत होते, पायावरच उकिडवे बसायचे, काट्यांवर, लाकडी तक्तावर, खाली जमिनीवरच झोपायचे, एकाच कडेवर झोपायचे, शरीरावर धूळ, माती चोळायचे, उघड्या जागेत झोपायचे, जेथे जशी जागा मिळेल तिथे बसायचे. मळलेल्या, सडलेल्या, गळालेल्या घाणेरड्या वस्तू खायचे, घाणेरडे पाणीही प्यायचे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी तीनदा खान करायचे._*

*_कोणी-कोणी अर्ध्या-अर्ध्या महिन्यापर्यंत उपाशी राहायचे आणि ह्यालाच साधना मानायचे. ते संयमित चित्ताने शील, समाधी, प्रज्ञेची भावना करु शकत नव्हते. न त्यांना याचा साक्षात्कार व्हायचा._*

_शाक्य राजकुमारानेही अनेक कष्टदायक तपस्यांना अजमावून पाहिले. त्यांच्याच शब्दात 'त्या वेळी मला हे ज्ञात झाले की मी दातांवर दात ठेऊन, जिभेने टाळूला दाबून, मनाने मनाचा निग्रह करुन, त्याला दाबून त्याला पीडित का करु नये? तेव्हा मी दातांवर दात ठेऊन, जिभेने टाळूला दाबून, मनाचा मनाने निग्रह केला, त्याला दाबले, त्याला संतप्त केले. असे केल्यावर मला घाम फुटला. जसे कोणी वलवान पुरुष कमजोर पुरुषाच्या डोक्याला अथवा खांद्याला पकडून जोरात झटका देईल, त्याला दावेल अथवा संतप्त करेल. त्याच प्रकारे माइया काखेतून घाम फुटायला लागला. त्यावेळी माइयात अदम्य वीर्य (परिश्रम) प्रारंभ झाले होते. देहदंडनाव्दारे माझी स्मृती क्षीण झाली होती, तरीही मी नितांत दुःखविमुक्तीच्या हेतूने ह्या कष्टदायक मार्गावर आरुढ होतो._

_*त्यानंतर मला सुचले की मी श्वासरहित ध्यान भावना का करु नये ? तेव्हा मी मुख आणि नासिकेव्दारे श्वासाचे येणे-जाणे थांबविले. तेव्हा मला मुख आणि नासिकेव्दारे श्वास-प्रश्वास अडविल्यावर आपल्या कर्णछिद्रांव्दारे निघणाऱ्या वायूचा अत्याधिक आवाज ऐकू येऊ लागला. जसे लोहाराच्या भात्याव्दारे खूपच अधिक आवाज होतो. त्या वेळी माझ्यात अदम्य वीर्य (परिश्रम) प्रारंभ झाले होते. देहदंडनाव्दारे माझी स्मृती क्षीण झाली होती परंतु माझे शरीर नितांत दुःखविमुक्तीसाठी तैयार होते."*_

_*असीम वैभव विलासात वाढलेला सुकुमार सुकोमल राजयोगी ह्या दुष्कर चर्चेत दृढतापूर्वक लागलेला होता आणि त्याने ह्याच्या चरम सीमेपर्यंतचा प्रयोग करुन पाहिला. त्या काळच्या प्रचलित सर्व देहदंडाच्या तपश्चर्या करून पाहिल्या. कायेवर अनेक प्रकारचे आतापन-संतापनाचे प्रयोग करुन पाहिले. आणि जेव्हा उपवास करायला सुरवात केली तेव्हा असे उपवास केले की शरीराला सुकवून काटा बनविले. कोठेही मांस-मज्जेचे नावनिशान राहिले नाही. केवळ हाडांचा सापळा आणि त्यावर सुरकुतलेले चामडे, पस्तीस वर्षाच्या वयात ऐंशी वर्षाच्या वृध्दापेक्षाही वाईट अवस्था झाली. स्वर्णिम आभा असणाऱ्या सुंदर शरीराचा रंग काळा झाला. जागो-जागी मळाची पुटे चढली. कुल्ले असे झाले जसे उंटाचे पाय. मणक्याच्या हाडाचे उन्नत अवनत काटे असे झाले जसे गवताची बळलेली दोरी. फासळ्या अशा झाल्या, जशा जीर्ण-शीर्ण घराच्या ढिल्या होऊन अलग झालेल्या फळ्या. डोळ्यांच्या खोवणीत बुबुळ असे, जसे जणू खोल विहिरीत एखाद्या ताऱ्याचे प्रतिबिंब दिसावे. डोक्यावरील त्वचा अशी झाली जसे कच्ची तोडलेली दुधी उन्हात वाळून सुरकुतून गेली असेल. पोटाचे चामडे पाठीच्या हाडाला जाऊन टेकले. त्याला पकडायला गेला तर पाठीच्या मणक्याचे काटे हाताला लागत. शरीर इतके कृश आणि दुर्बळ झाले की ज्या अंगाला हाताचा आधार देऊन उठण्याचा प्रयत्न केला, तेथील सडलेल्या मूळाचे रोम निघून गळून पडत असत. मल-मूत्र त्यागण्यासाठी उठून चालू इच्छितो तर एक पाऊलही चालू शकत नव्हता. तिथेच कोसळून पडायचा. अशी केली काया-क्लेशाची पराकाष्ठा.*_

_जवळपास सहा वर्षांपर्यंत देह-दंडाची अशी कठोर दुष्कर तपश्चर्या करुन पाहिले की अंतर्मनाच्या सखोलतेत जे अंतर्निविष्ट क्लेश होते ते तसेचे तसेच आहेत. थोडेसेही दूर झाले नाहीत._

_*तेव्हा समजले की ज्या प्रकारे काम-भोग, विलास-वैभवाचे जीवन जगत कोणी व्यक्ती एका अतिचे जीवन जगते आणि मुक्तिपासून दूर राहते, तसेच शरीराला पीडा देण्याच्या तपश्चर्येत लागलेली व्यक्ती दुसऱ्या अतिचे जीवन जगते. तो ही ह्याच प्रकारे मुक्तिपासून दूर राहतो. सुधारणे मनाला आहे. मनाला विकारांपासून विमुक्त करावयाचे आहे. ह्या विमुक्तीच्या साधनेसाठी दोन्ही अतिंना सोडून मध्यम मार्गाचा शोध आवश्यक आहे.*_

_*त्यामुळे योग्य आहार ग्रहण करून शरीराला आर्य साधनेच्या योग्य बनवून स्वतःतच मध्यम मार्गाच्या साधनेच्या शोधात लागला. अनेक आंतरिक बाधांचा सामना करीत शेवटी आपल्या अनेक जन्मांच्या संचित संवर्धित पुण्य पारमितांचे अपरिमित बळ जागले आणि विपश्यनेचा मुक्तिदायी आर्य अष्टांगिक मार्ग प्रकाशित झाला.*_

_*भगवानांनी त्या दोन्ही अतिंच्या अनर्थकारी मार्गांना त्यागून मज्झिमा पटिपदा, म्हणजे मध्यम मार्ग शोधून काढला आणि त्यालाच लोकांना शिकविले जो अभिज्ञान (श्रेष्ठ ज्ञान), संबोधी व निर्वाणाकडे घेऊन जाणारा आहे. ह्याला 'अरियो अट्ठङिको मग्गो' म्हणजे आठ अंगांचा आर्य मार्ग म्हटले, आर्य मार्ग ह्या अर्थाने की कसाही अनार्य व्यक्ती का असेना, जर तो ह्यानुसार आचरण करतो तर तो आर्य बनतोच.*_

_काम-भोगांचे बंधन स्पष्ट झाले. देह-दंडनाची निस्सारता स्पष्ट झाली. कर्मकाडांची निष्प्रयोजनता स्पष्ट झाली. विभिन्न दार्शनिक मान्यतेचे जंजाळ तुटले. *स्वानुभूतीच्या आधारावर जागलेल्या भावनामयी प्रज्ञेच्या बळावर अंधमान्यताजन्य दर्शन सम्यक-दर्शन झाले, बौद्धिक चिंतन-मननाचे भ्रामक ज्ञान सम्यक दर्शनाच्या आधारावर प्रत्यक्ष स्वानुभूतीचे सम्यक ज्ञान बनले. काल्पनिक विमुक्ती सम्यक विमुक्ती बनली. परम कल्याणी सम्यक संबोधीची उपलब्धी झाली. सर्व अंतर्निविष्ट क्लेश छिन्न-भिन्न झाले. चित्त सर्व विकारांपासून नितांत विमुक्त झाले. प्रज्ञाविमुक्ती जागृत झाली. नित्य, शाश्वत, ध्रुव, प्रणीत, प्रशांत परम सत्य साक्षात झाले. सिद्धार्थ राजकुमार सम्यक संबोधी प्राप्त करुन सम्यक संबुद्ध बनले.*_

_उत्तर भारतात बुद्धांचा धर्म पसरविण्याचे पवित्र कार्य धर्मबंधू करीत राहिले. अनेक समजदार लोकांनी ह्या मार्गाला ह्यासाठी सहज स्वीकारले कारण ह्यात काहीही अंधविश्वास नव्हता, अंधमान्यता नव्हती. आपल्या बाबतीत जी स्वयं अनुभूती जागेल त्याच्याच आधारावर साधना पुढे जाते आणि वैज्ञानिक असल्यामुळे चांगले फळही देऊ लागते. ह्या साधनेमुळे सारे कर्म आणि कर्मफळ सुखद होतात. हे सत्य अनेकांना समजू लागले आणि त्यांनी ह्या सरळ स्वच्छ मार्गाचा सहर्ष स्वीकार केला._

_*परंतु तरीही भारताच्या ह्या विशाल भूखंडात कितीतरी लोक भिन्न-भिन्न प्रकारच्या अंधमान्यतांशी, अंधविश्वासांशी जुळलेले होते. त्यांना हा सहज सरळ मार्ग समजण्यात व स्वीकारण्यात अडचण आली. परंतु ज्यांनी याचा स्वीकार केला त्यांचे मंगलच झाले. अशा अंधमान्यतांतून, अंधविश्वासांतून, बाहेर निघून ह्या मंगल मार्गावर पाऊल-पाऊल चालत आपणही आपले मंगल साधावे, कल्याण साधावे.*_

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २३/१२/२०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

No comments:

Post a Comment

योग

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_योग_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_19.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _भगवंतांनी संबोधी मार्गा...