Monday, 27 February 2023

बुध्द सरणं गच्छामी

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

               *_बुद्धं - धम्मं - संघं सरणं गच्छामी_*

          _मानवी जीवन सुखी व समृद्ध होण्यासाठी बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची आवश्यकता प्रतिपादित केलेली आहे. म्हणूनच त्यांनी बौद्ध धम्माची दिक्षा दिल्यानंतर बौद्ध जीवन जगणाऱ्या उपासक उपासिकांसाठी धम्मविधिनुसार आचरण करता यावे यासाठी बौद्ध पूजा पाठ हे पुस्तक संकलित केले होते. *प्रत्येक बौद्ध व्यक्तींनी आपल्या दिनचर्येमध्ये रोज आपल्या वेळेनुसार दिवसातून एकदा बुद्ध- धम्म- संघ यांची नित्यवंदना त्यांच्या पाली भाषेतील अर्थासहित सर्व कुटूंबियांच्या अथवा समाजाच्या समूहात घरात, बुद्ध विहारात अथवा एखाद्या सामुदायिक ठिकाणी नित्यनेमाने केली पाहिजे. कारण त्यामुळे आपल्यात, कुटुंबात व समाजात सुसंस्कार निर्माण होते, शांती प्रस्थापित होते.*_

            _*पण आज सर्व सामान्य उपासक उपासिका ह्या गाथांचा पाली भाषेतील अर्थ नीट समाजावून न घेताच त्या गाथा पाठ करताना बोलताना दिसतात. उदाहरण म्हणून आपण जर त्यांना विचारले की बुद्धं - धम्मं - संघं सरणं गच्छामी म्हणजे काय ?*_

या पाली भाषेतील शब्दांचा अर्थ न समजता ते पटकन सांगताना दिसतात की.....

*_" मी बुद्धाला शरण जातोय "_*

 _*" मी धम्माला शरण जातोय "*_

*_" मी संघाला शरण जातोय "_*

              _असा अर्थ सांगणारे शहरात गावात अनेक आहेत. पण हा अर्थ संदर्भहीन आहे. पाली भाषेत या गाथांचा अर्थ वेगळा आहे. तो पुढीलप्रमाणे ..._

*_।। बुद्धं सरणं गच्छामी ।।_*

_बुद्धांचे बुद्ध वंदनेत पुढील गुण दर्शविले आहेत_

_इति पि सो भगवा अरहं, स्म्मासम्बुद्धो, विज्जाचरणसम्पन्नो, सुगतो, लोकविदु, अनुत्तरो, पुरिसधम्मसारथि, सत्था देव अनुस्सानं, बुद्धो भगवाति ।।_

*_१) अर्हत :-* जीवनमुक्त_

*_२) सम्मासंबुध्दो :-* स्वप्रयत्नाने सम्यक ज्ञान प्राप्त करणारा ज्ञानी_

*_३) विज्जाचरण संपन्नो :-* विद्या आणि शील यांचे ज्ञान मिळवून  आचरण करणारा_

*_४) सुगतो :-* सर्वांसाठी जे सत्य असेल जे हितकारक तेच बोलण्यामुळे उत्तम गतीस प्राप्त झालेला._

*_५) लोकविदू :-* लोक-लोकांतराचे रहस्य जाणणारे_

*_६) अनुत्तरोपुरिसधम्मसारथी :-* दमनशील पुरुषांचे सर्वश्रेष्ठ सारथी_

*_७) सत्तादेवमनुस्सानं बुद्धो भगवाति :-* मानवाला सुमार्गावर नेणारे अनुशासक असे जे ते भगवान बुद्ध होत_

*_।। धम्मं सरणं गच्छामी ।।_*

_धम्माचे धम्म वंदनेत पुढील गुण दर्शविले आहेत_

_स्वाक्खातो भगवता धम्मो सन्दिट्ठिको अकालिको, एहिपस्सिको ओपनाय्यिको पच्चतं वेदित्ब्बो विञ्ञुही’ति।_

*_१) स्वाक्खातो :-* भगवंतांचा धम्मं सुआख्यात आहे_

*_२) संदिट्ठिको :-* तो साक्षात प्रचिती देणारा आहे_

*_३) अकालिको :-* तो काळरहित आहे_

*_४) एहिपस्सिको :-* तो प्रत्यक्ष जाणता येतो_

*_५) ओपनेय्यिको :-* तो प्रगतीपथावर नेणारा आहे_

*_६) पच्चतं वेदितब्बो विञ्ञुही’ति :-* तो सुज्ञ माणसाने प्रत्यक्ष अजमावून पाहण्यासारखा आहे_

*_।। संघंसरणं गच्छामी ।।_*

_संघाचे संघ वंदनेत पुढील गुण दर्शविले आहेत_ 

_सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो,_
_उजुपतिपन्नो भगवतो सावकसंघो,_
_ञायपटिपन्नो भगवतो सावकसंघो,_
_सामीचपटिपन्नो भगवतो सावकसंघो।_
_यदिदं चत्तारि पुरिसयुगानी, अठ्ठपुरिसपुग्गला_
_एस भगवतो सावकसंघो, आहुनेय्यो, पाहुनेय्यो,_
_दक्खिनेय्यो, अञ्जलिकरणीयो, अनुत्तरं पुञ्ञक्खेतं लोकस्सा’ति॥_

*_१) सुपटिपन्नो :-* भगवंतांचा श्रावक संघ संघसुप्रतिष्टीत आहे_

*_२) उजुपटिपन्नो :-* भगवंतांचा श्रावक संघ सरळमार्गी आहे_

*_३) ञायपटिपन्नो :-* भगवंतांचा श्रावक संघ ज्ञानमार्गी आहे_

*_४)सामिचिपटिपन्नो :-* भगवंतांचा श्रावक संघ सुयोग्य जीवन जगणारा आहे_

*_५) अट्ठपुरिसपुग्गला:-* भगवंतांचा श्रावक (आठ अवस्थाची प्राप्ती केलेल्या) अष्टविध पुरुषाचे चार युग्म असलेला हा संघ आहे_

*_६)आहुणेय्यो:-* भगवंतांचा श्रावक संघ स्वागत करण्यास_

*_७) पाहुणेय्यो :-* भगवंतांचा श्रावक संघ पाहुणचारास,_

*_८) दक्खिणेय्यो :-* भगवंतांचा श्रावक संघ दान देण्यास,_

*_९) अंजलिकरणीयो :-* भगवंतांचा श्रावक संघ हात जोडून वंदन करण्यास पात्र असा हा संघ आहे_

*_१०) अनुत्तरं पुञ्ञक्खेतं लोकस्सा’ति :-* लोकांच्या दृष्टीने पुण्याचे पीक देणाऱ्या अलौकिक शेताप्रमाणे हा संघ आहे._!

               _*बुद्धं - धम्मं - संघ सरण गच्छामि म्हणजे बुद्धाच्या, धम्माच्या आणि संघाच्या पायावर डोके ठेवतो त्यांना शरण जातो हा आज अज्ञानापोटी सांगण्यात येत असलेला अर्थ पालीमध्ये नाही. तर बुद्ध धम्म संघ यांच्या गुणांना मी स्विकारतो, आचरणात आणतो, अंगिकारतो, अनुसरतो असा तो अर्थ होतो.*_

           *_चैत्यभूमी व इतर ठिकाणी ही बौद्ध पूजा पाठाची पुस्तके पाली भाषेतील मराठी व इतर भाषेंत अर्थांसहित आपल्याला मिळतात. ह्या गाथांचे पठण करतांना त्यांचा योग्य अर्थ समाजावून घेऊन आपल्या पत्नी, मुलांसह, कुटुंबासह, आपल्या ज्ञात मंडळींबरोबर घरात विहारात ह्या गाथांचे व्यवस्थित पठण होणे गरजेचे आहे. नाहीतर आपल्यात व इतरांच्यामध्ये काय फरक असणार._*

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_महेश कांबळे_*

*_दिनांक :- २७/०२/२०२३_*

*_संदर्भ :- बौद्ध पूजा पाठ_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/02/blog-post_27.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Thursday, 23 February 2023

भग्ग, भगवा, भगवान

*_भग्ग, भगवा, भगवान_*

              _"भगवान" हा शब्द भारतीय संस्कृतीत एक प्रचंड रुजलेला शब्द आहे. देव, सर्वशक्तिशाली, परमेश्वर, दाता, परमात्मा....ही या भगवान शब्दाची काही पर्यायवाची नावे आहेत. मात्र या अर्थाने हा शब्द खूप नंतरच्या काळात वापरलेला दिसतो. *वेद किंवा उपनिषद मध्ये देखील हा शब्द येत नाही. नंतरच्या काही वैदिक साहित्यात हा शब्द आढळतो. भक्ती संप्रदायात अनेक 'देवांना' हा शब्द किंवा उपाधी लावण्यात आली आहे.* मात्र या शब्दाची उत्पत्ती नेमकी कधी आणि केव्हा झाली?_

          _*भगवा अथवा भगवान हा शब्द सर्वात पहिल्यांदा आपल्याला पालि त्रिपिटकात वाचायला मिळतो. बुद्धांचा उल्लेख करताना त्यांना "बुद्ध" या नावाने उल्लेख करण्याऐवजी "भगवा" हा शब्द अनेक वेळा आदरार्थ्याने  उच्चरलेला दिसतो. उदा. एकं समयं भगवा वाराणसीयं  विहरती...भगवा हा शब्द मूळ "भग्ग" या शब्दापासून तयार झाला आहे. भग्ग या शब्दाचा संस्कृत मध्ये "भंज" हा पर्यायवाची आहे. पालि भाषेत या शब्दाची फोड अशी होते - भग + वान. भग म्हणजे नष्ट किंवा विध्वंस आणि वान म्हणजे आपल्या मनातील षड्रिपू अथवा वासना. म्हणजेच "भगवान" या शब्दाचा अर्थ "ज्याने आपल्या मनातील सर्व विकार / वासना नष्ट केले आहेत अशी व्यक्ती. याचे अनेक संदर्भ आपल्याला पालि त्रिपिटकात दिसून येतात. "भग्ग रागो, भग्ग दोसो किंवा सब्बा ते फासुका भग्गा किंवा भग्गा पाप्पका धम्मा...*_

            *_भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात खऱ्या अर्थाने केवळ दोनच भगवान झाले आहेत - भगवान बुद्ध आणि भगवान महावीर. (इतर "भगवानांनी" त्यांच्या मनातील षड्रिपू नष्ट केले कि नाही हे माहीत नाही किंवा सध्यातरी तसा पुरावा उपलब्ध नाही.)_*

            _*भ. बुद्धांच्या काळी भिक्खूंना केवळ लोकांनी टाकून दिलेले वस्त्र घालण्याची प्रथा होती. म्हणजे प्रेतावरील वस्त्र किंवा उपयोगात नाही म्हणून टाकून दिलेले वस्त्र. अशी वस्त्रे गोळा करून त्यांचा अनावश्यक भाग कापून टाकला जाई, नंतर ती वस्त्र स्वछ धुवून त्यांना अनेक विरक्त रंगांनी रंगविले जाई. एकदा भात शेती पाहताना व त्यातील आखीव रेखीव पीक व शेतांमधील पायवाट पाहून, भ. बुद्धांनी, भन्ते आनंदाला अशा प्रकारचे 'चीवर' बनवायला सांगितले. याच कापडाला एक विशिष्ट रंग देण्यात आला जो त्याग, परिश्रम व विरक्तीचे प्रतीक होता. हा रंग मनातील वासनांना नष्ट करणाऱ्या शौर्याचा प्रतीक बनला. हाच रंग "भगवा" म्हणून अस्तित्वात आला. मनातील शत्रूंना पराभव करणाऱ्याचा जसा तो रंग होता तसाच तो बाह्य जगातील शत्रूंना नेस्तनाबूत करणाऱ्यांचा देखील विजयी रंग ठरला.*_

           _आपल्या तिरंगातील रंगांबद्दल अनेक विचारवंतांनी गौरवोद्गार काढले आहेत. या बद्दल सांगताना तत्कालीन उपराष्ट्रपती सर्वेपल्ली राधाकृष्णन म्हणतात " Saffron किंवा भगवा हा त्यागाचे प्रतीक आहे. सर्व राज्यकर्त्यांनी त्याग वृत्ती ठेवली तरच राष्ट्राची प्रगती होऊ शकेल" Ref - Constituent Assembly Debates_

_*भग्ग, भगवा आणि भगवान हे बौद्ध संस्कृतीची देन आहे.*_


अतुल भोसेकर

९५४५२७७४१०

Monday, 20 February 2023

खोटेपणा धार्मिक असतो काय?

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_खोटेपणा धार्मिक असतो काय?_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_तथागतांची एक गोष्ट आहे_*

               _*एकदा बुद्ध भगवान वेळुवनात राहात होते. त्या समयी आयुष्मान राहुल राजगृहाजवळील अम्बलट्ठिका येथे राहात होते.* बुद्ध एके दिवशी राहूल होता तेथे गेले. राहुलने भगवंतांना दुरून येतांना पाहून आसन मांडले व पाय धुण्यास पाणी आणून ठेवले. हात-पाय धुण्याचे सोपस्कार संपवून भगवंत एका आसनावर जाऊन बसले आणि राहुल त्यांना नमस्कार करून एका बाजुला बसला. *बुद्धाने पाय धुण्याच्या पात्रात थोडे पाणी शिल्लक ठेवले होते, त्याकडे निर्देश करून बुद्ध राहूलला म्हणाले, "राहुल, त्या पात्रात किती पाणी आहे?"*_

              _"अत्यल्प पाणी आहे, भन्ते!" राहुलने उत्तर दिले. *राहुल ज्याला खोटे बोलण्याविषयी लाज वाटत नाही, त्या माणसाचे श्रामण्य (म्हणजे भिक्षूपद) या पाण्याप्रमाणे अत्यल्प असते. क्षुल्लक असते. "*_ 

         _*पुन्हा ते पात्र पालथे घालून बुद्ध राहुलला म्हणाले, "राहुल, ज्याला खोटे बोलण्याची लाज वाटत नाही. त्याचे श्रामण्य या भांड्याप्रमाणे पालथे पडलेले आहे, असे समजावे."*_

       _पुन्हा ते भांडे सरळ ठेऊन बुद्ध राहुलला म्हणाले, "राहुल, हे रिकामे भांडे तू पाहात आहेस ना?"_

_"होय, भन्ते!"_

      _*"राहुल, ज्याला खोटे बोलण्याची लाज वाटत नाही, त्याचे श्रामण्य या भांड्याप्रमाणे रिकामे असते. "*_

       _*भगवंत पुढे म्हणाले, "राहुल, लढाईसाठी सिद्ध केलेला एखादा राजहत्ती आपल्या सर्व अवयवांनी लढाई करील, परंतु सोंड तेवढी राखून ठेवील. तर तेव्हा असे म्हणता येईल की. या हत्तीने आपले जीवित धन्याच्या कार्यासाठी पूर्णपणे वाहिले नाही. परंतु तोच हत्ती जर लढाईमध्ये सोंडेचाही पूर्णपणे उपयोग करू लागला, तर राजकार्यासाठी त्याने आपले जीवित अर्पण केले आहे, असे म्हणता येईल. त्याचप्रमाणे, ज्याला खोटे बोलण्याची लाज वाटत नाही. त्याला कोणत्याही पापाचरणाची लाज वाटणार नाही असे माझे म्हणणे आहे. म्हणून हे राहुल थट्टामस्करीसाठी देखील खोटे बोलणार नाही, असा तू निश्चय कर."*_

           _मानवी समाजात धर्म म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे धर्म अशी धर्माबद्दलची सर्वसामान्य रूढ समजूत आहे. खोटेपणाला सर्वत्र अधर्मच समजले जाते. *धर्माच्या नावाने खोटेपणा करणे किती भयंकर प्रकारचे दुराचरण आहे, आणि बुद्धाने ते किती निषिद्ध मानले आहे याची यावरून स्पष्ट कल्पना येते.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- २०/०२/२०२३_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/02/blog-post_20.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Saturday, 18 February 2023

वळण्यास अति कठीण.

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_वळण्यास अति कठीण_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

               _*भिक्षु बोधिधम्म चीनला गेले* बादशाह पंडितांचा मोठा चाहता. *बुद्धभूमीतून आलेल्या बोधिधम्मांसारख्या पंडिताचा त्याने भरपूर सत्कार केला.* त्यांच्याकडून गंभीर स्वरूपाची धम्मचर्चा ऐकण्यास मिळेल म्हणून अगदी आनंदातूर झाला. त्याने विनम्रपणे विनंती केली. "भन्ते, बुद्ध शिकवणीचा उपदेश करावा. बोधिसत्व उत्तरले._

_*"सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा।*_ _*सचित्तपरियोदपनं एतं बुद्धान् सासनं।।'*_

      *_कोणतेही पाप न करणे, कुशल कर्माचे संवर्धन करणे, स्वचित्ताचे शुद्धीकरण करणे हेच बुद्धाचे अनुशासन होय._*

_"बस्स इतकेच ?' बादशाहने आश्चर्यचकित होऊन विचारले. "होय महाराज, इतकेच!' बोधिधम्म उत्तरले._

               _परंतु भन्ते, हे तर इतके सोपे आहे की, सात वर्षांच्या मुलासही कळू शकेल! "बादशहाचा आश्चर्याघात शमला नव्हता. *बोधिधम्म ताडकन् उत्तरले. होय राजन, हे इतके सोपे आहे की सात वर्षाचे बालकही समजू शकेल; परंतु आचरणास इतके कठीण की सत्तर वर्षांचा वृद्धही डळमळून जाईल.'*_

             _*पंचशील म्हणजे सब्ब पापस्स अकरणं, कोणतेही पापाचरण न करणे. कळण्यास सोपे, परंतु वळण्यास अति कठीण.* मानव समाजास नुसते एवढे जरी जमले, तरी जगातील अर्धे दुःख नाहीसे होऊ शकते. *विश्वकल्याणाचे एवढे सामर्थ्य या बुद्ध वचनात सामावलेले आहे.* पंचशील अत्यंत सोपे व सर्व परिचित आहे. परंतु माणसाचा स्वभाव असा की कळण्यास अति सोपे, त्याचे काही महत्त्व न वाटे. म्हणूनच बुद्धाने आपल्या धम्मरूपी जीवनमार्गाचा तो पाया बनविला आहे. इतकेच नव्हे, तर स्वतःपेक्षाही त्या धम्ममार्गाला श्रेष्ठ स्थान दिले आहे._ 

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- १८/०२/२०२३_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/02/blog-post_46.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

बाण मारणाऱ्याची जात काय?

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणि पद्मे हूँ !!_*

*_बाण मारणाऱ्याची जात काय?*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

             _*मालुंक्यपुत्त नावाचा एक बुद्धांचा भिक्षू शिष्य* एकदा बुद्धापाशी आला आणि बुद्धाला प्रणाम करून एका बाजूला बसून त्याने *बुद्धांला विचारले, “भगवन्, एकांतात बसलो असता माझ्या मनात असा विचार आला की, "हे जग शाश्वत आहे काय? किंवा अशाश्वत आहे? शरीर व आत्मा एक आहेत की भिन्न? मरणानंतर तथागतांचा जन्म होतो किंवा नाही? या प्रश्नांचा भगवंतानी खुलासा केलेला नाही. म्हणून मला वाटते की आपण है प्रश्न भगवंतांना विचारावेत आणि जर भगवंतांनी त्यांची समाधानकारक उत्तरे दिली तर भगवंतांच्या संघात राहावे, नाही तर निघून जावे. "*_

_त्यावर बुद्ध त्याला म्हणाले "हे मालुंक्यपुत्ता, तू माझा शिष्य झालास तेव्हा मी तुझ्या या प्रश्नांची उत्तरे देईन, असे मी तुला कधी म्हणालो होतो काय?"_

_मालुंक्यपुत्त उत्तरला "नाही, भन्ते!"_

_बुद्ध पुढे म्हणाले. "तर मग तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत तर माझा शिष्य राहणार नाहीस या तुझ्या म्हणण्याला काही अर्थ आहे काय?"_

_मालुंक्यपुत्त उत्तरला "नाही, भन्ते!"_

            _*त्यावर बुद्ध म्हणाले "मालुंक्यपुत्ता, असे समज की एखाद्या माणसाला जंगलात विषारी बाण लागून तो घायाळ झाला आहे. त्याच्या आप्तमित्रांनी त्याला वैद्याकडे नेऊन त्याचा बाण काढून त्यावर उपचार करण्यास सांगितले. आणि जर तो माणूस वैद्याला  म्हणाला की, "हा बाण काढण्यापूर्वी मला कळले पाहिजे की, तो कोणी मारला आहे? बाण मारणारा ब्राह्मण होता की क्षत्रिय? वैश्य होता की शूद्र? काळा होता की गोरा होता? त्याचे धनुष्य कोणत्या प्रकारचे होते? धनुष्याची दोरी कशाची होती? बाणाला लावलेली पिसे कोणत्या पक्षाची होती? बाणाला लावलेले विष कोणते होते? मला हे कळल्याशिवाय बाण काढू नका" असा जर तो माणूस हट्ट धरून बसला तर त्याच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळण्यापूर्वीच तो हकनाक मरून जाईल,*_

         _*त्याच प्रमाणे, हे मालुंक्यपुत्त, जो कोणी जग हे शाश्वत आहे, अशास्वत आहे, वगैरे प्रकारचा हट्ट धरील आणि त्याशिवाय दुःखमुक्तीसाठी ब्रह्मचर्य मार्गाचे पालन करणार नाही, तो सुद्धा त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावाचून दुःखातच मरून जाईल.*_

         *_"हे मालुंक्यपुत्त, जग शाश्वत आहे किंवा अशाश्वत, शरीर आणि आत्मा एक आहे की भिन्न, मृत्यूनंतर तथागत असतात की नाही, इत्यादी गोष्टींवर विश्वास ठेवला किंवा न ठेवला तरी त्यामुळे धम्ममार्गाचे पालन करण्यास मदत होईल असे नाही. अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवला तरी जन्म, जरा, मरण, शोक, दौर्मनस्य यातून सुटका होत नाही. म्हणून मालुंक्यपुत्ता, मी या गोष्टींचा शोध घेण्याच्या भरीस पडलो नाही. कारण या वादविवादाने ब्रह्मचर्याच्या पालनास साहाय्य होत नाही. वैराग्यलाभ होत नाही, पापाचा निरोध होत नाही: शांती, प्रज्ञा, निर्वाण प्राप्त होत नाही."_*

       *_"हे मालुंक्यपुत्त, हे दुःख आहे, हे दुःखाचे कारण आहे. हा दुःखाचा निरोध आणि हा दुःख निरोधाचा मार्ग आहे, हे मी स्पष्ट करून सांगितले आहे. कारण ही चार महान सत्ये ब्रह्मचर्याला स्थैर्य आणणारी आहेत, वैराग्य निर्माण करणारी आहेत, पापांचा निरोध करणारी आहेत, शांती, प्रज्ञा, आणि निर्वाणाचा लाभ करून देणारी आहेत. म्हणून मी ज्या गोष्टींची चर्चा केलेली नाही, त्याची चर्चा करू नकोस मी ज्याचे स्पष्टीकरण केले आहे. ते लक्षात घे. ते योग्य आहे असे समज."_*                         

            _*अशा प्रकारे आपल्या धम्म शिकवणीचा उद्देश केवळ मानवाचे दुःख नाहीसे करणे हाच आहे, हे तथागतांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. म्हणून बुद्धाचा धम्म इतर कोणत्याही धर्माच्या विरोधी नाही. इतर धर्ममार्ग मानवाच्या दुःखाचा अंत करण्यास पुरेसे नाहीत, किंवा ते त्यांचे मुख्य ध्येय नाही, हेच बुद्धाचे सांगणे आहे.*_

*_।। सर्व प्राणी सुखी होवोत, सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, कोणालाही दुःख न होवो....।।_*

                 *_!! ओम मणि पद्मे हूँ !!_*

*_संकलन :- महेश कांबळे

*_संदर्भ :- मज्झिम निकाय सुत्त नं. ६३_*

*_दिनांक :- १८/०२/२०२३

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/02/blog-post_18.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Friday, 17 February 2023

१९६० मधील सोपारा स्तुप

 *महाराष्ट्राची पहिली धम्मयात्रा- १९६० मधील सोपारा स्तुप यात्रा* Soppara Stupa in 1960.


१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसह बौद्ध धर्माची दिक्षा घेतली आणि भारतातील असंख्य पिडीतांची आयडेंटिटी चेंज झाली. त्यांच्या आयुष्यातील नव्या मार्गावरील वाटचालीला सुरवात झाली. हा बदल अपेक्षित होताच आणि तो उस्फूर्तपणे स्वीकारला जाऊन घरातील काल्पनिक देवांना विसर्जित करण्यात आले. परंतु त्यावेळी तळागाळात बुद्धधम्माबद्दल काहीच माहिती नव्हती. वंदना माहीत नव्हती. मात्र धर्मांतर झाल्यानंतर दोन-तीन वर्षातच बौद्ध धर्माची माहिती असणारी अनेक पुस्तके, पाक्षिके बाजारात येऊ लागली. भगवान बुद्ध यांचे चरित्र, त्यांचा उपदेश यावरील पुस्तके प्रसिद्ध होऊ लागली. मग हळूहळू बुद्ध धम्म म्हणजे काय हे समजू लागले. यामुळे आजूबाजूस  असलेल्या बौद्ध लेण्यां, स्तुप पाहून ही सर्व आपलीच संस्कृती आहे ही जाणीव जागृत झाली.


१९६० साली भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष यशवंतराव आंबेडकर यांनी सोपारा स्तुपाला भेट दिली. त्याच वर्षी मुंबईचे पहिले बौद्ध महापौर पी. टी. बोराळे यांनी महाराष्ट्रातील पहिली धम्मयात्रा दिनांक २३ मार्च १९६० रोजी सोपारा स्तूपाची आयोजित केली. साठ वर्षांपूर्वी नालासोपाऱ्याला जाणे म्हणजे मोठे दिव्य होते. जोगेश्वरी पासून पुढे मनुष्यवस्ती विरळ होती. मुंबईच्या बाहेर प्रवास करत जाणे म्हणजे आडगावात गेल्यासारखे होते. बोराळे साहेबांनी तेथे दिप प्रज्वलित केला आणि आलेल्या यात्रेकरूंसोबत पंचशिल ग्रहण केले. अशा तऱ्हेने हळूहळू सार्वजनिक बौद्ध कार्यक्रमास सोपारा स्तुपापासून सुरुवात होत गेली. त्यानंतर सोपारा येथे बुद्ध जयंती निमित्ताने पहिले धार्मिक प्रवचन १९६२ साली झाले. त्याच वर्षी सिलोनच्या संसदीय प्रतिनिधी मंडळाने सुद्धा सोपाऱ्याला भेट दिली. 


त्यानंतर सोपारा बुद्धजयंती चॅरिटी सोसायटी स्थापन करण्यात येऊन त्यामध्ये श्रीमती के कॉन्ट्रॅक्टर मॅडम, सोफिया वाडिया मॅडम, त्रिवेदी, रेव्ह.धर्मानंद, पी.टी. बोराळे, परमार गुरुजी, कापडिया व केळशीकर या सभासदांचा समावेश झाला. त्यावेळेला मोठा समारंभ होऊन सोपारा येथे भगवान बुद्धांची छोटीमूर्ती स्थापित करण्यात आली. तसेच पंडित भगवानलाल इंद्रजी यांनी सोपारा येथे केलेल्या उत्खननास ८० वर्षे झाल्या निमित्त स्मृतिदिन साजरा करण्यात आला. दि.२२ एप्रिल १९६२ रोजी सयाम,सिलोन आणि भारतातील बौद्ध भिक्खूंची नालासोपारा येथे मोठी यात्रा आयोजित करण्यात आली. त्यांचे स्तुपाजवळ घेतलेले छायाचित्र येथे सादर करण्यात येत आहे. त्यामधे दिसत असलेली लहान मुले आज सत्तर-ऐंशीच्या घरात असतील. 


१५ नोव्हेंबर १९८१ रोजी जेव्हा जपानी भिक्खूबरोबर नालासोपाऱ्याचा स्तुप प्रथम पाहिला तेंव्हा नालासोपारा सुंदर आणि शांत होते. ट्रेनने जेंव्हा नालासोपारा स्टेशनवर उतरलो तेव्हा फक्त वीस-पंचवीस माणसे उतरली होती. आता मात्र नालासोपारा पार बदलले असून स्तूप परिसराच्या आजूबाजूस वस्ती वाढल्याने शांतता धोक्यात आली आहे. मात्र एक प्रश्न अजूनही पडतो की जे सोपारा बंदर प्राचीनकाळी व्यापारासाठी प्रसिद्ध होते आणि ज्या बंदरातून सम्राट अशोकपुत्र महास्थाविर महेंद्र सिरिलंकेस गेले ते बंदर नेमके आहे तरी कुठे ? पोर्तुगीज येण्यापूर्वीचा वसईचा भाग येथे सोपारा बंदर होते काय ? हजारो वर्षापासून गाळ साठल्याने बंदर कदाचित नष्ट झाले असावे. 


--- संजय सावंत ( नवी मुंबई )


⚛⚛⚛






Wednesday, 8 February 2023

जातक - सर्वात प्राचीन नीतिकथा

 *_जातक - सर्वात प्राचीन नीतिकथा_*


फार प्राचीन काळापासून मनुष्यासाठी कथा या नेहमीच मनोरंजनाचे साधन राहिले आहे. पिढी दर पिढी या कथांमध्ये बदल होत गेले आणि त्यांची संख्या देखील वाढत गेली. बुद्धपूर्व काळात मनोरंजन म्हणून सांगितलेल्या या कथांना, बुद्धकाळात व नंतर एक नवीन विचार लाभला आणि त्या नीतीच्या कथा म्हणून जनसामान्यात प्रसिद्ध पावल्या. भ. बुद्धांच्या काळात या कथा, शीलसंवर्धन तसेच पारमिता यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ठरल्या आणि म्हणूनच मनुष्याला त्याच्या आयुष्यातील 'स्वत्व' गवसावें यासाठी या नीतिकथा नंतर शृंखलाबद्ध पद्धतीने मांडण्यात आल्या. 


*_पालि साहित्यात ज्या नऊ अंगाने भ. बुद्धांचे विचार मांडले गेले आहेत त्यांना 'नवांगबुद्धसासना' म्हटले गेले आहे. हे नऊ अंग म्हणजे सुत्त, गेय्य, वैय्याकरण, गाथा, उदान, इतिऊत्तक, जातक, अब्भुतधम्म आणि वेदल्ल. एका अर्थाने बुद्धविचार समजून घेण्याचे हे वेगवेगळे "जॉनर"  आहेत._*

*_जातककथा या भ.बुद्धांच्या पूर्वायुष्याशी निगडित असून, त्या जन्मी 'बोधिसत्त्व' असलेले बुद्ध, हे कधी प्राणी, कधी झाड, कधी मनुष्य अथवा कोणी असामान्य जीव म्हणून केलेले नीतिकार्य, कथेच्या स्वरूपात लोकांसमोर मांडण्यात आले आहे. जर सगळ्या कथा वाचल्या तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते कि कथेचा नायक असलेला बोधिसत्त्व, नीतीशी कधीही प्रतारणा करीत नाही. एवढेच नव्हे, तर वेळ पडल्यास, शीलाचे पालन करण्यासाठी स्वतःचा जीव देखील देऊ शकतो. याचाच अर्थ, या कथांमध्ये 'शीलसंवर्धन' याला परमोच्च स्थान आहे! त्यामुळे 'जातककथा' या बुद्धांच्या पूर्वायुष्याशी संबंधित आहेत असे जरी दाखवल्या असल्या तरी मूलतः त्या "रूपक कथा" आहेत. त्याकाळी सर्वसामान्य जनतेला शीलसंवर्धन अथवा नीतिमान आयुष्याचे महत्त्व कळावे म्हणून या कथा बुद्धांच्या पूर्वायुष्याची जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे नकळतपणे लोकांच्या मनावर बिंबवले जाते कि चांगले, शीलवान, नीतिमत्तेने आयुष्य जगले तर या आयुष्यात बुद्धत्त्वापर्यंत पोहचू शकता. दुसरे असे, कि बोधिसत्त्वाने दहा पारमिता प्राप्त केल्यानंतरच तो बुद्धत्त्वापर्यंत पोहोचतो हे दर्शविण्यासाठी अनेक जन्माच्या या कथा रचण्यात आल्या आहेत. बुद्धविचारांना अभिप्रेत असलेले कम्म सिद्धांत म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक आचार-विचार या बोधिसत्त्वामध्ये दिसतात ज्यांचा मुळात हा हेतूच आहे कि सर्वसामान्यांनी त्यातून शिकावे आणि अशा पाचशे पेक्षा जास्त कथांमधून, हे बुद्धविचार पिढी दर पिढी, त्याकाळात पोहचल्या._*  

_खरं तर 'बुद्धत्त्व' हे अढळ स्थान नव्हे. त्या स्थानावर पोहचल्यानंतर सतत जागरूकता महत्त्वाची आहे अन्यथा स्थानभ्रष्ट देखील होऊ शकते हे बुद्धांनी अनेकवेळा भिक्खू संघाला सांगितले आहे. *सर्वसामान्य लोकांनी या कथांमधून बोध घ्यावा, आपल्या आयुष्याच्या जवळपास असलेल्या अनुभवातून शिकावे म्हणून या कथांची पार्श्वभूमी देखील वेगवेगळी आहे. तसेच काही जातक उदा. 'गूथपाणजातकं' या जातकात बोधिसत्त्वाची काहीच भूमिका दिसत नाही. या कथेत बोधिसत्त्व फक्त एक झाड म्हणून दाखविले आहे. त्या कथेतील पात्रांशी त्याचा कुठलाही संबंध येत नाही. किंवा 'अण्डभूतजातकं' ज्यात बोधिसत्त्व एक जुगारात जिंकण्यासाठी वाट्टेल त्या थराला जातो. याचाच अर्थ, जातक कथा या मानवी भावभावनांचे दर्शन घडवत असतानाच, त्यातील नीती-अनीतीचे प्रश्न उपस्थित करून, विचार करायला लावून, मानवी मनाला उत्तर द्यायला भाग देखील पाडतात. अशा प्रकारच्या जातक आपल्याला 'काय करू नये' याची शिकवण देतात.*_

*_जातकात आपल्याला अनेक लोकप्रिय कथांचे मूळ दिसते. 'दसरथ जातकं' आणि 'जनक जातकं' मध्ये रामायणाची बीजे आहेत. 'देवधम्म जातकं' मधला संपूर्ण प्रसंग हा जसाच्या तसा महाभारताच्या काव्यात आला आहे. ग्रीक मधील काही मिथके, इसापनीती, पर्शियन लोककथा आणि त्याच्यातून निर्माण झालेल्या इंग्लंड मधील चौसर लोककथा आणि इटलीच्या बोकाशीओ लोककथा या सर्वांचा उगम, जातक कथांमधूनच झाला आहे. पंचतंत्रातील अनेक कथा जातक कथांशी साम्य दर्शवितात. जातक कथांमधला नायक हा मनुष्यांव्यतिरिक्त, झाडे, पशु किंवा पक्षी आहे, मात्र त्यांच्यातही मनुष्यांमधे आढळणारे सारे गुणदोष दिसतात. या जीवांमध्ये हे गुण दाखविण्याचे कारण म्हणजे बुद्धविचारां मध्ये असलेली 'वैश्विकता' ज्यामध्ये झाडे, पशु-पक्षी किंवा प्रत्येक जीवांप्रती असलेली करुणा आणि मेत्ता भावना होय. त्यामुळेच या सर्व जीवांचे 'मानवीयकरण' करून या कथांना लोकरंजक आणि उद्बोधक करण्यात आल्या आहेत._* 

_आधुनिक काळातील किपलिंग, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांच्या कथांमधून अथवा चित्रांमधून जातक डोकावताना दिसतात तर पाकिस्तान स्थित जगप्रसिद्ध उर्दू लेखक इंतिजार हुसेन यांच्या 'पत्ते', 'बस्ती', 'कच्छवे', 'बंदर' किंवा 'वापस' या कथा जातकांवर आधारित आहेत. *अंटोनीन दोवारीक या चेक नाटककाराने 'रुसाल्का' नावाचा ऑपेरा लिहिला ज्याचे मूळ देवधम्म जातक आहे.*_ 

*_सुत्त पिटकातील खुद्दक निकायातील 'जातक', हा ५४७ जातकांचा एक ग्रंथ आहे. यात अनेक कथांची पुनरुक्ती असल्यामुळे, एवढी संख्या दिसते. या सर्व कथांची रचना सारखीच आहे. सुरुवातीला कथेच्या प्रारंभी एक गाथा आहे जी संपूर्ण कथेचे सार सांगते नंतर दुसऱ्या भागात बुद्धांच्या काळातील एखाद्या वर्तमान घटनेशी ती जोडली जाते (पचुपन्नावत्थु). ही चर्चा भिक्खुंमध्ये सुरु असते आणि त्यामुळे बुद्ध पूर्वायुष्यातील एखाद्या घटनेशी ही कथा जोडतात (अतितावत्थु). तिसऱ्या भागात भ.बुद्ध त्या घटनेचे अन्वयार्थ लावत, पूर्वजन्मातील आणि वर्तमान जन्मातील व्यक्तिंचा संबंध सांगतात._* 

_*जातक कथांचा लेखक कोण आहे किंवा किती जणांनी लिहिले हे स्पष्ट नाही, मात्र भ.बुद्धांच्या महापरिनिर्वाण पश्चात अंदाजे पाचशे वर्षामध्ये या लिहिल्या गेल्या आहेत हे निश्चित आहे. या कथांना किंबहुना त्यातील विचारांना महत्त्व प्राप्त व्हावे म्हणून ते बुद्धांनी म्हटल्याचे सांगितले गेले आहे. भौगोलिक दृष्ट्या पहिले तर या सर्व कथा कपिलवस्तू, श्रावस्ती, काशी आणि राजगृह येथे म्हटल्या गेल्या आहेत. यातील काही निवडक पस्तीस कथा निवडून 'चारियापिटक' या नावाचा स्वतंत्र ग्रंथ त्रिपिटकात आढळतो. भारहूत, अमरावती आणि सांची येथील स्तूपाच्या कुम्पणपट्टीवर जातक कोरलेली दिसतात तर अजंठा बुद्ध लेणींत या कथांचे चित्र पाहायला मिळतात. या वरूनच आपल्याला लक्षात येते कि जनसामान्यात जातककथा किती प्रसिद्ध होत्या. या कथांमधून प्राचीन भारतातील मनुष्य स्वभावाचे सटीक चित्रण आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच भारत, श्रीलंका, चीन, तिबेट, नेपाळ येथील कलाकारांमध्ये या कथा अतिशय प्रिय आहेत. त्यातील कथांच्या रचनेवरून आणि त्यांचे त्रिपिटकातील संदर्भावरून जातकांच्या रचनेचा काळ अंदाजे इ.स.पूर्व तिसऱ्या शतकाचा  मानण्यात येतो. 'अवदानशतक' मध्ये वीस जातककथा आहेत.*_

_*व्ही फॉसबॉल या जर्मन अभ्यासकाने सर्वात पहिल्यांदा पालि जातकठ्ठकथांचे रोमन लिपीमध्ये लिप्यांतरण केले. सिंहलीमध्ये प्राचीन ताडपत्रांवर लिहिलेल्या जातकठ्ठकथा गोळा करून त्यांच्या भाषांतर आणि त्यानंतर छपाईसाठी त्यांनी तब्बल वीस वर्षे कष्ट घेतले. त्यांच्या संस्करणाचाच उपयोग जगभरातील अभ्यासकांना आजही होत आहे. पालि त्रिपिटक लिपिबद्ध होई पर्यंत बुद्धवचन तोंडपाठ असणाऱ्या भिक्खूंना 'भाणक' म्हणत. 'जातकभाणक' म्हणवणाऱ्या भिक्खूंना संपूर्ण जातक त्यांच्या अठ्ठकथांसह तोंडपाठ असे. कालांतराने इ.स.पूर्व पहिल्या शतकात हे सर्व लिपिबद्ध झाले.*_

 *_आर्यशूर या चवथ्या शतकातील बौद्ध आचार्यांनी संस्कृत भाषेमध्ये 'जातकमाला' काव्य  लिहिले ज्यात मूळ पालितील ३४ जातक असून त्या सर्व बोधिसत्त्वाच्या पारमिते वर आधारित आहेत. १८९० साली एच केर्न यांनी सर्वात पहिल्यांदा या काव्याचे भाषांतर केले. जातककथा या सुत्त आणि विनय पिटकात देखील पाहायला मिळतात. उदा. सुखविहारी, तित्तिर, खंडवत्त जातकं. काही गाथा धम्मपद मध्ये देखील पाहायला मिळतात. जातक अनेक निपात (भाग) मध्ये विभागले आहे. पहिल्या निपातात दीडशे गोष्टी असून प्रत्येक गोष्टीत एक गाथा आहे, दुसऱ्या निपातात शंभर गोष्टी आहेत ज्यात प्रत्येक गोष्टीत दोन गाथा आहेत, तिसऱ्या आणि चवथ्या निपातात प्रत्येकी पन्नास गोष्टी असून, त्यात तीन आणि चार गाथा अनुक्रमे आहेत तर एकविसाव्या निपातात पाच गोष्टी असून त्यात प्रत्येकी ऐंशी गाथा आहेत आणि बाविसाव्या निपातात दहा गोष्टी असून त्यांच्या गाथांची संख्या जास्त आहे._* 

_*जातकात मानवी स्वभावातील आसक्ती, लोभ, राग, द्वेष, मत्सर, मूर्खपणा, सत्ता तसेच करुणा, मेत्ता, दान, आदर, सत्य, अहिंसा, प्रज्ञा, अनुमोदन यांच्याबद्दल रूपके आहेत.* या कथा मानवी स्वभावाच्या हुबेहूब व्यक्तिरेखन असल्यामुळे त्या केवळ वाचनीयच नाही तर उद्बोधक देखील  आहेत. *अभ्यासकांनी जातककथांना वेगवेगळा अन्वयार्थ लावला आहे. त्यात काही मते एकमेकांना पूरक  आहेत तर काही अतिशय विरोधाभासी आहेत. जातकातील उदाहरण देऊन सांगायचे झाल्यास "किंसुकोपम जातकं" मध्ये  राज्याचा सारथी तेथील चार राजकुमारांना किंसुक या प्रसिद्ध वृक्षाला वेगवेगळ्या काळात दाखवितो. त्यामुळे प्रत्येकाला किंसुक या वृक्षाबद्दल वेगवेगळे मत तयार होते. जेव्हा ते त्याचे वर्णन करतात तेव्हा एकाला तो खोडासारखा दिसतो, तर दुसरा त्याला पालवी फुटलेली असताना पाहतो, तिसऱ्या राजकुमाराला तो वृक्ष झुपकेदार दिसतो तर चवथ्या राजकुमाराला तो डेरेदार दिसतो. प्रत्येकजण आपापल्या मतावर ठाम असतो, मात्र राजा, जो बोधिसत्त्व आहे, तो सांगतो कि वृक्ष एकच आहे मात्र प्रत्येकाने त्याला वेगवेगळ्या स्थितीत पाहिल्यामुळे वेगळा भासतो. हेच जातककथांचे गुण आणि सामर्थ्य देखील आहे.*_ 

_*जातक कथा या उत्क्रांती, अंतर्यात्रा आणि नवीन दृष्टीकोनाची सुरुवात दर्शवितो. या गोष्टींमध्ये बोधिसत्व एखाद्या जिवासारखा जन्म घेतो किंबहुना त्याचे रूपांतर होते. या गोष्टींतून दिलेला नीतीचा संदेश मनुष्याचा 'स्वत्व' शोधण्यासाठी केलेला प्रवास हा 'आतल्या' दिशेला आहे. आधुनिक मानसशास्त्र सांगते कि पशु-प्राण्यांचे अनेक गुण-अवगुण मनुष्यात त्याच्या वेगवेगळ्या मनाच्या अवस्थेत दिसतात. जातक कथांनी पशु-पक्ष्यांमध्ये मनुष्याचे गुण दाखविले आहेत! एकाच व्यक्तीचे, अनेक वेळा, वेगवेगळ्या रूपात जन्म दाखविणे हे चराचर सृष्टीचे परस्पर संबंधाचे धोतक होय. गोष्टींमधल्या सार तत्वांची पुनरुवृत्ती म्हणूनच गरजेची आहे.*_ 

_जातक सारख्या नीतिकथा या लोककथेचे माध्यम बनून लोकसमूहामध्ये प्रसारित होत राहतात. प्रत्येक कथेतील बोधिसत्वाच्या भूमिकेशी आपण जोडले जातो आणि कळत-नकळत आपण बुद्धांच्या विचारांकडे आकर्षित होतो. अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धांनी दिलेला हा नरेटिव्ह म्हणूनच आजही तितकाच सशक्त भासतो._  

अतुल मुरलीधर भोसेकर

संयुक्त लेणीं परिषद

९५४५२७७४१०

Thursday, 2 February 2023

अंगुलीमालावर विजय

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                *_नमो बुद्धाय - जय भिम_*          

                     *_ओम मणि पद्मे हुं_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_*उक्खित्त खग्गमतिहत्थ सुदारुणन्तं,*_

-*धावन्ति योजनपंथगुलि-मालवन्तं |*_

*_इध्दीभिसङगखत मनो जितवा मुनिन्दो,_*

*_तं तेजसा भवतु ते जयमंङलानि ||_*

            _*ज्या मुनींद्राने, हातात तलवार घेऊन एक योजनपर्यंत धावणाऱ्या, अत्यंत भयानक अंगुलीमालाला आपल्या ॠद्धीबलाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.*_


                _*अंगुलीमालावर विजय*_

            _सुमारे सव्विशे वर्षांपुर्वी *कोशल राष्ट्रांत प्रसेनजीत नावाचा राजा राज्य करीत असताना,* एका अरण्यात *अंगुलीमाल नावाचा डाकु* राहत होता. तो लोकांना मारुन त्यांची बोट कापुन त्या बोटांची माळ गळ्यात घालत असे. त्यामुळे लोक त्या अरण्यात जाण्यास टाळत असत. कोणाची तिथे जाण्याची हिंमत होत नसे. अंगुलीमालाची भिती सर्व राज्यात पसरली होती. अंगुलीमाच्या भितीमुळे लोक गाव सोडुन पळु लागली होती. म्हणुन अंगुलीमालाचा नायनाट करण्यासाठी महाराज प्रसेनजीतला अनेक विनंत्या येऊ लागल्या. त्यामुळे अंगुलीमालाला पकडुन आणण्यासाठी प्रसेनजीतने सैन्याची एक तुकडी पाठवली होती परंतु अंगुलीमालाने त्या सैन्याच्या तुकडीची कत्तल केली. असा अंगुलीमाल भयानक आणि क्रुर होता.अंगुलीमालाच्या हिंसाचाराच्या गोष्टी देशोदेशी प्रसीद्ध झाल्या होत्या._

            _एके दिवशी भगवान बुद्ध श्रावस्ती शहरातुन पिंडपात करुन परत येत असताना त्यांनी अंगुलीमाल जिथे रहात होता त्या वनाकडे वाट धरली. तेव्हा वाटेत ज्यांना कोणाला भगवान बुद्ध त्या मार्गाने जाताना दिसले त्यांनी भगवंतांना अडविण्याचा खुप प्रयत्न केला, कि आपण या वाटेने जाऊ नका पुढे अत्यंत क्रुर व निष्ठुरह्रदयी अंगुलीमाल नावाचा हिंसाचारी दरोडेखोर रहातो. त्यामुळे त्या जंगलाजवळच्या गावातील लोकांनी आपल्या गावाचा त्याग करुन ते आता श्रावस्ती, साकेत आदी शहरात रहायला आले. तो त्याच्या दृष्टीस पडलेल्या कोणत्याही माणसाला जीवंतपणे जाऊ देत नाही._

            _त्यावर भगवान बुद्ध म्हणत, अरे, पण तो सुद्धा माणुसच आहे ना? तो सध्या हिंसाचारी डाकु असला तरी भविष्यात एक चांगला पुरुष होणार नाही, असे कसे म्हणता येईल? असे बोलुन तथागत पुढे निघुन जात. तो एक राजमार्ग होता पुर्वी या मार्गाने अनेक लोक प्रवास करीत असत, परंतु अंगुलीमालामुळे त्या रस्त्याने कोणीच प्रवास करीत नव्हते. परंतु त्याच राजमार्गावर एक दृढ निश्चयी, मुखावर निर्भयता व अंतकरणातील करुणा मुखावरच दिसणारा तेजस्वी महामानव क्रुर व निष्ठुरह्रदयी अंगुलीमालाच्या निवासस्थानाजवळ आले. तोच त्या महाकारुणीकाच्या पायाच्या आवाज त्याच्या कानी पडला. त्याने तिकडे बघितल्यावर त्याची दृष्टी भगवंतांवर पडली, *विश्वातील सर्वश्रेष्ठ मानव रस्त्याने चालला होता. त्यांच्याकडे पाहुन अंगुलीमाल आश्चर्यचकीत झाला. त्याने असा दिव्य पुरुष कधीच बघितला नव्हता. त्याच्यावरुन नजर न हटावी, त्याच्याकडे पहातच रहावे असे अंगुलीमालाला वाटत होते.* त्या महामानवाला पकडण्यासाठी अंगुलीमाल धावु लागला परंतु तो त्यांना पकडु शकत नव्हता._

            _तेव्हा तो बुद्धास म्हणाला, "थांब श्रमणा थांब", त्यावर *भगवान बुद्ध म्हणाले, अंगुलीमाला मी तर केव्हाचाच स्थीर होऊन थांबलो आहे, तुच पळतो आहेस...*_

            _तेव्हा अंगुलीमाल स्वतःशीच म्हणाला हा श्रमण खोटे का बोलत आहे? मला कोणाची भिती आहे तर मी पळणार,, ज्याचे साधे नाव जरी ओठावर आले तरी सर्वांना थरकाप सुटतो, तो अंगुलीमाल पळत सुटणार असे तुला कसे वाटले? श्रमणा, आता मात्र तु खोटे बोलत आहेस, तु इतक्या जलद गतीने पळत आहेस मी घोड्याच्या गतीने तुझा पाठलाग करतो आहे तरी तु मला अजुनपर्यंत सापडला नाहीस.._

        _श्रमण चालत असुन म्हणता मी थांबलो आहे, आणि मलाच थांबलेलो असता थांब म्हणता, श्रमण तुला ह्याचा अर्थ विचारतो, तु कसा थांबला आहेस आणि मी कसा थांबलो नाही._

        _*भगवान म्हणाले,, मी सर्व प्राण्यांबद्दल हिंसा दंड भावना सोडुन दिल्यामुळे नेहमी करीता थांबलो आहे. तु मात्र प्राण्यांबद्दल असंयमी आहेस, म्हणुन मी थांबलेलो आहे, आणि तु थांबलेला नाहीस. तुझ्यातील साधुत्व अजुन मेलेले नाही, जर त्याला तु संधी देशील तर तुझ्यात बदल घडुन येतील.*_

_*भगवंतांच्या शब्दांनी अंगुलीमाल भारावुन गेला होता.*_

            _*अंगुलीमाल म्हणाला मी महर्षीची वंदना केली. चिरकाळानंतर श्रमणाचे महावनात आगमन झाले. आपण उपदेशिलेल्या धम्माचे श्रवण करुन त्या हजार पापाचा त्याग करुन मी त्याग करीन. असे म्हणत त्याने आपल्या गळ्यातील माळ व तलवार व धनुष्यबाण वगैरे फेकुन दिले आणि सुगताच्या पायाची वंदना केली आणि प्रव्रज्जेची याचना केली.*_

*_देव व मनुष्यांचे शास्ता अशा महाकारुणीक भगवान बुद्धांनी अंगुलीमालाला 'भिक्षु ये' असे म्हटले तेथेच त्याची उपसंपदा झाली. अशा प्रकारे महाहिंसक, महाक्रोधी अंगुलीमालास आपल्या अलौकीक ॠद्धीने जिंकले,......._*

*_।। सर्व प्राणी सुखी होवोत, सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, कोणालाही दुःख न होवो....।।_*

                 *_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/02/blog-post_2.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼



Wednesday, 1 February 2023

आलवक नामक यक्षाची गोष्ट

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                *_नमो बुद्धाय - जय भिम_*          

                     *_ओम मणि पद्मे हुं_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_मारातिरेक-मभियुज्झित-सब्बरंत्ती,_*

*_घोरम्पनाल वक मक्ख मथद्ध यक्ख ।_*

*_खान्ति सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो,_*

*_तं तेजसा भवतु ते जयमंगलानि ।।_*

           _*ज्या मुनींद्राने, माराशिवाय समस्त रात्र संग्राम करणाऱ्या घोर, दुर्धर आणि निष्ठुर ह्रदयाच्या आलवक नावाच्या यक्षाला क्षांती आणि संयमाच्या बळाने जिंकले त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.*_

             *_आलवक नामक यक्षाची गोष्ट_*

            _एकदा भगवान बुद्ध आळवी मध्ये आरामांत थांबले होते. तेव्हा आलवक नावाचा निष्ठुर यक्ष त्यांच्या जवळ येऊन म्हणाला, इथुन चालता हो, त्यावर तथागत उत्तरले, मित्रा, मी इथुन जाणार नाही, तुला जे करायचे आहे ते कर._

_मी तुला प्रश्न विचारतो, जर तु त्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकला नाहीस तर तुझे पाय पकडुन गंगेच्या पलीकडे फेकीन._

_*भगवान म्हणाले, माझ्या मित्रा सर्व देवांगणांत, मारांमध्ये, ब्रह्मांमध्ये नाही, श्रमण आणि ब्राह्मणांमध्ये असा कोणी जो माझ्या मनापर्यंत पोहोचु शकेल. आणि माझे पाय धरुन मला गंगेच्या पलीकडे फेकु शकेल. पण जाऊदे,, तुला जे काही विचारायचे आहे ते विचार.*_

_आलवक म्हणाला,_

_*•मनुष्याचे श्रेष्ठ धन कोणते?*_

_*•कोणते सत्कृत्य त्याच्यासाठी सुखकारक आहे?*_

_*•कोणत्या प्रकारच्या आचरणाने त्याचे जीवन श्रेष्ठ होते?*_

_भगवान म्हणाले -_

_*•श्रद्धा हे मनुष्याचे श्रेष्ठ धन होय.*_

_*•सद्धम्माचे संपादन केल्यास जीवन सुखकारक होते. सत्य हा सर्वोच्च उद्धारक आहे.*_

_*•सन्मार्गाने प्रज्ञापुर्वक वागणाऱ्यांचे जीवन श्रेष्ठ आहे.*_

_आलवक म्हणाला,_

_*• मनुष्य पुरातुन बाहेर कसा निघतो?*_

_*• तो अर्णव (समुद्र) कसा पार करतो?*_

_*•मनुष्य दुःखाच्या पार कसा जातो?*_

_*•तो परिशुद्ध कसा होतो.?*_

_भगवान म्हणाले,_

_*• मनुष्य श्रद्धेने पुरातुन पोहुन बाहेर येतो.*_

_*• सावधानपणाने अर्णव तरतो.*_

_*• उत्साहाने दुःखाच्या पार जातो.*_

_*• प्रज्ञेने परिशुद्ध होतो.*_

_आलवक म्हणाला,_

_*• मनुष्य कशाने प्रज्ञा मिळवतो?*_

_*• धन कसे मिळवतो?*_

_*• किर्ती कशी प्राप्त करतो?*_

_*• मित्र कसे मिळवितो?*_

_*• कोणता मनुष्य परलोकात गेल्यावर शोक करत नाही?*_

_भगवान म्हणाले,_

_*•अरहंताच्या निर्वाणप्राप्तीच्या धम्मावर श्रद्धा ठेवुन श्रद्धावान व प्रज्ञावंत मनुष्य शुश्रुषेने प्रज्ञा मिळवितो.*_

_*• योग्य मेहनत करणारा, धुरा वाहणारा, सत्याने किर्ती प्राप्त करणारा, दानाने मित्र जोडतो.*_

_*• ज्या गृहस्थाकडे सत्य, संयम, अहिंसा व दमन हे गुण आहेत. तो परलोकात गेल्यावर शोक करत नाही. हवे असल्यास निरनिराळ्या श्रमण ब्राह्मणांकडे जाऊन विचार श्रेष्ठ, दम, त्याग आणि क्षांति यांच्यापेक्षा श्रेष्ठ या लोकात काय आहे?*_

             _यावर आलवक नामक यक्ष म्हणाला, मी निरनिराळ्या श्रमण आणि ब्राह्मणांना कशाला विचारु? जेव्हा तथागतांनी येथेच मला सत्याचे दर्शन घडवुन दिले. मला माझ्या जीवनाचा लाभ समजला आहे._

       _खरोखरच माझ्या लाभासाठी तथागत आळवीला रहावयास आले, त्यामुळे कोणाला दान दिले असता ते लाभदायक होते हे मला समजले. मी सम्यक संबुद्धाला आणि त्याच्या धम्माच्या सुधर्मतेला नमस्कार करीत गावो गावी आणि शहरो शहरी फिरत राहीन._

        _धन्य धन्य गौतमा,, आजपासुन मी तुला शरण जातो. असे म्हणत आलवक भगवान बुद्धांना शरण गेला तेथेच त्याची उपसंपदा झाली._

*_।। सर्व प्राणी सुखी होवोत, सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, कोणालाही दुःख न होवो....।।_*

                 *_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/02/blog-post_33.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


नालंदा - बोधिसत्वांची मांदियाळी

 नालंदा - बोधिसत्वांची मांदियाळी


कुठल्यातरी शायरने म्हटले होते "खंडहर बता रहें हैं के इमारत कितनी बुलंद थी....". नालंदा विश्वविद्यापीठाचे प्राचीन अवशेष पहिले कि वरील ओळी आपसूक आठवतात! जगातील सर्वात प्राचीन विश्वविद्यापीठ म्हणून 'नालंदा'चा गौरव आहे! मुळात विद्यापीठ ही संकल्पना बौद्ध संस्कृतीची देन आहे. प्राचीन भारतात गुरुकुल पद्धत होती ज्यात विद्यार्थी गुरूच्या घरी जाऊन शिकत. मात्र यात ठराविक विद्यार्थ्यांनाच शिक्षण मिळत. सर्वांसाठी शिक्षण नव्हते! भ.बुद्धांच्या काळात अनेक दानशूर व्यक्तींनी विहार, वने अथवा संघाराम बांधून दान दिली. याच विहारात किंवा संघारामात नवदीक्षित भिक्खू आणि वयस्कर भिक्खू अथवा अर्हत एकत्र राहून अध्ययन आणि अध्यापन करीत. हीच संघराम अथवा विहारे त्याकाळातील विद्यापीठे होती. 


सम्राट अशोकांच्या काळी डोंगरांमध्ये लेणीं कोरण्यात आली आणि कालांतराने या बुद्ध लेणीं, विद्यापीठाचे काम करू लागल्या. कान्हेरी, जुन्नर, अजंठा, नाशिक येथील बुद्ध लेणीं काही ठळक उदाहरणे आहेत. मुक्त व स्वतंत्र परंतु मानवकल्याणाचा उद्देश असलेल्या विचारांना, बौद्ध संस्कृतीने नेहमीच प्रोत्साहन दिल्यामुळे, अनेक विषयांमध्ये बौद्ध आचार्यांनी मूलभूत सिद्धांत मांडले ज्यांच्या ज्ञानशाखा आजही जगभरातील विद्यापीठात शिकविले जातात.


इ.स.पूर्व ६०० ते इ.स. ११०० हा १५०० वर्षांचा काळ, बौद्ध संस्कृतीचा उत्कर्षाचा काळ होता. इ.स.पूर्व ५व्या शतकात सुरु झालेले तक्षशिला हे जगातील सर्वात प्राचीन शिक्षाकेंद्र होते. नालंदा, एक विश्वविद्यापीठ होण्याची कित्येक शतके आधी, एक बौद्ध विहार म्हणून नावाजलेले होते. तेथे अनेक बौद्ध भिक्खू आणि बौद्ध आचार्य एकत्र राहून धम्म अध्ययन करीत. 


इ.स. ४२५ मध्ये गुप्त वंशाच्या सम्राट कुमारगुप्त पहिला याने नालंदा विश्वविद्यापीठाची निर्मिती केली. या विश्वविद्यापीठाला संपूर्ण राजाश्रय होता. कुमारगुप्त पहिलाचे वारसदार, बुद्धगुप्त, तथागतगुप्त, बालादित्य आणि वज्र यांनी देखील नालंदाला सढळ हाताने मदत केली. यानंतर पुर्नवर्मन, हर्षवर्धन आणि पाल राजवंशाने या विश्वविद्यापीठाचा प्रचंड मोठा विस्तार केला. याच दरम्यान नालंदापासून प्रेरणा घेत, सोमपुरा, वल्लभी, विक्रमशिला, जगद्गल्ला, ओदंतपुरी अशा अनेक बौद्ध विद्यापीठांची स्थापना झाली जी जगविख्यात होती.  

हुयांग त्सांग आणि इ त्सिंग या बौद्ध  भिक्खुंनी आपल्या प्रवासवर्णनात नालंदाचे वैभव लिहून ठेवले आहे. भ.बुद्धांच्या काळी नालंदा हे एक प्रसिद्ध गाव होते. भ.बुद्धांनी अनेकवेळा येथे देशना दिली तसेच भ.महावीर यांनी १४ वर्षावास येथे व्यतीत केले होते. 


नालंदा मध्ये एकाच वेळी १०,००० विद्यार्थी आणि २००० प्राध्यापक एकत्र राहून अभ्यास करीत असत. 'धर्मगंज' नावाचा ग्रंथालय परिसर होता ज्यात रत्नसागर, रत्नादधि आणि रत्नरंजका नावाच्या तीन नऊ मजल्याच्या इमरती होत्या, ज्यात ६४ विषयांचे लाखो हस्तलिखित ग्रंथ होते! या विश्वविद्यापीठामध्ये जगभरातील विद्यार्थी, शिक्षक ज्ञान मिळविण्यासाठी येत. नालंदाच्या प्रवेश मात्र अतिशय कठीण होता. त्यांचा प्रमुख द्वारपाल हा आत्ताच्या काळातील पीएचडी होता व सर्व विद्यार्थ्यांची पहिली परीक्षा तो घ्यायचा! त्याच्या परीक्षेत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी मग आतमध्ये दुसऱ्या परीक्षेला सामोरे जावे लागे. येथे राहणे, भोजन आणि शिक्षण सर्व विनामूल्य होते आणि ते सतत ७०० वर्षे चालले होते! म्हणूनच हुयांग त्सांग म्हणतात त्याप्रमाणे याचे नांव 'ना अल इलम दा' म्हणजेच "कधीही न आटणारे दान" असे होते! त्याकाळी येथे तिबेट, जापान, चीन, पर्शिया, कोरिया, टर्की, इंडोनेशिया आणि ग्रीस येथील विद्यार्थी अभ्यासासाठी येत. १२व्या शतकाच्या दरम्यान संपूर्ण नालंदा विश्वविद्यापीठ जाळून टाकण्यात आले आणि त्यात लाखो ग्रंथ भस्मसात झाले, मात्र तरीही काही भिक्खुंनी थोडीफार हस्तलिखिते आपल्याबरोबर नेली जी सध्या लॉस अंजिलस, न्यू यॉर्क आणि तिबेट मधील संग्रहालयात सुरक्षित आहेत.     


नालंदाची महती जगभरात पसरली ती त्याच्या १७ विद्वान विद्यार्थ्यांमुळे! खऱ्या अर्थाने ते सर्व बोधिसत्व होते! दलाई लामा देखील या सर्वांबद्दल आदर व्यक्त करताना आपण त्यांचे शिष्य असून त्यांच्याच विचारांचा वारसा चालवतोय असे आवर्जून सांगतात! 


"नागार्जुन" हे 'माध्यमक', 'शून्यवाद' आणि 'निस्वभाववाद' तत्वज्ञानाचे जनक समजले जातात. एखादी वस्तू अथवा विचार याला स्वअस्तित्व नसून ते इतरांच्या अस्तित्वावर अवलंबून असतात म्हणजेच त्यांचे स्वतःचे स्वभाव नसतात. उदा. आपले शरीर हे अनेक मज्जारज्जू, हाडे, मांस, रक्त, नसा यांनी बनलेले आहे. म्हणजेच यांचे मूळ घटक म्हणजे पेशी (मांसपेशी, हाडपेशी) आहेत. प्रथिने आणि पाणी यांच्या अनेक रेणू पासून पेशी तयार होतात. अनेक अणुंमुळे रेणू तयार होतात. हे अणू कार्बन, हैड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संयोगातून तयार होतात आणि हे सर्व घटक आपल्या वातावरणात अस्तित्वात असतात. याचाच अर्थ आपले शरीर हे अनेक घटकांपासून बनले असून त्याचे स्वतःचे असे वेगळे अस्तित्व नाही! मनुष्यात उद्भवणाऱ्या अनेक विकारांना जर हेच प्रमाण लावले तर त्या विकारांचा फोलपणा किंवा मिथ्यापणा समजून येतो. याच अनुषंगाने नागार्जुनाने 'मुलमाध्यमकाकारिका' हा ग्रंथ लिहिला जो बुद्धांच्या 'प्रतित्यसमुत्पाद' या संकल्पनेवर आधारित आहे.

"आर्यदेव" हे नागार्जुनांचे अतिशय विद्वान शिष्य ज्यांनी अज्ञान, अनित्यता आणि क्षणिकवाद यावर ४०० पदांचे चतुःशतक  लिहिले. महायान माध्यमिका विचारधारेचे ते सहसंस्थापक समजले जातात. दक्षिण भारतात राहून त्यांनी अनेक विहारे बांधले. 

"असंग" हे ४थ्या शतकातील महायानच्या 'योगाचार'चे संस्थापक असून, त्यांचा भाऊ 'वसुबंधू' सह त्यांनी लिहिलेले 'अभिधर्मसमुच्चय', 'बोधिसत्त्वभूमी', 'योगाचारभूमिशास्त्र', 'महायानसूत्रालंकार' आणि 'विज्ञानवाद' हे संस्कृत भाषेतील सर्वोत्तम ग्रंथ लिहिले. ध्यानाचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी अनेक विहारांची स्थापना केली ज्यात हजारों अभ्यासू भिक्खू तयार झाले.    

"वसुबंधू" यांनी 'अभिधर्मकोशकारिका' ही अभिधर्मवर अभ्यासात्मक टीका लिहिली. बौद्ध तत्वज्ञान आणि संकल्पना यावर कोणत्या पद्धतीने आणि कशी व्याख्या करावी याचे अतिशय पांडित्यपूर्ण 'व्याख्यायुक्ती' हा ग्रंथ लिहिला. बुद्धविचारधारेवर त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा मोठी आहे. 'वादविधी', 'विज्ञाप्तिमात्रताशास्त्र', 'दशभूमिकाभाष्य' हे काही महत्त्वपूर्ण ग्रंथ होय. वसुबंधूंनी 'वादविधी' या ग्रंथांमधून बौद्ध तर्कशास्त्रची सुरुवात केली असे म्हणावे लागेल. 

"दिग्नाग" हे नालंदा विश्वविद्यापीठाचे अतिशय विद्वान विद्यार्थी आणि अध्यापक होते. प्रमाणशास्त्र आणि तर्कशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. दिग्नागनुसार कोणत्याही वस्तूची सत्यता ही प्रत्यक्षज्ञान आणि अनुमान ज्ञान या दोन सिद्धांतावर आधारित आहे. भाषा, तर्क आणि अनुमान या त्यांच्या सिद्धांताने भारतीय तर्कशास्त्राचा एक नवीन पाया रचला गेला. वसुबंधूंचे शिष्य असणारे दिग्नाग यांनी 'प्रमाणसमुच्चया' हा प्रमाणशास्त्रावरचा अजोड ग्रंथ लिहिला. 'हेतुचक्र', 'आलंबनपरीक्षा', 'अभिधर्मकोशमर्मप्रदीपा', 'अष्टसहस्रिकाप्रज्ञापारमिता', 'त्रिकालपरीक्षा' आणि 'न्यायमुख' हे ग्रंथ लिहिले. 

"धर्मकीर्ती" हे नालंदा विश्वविद्यापीठाचे प्रमाणशास्त्राचे विद्वान विद्यार्थी होते. धर्मकीर्ती यांनी "प्रमाणवर्तिका" हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या नुसार वस्तुच्या अनुभूतीची सत्यता ही त्या वस्तुच्या अपेक्षित कामाची क्षमता असते. प्रत्येक वस्तुचे स्वलक्षण हे क्षणिक असते. बौद्ध तत्वज्ञान दोन सत्य मानते - संवृत्ती सत्य आणि परमार्थ सत्य. 'प्रमाणवाद' सिद्धांताची मांडणी आणि त्याची तत्वज्ञानिक मीमांसा याचे श्रेय दिग्नाग आणि धर्मकीर्ती यांना जाते. धर्मकीर्ती यांनी 'संबंधपरीक्षावृत्ती', 'प्रमाणाविनिश्चय', 'प्रमाणवृत्तिकाकारिका', 'न्यायबिंदुप्रकरण', 'हेतुबिंदुनामप्रकरण', 'वादन्यायानामप्रकरण'  अशा अभ्यासू ग्रंथांची निर्मिती केली.    

"गुणप्रभा" हे वसुबंधूंचे शिष्य होते आणि विनयपिटकावर स्वतःचे भाष्य "विनायसूत्र" लिहिले जे आजही एक प्रमुख ग्रंथ मानण्यात येतो.

"शक्यप्रभा" हे नालंदाचे आचार्य शांतरक्षित यांचे शिष्य होते व 'विनय' मध्ये अतिशय विद्वान समजले जात. त्यांनी काश्मीर मध्ये बुद्धविचारांचा जोरदार प्रचार केला. 

"बुद्धपालित" यांनी नागार्जुन आणि आर्यदेव यांच्या ग्रंथावर अतिशय विद्वत्तापूर्ण टीका लिहिली. मध्यमका-प्रासंगिक विचारधारेचे ते संस्थापक समजले जातात. नागार्जुन यांच्या 'मुलशास्त्र' वर त्यांनी 'बुद्धपालितवृत्ति' नावाची टीका लिहिली.

"भावविवेक" हे बुद्धपालित यांच्या समकालीन होते व त्यांनी देखील नागार्जुनांच्या ग्रंथावर "प्रज्ञाप्रदीपा" नावाची टीका लिहिली. त्यांच्या मते 'निस्वभाव' किंवा 'स्वभावशून्यता' हे स्वातंत्रानुमना हवी. प्रासंगिक विचारधारेपेक्षा स्वतंत्र विचारधारा प्रस्थापित केल्यामुळे त्यांना 'स्वतंत्रिका-मध्यमका' विचारधारेचे संस्थापक समजले जातात. 'मध्यमकाहृदयकारिका' आणि त्यावरची स्वटिका 'तर्कज्वाला' हे स्वतंत्र ग्रंथ लिहिले. भारतीय तर्कशास्त्रात, दोन विधानांवरून निष्कर्ष किंवा अनुमान काढण्याची पद्धत भावविवेक यांनी प्रथम सुरु केली. 

"चंद्रकीर्ती" हे नालंदाचे विद्यार्थी होते ज्यांनी नागार्जुनांच्या विचारधारेचे प्रवर्तक समजले जातात. त्यांनी 'प्रसन्नपदा', 'माध्यमकावतारा', 'चतुःशतकटिका', 'युक्तिशस्तिकावृत्ती', 'शून्यतासप्तवृत्ती', आणि 'त्रिशरणसप्तति' ग्रंथ लिहिले.

"शांतरक्षिता" यांनी तिबेट मध्ये सर्वात पहिले विहार बांधले आणि अनेक तरुणांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यांच्यामुळे तिबेटमध्ये बुद्धविचार विशेषतः महायान विचारधारा यांचा प्रसार झाला. शांतरक्षिता यांनी 'अष्टतथागतस्तोत्र', 'तत्वसद्धी', 'संवरविमशकवृत्ती', सत्यद्वयविभंगपंजिका', 'परमार्थविनिश्चय', 'वादन्यायटिकाविपणचितार्थ', 'तत्त्वसंग्रह' आणि 'माध्यमकलांकार' हे ग्रंथ लिहिले.

"कमलशीला" आणि "हरिभद्र" हे दोघे शांतरक्षित यांचे विद्वान शिष्य होय. प्रमाण आणि ध्यान या विषयांत हे दोघे पारंगत होते. कमलशीला यांनी 'भावनाक्रम' नावाचे तीन ग्रंथ ध्यानावर लिहिले, तर हरिभद्र यांनी प्रमाण, माध्यमका आणि अभिधम्मावर, 'अभिसमयालंकार-लोकप्रज्ञापारमिता व्याख्या' आणि 'अभिसमयालंकारविवरती' तसेच प्रज्ञापारमितावर पंचवीस हजार ओळींच्या व्याख्येचे पुनर्लिखाण केले.  

"विमुक्तीसेना" हे प्रज्ञापारमितेचे एक आचार्य होते ज्यांनी 'अभिसमलंकार'वर टीका लिहिली. वसुबंधूंच्या चार विद्वान शिष्यांपैकी हे सर्वोत्तम होय. ते सर्व पारमिता विशेषतः प्रज्ञापारमिता मध्ये अतिशय अभ्यासू आणि दिशादर्शक मानले जातात.      

"शान्तिदेवा" हे नालंदाचे विद्वान होते ज्यांनी बोधिचित्त आणि सहा पारमितांवर आधारित 'बोधिचर्यावतर' हा महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला. शिक्षासमुच्चया कारिका' हा एक ग्रंथ शांतीदेवांनी लिहिला.

"अतिशा" हे नालंदाच्या 'बोधिसत्व' विद्यार्थ्यांमधले शेवटचे विद्यार्थी होय. 'बोधिपथप्रदिपा' हा ध्यानमार्गाचे अप्रतिम ग्रंथ असून ध्यानाच्या उच्चतम अवस्थाप्रप्तीसाठी अभ्यासनीय आहे. 'बोधिपथप्रदिपापंजिकानामा', 'चरयासंग्रहप्रदिपा', 'बोधिसत्त्वमान्यवली', माध्यमकारत्नप्रदिपा', 'महायानपथसाधनासंग्रह', 'शिक्षासमुच्चया अभिसमया', 'प्रज्ञापारमितापिण्डार्थप्रदिपा', 'एकवीरासाधना' आणि 'विमलरत्नलेखा' हे ग्रंथ अतिशा यांनी लिहिले. 


नालंदा विश्वविद्यापीठ हे बुद्धांच्या काळानंतरचे प्रथमच असे अभ्यासकेंद्र होते जेथे त्यांच्या प्रत्येक विचारांचा काटेकोर अभ्यास, सटीक विश्लेषण आणि प्रदीर्घ काळापर्यंत ग्रंथनिर्मिती चालू होती. म्हणूनच येथे ज्ञानियांचा मळा सतत बहरलेला होता आणि त्यातूनच बोधिसत्वांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. नालंदा मधील या "बोधिसत्व" विद्यार्थ्यांनी अनेक नवीन ज्ञानशाखा सुरू केल्या ज्यांचा अभ्यास आजही जगभर चालू आहे. भारतीय इतिहासात कोणत्याही संस्कृतीने येवढे प्रचंड योगदान शिक्षण क्षेत्रात दिले नाही....म्हणून तर त्याकाळी भारत हा "विश्वगुरू" होता!


अतुल मुरलीधर भोसेकर

संयुक्त लेणीं परिषद

९५४५२७७४१०

नालागीरी हत्तीवर विजय

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                *_नमो बुद्धाय - जय भिम_*          

                     *_ओम मणि पद्मे हुं_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

               *_नालागीरी हत्तीवर विजय_*

*_नालागिरि गजवरं अतिमत्तभूतं,_*

*_दावग्गिचक्कमसनीव सुदारूणन्तं।_*

*_मेत्तम्बुसेक विधिना जितवा मुनिन्दो,_*

*_तं तेजसा भवुत ते जयमंगलानि।।_*

              *_ज्या मुनींद्राने, दावाग्नीचक्र आणि विजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि मदोन्मत अशा नालागीरी हत्तीला आपल्या मैत्री अभिषेकाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो..._*

          _देवदत्त हा सिद्धार्थाचा चुलत भाऊ त्याच्यावर नेहमी जळत असे, एकदा जेव्हा भगवान बुद्ध कपिलवस्तु मध्ये आले आणि शाक्यांना धम्मदेशना करु लागले, त्या देशनेने प्रभावित होऊन अनेक शाक्यांनी बुद्धाच्या संघात प्रवेश केला. त्यावेळेस *देवदत्तने सुद्धा भगवान बुद्धाच्या संघात प्रवेश केला. आणि फार थोड्या कालावधीतच त्याने असीम नैसर्गीक शक्ती मिळविल्या. तो आता ध्यान साधनेचा सराव करु लागला होता. पण तरी सुद्धा त्याच्या मनात बुद्धाच्या प्रती असलेला द्वेष कमी होत नव्हता.*_

           _*एकदा तो राजा अजातशत्रुच्या जवळ गेला आणि त्याने आपल्या शक्तीने राजाला प्रभावित केले. त्यामुळे अजातशत्रु देवदत्ताचा शिष्य बनला होता.*_

             _इकडे संघात आपण संघनायक बनलो पाहिजे यासाठी देवदत्त बुद्धासमोर नेहमीच बढाया मारायचा. एकदा त्याने संघात मला मानाचे स्थान नाही असा बुद्धावर आणि संघावर आरोप केला. त्यानंतर तो मगध राष्ट्रांत आपला मित्र अजातशत्रुकडे मदतीसाठी गेला. *(अजातशत्रु हा बिंबीसाराचा मुलगा होता, आणि बिंबीसार हा बुद्धाच्या प्रमुख अनुयायांपैकी एक. अजातशत्रुने बिंबीसाराची हत्या केली होती.)* त्यामुळे अजातशत्रुने देवदत्ताला बुद्धाच्या विरोधात मदत करण्याची हमी दिली._

            _सर्वप्रथम अजातशत्रुने धनुर्विद्येत अतिशय पारंगत अशा सोळा धनुर्धरांची नियुक्ती बुद्धाची हत्या करण्यासाठी केली होती. परंतु भगवान बुद्धाच्या प्रभावाने त्या धनुर्धरांचे ह्रदय परिवर्तन झाले. या अपयशाने यापुढे *देवदत्त स्वतः बुद्धाची हत्या करण्याचा प्रयत्न करु लागला.*_ 

         _*एकदा भगवान बुद्ध त्यांच्या संघासोबत एका पर्वतशिखरा खालुन जात असताना. त्या पर्वतशिखराहुन एक मोठा दगड भगवान बुद्धांच्या दिशेने फेकला. परंतु तो दगड भगवान बुद्धांच्या समोर पडला आणि त्या दगडाचा एक लहान तुकडा तथागतांच्या पायाला लागला आणि त्यांच्या पायाला जखम झाली. देवदत्ताचा हा प्रयत्न फसला परंतु तरीही त्याने पराभव स्वीकारला नव्हता.*_

          *_त्यानंतर देवदत्त हत्तीशाळेत जाऊन नालागीरी नावाच्या हत्तीजवळ गेला, त्याने त्या हत्तीला दारु, आणि अन्य नशा येणारे पदार्थ खायला दिले, त्यामुळे तो हत्ती आपली शुद्ध हरवुन बसला होता. नशेच्या प्रभावामुळे नालागीरी आता अत्यंत क्रुर व भयानक बनला होता. वाटेत भेटेल त्याला पायाने चिरडत समोर तो चालला होता, लोक त्याच्या भितीमुळे सैरावैरा पळु लागले होते, संपुर्ण नगरीत त्याची दहशत माजली होती तरीसुद्धा अशा भयानक परिस्थीत भगवान बुद्ध आपल्या संघासोबत त्याच दिशेने चालले होते. तेव्हा एका स्त्रीने आपल्या बाळाला भगवान बुद्धांच्या पायाखाली आणुन ठेवले, तो नालागीरी हत्ती त्या बाळाला लाथ मारणार एवढ्यातच भगवान बुद्धांनी त्या हत्तीला स्पर्श केला आणि काय तो हत्ती शांत झाला आणि गुडघ्यावर बसला. तो आता भगवान बुद्धांचा मित्र बनला होता, सर्व नगरवासी भगवान बुद्धांचा हा पराक्रम बघत होते. भगवान बुद्धांनी त्या हत्तीला काही कोणत्या जादुई शक्तीने प्रभावित केले नव्हते तर भगवान बुद्धांकडे एक अलौकिक शक्ती होती त्यांच्या चेहऱ्यावार एक वेगळ्याच प्रकारचे तेज होते,  मैत्रीचे बल होते ज्याला बघुनच लोक भगवान बुद्धांकडे आकर्षित व्हायचे....-*

*_।। सर्व प्राणी सुखी होवोत, सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, कोणालाही दुःख न होवो....।।_*

                 *_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/02/blog-post.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...