Friday, 20 December 2024

भगवान बुध्दांची सहिष्णुता आणि असीम करूणा

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_भगवान बुध्दांची सहिष्णुता आणि असीम करूणा_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_34.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_*भगवान बुध्दांची सहिष्णुता हिमालय पर्वताच्या शिखरासमान होती, जिला वाटेल तितक्या वादळांचा व झंझावातांचा सामना करावा लागला. तरी ती सुदृढ आणि स्थिर रहात असे. त्यांची मैत्री आणि करूणा महासमुद्रासमान अथांग होती, ज्यातून कितीही जल काढले, तरी त्यामुळे त्यात कमतरता जाणवत नाही. भगवानांच्या जीवन काळात निंदा आणि अपशब्दांची कितीतरी वादळे आली. परंतु त्यांची सहिष्णुता सुदृढ राहिली तसेच निंदकांच्या प्रती असीम मैत्रीत थोडीशीही कमी आली नाही.*_

१. _मगधाच्या नागरिकांव्दारे निंदा -_

_बुध्दांच्या भिक्षूंना पाहून अनेक नागरिक बुध्दांच्या बाबत निंदेचे असे शब्द म्हणायचे - *"हा श्रमण मगध देशाला निपुत्रक बनविण्यासाठी तयार आहे. स्त्रियांना विधवा बनवित आहे. कुळनाशासाठी बध्द आहे. आत्ताच याने हजारो जटिल सन्यासींना आपले शिष्य बनविले. त्यानंतर संजय मतानुयायी साडे बाराशे परिव्राजकांनाही आपल्या पंथात सामील केले. आता प्रसिध्द प्रसिध्द मगधदेशवासी कुलपुत्र श्रमण गौतमाच्या शिकवणुकीचा स्वीकार करीत आहेत.* "भिक्षूंना त्यांनी असे टोमणेही मारले - *"हा महाश्रमण गौतम मगधाव्या गिरिव्रजामध्ये (राजगृहमध्ये) आला आहे. ह्याने इतक्या लोकांना तर आपले शिष्य बनविलेच आहे, अजून माहीत नाही कोणा-कोणाला शिष्य बनवेल !"*

_भगवानांनी आपल्या भिक्षूकडून असे ऐकले तेव्हा ते म्हणाले - 'भिक्षूनो हे टोमणे तुम्हाला जास्त दिवसांपर्यत ऐकावे लागणार नाहीत. आठवडाभर लोक म्हणतील, मग आपोआप चूप होतील."_

२. _सुप्रिय परिव्राजकाव्दारे निंदा -_ 

_एकदा बुध्द भिक्षूसंघासोबत राजगृहापासून नालंदेकडे जात होते. त्या वेळी *सुप्रिय परिव्राजकही आपला शिष्य ब्रम्हदत्त माणवसोबत* त्यांच्या मागे मागे येत होता. सुप्रिय परिव्राजक बुध्द, धर्म व संघाबाबत रस्ताभर निंदेच्याच गोष्टी सांगत राहिला. परंतु त्याचा शिष्य ब्रम्हदत्त माणव बुध्द, धर्म व संघाची नाना प्रकारे प्रशंसाच करीत राहिला. रस्त्यात एका स्थानावर सर्व जण थांबले, तेथेही हे दोन्ही गुरु-शिष्य ह्याच प्रकारे निंदा आणि प्रशंसा करीत राहिले. रात्रभर भगवानांचा शिष्य-संघ त्या दोघांची चर्चा ऐकत राहिला, परतु त्यांच्या वादविवादात पडला नाही._

*_भगवानांनी ह्याला चांगले म्हटले व ते म्हणाले की कोणाच्या प्रशंसेने आनंदित होऊ नये तसेच निंदेने व्यथित होऊ नये._*

३. _निग्रोध परिव्राजकाव्दारे निंदा -_

_ह्याने बुध्दांची निंदा करतांना म्हटले *'शुन्यागारात राहून राहून श्रमण गौतमाची बुध्दी नष्ट झाली आहे. त्यांची प्रज्ञा भ्रष्ट झाली आहे. भरलेल्या सभेत ते माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाहीत."*_

_परंतु जेव्हा तो खरोखर *भगवानांना भेटला तेव्हा त्यांची शांती आणि प्रज्ञा पाहून नत-मस्तक झाला.*_

४. _आक्रोशक ब्राम्हणाव्दारे निंदा -_

_अत्यंत क्रोधित होऊन तो भगवानांजवळ गेला आणि त्यांना पुष्कळश्या शिव्या देऊ लागला. हे ऐकून *भगवान म्हणाले. "ह्या ज्या शिव्या आहेत यांना परस्पर खाणे-पिणे म्हणतात. मी तुमच्या सोबत हे परस्पर खाण्या-पिण्याचे काम करीत नाही. तुम्ही मला खाण्यासाठी शिव्यांची ही भेट दिली. ही भेट तुमचीच असो. मी तर हिचा स्वीकार केला नाही आणि त्या बदल्यात ना तुम्हाला माझ्यातर्फे शिव्यांची कोणती भेट दिली. तुमची भेट तुमच्या जवळच राहिली."*_

_*क्रोधी स्वभावाचा असूनही आक्रोशक भारव्दाज ब्राम्हण समजुतदार होता. तो तत्काळ समजला की आम्ही तर दिवस-रात्र एक दुसऱ्यांना शिव्यांची भेट देतच रहातो आणि पहा. ही कसी व्यक्ती आहे, जिने शिव्यांची भेट स्वीकारलीच नाही. उलट त्या बदल्यात शिव्या न देता चूप राहिली व सहिष्णुतापूर्वक नितांत शांत राहिली. हे पाहून समजून तो भगवानांचा श्रध्दाळू अनुयायी झाला.*_

५. _अग्गिक भारव्दाजाव्दारे निंदा -_

 _भगवान घरोघर भिक्षा मागीत जाऊन *अग्गिक भारव्दाज ब्राम्हणाच्या* घरी पोहोचले. अग्गिक भारव्दाजाने त्यांना पाहून धिक्कारतांना म्हटले *"हे मुंडक, तिथेच थांब! हे श्रमण, तिथेच थांब! हे वृषल, तिथेच थांब!”* त्याची इच्छा नव्हती की कोण्या वृषल म्हणजे नहाशूद्राची वाईट सावली त्याच्या घरावर पडावी._

_*हे ऐकून भगवानांनी भारव्दाज ब्राम्हणाला समजाविले की वृषल कोण असतो आणि वृषलकारक कर्म कोणती असतात. करुणामय भगवानांच्या ह्या स्पष्टीकरणाला ऐकून-समजून भारव्दाज ब्राम्हण अत्यंत श्रध्दाळू होऊन त्यांचा शिष्य झाला.*_

६. _मागण्डिय परिव्राजकाव्दारे निंदा -_

_ज्या आसनावर बुध्द बसले होते. ते पाहून *मागण्डिय परिव्राजक म्हणाला "अरे, मी या आसनाला पाहिले हे फार वाईट झाले, कारण श्रमण गौतम तर 'भूणहू' म्हणजे भ्रूण हत्यारा आहे.* भगवान अशा प्रकारच्या निंदामय वचनांनी किंचितही विचलित झाले नाहीत._

७. _सिंह सेनापतीव्दारे निंदा -_

_त्याने भगवानांवर एकदा असे लांछन लावले की त्यांच्याजवळ कोणतीही अलौकिक शक्ती नाही. ह्यावर *भगवानांनी समजाविले की त्यांची शिकवण अलौकिक प्रदर्शनासाठी नाही, तर दुःखाच्या नितांत समाप्तीसाठी आहे. हे ऐकून-समजून तो भगवानांचा परम श्रध्दाळू शिष्य झाला.*_

८. _चिंचा माणविकाव्दारे निंदा -_ 

_गर्भवतीचा खोटा वेष घालून चिंचा भरलेल्या धर्म सभेत पोहोचली आणि बुध्दांना अपशब्द म्हणू लागली - *"हे महाश्रमण, माझ्या पोटात तुझ्याकडून दिला गेलेला जो गर्भ आहे, त्याच्या प्रसवाची काही व्यवस्था जर तू करू शकत नसशील, तर आपल्या एकाद्या धनी उपासकाला सांगून करव.* हे खोटे वचन ऐकून भगवानांनी शांत चित्ताने म्हटले "भगिनी तुझ्या ह्या वचनाची सत्यता वा असत्यता तू ही जाणतेस आणि मी ही." हे ऐकूनही चिंचा वारंवार त्या खोट्या लांछनाला म्हणत राहिली. परंतु *भगवानांवर त्या निंदेचा काहीही परिणाम न झाल्यामुळे ती घाबरली आणि तिच्या पोटावरील लाकडाच्या तुकड्‌याला ज्या दोरांनी बांधले होते ते ढिले झाले, लाकडाचा तुकडा खाली पडला आणि सत्य प्रकट झाले. उपस्थित लोकांनी तिचा धिक्कार केला. परंतु भगवान शांतच राहिले.*_

९. _सुंदरी परिव्राजिकेव्दारे निंदा -_

_जेव्हा भगवान कोणत्याही प्रकाराने निंदित झाले नाहीत तेव्हा त्यांच्या विरोधकांनी अजून एक चाल खेळली. *सुंदरी परिव्राजिका नावाच्या एका साध्वीला जेतवनात घेऊन जाऊन, एकांतात तिची हत्या केली.* मग तिच्या शवाला उचलून, निंदा करायला लागले की 'बुध्दांचे श्रमण महाव्यभिचारी व खूनी आहेत. असे म्हणत मृत सुंदरीच्या शवाला घेऊन नगरात फिरायला लागले. ह्यावर *भगवानांनी आपल्या भिक्षूना शांत रहाण्याचा निर्देश दिला आणि समजाविले की तुमच्यावर लावण्यात आलेला हा खोटा आरोप एका आठवड्यापेक्षा जास्त टिकणार नाही. असेच झाले. भिक्षु शांत राहिले आणि कालांतराने सत्य समोर आले.*_

१०. _सारिपुत्रावर बुक्कयाचा प्रहार -_

_*सारिपुत्राबाबत हे प्रसिध्द होते की कोणतीही व्यक्ती कोणत्याही कारणामुळे त्यांना क्रोधित करू शकत नाही.* एका विरोधी ब्राम्हणाने जेव्हा हे ऐकले तेव्हा तपासण्यासाठी त्यांच्या पाठीवर पुर्ण शक्तीनीशी एक बुक्का मारला. सारिपुत्रांना ह्यामुळे थोडासाही क्रोथ आला नाही. ब्राम्हण समजला की खरोखर है अत्यंत सहिष्णुतासंपन्न व्यक्ती आहेत. हे पाहून तो विनीत भावाने त्यांच्या चरणांजवळ बसला आणि ही प्रार्थना केली की आपण आज माझ्या घरी येऊन माझ्या व्दारे दिलेली भिक्षा ग्रहण करावी._

_*सारिपुत्रांनी हे स्वीकार करून असेच केले. लोक पहातच राहिले की ज्या व्यक्तीने त्यांना एवढी मारहाण केली. त्याच्यावर क्रोध न करता त्याच्याप्रति करूणाभाव जागवून त्याची विनंती स्वीकार केली आणि त्याच्या घरी भिक्षा घेण्यासाठी आले.*_

११. _अम्बटु माणवाव्दारे निंदा -_

_भगवान जेथे थांबले होते, तेथे जाऊन अम्बठ्ठ माणव नावाच्या युवकाने बुध्दांची निंदा करतांना म्हटले *"गौतम बुध्द आणि त्यांचे श्रमण पापी आहेत." आणि नंतर संपूर्ण शाक्य जातीची निंदा करतांना म्हटले "ते तापट स्वभावाचे आहेत, कटूभाषी आहेत. ते ब्राम्हणांचा ना मान-सत्कार करतात आणि ना त्यांची पुजा करतात. म्हणून पापी आहेत.* त्यानंतर *भगवानांनी अत्यंत शांत वाणीने त्याला समजाविले की खरोखर सन्मान-सत्कार कोणाचा करावयास पाहिजे आणि खरोखर कोण पापी आहे. हे ऐकून अम्बट्ठ शांत व नम्र झाला.*_

१२. _मागण्डियाव्दारे निंदा -_ 

_*मागण्डिय ब्राम्हणाची मुलगी मागण्डिया इतकी सुंदर होती की तिचे वडील तिच्यासाठी तितक्याच सुंदर वराचा शोध घेत होते.* जेव्हा त्याने अत्यंत सुंदर व्यक्तित्व असणाऱ्या गौतम बुध्दांना पाहिले तेव्हा ते त्याला आपल्या मुलीसाठी योग्य वर वाटले. त्याने आपल्या पत्नीला मुलीला घेऊन तिथे बोलविले. ब्राम्हण मागण्डियने बुध्दांसमोर आपल्या मुलीशी विवाह करण्याचा प्रस्ताव मांडला. बुध्दांनी तत्काळ (त्याचा) अस्वीकार केला. ब्राम्हणाव्दारे तिच्या रूपाची प्रशंसा केली गेल्यावर भगवान म्हणाले "मी हिला पत्नी म्हणून कसे स्वीकारू? मी तर हिला पायानेही स्पर्श करू शकत नाही." त्यानंतर त्यांनी आपल्या बुध्दत्व प्राप्तीची सत्यता समजाविली. ते ऐकून मागण्डिय आणि त्याची पत्नी दोघांनीही बुध्दांची शरण ग्रहण केली व पुढे जाऊन मुक्त अवस्था प्राप्त केली._

_*बुध्दांव्दारे तिला अस्वीकार केल्या गेल्यामुळे मागण्डियाच्या हृदयाला मर्मांतक ठेच लागली. पुढे जाऊन अत्यंत सुंदर असल्यामुळे तिचा विवाह कोसंबीचा राजा उदयनसोबत झाला. ती महाराणी झाली. परंतु बुध्दाव्दारे अपमानित होण्याची पीडा तिला सलत राहिली. एकदा गौतम बुध्द आनंदांसोबत त्या नगरीत आले. त्यांना पाहून तिने आपल्या महालाच्या दासांना व कर्मचाऱ्यांना आदेश दिला की त्यांनी बुध्दाच्या मागे लागून अशा प्रकारे त्यांना शिव्या द्याव्यात "श्रमण गौतम तू चोर आहेस ! मुर्ख आहेस ! अविवेकी आहेस ! उंट आहेस ! बैल आहेस ! गाढव आहेस ! पशू आहेस ! नरकगामी जीव आहेस ! तुमची सुगती होणार नाही! दुर्गतीच होईल!"*_

_*अशाअशा शब्दांनी ते लोक भगवानांना अपमानित करू लागले. तेव्हा आयुष्मान आनंदानी शास्त्यांना म्हटले "भंते! हे अभद्र नागरिक आपणास अपशब्द बोलत आहेत त्यामुळे आपण दुसऱ्या नगरात का जावू नये? ह्यावर शास्ता म्हणाले "तेथील लोकही जर असेच अपशब्द बोलु लागतिल तर मग कुठे जायचे ?*_

*_शास्त्यांनी पुन्हा समजाविले 'आनंद, मी तर युध्दामध्ये उतरलेल्या हत्तीप्रमाणे आहे. युध्दात लढणाऱ्या हत्तीला जसे चारी कडून येणाऱ्या बाणांना सहन करावे लागते. तसेच पुष्कळशा दुःशील लोकांव्दारे बोलल्या गेलेल्या अपशब्दांना सहन करणे माझे कर्तव्य आहे. जशी प्रशंसा होते, तशीच निंदाही होतेच. दोन्हीतही समान रहाणेच धर्म आहे._*

_अशा प्रकारे *बुध्दांच्या जीवनकाळात अनेकदा अनेक प्रकाराने त्यांची निंदा करण्यात आली. परंतु बुध्द 'बुध्द' होते. ते अशा निंदेने कसे विचलित होतील! त्यांची सहिष्णुता हिमालयाच्या शिखरासमान सुदृढ होती. त्यांच्याकडून तर निंदकांच्या प्रती सदैव मंगल मैत्रीच प्रकट होत होती जी अगाध सागरासमान असीम होती.*_

_निंदा अधिकतर अशा लोकांव्दारे व्हायची जे भगवानांची प्रसिध्दी व त्यांच्या शिकवणुकीचा विकास सहन करू शकत नव्हते. त्यांची इच्छा होती की कोणत्या न कोणत्या प्रकाराने बुध्दांची बदनामी करावी, ज्यामुळे त्यांच्या शिकवणुकीचा प्रसार होणार नाही._

_ह्याव्यतिरिक्त *देवदत्ता सारख्या व्यक्तीनेही भगवान बुध्दांची घोर निंदा केली, कारण तो त्यांच्या गौरवमय स्थानाला प्राप्त करण्यासाठी आतुर होता. परंतु भगवान त्याच्या प्रतीही मैत्रीभावच ठेवत होते.* एकदा तो भगवान आणि त्यांच्या शिकवणुकीबाबत उलट्या-सुलट्या गोष्टी पसरवून आपली खोटी महत्ता स्थापित करून, भगवानांच्या भिक्षूसंघातून पाचशे भिक्षूना आपल्यासोबत घेऊन निघून गेला. त्याची इच्छा होती की भगवानांच्या भिक्षुसंघात फूट पाडून आपल्यासाठी एक वेगळा भिक्षूसंघ स्थापन करावा. परंतु तो आपल्या ह्या दुष्कृत्यात सफल झाला नाही._

_तेव्हा त्याने विचार केला की देशाचा राजा बुध्दाचा श्रध्दावान भक्त आहे. तो जिवंत असे पर्यंत माझ्या हजारो प्रयत्नानंतरही बुध्दाच्या यश-कीर्तीत थोड़ासाही फरक पडणार नाही. त्यामुळे त्याच्या मनात हा दुष्ट विचार आला की राजकुमार अजातशत्रुला आपल्या वशीभूत करावे, ज्यामुळे त्याच्या माध्यमातून तो आपल्या मनोकामना पुर्ण करू शकेल._

_त्याने असेच केले. काही चमत्कारांचे प्रदर्शन करून अजातशत्रुला वशीभूत केले. मग त्याला समजाविले की तुझे वडील बिम्बिसार खूप दिवसांपर्यंत जीवंत रहातील. तोपर्यंत तुला राजसुखाची संधीच मिळणार नाही. त्यामुळे त्याची हत्या कर आणि स्वतः राजसिंहासनावर बस._

_अजातशत्रू आपल्या वडिलांची हत्या करण्यासाठी तयार झाला. परंतु असफल राहिला, राजाला आपल्या पुत्रावर दया आली की त्याला राजसिंहासन प्राप्त करण्याची प्रबळ इच्छा आहे. त्यामुळे त्याने स्वतःच प्रेमपूर्वक राज सिंहासनाचा त्याग केला आणि पुत्र अजातशत्रुला देशाचा शासक बनविले._

&देवदत्ताचे ह्यामुळेही समाधान झाले नाही, कारण की राजा नसल्यावरही बिम्बिसारावर प्रजेची निस्सीम श्रध्दा होती. जरी तो त्याला मारू शकला नाही तरी एका षडयंत्राव्दारे पुत्राने आपल्या पित्याला कारागृहात टाकले व तेथे उपाशी ठेऊन त्याचा मृत्यु घडविला._

_देवदत्त प्रसन्न झाला 'राजाच वशात असल्यामुळे, मग कोणाची भिती' ह्या दृष्टीने त्याने बुध्दांची हत्या करण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु सफल झाला नाही. *बुध्द त्याच्या दुष्कृत्यांप्रति हिमालयासारखे अविचल राहिले. त्यांची मैत्री अथाह व असीम राहिली.*_

_हे प्रसंग बुध्दांच्या ह्या दोन्ही गुणांची ज्वलंत उदाहरण आहेत._

_देवदत्ताने एकदा क्रोधित नाळगिरि हत्तीला, जो सेवकांव्दारे दारू पाजून कुध्द केला गेला होता आणि चीत्कारत होता त्याला त्या रस्त्यावर सोडविले ज्यावर बुध्द भिक्षाटणासाठी निघाले होते. *भिक्षू साधकांनी जवळच्या एखाद्या घरात सुरक्षेसाठी प्रवेश करण्याची भगवानांना प्रार्थना केली, परंतु ते नितांत अविचलित राहिले. चित्कार करीत हत्ती जवळ येत गेला. भगवानांच्या मैत्रीची वर्षा त्याच्यावर होत राहिली. त्यामुळे त्याचा केवळ क्रोधच नष्ट झाला नाही तर तो भगवानांजवळ येऊन आदरपूर्वक गुडघे टेकून त्यांना नमस्कार करू लागला. भगवानांनी असीम मैत्रीने त्याच्या गंडस्थळावर प्रेमाने थोपटले आणि तो गद्गद् झाला. तो परत गेला ते बुध्दांकडे पाठ करून नाही, तर त्यांच्या तोडाकडे पहात, त्यांना प्रणाम करीत उलट्या पावलांनी संपुर्ण रस्ता चालून परतला.*_

_*अशी होती भगवानांची अविचल सहिष्णुता आणि अशी होती भगवानांची अथांग मैत्री. भगवानांच्या जीवनातील वरील घटनांपासून आम्हाला शिकवण व प्रेरणा घेतली पाहिजे. कोणी आमची हजार निंदा करो जर त्या निंदेत सत्य असेल तर तत्काळ आपल्याला सुधारावे. अन्यथा अत्यंत घोर निंदेतही अविचलित राहून निंदकांच्या प्रती यथाशक्ती मंगल मैत्रीचेच प्रसारण करावे.*_

_*आजच्या व भविष्यातील धर्माचार्यांनी हे ध्यानात ठेवायला हवे की कोणीहि देवदत्त कोणत्याही विशिष्ट स्थितीला प्राप्त झाल्यावर ती कायम ठेवण्यासाठी अथवा प्राप्त झाली नसतांना तिला प्राप्त करण्यासाठी कोणतेही दुष्कर्म करो, परंतु साधकांनी ह्यामुळे थोडेसेही विचलित होऊ नये. न कोणत्या राजकीय शक्तीमुळे भयभीत व्हावे आणि न कोणत्या धनी व्यक्तीमुळे प्रभावित होऊन विचलित व्हावे. सहिष्णुता कायम राही. धैर्य कायम राहो आणि मंगल मैत्रीच जागृत होत राहो.*_

_हाच धर्माचा संदेश आहे. हेच करणीय आहे, ह्यातच सर्वांचे मंगल सामावलेले आहे! सर्वांचे कल्याण सामावलेले आहे!_

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २१/१२/२०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

No comments:

Post a Comment

योग

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_योग_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_19.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _भगवंतांनी संबोधी मार्गा...