Saturday, 23 September 2023

धम्मचक्कपवत्तन मराठी

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_धम्मचक्कप्पवत्तन सुत्तं_* 

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_* 

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


 त्या भगवंताला, अर्हताला, सम्यकसम्बुध्दाला नमस्कार असो 


मी असे ऐकले आहे की, एके समयी भगवान बध्द वाराणसी येथे ऋषिपतन नावाच्या मृगदाय उद्यानात राहात होते. तेथे एकदा भगवन्तानी पंचवर्गीय भिक्षूंना उद्देशून म्हटले :-

भिक्षुहो, प्रवजिताने हे दोन आत्यन्तिक मार्ग टाळावे. कोणते दोन मार्ग ? काममुखात लोळत राहणे हा हीन, ग्राम्य, सर्वसामान्य माणसांनी अवलंबिलेला अनार्य (असभ्य) व अनर्थकारक असा पहिला मार्ग (अन्त) आणि देहदण्ड करण्याचे व्रत ज्यात आहे असा दुःखदायक, अनार्य आणि अनर्थकारक असा दुसरा मार्ग. भिक्षुहो, हे दोन्ही अंतिम स्वरूपाचे आत्यंतिक मार्ग न अनुसरता (स्विकारता) उपशम, अभिज्ञा (उच्च ज्ञान व शक्ती) संबोधी आणि निर्वाणाकडे घेऊन जाणारा योग्य दृष्टी व ज्ञान प्रदान करणारा मध्यम मार्ग तथागत बुध्दाने शोधून काढला आहे.



जो सुयोग्य दृष्टी व ज्ञान प्रदान करणारा मध्यम मार्ग तथागत बुध्दाने शोधून काढला आहे. जो सुयोग्य दृष्टी व श्रेष्ठ ज्ञान प्रदान करून उपशम, अभिज्ञा, संबोधी व निर्वाण प्राप्त करून देण्यास कारणीभूत होतो.

हे भिक्षुहो, कोणता तो मध्यम मार्ग जो तथागताने शोधून काढलेला आहे. जो सुयोग्य दृष्टी व श्रेष्ठ ज्ञान प्रदान करून उपशम, अभिज्ञाला, संबोधीला आणि निर्वाण प्राप्त करून देण्यास कारणीभूत होणारा दृष्टीदायक मार्ग आहे.

हाच तो आर्य अष्टांगिक मार्ग उदाहरणार्थ: सम्यक् (योग्य) दृष्टी, सम्यक् संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीव (आजीविकेचे साधन), सम्यक व्यायाम (प्रयत्न), सम्यक् स्मृती आणि सम्यक् समाधी.

भिक्षुहो, तथागत बुध्दाने हाच तो उपशम, अभिज्ञा, संबोधी आणि निर्वाण प्राप्त करून देण्यास कारणीभूत होणारा श्रेष्ठ दृष्टी आणि ज्ञान प्रदान करणारा मध्यम मार्ग शोधून काढला आहे.

भिक्षूंनो, दुःखाचे अस्तित्व हे एक आर्य (सनातन) सत्य आहे. जन्म दुःखदायक आहे. वृध्दत्व (जरा) दुःखदायक आहे. व्याधी दुःखदायक आहे. आणि मरण हे ही दुःखदायक आहे. अप्रिय व्यक्तींचा सहवास व प्रिय व्यक्तींची ताटातूट (वियोग) दुःखदायक आहे. इच्छित वस्तू प्राप्त होत नाही ते दुःखदायक असते. थोडक्यात, म्हणजे पाच उपादान स्कंध (रूप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान) दुःखदायक आहेत.

भिक्षुहो, हे दुःखसमुदाय आर्यसत्य आहेत. ही जी तृष्णा पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी (जन्मप्राप्त करणारी) अनेक विषय भोगात रंगणारी जेथे तेथे सुख शोधणारी लोभयुक्त तृष्णा, उदाहरणार्थ कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा (विनाशतृष्णा)

भिक्षुहो, दुःखाचा निरोध हे सुध्दा एक आर्यसत्य आहे. तो निरोध म्हणजे (वर वर्णन केलेल्या) तृष्णेचा संपुर्ण विरागाने (वैराग्याने अनासक्तीने) निरोध, त्याग, प्रतिनिसर्ग (अस्विकार), मुक्ती आणि अनासक्ती तेच हे (दुःखनिरोधाचे) आर्यसत्य.

भिक्षुहो, दुःखनिरोधगामी मार्ग (अस्तित्वात असणे) हे पण एक आर्यसत्य आहे, तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय. तो आर्य अष्टांगिक मार्ग कोणता ? सम्यक् दृष्टी, सम्यक् संकल्प, सम्यक् वाचा, सम्यक् कर्म, सम्यक आजीव (आजीविका), सम्यक् व्यायाम (प्रयत्न), सम्यक् स्मृती व सम्यक् समाधी.

भिक्षुहो, हे दुःख एक आर्य सत्य आहे. असे जाणवल्यावर मला पुर्वी न ऐकलेल्या धर्माचे दर्शन झाले, ज्ञान मिळाले, प्रज्ञा प्राप्त झाली. विद्या लाभली व (डोक्यात) प्रकाश पडला. हे दुःख आर्यसत्य जाणण्यास योग्य आहे. (असे समजल्यावर) मला पूर्वी ऐकण्यास न मिळालेल्या धर्माचे दर्शन झाले, ज्ञान मिळाले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली व (माझ्या डोक्यात ज्ञानाचा) प्रकाश पडला. हे दुःख आर्यसत्य जाणण्यास योग्य आहे, (असे समजल्यावर) मला पुर्वी ऐकण्यास न मिळालेल्या धर्माचे दर्शन झाले, ज्ञान मिळाले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली व (माझ्या डोक्यात ज्ञानाचा) प्रकाश पडला.

भिक्षुहो, दुःखाच्या उत्पत्तिस्थानाचे (समुदयाचे) अस्तित्व असते (आहे). हे आर्य सत्य समजल्यावर मला पुर्वी न ऐकलेल्या धर्माचे दर्शन (धर्माची दृष्टी) मिळाले, ज्ञान लाभले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या हाती आली आणि (माझ्या डोक्यात ज्ञानाचा) प्रकाश पडला. दुःखाच्या उत्पत्तीचे कारण हे जे आर्यसत्य आहे. त्याच्या त्याग केला पाहिजे. (असे समजल्यावर) पूर्वी कधीही न ऐकलेल्या धर्माचे मला दर्शन झाले, ज्ञान लाभले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली आणि (माझ्या डोक्यात ज्ञानाचा) प्रकाश पडला. या दुःखाच्या उत्पत्तीच्या कारणासंबंधी आर्यसत्याचा मी त्याग केला आहे. (असे समजल्यावर) पुर्वी न ऐकलेल्या धर्माचे मला दर्शन झाले. ज्ञान लाभले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली आणि (माझ्या डोक्यात ज्ञानाचा) प्रकाश पडला.

भिक्षुहो, या दुःखाचा निरोध (नाश) होऊ शकतो. हे आर्य सत्य समजल्यावर मला पुर्वी न ऐकलेल्या धम्माचे दर्शन झाले, ज्ञान लाभले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या हाती आली आणि माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला. या दुःखनिरोधाचे आर्य सत्य प्राप्त करून घेण्यास साध्य करण्यास योग्य आहे. असे समजल्यावर मला पूर्वी न ऐकलेल्या धम्माचे दर्शन झाले, ज्ञान मिळाले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली आणि माझ्या (डोक्यात) ज्ञानाचा प्रकाश पडला. त्या दुःखनिरोध आर्यसत्याची मला सिध्दी प्राप्त झाली आहे, (असे समजल्यावर) मला पूर्वी न एकलेल्या धम्माचे दर्शन झाले, ज्ञान लाभले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली आणि (माझ्या डोक्यात ज्ञानाचा) प्रकाश पडला.

भिक्षुहो, या दुःखाचा निरोध (नाश) करण्याचा मार्ग अस्तित्वात आहे. हे आर्य सत्य (मला समजल्यावर) मला पुर्वी न ऐकलेल्या धम्माचे दर्शन झाले, ज्ञान लाभले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली आणि (माझ्या डोक्यात ज्ञानाचा) प्रकाश पडला. या दुःखनिरोधगामी मार्गाचे आर्यसत्याची मी अपेक्षा केली पहिजे (अंगिकारले पाहिजे- आत्मसात केले पाहिजे) (असे मला समजल्यावर) मला पुर्वी कधीही श्रवण न केलेल्या धम्माचे दर्शन झाले, ज्ञान प्राप्त झाले, प्रज्ञा मिळाली, विद्या लाभली व (माझ्या डोक्यात ज्ञानाचा) प्रकाश पडला. त्या दुःखानिरोधी मार्गाच्या आर्यसत्याची मी अपेक्षा केली आहे. (त्याला मी अंगिकारले आहे - आत्मसात केले आहे) (असे मला समजल्यावर) मला पुर्वी कधीही श्रवण न केलेल्या धम्माचे दर्शन झाले, ज्ञान प्राप्त झाले, प्रज्ञा मिळाली (लाभली), विद्या लाभली व (माझ्या डोक्यात ज्ञानाचा) प्रकाश पडला.


भिक्षुहो, जोपर्यंत मला या चार आर्यसत्यांविषयी प्रत्येकी तीन तन्हेची व एकंदर बारा प्रकारचे यथातथ्य (सुविशुध्द) ज्ञानदर्शन झाले नहीं तो पर्यंत देव, मनुष्य, मार, ब्रह्मदेव आणि श्रमण ब्राह्मण यांच्या जगात व देव आणि माणसांच्या समुदायात अनुत्तर (श्रेष्ठ) अशा सम्यक् संबोधीचा मला लाभ झाला, असे मला मनोमन वाटले नाही.

भिक्षुहो, पण जेव्हा मला या चार आर्यसत्याविषयीच प्रत्येकी तीन तऱ्हेची व एकंदर बारा प्रकारची सुविशुध्द व यथातथ्य ज्ञानदृष्टी प्राप्त झाली. तेव्हाच देव, मनुष्य, मार, ब्रह्मदेव, श्रमणब्राह्मणांच्या जगात व देव माणसांच्या समुदायात अनुत्तर (श्रेष्ठ) अशा सम्यक सम्बोधीचा मला लाभ झाला. असे मला मनोमन वाटले (अशी मला खात्री झाली.) तशी दिव्य ज्ञानदृष्टी पण मला प्राप्त झाली. मला प्राप्त झालेली चित्ताची विमुक्ती अक्षोभ्य (अविकंप) आहे, हा माझा शेवटचा जन्म आहे आणि आता यानंतर मला पुनर्जन्म प्राप्त होणार नाही (असे मी जाणले आहे)

भगवान असे म्हणले, पंचवर्गीय भिक्षूंनी सन्तुष्ट मनाने (मुदित चित्ताने) भगवन्तांच्या भाषणाचे अनुमोदन केले.

हे भाषण ऐकल्यावर आयुष्यमान कौंडण्याला जे काही उत्पन्न होणारे आहे. वे सर्व नाशवान आहे, अशी निर्मळ परिशुध्द धम्म दृष्टी उत्पन्न झाली.

(याप्रमाणे) भगवान बुध्दाने धर्मचक्र प्रवर्तत केल्यावर भूमीवर राहणान्या सद्गुरूषांनी असा आवाज उठविता "भगवान बुध्दाने वाराणसी जवळील ऋषीपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले की जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण देवता, मार किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरवले जाऊ शकत नाही. (किंवा जे धम्मचक्र यापुर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून जा यगामध्ये आजपर्यंत प्रवर्तित होऊ शकले नाही).'

भूमिवर राहणाऱ्या देवाचा (सद्पुरूषाचा) आवाज ऐकून चातुर्महाराजिक देवांनी (सद्पुरूषांनी) आवाज उठविला. भगवान बुध्दाने वाराणशी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की, जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही.

चातुर्महाराजिक देवाचा (सदपुरूषांचा) आवाज ऐकून त्रायंत्रिश देवांनी (सद्पुरूषांनी) आवाज उठविला. भगवान बुध्दाने वाराणशी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की, जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही.

तावतिसानं देवाचा आवाज ऐकून याम देवांनी आवाज उठविला. 'भगवान बुध्दाने वाराणशी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की, जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. 

याम देवांचा आवाज ऐकून तुषित देवांनी आवाज उठविला. भगवान बुध्दाने वाराणशी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की, जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही.

तुषित देवांचा आवाज ऐकून निर्माणरती देवांनी आवाज उठविला. 'भगवान बुध्दाने वाराणशी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की, जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही.

निर्माणरती देवाचा आवाज ऐकून परिनिर्मितवशवर्ती देवांनी आवाज उठविला (घोषणा केली). भगवान बुध्दाने वाराणशी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की, जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही. (किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही.)

परिनिर्मितवशवर्ती देवांचा आवाज ऐकून ब्रह्मपरिषद देवांनी आवाज उठविला (घोषणा केली). भगवान बुध्दाने वाराणशी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की, जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही. (किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही.)

ब्रह्मपरिषद देवांचा आवाज ऐकून परिनिर्मितवशवर्ती देवांनी आवाज उठविला (घोषणा केली). 'भगवान बुध्दाने वाराणशी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की, जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही. (किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही.)

ब्रह्मपुरोहित देवांचा आवाज ऐकून ब्रह्मपरिषद देवांनी आवाज उठविला (घोषणा केली). भगवान बुध्दाने वाराणशी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की, जे धम्मचक्र भ्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही. (किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही.)

महाब्रह्मा देवांचा आवाज ऐकून परिनिर्मितवशवर्ती देवांनी आवाज उठविला (घोषणा केली. 'भगवान बुध्दाने वाराणशी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की, जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही. (किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही.)

परिताभ देवांचा आवाज ऐकून ब्रह्मपरिषद देवांनी आवाज उठविला (घोषणा केली). भगवान बुध्दाने वाराणशी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की, जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही. (किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही.)

अप्रमाणभ देवांचा आवाज ऐकून परिनिर्मितवशवर्ती देवांनी आवाज उठविला. 'भगवान बुध्दाने वाराणशी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की, जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही. (किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही.)

परिसुत्ताभ देवांचा आवाज ऐकून ब्रह्मपरिषद देवांनी आवाज उठविला. भगवान बुध्दाने वाराणशी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की, जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही. (किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही.)

परिमुत्तभ देवांचा आवाज ऐकून परिनिर्मितवशवर्ती देवांनी आवाज उठविला. 'भगवान बुध्दाने वाराणशी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की, जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही. (किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही.)

अप्रमाणसुभ देवांचा आवाज ऐकून ब्रह्मपरिषद देवांनी आवाज उठविला. भगवान बुध्दाने वाराणशी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की, जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही. (किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही.)

सुभकिण्हक देवांचा आवाज ऐकून परिनिर्मितवशवतीं देवांनी आवाज उठविला. "भगवान बुध्दाने वाराणशी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की, जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही. (किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही.)

वेहप्फल देवांचा आवाज ऐकून ब्रह्मपरिषद देवांनी आवाज उठविला. भगवान बुध्दाने वाराणशी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की, जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही. (किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही.)

अविह देवांचा आवाज ऐकून परिनिर्मितवशवर्ती देवांनी आवाज उठविला. 'भगवान बुध्दाने वाराणशी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की, जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही. (किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही.)

अत्तण देवांचा आवाज ऐकून ब्रह्मपरिषद देवांनी आवाज उठविला. भगवान बुध्दाने वाराणशी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की, जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही. (किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही.)

सदस्य देवांचा आवाज ऐकून परिनिर्मितवशवर्ती देवांनी आवाज उठविला. 'भगवान बुध्दाने वाराणशी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की, जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही. (किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही.)

सुदर्शी देवांचा आवाज ऐकून ब्रह्मपरिषद देवानी आवाज उठविला. भगवान बुध्दाने वाराणशी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की, जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही. (किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. )

अशा प्रकारे त्याचवेळी आणि त्याच क्षणी हा आवाज ब्रह्म लोकांपर्यंत पोहोचला आणि दहा हजार ब्रह्मांडे डगमगली, कंप पावली, डळमळू लागली, देवतांच्या तेजापेक्षा महान तेजायमान असा विशाल प्रकाश जगात निर्माण झाला.

- त्यावेळी भगवंताने उद्गार काढले 'अहा ! कौण्डण्याने जाणले. खरोखर ! कौण्डन्याने जाणले !' या कारणामुळेच आयुष्यमान कोण्डन्याचे नाव 'अज्ञानकोण्डन्य' असे पडले. 

या सत्यवचनामुळे सर्वत्र नेहमी कल्याण होवो !

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_महेश कांबळे_*

*_दिनांक :- २४/०९/२०२३_*

*_संदर्भ :- सुत्तपिटक - संयुत्तनिकाय - महावग्गपाळी_*  

              *_१२ सच्चसंयुत्त - २ धम्मचक्कप्पवत्तनसुत्तं _*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/09/blog-post_29.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...