🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_कुर्बानी म्हणजे फक्त पशुबळी देणे ?_*
*_- मोहम्मद सुलेमान (एप्रिल १९९७)_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_बकरी ईदची नमाज रमजान ईदच्या नमाजापेक्षा लवकर होते. कारण कुर्बानी असते. कुर्बानी म्हणजे पशुबळी देणे. हा *बळी देण्याचा कार्यक्रम नमाजनंतर होतो म्हणून नमाज लवकर.*_
_*आमच्या समाजात किती लोक कुर्बानी देतात? आणि कुर्बानी देण्याच्या अंधश्रद्धेतून हा समाज केव्हा बाहेर येणार?* पैसेवाल्या मुसलमानांनी या प्रथेला किळसवाणे स्वरूप आणले आहे. ईदपूर्वी बकरी खरेदी करून त्यांचे प्रदर्शन करणे, बकऱ्यांच्या किमतीत चढाओढ लागलेली असते व इतके सर्व करून मटणातील तिसरा हिस्सा नातेवाईक व मित्रांना वाटणे म्हणजे झाली कुर्बानी. मौलाना नमाजानंतर प्रवचनात सांगत होते, बावण्णतोळे चांदी किंवा सव्वा दोन तोळे सोने ज्यांच्या जवळ असेल, त्या प्रत्येकाने कुर्बानी केली पाहिजे, पशूचे रक्त वाहिले पाहिजे._
_*चौदाशे वर्षांपूर्वी सुरू झालेली ही प्रथा म्हणजे अंधश्रद्धा होय.* आजच्या विज्ञान युगात या प्रथा बंद होण्याऐवजी मौलाना आता उजळ माथ्याने प्रचार करत असतात व ज्याच्या नावाने बळी द्यायचा, त्याने आपल्या हाताने पशूच्या गळ्यावर सुरी फिरवावी, मग फार पुण्य मिळते, असल्या भाकड कथा सांगत असतात._
_*यात्रेत होणाऱ्या पशुबळीविरुद्ध 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'ने आघाडी उघडली आहे. ती स्वागतार्ह आहे. त्याचबरोबर ईदच्या निमित्ताने होणाऱ्या पशुबळी विरुद्ध आंदोलन उभे करून मुस्लिम समाजात जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.*_
_आज ईदचा दिवस; पण शीरखुर्मा खाल्ला, खिलवला जातो, मिठाई वाटली जाते आणि दुरावलेले मित्र एकमेकांना स्नेहभावाने कडकडून अलिंगन देतात, ती ईद नाही. आजची ईद काही वेगळीच आहे. पहाटे उठून कसाई लोक आपापल्या सुऱ्या, कुऱ्हाडी परजून घेतात आणि जास्तीत जास्त पशुंचा जीव घेण्याच्या तयारीला लागतात. तसे पाहू गेल्यास बळीच्या व्यक्तीला ती व्यक्ती एकटी कापू शकते. पण मोठ्या पशूमध्ये सात भागीदार एकत्र येऊन बळी देतात. बोकड, शेळी, मेंढी इत्यादी पशुंमध्ये फक्त एकाच व्यक्तीचा वाटा असतो आणि एकटी व्यक्ती एक पशू कापते. आज या पशूंना कापण्याचा दिवस आहे, हाच बळीचा दिवस. साधारण बोलाचालीच्या भाषेत ही 'खारी ईद' ही आहे. एका पशूला सात माणसं मिळून बळी देतात म्हणून पशूचे सातही मालक 'इजराईल' (जीव घेणारे देवदूत) आले आहेत. ठळकपणे हे सांगता येईल की, आज प्रत्येक मुसलमान रक्त वाहण्यासाठी ठामपणे उभा आहे. हे रक्त वाहवणे आणि पशुंना (हलाल करून) गळा कापून मारण्याला ते कुर्बानी मानतात आणि हे पुण्य कृत्य समजतात. घराच्या ज्या खोलीत मी बसलो आहे, त्याच्या मागे परसदारी थोडी रिकामी जागा आहे. सूर्य उगवण्यापूर्वीच कसाई आपल्या परजलेल्या सुऱ्या आणि कुऱ्हाडीसोबत इथे पोचले आहेत. ही जागा गावाच्या मधोमध आहे. आपल्या पशुंना अखेरच्या पाण्याचा घोट पाजून पाजून 'कुर्बानी देणारे लोक' इथे येऊ लागले आहेत. पहाटेचा गार वारा आणि शुद्ध वातावरण माझ्यासारख्या आळशी माणसाला ताजेपणा आणि स्फूर्ती देत आहे. म्हणून मी खिडक्या जास्तीत जास्त उघड्या ठेवतो. रात्रीच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांना सकाळी-सकाळी नकळत कोण माझ्या सोबत सोडविण्याचा प्रयत्न करतोय म्हणून आजही खिडक्या उघड्याच आहेत._
_*अजून एक पशू आला आहे. कसायाने आपल्या शबनममधून सुरीबरोबर नायलॉनची एक लांबी दोरी बाहेर काढली आणि तो पशूजवळ आला. पशूच्या मालकांनी पशूचा दोरखंड कसायाच्या हाती दिला. कसायाने पशूचा जबडा जोराने पकडला आणि सायकलच्या हँडलसारखा असा जोरात हिसडा दिला की, पशू धाडकन जमिनीवरच आदळला. सर्व परंपरेनुसार बळी देणाऱ्या लोकांचे पशूजवळ असणे महत्त्वाचे असते. त्यामुळे पशू जमिनीवर पडल्यामुळे त्या सर्वांनी त्याला दाबून धरले. कसायाने लगेच नायलॉनच्या लांब दोरीने पशूचे चारही पाय एकदम मजबूत बांधून टाकले. पशूने उठण्याचा प्रयत्न केला; पण व्यर्थ. काहीच उपाय नव्हता. कारण की चारही पाय बांधले गेले होते. असहायपणे पडलेल्या पशूने प्रेम आणि करुणेने जवळ उभ्या असलेल्या त्या सर्वांना पाहिले. त्यांचे चेहरे मानवी होते आणि ते आपल्याला (अश-र-फुल मख्लूकात) दहा, जगातल्या सर्व गोष्टी सांगण्याचा दावा करतात. सगळ्यांकडून दयेची भीक आणि जिवाचं दान मागत पशूने सांगितलं, "मी तुमचा नांगर हाकतो, बग्गी ओढतो, तुमच्या सोबत राहतो, तुम्ही मला का मारता आहात?" कोणीच पशूचे ऐकले नाही आणि म्हणाले - "आम्ही यात काहीच करू शकत नाही, हा तर देवाचा हुकूम आहे." पशूने आपल्याला सकाळपर्यंत चारा-पाणी देणाऱ्या मालकाचा शोध घेतला. पण आज त्यानेही आपले तोंड वळवून घेतले होते.*_
_घ्या, ते मुल्लाजी आहेत. त्यांना सुरीने गळा कापतेवेळी अल्लाहचे नाव घ्यायचे आहे. *मुल्लाजीने जेव्हा कसायाच्या हातून सुरी आपल्या हातात घेतली, तेव्हा पशूने मुल्लाजीला पाहिले आणि डोळ्यातल्या डोळ्यात फिर्याद करत सांगितले- 'तुम्ही तर देवाचे खास प्रतिनिधी, देवदूत आहात ना? काय तुम्हीही माझ्यावर कृपा करणार नाही? कारण देवाचा गुण (रहीम व करीम आहे) हे तर तुम्ही जाणताच ना?'*_
_मुल्लाजीने पशूची भावना जाणून उत्तरादाखल सांगितले- "हे तर मला माहीत आहे की, देव रहीम व करीम आहे; पण काय करू, हा माझ्या पोटाचा सवाल आहे. जर मी तुला सोडून दिले, तर कायमस्वरुपी मुला-बाळांचा रोजगार बंद होऊन जाईल." *मुल्लाजींची गोष्ट ऐकून पशूच्या डोळ्यात दोन मोठमोठी आसवं तरळली. त्याचा आज कोणीच वाली आणि दुःखात सहभागी होणारा नव्हता. पण त्याला आनंद वाटला की, आपला बळी दिल्यामुळे आपण मुलांच्या मोठ्या टोळीचे पोट भरण्याच्या कामी येऊ शकू. त्याने शेवटचा आणि लांब उसासा घेतला. इतका लांब की, त्यात साऱ्या जगाचं दुःख सामावलं जावं.*_
_कसायाने पशूचे डोके उलटे करून टाकले, त्याचे डोळे खाली जमिनीत गाडले केले आणि मान वरच्या बाजूला ताठर झाली. मुल्लाजींनी सुरी मानेवर ठेवली आणि जोरात म्हटलं, "बिस्मिल्ला हि अल्लाहु अकबर" आणि सुरीचे तीन असे हिसडे दिले की, मानेचा अर्धा भाग कापला गेला. जितकं रक्त होतं, लाल कारंज्यासारखं शरीरातून बाहेर आलं. जवळ उभ्या असलेल्या बळी देणाऱ्या लोकांमधून एकाने सांगितले "पशू फार मोठा आहे, बरीच चरबी आहे." दुसऱ्याने सांगितले, "एक वर्षापासून धान्य आणि चांगले गवत खात होता." नवे आणि भडक कपडे घातलेली मुलं ओरडत होती, "अहा, आमचा पशू कापला गेला, आता याची कलेजी खाऊ."_
_*माझ्या घरात बसल्या बसल्या हा चौथा पशू कापला जाताना मी बघत होतो. सर्व पशुंनी आपला बळी देणाऱ्या अलिखान बहादूरजवळ कृपेची दाद-फिर्याद मागितली; पण कोणीही त्याचं काहीएक ऐकलं नाही. रस्त्यावरील आपल्या अधिकारात देवाचं नाव घेत त्या सर्वांना मारून टाकलं गेलं. जेव्हा पाचवा पशू आणला, तेव्हा तर माझी त्याला पाहायची हिम्मत झाली नाही.*_
_ज्या खिडक्यांमधून दोन तासांपूर्वी सुखद आणि मोहक हवा येत होती, आता पशूच्या रक्त आणि मासांच्या दुर्गंधीने माझी खोली भरली होती, जिथे वृक्षावर काही तासांपूर्वी बुलबुल, कोकीळ आणि चिमण्या आपल्या चिवचिवाटाने आणि गाण्यांनी वातावरणात ताजेपणा भरत होत्या, आता शेकडो कावळे आणि खूप घारी, गिधाडे मांसाच्या बोटीसाठी आपापसात भांडत होती पाहता-पाहता त्या सुंदर जागेचे वातावरण स्मशानघाटात बदलून गेले आणि बुलबलांची, कोकिळांची जागा कावळे, घारी आणि गिधाडांनी घेतली. या दृश्यापासून स्वतःला वेगळे करण्यासाठी मी खिडकी बंद केली आणि त्यावर पडदाही टाकला. सायंकाळी कळले की, आज पंधरा पशू कापले गेले आहेत._
_खिडकी बंद करून मी स्वतःला या पशूपासून दृष्टीआड करून घेत होतो. पण मन, हृदय आणि मस्तक अजूनही त्या पशूच्या आत्म्याबरोबर भरकटत होतं. मी पशूच्या आत्म्याबरोबर दूरस्थ आकाशातील शून्यात हरवून गेलो आणि विचार करू लागलो. इतका काळ लोटल्यावरही पशूंना बळी देण्याची प्रथा मुसलमानांमध्ये जशीच्या तशी जिवंत आहे, याचं कारण काय असावं? मुसलमान या प्रथेला का साजरी करतात? पण ते दुसऱ्यांना असे करण्यापासून परावृत्त करतात का? ही प्रथा खोटी आहे की, यात काही सत्यता आहे?"_
_या प्रश्नांचं मंथन करत-करत मी अरब राष्ट्राच्या भूतकाळात जाऊन पोचलो. त्याकाळी तिथे राहणारे आपल्या घराण्याचा व समाजाच्या मनोकामनेच्या पूर्ततेसाठी आपल्या मूर्तीच्या (ज्यांना ते आपले देव मानत होते) नावांवर, त्यांच्यासमोर, आपल्या एकुलत्या एका (ज्येष्ठ) मुलाचा व मुलीचा बळी देत होते. भारतात आजही एखाद-दुसऱ्या स्थानावर लपून-छपून ही प्रथा पाहिली जाऊ शकते आणि वर्तमानपत्रात वाचायला मिळतं की, अमक्या-अमक्या ठिकाणी अमक्या व्यक्तीने आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी एका मुलाचा बळी दिला._
_अरब राष्ट्रात ही प्रथा सुरू होती, त्याच लोकांमध्ये एक हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जन्माला आले. लोकांनी त्यांनाही आपल्या पूर्वजाप्रमाणे आपला मुलगा हजरत इस्माईलचा बळी देण्याची गोष्ट सांगितली. जेव्हा ते आपला मुलगा हजरत इस्माईलचा बळी देऊ लागले, तेव्हा त्यांनी या प्रथेत मोठ्या क्रांतिकारी परिवर्तनाची घोषणा केली. ते म्हणाले होते, 'मनुष्याच्या ऐवजी आजपासून पशुबळी दिला जाईल आणि हा बळी मूर्तीच्या नावावर न दिला जाता, देवाच्या नावावर दिला जाईल, या घोषणेने हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम यांनी मनुष्यांना बळी द्यायची प्रथा थांबवून माणसाचे रक्षण केले होते. त्यांच्याच काळापासून ही बळीची प्रथा सुरू आहे. नुकताच मी अरबातील वाळवंटात इराण, मिस्त्र, इराक, जॉर्डन आणि सीरियाच्या पर्वत प्रदेशांमधून हिंडत होतो. यादरम्यान मनात प्रश्न उभा ठाकला. यहुदी आणि ख्रिश्चन लोक तर मुसलमानांच्या आधीचे आहेत आणि हजरत इब्राहिमला ते नबी मानतात; मग ते इब्राहिम अलैहिस्सलामच्या प्रथेला का साजरी करीत नाहीत? मी परत विचाराच्या गर्तेत हरवून गेलो. तेव्हा माझ्या प्रश्नांचं उत्तर असे मिळाले की, यहुदी आणि ख्रिश्चन हजरत इब्राहिमचा पुत्र मोहम्मद इसाकची लेकरे आहेत. इसाकला बळी दिले गेले नाही, याच कारणास्तव ते लोक या प्रथेला साजरी करीत नाहीत._
_हजरत मोहम्मद सल्लललाहू अलैहि वसल्लम, हजरत इस्माईलच्या मुलांपैकी आहेत. त्यांना बळीसाठी घेऊन गेले होते. याच दरम्यान एका प्रश्नाने मला घेरले, "हजरत मोहम्मद स.ने या बळी प्रथेवर एवढा भर का दिला? आता मी हजरत मोहम्मद स. च्या अरब राष्ट्राला खोलवर पाहू लागलो, तर ध्यानात आले की, ज्यावेळी हजरत मोहम्मद साहेब मानवता आणि एकेश्वरवादाचा प्रचार करीत होते, त्यावेळीही तिथले निवासी मूर्तीसमोर मुलांचा आणि माणसांचा बळी देऊ लागले होते आणि मुलींना जिवंत जमिनीत पुरू लागले होते. या वाईट प्रवृत्तींचा त्यांनी जोरदार मुकाबला केला आणि आपल्या अनुयायांना (मुसलमानांना) सांगितले, "तुमचा धर्म तुमचा पिता हजरत इब्राहिमच्या आधारावर आहे." याप्रकारे जेव्हा हजरत मोहम्मद स.ने आपल्या लोकांना समजावले, तेव्हा त्यांनी मनुष्याचा बळी देणे आणि मुलींना जिवंत जमिनीत पुरण्याऐवजी त्यांचे रक्षण करण्यासाठी पशुबळींवर भर दिला. त्यामुळे मनुष्याच्या आणि मुलींच्या जीवाचे रक्षण झाले आणि हजरत इब्राहिम अ. ची ही प्रथा दुसऱ्यांदा जिवंत झाली. आजतागायत जिवंत आहे._
_याच प्रश्नांच्या घुसळणीला माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला, "काय, आज सुद्धा ही प्रथा उचित आहे? धर्म आणि श्रद्धेनुसार असा विचार करणे योग्य मानले जात नाही; पण आमचे युग हे विज्ञान आणि बौद्धिकतेकडे झुकणारे आहे. त्यामुळे माझ्या मनाने उत्तर दिले, "ही प्रथा उचित नाही." परत प्रश्न निर्माण झाला, 'उचित का नाही?' "जगातील करोडो मुसलमानांनी या प्रथेला, श्रद्धेला पवित्रतेची मान्यता तर देऊन ठेवली आहे ना?" मनात प्रश्न उसळला, "जुन्या श्रद्धेच्या आधारावर उचित मानणे, हा काही सत्याश्रित विचार नाहीच मुळी. आज मनुष्य आपल्या विचारांना आणि श्रद्धेला विज्ञानाच्या कसोटीवर पारखून मानव समाजासाठी एक जसा मार्ग शोधतो आहे, त्यात हिंसा आणि क्रूरतेचा काहीच मागमूस नसावा. म्हणून ती स्थिती प्राप्त करण्यासाठी है चांगले मानले जाऊ लागले आहे की, पशुंनाही मारले जाऊ नये आणि विशेषतः देवाच्या नावावर तर मुळीच नको. कारण पशूना बळी देण्याआधी माणसांना बळी दिले जात होते. त्यांना थांबविण्यासाठी पशुंची योजना करण्यात आली. आता वेळ आली आहे की, पशुंच्या संरक्षणाच्या संबंधातही विचार केला जावा."_
_*सध्या बळी देण्याच्या प्रथेत बदल होत आहे, जी कोणत्याही कायद्याशिवाय किंवा सुधार आंदोलनाशिवाय स्वतःच मुस्लिम समाजात हळूहळू जोर धरू लागली आहे. बळी देणारी व्यक्ती पशूचा बळी न देता त्या पशूची बाजारातील जी किंमत आहे, ती रोख स्वरुपात एखाद्या मौलवी, मुल्ला किंवा अरबी पाठशाळेत पाठवून देते. ही प्रथा हळूहळू वाढत चालली आहे.*_
_माझे एक मित्र आहेत. चांगल्या संपन्न घरचे आहेत. घरचा कारखाना आहे. त्याने पशूची किंमत रोख स्वरुपात अरबी शाळेत पाठविली. मी त्यांना विचारले, "आपल्या हाताने पशूचा बळी दिल्याने कित्येक पट पुण्य लाभते, असा समज आहे; पण तुम्ही बळी न देता रोख पैसे दान केलेत, याचे कारण काय आहे?" माझ्या या प्रश्नावर त्यांचे उत्तर होते "आता कसला बळी आणि कसले पुण्य? हा तर आता मौलवी, मुल्लांचा रोजगार मिळविण्याचा एक मार्ग मात्र उरला आहे. आपल्याला त्यांची मदत करावयाची आहे. हा फायदा आहे की, ते ऐंशी टक्के गरीब मुसलमानांपासून आमचे रक्षण करतात. जोपर्यंत हा पडदा आहे, तोपर्यंत सर्व आलबेल आहे."_
_आपल्या मित्राच्या स्पष्टीकरणाने मला हसू आले आणि याच हलक्या- फुलक्या वातावरणात मी विचारले, "तर हे सांगा ना की, हे मुल्ला, मौलवी श्रीमंतांकडून गरिबांना आपला अधिकार मागण्यापासून रोखण्यासाठी कवच आणि ढालीची आवश्यकता, तर त्यावेळी लागते, जेव्हा लढाईच्या मैदानात तलवार किंवा भाला उचलला जातो. गरिबांना तर ते (मौलवी) मैदानापर्यंत येऊसुद्धा देत नाहीत."_
_आपल्या मित्राची गोष्ट ऐकून मी परत आपल्या खोलीत परतलो आणि प्रश्नोत्तरांच्या खोल गर्तेत बुडालो, याच परिस्थितीत माझा डोळा लागला. यादरम्यान अचानक मला एक आवाज ऐकू आला,_
_"या सर्व रसूम (कर शुक्ल) आणि अकायद यांच्याशी मनुष्य बांधील आहे. समाजाच्या संघटनेची आवश्यकता आणि तात्कालीन समस्यानुकुलतेला ध्यानी घेऊन आपल्या पूर्वजांनी हे सर्व ठरविले होते. आता काळ बदलला आहे. समाजाच्या गरजा बदलल्यात आणि या प्रथेची उपयोगिताही तेवढी राहिली नाही. यासाठी पुनर्विचार केल्यानंतर पशूचे रक्त सांडण्याऐवजी रोख पैसे दान केले जावेत व त्या पैशांना इकडे-तिकडे न विखरू देता संघटित स्वरुपात त्यापासून नवीन कारखाने आणि शाळा चालविल्या जाव्यात. असे करण्याने नव्या युगातील नवा समाज निर्माण होईल आणि मुस्लिम समाज प्रगतिपथावर पुढे जाईल. *मला विश्वास वाटतो की, समाजातील बुद्धिजीवी, विचारवंत आपल्या चिंतनाला अंधश्रद्धेच्या जाळ्यातून काढून बौद्धिकतेच्या भक्कम आधारावर उभे करतील आणि हरत-हेने मागासलेल्या गरीब मुस्लिम समाजाला उन्नतीच्या मार्गावर लावतील. हे काही धर्मविरोधी कार्य नाही आणि खरे म्हणजे धर्माचा खरा हेतू माणसाला उन्नत करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्याचे तर आहे.*_
*_संदर्भ :-_*
_*१) खंड ३, पुस्तक ४ - समग्र अंधश्रध्दा निर्मूलन, 'अंनिवा'तील निवडक लेख, अंधश्रद्धांचा विळखा*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment