🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन_*
*_डॉ. नरेंद्र दाभोलकर_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/blog-post_30.html
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_भाग ११_*
*_हरितालिका व्रताचे सत्य_*
_म्हणजे एके ठिकाणी बोलत असताना मी म्हणालो की, *"तसा माझा व्रतवैकल्यांना विरोधच आहे, पण जर हरितालिकेचं व्रत मुलींनी केलं, तर मला ते तितकंसं अयोग्य वाटत नाही".* मग अर्थातच लोकांना आश्चर्य वाटलं. मी म्हणालो, "हरितालिकेच्या व्रताची कथा कुणाला माहिती आहे सांगा?" पुन्हा तीच गोष्ट चांगला नवरा मिळण्यासाठी आपल्या लग्नाच्या मुलीला सगळ्या बायका हरितालिकेचं व्रत करायला लावतात. पण व्रत काय आहे? व्रत असं आहे की, प्रजापिता ब्रह्माची मुलगी पार्वती उपवर झाली. तिला लग्न करायचं होतं शंकराशी. शंकर बसला होता कैलासावर. लग्न करायला तो अजिबात तयार नव्हता. त्यामुळे तिने स्वतःला जाळून घेतलं आणि जीव दिला._
_दुसऱ्या जन्मी ती पुन्हा प्रजापिता ब्रह्माच्या पोटीच जन्माला आली. पुन्हा उपवर झाली. ती अतिशय सुंदर होती. एकदा त्रिखंडात संचार करणारा नारद ब्रह्माकडे आला, त्या वेळी ब्रह्माने नारदाला विचारलं, "नारदा, माझी मुलगी अतिशय सुंदर आहे; उपवर आहे. तिला एक चांगला नवरा सुचव" नारदाने सुचवलं, "तुझ्या मुलीला त्रिखंडामध्ये एकच नवरा आहे आणि तो म्हणजे, शेषशायी विष्णू भगवान". त्याप्रमाणे ब्रह्माने पार्वतीचं लग्न शेषशायी विष्णू भगवानाशी करायचं ठरवलं. हे लग्न ठरवलेलं ज्या वेळी पार्वतीला कळलं, त्या वेळी पार्वती स्वतःच्या मैत्रिणीला घेऊन घरातनं निघून गेली. ती जंगलामध्ये नदीच्या काठी गेली. तिने वाळूचं शिवलिंग केलं. शिवाची आराधना सुरू केली. मग जो शंकर कैलासावर होता, त्याला करंट गेला की, 'आता काही खरं नाही!' शंकर आला. शंकर आणि पार्वती यांचं मीलन झालं._
_*हरितालिका - हरित म्हणजे वन आणि आलि म्हणजे सखी. सखीला घेऊन वनात जाऊन केलेलं व्रत, ते 'हरितालिका व्रत'. आता हे सगळं चांगला नवरा मिळण्यासाठी लग्नापूर्वी करावं, असं जर या उपवर मुलींना घरी सांगितलं जात असेल, तर हे व्रत असं सांगतं की, मुलीला ज्याच्याशी लग्न करावंसं वाटेल, त्याच्याशी लग्न करायला जर घरच्यांनी विरोध केला, तर स्वतःच्या मैत्रिणीला घेऊन तिने घरातनं निघून जावं आणि ज्याच्याशी तिला लग्न करावंसं वाटतंय, त्याच्याशीच लग्न करावं. असं नुसतं म्हटलं, तरी शास्त्र महाविद्यालयातल्या मुलीदेखील अवाक होऊन किंवा हसून पाहत राहतात. याचं कारण, तुमच्या जाणिवा प्रगल्भ, उन्नत आणि चिकित्सक झाल्या पाहिजेत, हे जे शिक्षणाचं मुख्य प्रयोजन आहे, ते आजमावण्याची संधी स्त्री वर्गाला फार कमी मिळालेली आहे.*_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :-०२/०४/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - लेखक डॉ नरेंद्र दाभोळकर*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment