🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_।। पब्बतङ्गपञ्हो ।।_*
*_।। पर्वताचे पाच गुण ।।_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
_"भन्ते नागसेन, 'पब्बतस्स पञ्च अङ्गानि गहेतब्बानी'ति यं वदेसि, कतमानि तानि पञ्च अङ्गानि गहेतब्बानी'ति? "यथा, महाराज, पब्बतो अचलो अकम्पितो असम्पवेधी, एवमेव खो महाराज, योगिना योगावचरेन सम्मानने विमानने सक्कारे अक्कारे गरुकारे अगरुकारे यसे अयसे निन्दाय पसंसाय सुखे दुक्खे इट्ठानिट्ठेसु सब्बत्थ रूपसद्ददगन्धरसफोट्ठब्बधम्मेसु रजनीयेसु न रज्जितब्बं, दुस्सनीयेसु न दुस्सितब्बं, मुय्हनीयेसु न मुय्हितब्बं, न कम्पितब्बं न चलितब्बं, पब्बतेन विय अचलेन भवितब्बं । इदं, महाराज, पब्बतस्स पठमं अङ्गं गहेतब्बं |_ *_भासितम्पेतं महाराज, भगवता देवातिदेवेन -_*
*_"सेलो यथा एकघनो, वातेन न समीरति ।_*
*_एवं निन्दापसंसासु, न समिञ्जन्ति पण्डिता'ति ॥_*
_"भंते नागसेन, तुम्ही म्हणता की, पर्वताचे पाच गुण असले पाहिजे, तर ते पाच गुण कोणते ?"_
*_"महाराज, पर्वत अचल, अकंप्य आणि स्थिर असतो. त्याचप्रमाणे योगसाधना करणाऱ्या भिक्षूंनी सन्मान, अपमान, सत्कार, दुत्कार, प्रतिष्ठा, अप्रतिष्ठा, यश, अपयश, निदा, प्रशंसा, सुख, दुःख, इष्ट, अनिष्ट आणि सर्वच रूप, शब्द, गंध, रस, स्पर्श इत्यादी धर्माच्या मोहक स्वरूपापासून स्वतःचे रक्षण केले पाहिजे. द्वेषास कारण ठरणाऱ्या धर्माविषयी द्वेष करू नये. मोह उत्पन्न करणाऱ्या धर्माविषयी द्वेष करू नये. मोह उत्पन्न करणाऱ्या धर्मासंबंधी कधीच मोह उत्पन्न होणार नाही, याची काळजी बाळगली पाहिजे. त्यापासून कधी विचलीत होऊ नये. अगदी पर्वतासमान अचल आणि स्थिर झाले पाहिजे, महाराज, पर्वताचा हाच पहिला गुण असावयास पाहिजे._*
_महाराज, देवाधिदेव भगवान बुद्धांनी म्हटलं सुद्धा आहे की,_ *_'ज्याप्रमाणे एकदम घनदाट असा पर्वत कधीही वाऱ्याने हालत नाही किंवा डोलत नाही त्याचप्रमाणे पंडित पुरुष निंदा किवा प्रशंसेने मुळीच अस्थिर व चंचल होत नाहीत'._*
_"पुन चपरं महाराज, पब्बतो थद्धो न केनचि संसट्ठो, एवमेव खो, महाराज, योगिना योगावचरेन थद्धेन असंसट्ठेन भवितब्बं, न केनचि संसग्गो करणीयो। इदं, महाराज, पब्बतस्स दुतियं अङ्गं गहेतब्बं ।_ *_भासितम्पेतं महाराज, भगवता देवातिदेवेन -_*
*_"असंसट्ठं गहट्ठेहि, अनागारेहि चूभयं ।_*
*_अनोकसारिमप्पिच्छं, तमहं ब्रूमी ब्राह्मण'न्ति ॥_*
_*"महाराज, आणखी, कठोर पर्वत कधी कोणाशी लागाबांधा लावित नाही, तर तो एकटाच आपल्या मस्तीत पडून राहतो. त्याचप्रमाणे योगसाधना करणाऱ्या भिक्षूंनी कोणाशीही भेटीगाठी घेण्यासंबंधी कठोर होऊन राहिले पाहिजे. संसर्गापासून दूर एकांतात मग्न राहिले पाहिजे. महाराज, पर्वताचा हाच दुसरा गुण असला पाहिजे.*_
*_महाराज, देवाधिदेव भगवान बुद्धांनी म्हटले आहे की, 'गृहस्थ आणि प्रव्रजित यांच्याशी अधिक संसर्ग न ठेवता एकटेच आपल्या साध्याची वाटचाल करणाऱ्या अल्पेच्छू अशा प्रव्रजितास मी श्रेष्ठ ब्राह्मण आहे असे मानतो. "_*
_"पुन चपरं, महाराज, पब्बते बीजं न विरूहति, एवमेव खो, महाराज, योगिना योगावचरेन सकमानसे किलेसा न विरूहापेतब्बा । इदं, महाराज, पब्बतस्स ततियं अङ्गं गहेतब्बं ।_ _*भासितम्पेतं महाराज, थेरेन सुभूतिना -*_
*_"रागूपसंहितं चित्तं, यदा उप्पज्जते मम ।_*
*_सयंव पच्चवेक्खामि, एकग्गो तं दमेमहं ॥_*
*_रज्जसे रजनीये च, दुस्सनीये च दुस्ससे।_*
*_मुय्हसे मोहनीये च, निक्खमस्सु वना तुवं ॥_*
_*“विसुद्धानं अयं वासो, निम्मलानं तपस्सिनं।*_
*_मा खो विसुद्धं दूसेसि, निक्खमस्सु वना तुव'न्ति ॥_*
_*“महाराज, आणखी, पर्वतावर बी रूजत नसते. त्याचप्रमाणे योगसाधना करणाऱ्या भिक्षूंनी आपल्या मनात कधीच क्लेश रूजू देऊ नये. महाराज, पर्वताचा हाच तिसरा गुण असला पाहिजे.*_
*_महाराज, स्थविरसुभूती यांनीही म्हटले आहे की, 'माझ्या मनात जेव्हा मनोविकार उत्पन्न होतात, तेव्हा मी ते पाहून घेतो आणि स्वतः एकटाच त्यांचे निर्दालन करीत असतो. जर तुम्ही वासना उत्पन्न करणाऱ्या धर्माकडे पाहून वासनायुक्त होत असाल, द्वेष उत्पन्न करणाऱ्या कर्माकडे पाहून द्वेषी होत असाल आणि मोहक वस्तूंना पाहून मुढ बनत असाल, तर या वनातून खुशाल निघून जा. निर्मळ मनाच्या विशुद्ध तपस्व्यांचीच ही भूमी आहे. आपल्या दुर्गुणानेही भूमि अपवित्र करून घेऊ नका. या वनातून तत्काळ निघून जा."_*
_"पुन चपरं, महाराज, पब्बतो अच्चुग्गतो, एवमेव खो, महाराज, योगिना योगावचरेन ञाणच्चुग्गतेन भवितब्बं । इदं, महाराज, पब्बतस्स चतुत्थं अङ्गं गहेतब्बं ।_ _*भासितम्पेतं महाराज, भगवता देवातिदेवेन -*_
*_''पमादं अप्पमादेन, यदा नुदति पण्डितो।_*
*_पञ्ञापासादमारुय्ह, असोको सोकिनिं पजं ।_*
*_पब्बतट्ठोव भूमट्ठे, धीरो बाले अवेक्खती'ति ॥_*
_*“महाराज, याशिवाय पर्वताचे शिखर फार उंच असते. त्याचप्रमाणे योगसाधना करणाऱ्या भिक्षूंनी सुद्धा आपल्या ज्ञानाची उंची गाठावयास पाहिजे. महाराज, पर्वताचा हाच चौथा गुण असावयास पाहिजे.*_
*_महाराज, देवाधिदेव भगवान बुद्धांनी सुद्धा म्हटले आहे की, 'ज्यावेळी पंडितपुरुष अप्रमादाने प्रमाद दूर करतो, त्यावेळी तो प्रज्ञेच्या उंच सोपानावर चढून शोकमुक्त होऊन शोकाकून अज्ञ लोकांना बघत असतो. जसे की, एखाद्या पर्वत शिखरावर चढलेला माणूस खालच्या लोकांना बघत असतो."_*
_"पुन चपरं, महाराज, पब्बतो अनुन्नतो अनोनतो, एवमेव खो, महाराज, योगिना योगावचरेन उन्नतावनति न करणीया। इदं महाराज, पब्बतस्स पञ्चमं गहेतब्बं।_ *_भासितम्पेतं, महाराज, उपासिकाय चूळसुभद्दाय सकसमणे परिकित्तयमानाय -_*
*_"लाभेन उन्नतो लोको, अलाभेन च ओनती।_*
*_लाभालाभेन एकत्था, तादिसा समणा ममा"ति ॥_*
*_"महाराज, आणखी, पर्वताला कधी उचलले जाऊ शकत नाही किंवा जमिनीत गाडल्याहि जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे योगसाधना करणाऱ्या भिक्षूंनी इतरांच्या स्तुतीमुळे चढून जाऊ नये किंवा निंदेमुळे खचूनहि जाऊ नये, महाराज, पर्वताचा हाच पाचवा गुण असला पाहिजे._*
*_महाराज, आपल्या मिक्षूंनी वाखाणणी करीत असता लहान सुभद्रा म्हणाली होती की, 'संसारातील लोक लाभ झाला असता फुगून जातात आणि अलाभामुळे खट्ट होतात, परंतु माझे श्रमण लाभ आणि हानि या दोन्ही अवस्थेत समान भावगुणाने स्थिर राहतात, "_*
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_संदर्भ :- मिलिन्द प्रश्न - ओपमवग्गो_*
*_(खंड ६, प्रकरण ३ रे उपमा कथा प्रश्न)_*
*_दिनांक : १४/०३/२०२३_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2023/03/blog-post_12.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment