🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_महापरिनिब्बानसुत्त_*
*_दुस्सीलआदीनवा_*
*_(शील न पाळण्याचे दुष्परिणाम)_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_१४८. *नालंदात इच्छेनुसार वास्तव्य केल्यानंतर भगवान आयुष्यमान आनंदला म्हणाले- "चल, आनंद! जेथे पाटलिग्राम आहे, तेथे जाऊ!"* “होय भंते,” असे आयुष्यमान आनंदने भगवंतांस उत्तर दिले. पाटलिग्रामच्या उपासकांना समजले की, भगवान पाटलिग्राममध्ये आले आहेत तेव्हा ते उपासक जेथे भगवान होते तेथे गेले. भगवंतांना अभिवादन करून ते एका बाजूस बसले. एका बाजूस बसलेले उपासक भगवंतांस म्हणाले,- "भंते! भगवान, आमच्या अतिथीगृहात येण्याचे आमंत्रण स्वीकारावे. " या आमंत्रणाचा भगवंतांनी मौनपणे स्वीकार केला._
_पाटलिग्रामच्या उपासकाचे अतिथीगृहात येण्याचे आमंत्रण भगवंतांनी स्वीकारले आहे हे ओळखून तेथून ते उठले, भगवंतांना अभिवादन करून त्यांना प्रदक्षिणा घालून अतिथीगृहाला गेले. तेथे जाऊन त्यांनी अतिथीगृहाच्या आत चारी बाजूंना बिछाना अंथरला. भगवंतांकरिता आसन तयार केले, पिण्याच्या पाण्याची सोय केली. तेलांचे दीप लावून भगवंतांना वंदन करून एका बाजूला उभे राहिले._
_एका बाजूला उभे असलेले पाटलिग्रामचे उपासक भगवंतांस म्हणाले, "भंते! अतिथीगृहाच्या चारी बाजूंना बिछाना अंथरला आहे, आपणाकरिता आसन लावले आहे. भंते! भगवान जे योग्य ते करा!"_
_भगवान सायंकाळी भिक्षापात्र हातात घेऊन, भिक्षुसंघासह आवसथागार (अतिथीगृह) गेले. ते तिथे गेल्यानंतर त्यांनी पाय धुतले. त्यानंतर आवसथागारात (अतिथीगृहात) प्रवेश केला. भगवान मध्यभागी असलेल्या खांबाला पाठ टेकून पूर्व दिशेला तोंड करून बसले. पाटलिग्रामचे उपासकदेखील पाय धुवून पूर्व दिशेला पाठ करून, पश्चिमेकडे तोंड करून भगवंतांसमोर बसले._
_१४९. तेव्हा भगवान पाटलिग्रामच्या उपासकांस म्हणाले, "हे गृहपतींनो! शीलवान मनुष्य दुःशील झाला तर त्याला पाच परिणामांना सामोरे जावे लागते. ते पाच परिणाम कोणते? तर गृहपतींनो,_
_*(१) पहिला परिणाम शीलापासून दुरावलेला मनुष्य आपली संपत्ती हरवून बसतो.*_
*_(२) दुसरा परिणाम वाईट शीलाचे अपयश सर्वत्र फैलावते._*
*_(३) तिसरे, वाईट शीलाचा मनुष्य कोणत्याही सभेत जावो, मग ती ब्राह्मणांची असो, ती क्षत्रियांची असो, ती गृहपतींची अथवा श्रमणांची असो, तो तेथे भयभयभीतपणे घाबरून चुपचाप बसतो._*
*_(४) चवथा परिणाम बहुशीलांचा माणूस बेहोशीत मरण पावतो._*
*_(५) तद्नंतर तो मनुष्य मेल्यानंतर त्याला सुगती प्राप्त होत नाही हा आहे पाचवा परिणाम._*
*_अशा तऱ्हेने हे गृहपतींनो, केवळ शील नसेल तर, चांगले शील नसेल तर, माणसाला ह्या पाच परिणामांना भोगावे लागते. "_*
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०१/१०/२०२३_*
*_संदर्भ :- सुत्तपिटक - दिघनिकाय - महावग्गपाळी - महापरिनिब्बानसुत्त - दुस्सीलआदीनवा_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2023/09/blog-post_80.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment