🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_अभिधम्म म्हणजे काय ?_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_'अभिधम्म' शब्दाचा प्रयोग 'अभिविनय' शब्दाबरोबरच क्रमशः धम्म आणि विनयासंबंधी गंभिर (गुढ) उपदेशाच्या अर्थाने सुत्तपिटकात आलेला आहे. म्हणूनच आचार्य बुद्धघोषाने अभिधम्माचा अर्थ 'उच्चतर' धम्म किंवा 'विशेष' धम्म असा केला आहे. अभिधम्म शब्दात 'अभि' शब्दास त्यांनी अतिरेक अथवा 'विशेष' या शब्दाचा वाचक मानले आहे. खरं म्हणजे ही विशेषता धम्माची नाही. कारण धम्म तर सगळीकडे एकच रस आहे. परंतु तिनही पिटकात त्याचे अनेक विभाग झाल्यामुळे त्याची अनेक प्रकारची रूपे झाली आहेत. 'इन्द्रो मायाभिः पुरूरूप ईयते'._*
_जो धम्मसुत्तपिटकात उपदेशरूप आहे, तोच धम्मविनयात संयमरूप आहे (नियम) तर तोच धम्म अभिधम्मात तत्वरूप आहे._
_प्रस्थानभेदामुळे धम्माच्या स्वरूपात भेद झाला आहे. जसे सुतपिटकाची अधिचित्त शिक्षा अभिधम्मपिटकात अधिप्रज्ञा शिक्षा झाली आहे. सुत्तपिटकाची व्यवहारदेशना अभिधम्मपिटकात परमार्थदेशना झाली आहे. परंतु हा जो वाटणारा भेद आहे, तो केवळ शैलीचा आहे. आदेशाना विधिचा आहे. सुत्त तर सगळ्यांसाठी सरळ आणि सोपे आहेत. कारण सुत्तपिटकात तर बुद्धवचन आपल्या मूळ स्वरूपात ठेवलेले आहेत. अभिधम्मपिटकात बुद्धाच्या विचाराचे वर्गीकरण आणि विश्लेषण केल्या गेले आहे. तात्विक आणि मनोवैज्ञानिक दृष्टिने त्याला गणनाबद्ध केल्या गेले आहे. म्हणूनच सुत्तपिटकाकडे पाहिल्यास वाटते की, हे उपदेश किंवा समजावण्याची दृष्टि (शैली) जनसाधारण माणसाच्या उपयोगाची आहे. पण *अभिधम्मपिटकाची शैली जे लोक बौद्धतत्व चिंतनाचे अध्ययन करणारे आहेत. त्यांच्याच उपयोगाची वाटते. म्हणूनच अभिधम्मपिटकाला 'उच्चतर धम्म किंवा 'विशेष' धम्म म्हटले आहे.*_
_सुत्तपिटकात जरी बौद्ध परंपरेनुसार 'अभिचित्ताची शिकवणूक आहे, विनयपिटकात 'अधिशीलाची शिकवणूक आहे तर अभिधम्मपिटकात "अधिप्रज्ञांची शिकवणूक आहे. त्याचप्रमाणे सुत्तन्त व्यवहारदेशना' (दोहार देशना) आहे तर विनयात 'आज्ञादेशना' (आणा देशना) आहे. अभिधम्मात मानले आहे की, अभिधम्म 'उच्चतर परमार्थदेशना (परमत्यदेशना) आहे._
_धम्माचा विस्तार अथवा सविस्तर विवेचन म्हणजे अभिधम्म आहे. सुत्तपिटकात आलेल्या बुद्धवचनालाच अभिधम्मपिटकात सूक्ष्म विस्ताराने समजाविल्या गेले आहे. पारिभाषिक शब्दावलीच तेवढी कुठे कुठे नवीन वाटते. परंतु सिद्धांताचा मूळाधार सुत्तांतच आहे. *अभिधम्माचे सिद्धांत वर्गीकरण अध्ययनाचा चांगला विषय होऊ शकतो. ह्यामुळे दोघांचा तुलनात्मक अध्ययन होऊन अभिधम्मपिटकाच्या गुढ सिद्धांतांना समजण्यासाठी सोपे होते. असे अध्ययन प्रथमच एकोणवीसाव्या शतकात भदन्त जगदिश कश्यपने अभिधम्म फिलॉसाफी हा ग्रंथ लिहून केले.*_
_त्यांच्या मतानुसार विभाज्यवाद हे जसे सुत्तांचे दर्शन आहे त्याचप्रमाणे अभिधम्माचे पण विभज्यवाद दर्शन आहे._
_*विभज्यवादाचा अर्थ होतो विभाग करून, विश्लेषण करून व्याख्या करणे.* उदाहरणार्थ- पुनर्जन्म होतो की नाही ? ह्याचे उत्तर जर विभज्यवादाप्रमाणे द्यावयाचे झाले तर ते असे होईल की, जो क्लेशातून मुक्त आहे, त्याचा पुनर्जन्म होत नाही, पण जे क्लेशमुक्त नाहीत त्यांचा पुनर्जन्म होतो. त्याचप्रमाणे विभज्यवादी म्हणेल की मानसिक आणि भौतिक जगाच्या संपूर्ण अवस्थांचे विश्लेषण करून झाल्यावर सुद्धा त्याचा अत्ता (आत्मा) कुठेच सापडत नाही. ज्याप्रमाणे चाक, धुरा, जू इत्यादी सर्व भागाच्या विरहित रथ होऊ शकत नाही त्याचप्रमाणे व्यक्ति रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान ह्या पांच स्कंधाशिवाय काहीच होऊ शकत नाही. हे सर्व स्कंध अनित्य, अनात्म, आणि दुःख आहे. त्यात आपलेपण शोधणे म्हणजे हे दुःखाचेच कारण आहे. हेच बुद्धाचे तत्वज्ञान आहे, जे सुत्तपिटकात अनेक वेळी प्रस्फुरित झालेले आहे. जसे अंगुत्तरनिकायातील हे शब्द पहा "हे गृहपती! येथे अश्रूतवाण आर्याच्या तत्वज्ञानापासून अपरिचीत, अज्ञानी मनुष्यरूपास आत्म्याच्या रूपाने पाहतो किवा आत्म्यालाच पावन समजतो अथवा आत्म्यात रूपाला पाहतो किंवा रूपात आत्म्याला पाहतो. तो समजत असतो, मी रूप आहे रूप माझे आहे ह्याप्रकारे मी रूप आहे आणि रूप माझे आहे समजून त्याच्या रूपात परिवर्तन होते व त्याचा विपरिणाम होतो आणि मग काहीच्या काहीच होऊन जाते. सर्वच गडबड-घोटाळा होतो. आणि गृहपती! त्यामुळे शोक, परिदेव (रडणं-पडणं) दुःख दौर्मनस्य आणि मानसिक त्रास होतो. "_
_रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान ह्या पाच स्कंधापासून सुद्धा दुःखाच्या समुदायाचे क्रम दाखविले आहे. व्यक्तिच्या वरील सांगितल्याप्रमाणे पांच स्कंधात विश्लेषणाशिवाय अनेक प्रकारचे विश्लेषणपण सुत्तांत आलेले आहे. त्यात मुख्यत्वे दोन आहेत._
_एकांत व्यक्तिसह बाहेरील जगाच्या संबंधाची व्याख्या करण्यासाठी बारा प्रकारच्या आयतनाचे विवेचन केल्या गेले आहे. ते खालीलप्रमाणे :-_
_*१. चक्खु -(डोळे) २.रूप ३. सोत (कान) ४.सद्द (शब्द) ५. घाण (नाक) ६. गंध (वास) ७. जिव्हा (जीभ) ८. रस ( चव) ९. काया (शरीर) १०. फोडुब्ब - (स्पर्श) ११. मन १२.धम्म*_
_ह्यात व्यक्तिचे (दृष्ट्याचे) विश्लेषण प्रथम सहा आयतनाच्या रूपाने केल्या गेले, ज्याला आध्यात्मिक (अज्झातिक) म्हटल्या जाते._
_नंतर बाहेरील जगाचे (दृष्याचे) विश्लेषण दुसऱ्या आयतनाच्या रूपाने केल्या गेले, ज्वाला बाह्य आयतन (बाहेरील आयतन) म्हणतात. द्रष्टा आणि दृष्याचे संबंध व त्याच्या उपादानाने उत्पन्न होणाऱ्या चंतनेला लक्षात घेऊन आंतरिक आणि बाह्य जगाचे १८ धातुच्या रूपात पण विश्लेषण केल्या गेले आहे. ते खालीलप्रमाणे :-_
_*१. चक्खे (डोळे), २. रूप, ३. चक्षुविज्ञान (चक्खुविञ्ञाण), ४. सोत (कान), ५. सद्द (शब्द) ६. श्रोतविज्ञान (सोतविञ्ञाण), ७. घाण (नाक), ८. गंध (वास), ९. घ्राणविज्ञान (घाणविञ्ञाण), १०. जिव्हा (जीभ), ११. रस (चव), १२. जिव्हाविज्ञान (जिव्हाविञ्ञाण), १३. काया, १४. स्पर्श, १५. कायाविज्ञान (कायाविञ्ञाण), १६. मन, १७. धम्म, १८. मनोविज्ञान (मनोविञ्ञाण).*_
_वरील तीनही प्रकारचे विश्लेषण सुत्तपिटकात आलेले आहेत. संयुक्तनिकायात संपूर्ण संयुत्तांची नावे त्याच्या विवेचनाच्या आधारावरूनच ठेवल्या गेली आहेत. जसे खंध-संयुत्त, सळाआयतन संयुक्त, धातु संयुक्त, स्कंध, आयतन आणि धातुंचा उपदेश तथागतांचा मूळ उपदेश होता. ह्याच साक्ष आम्ही बुद्धकालिन भिक्षुणींच्या उद्गारावरून चांगल्या प्रकारे समजू शकतो, ज्यात त्यांनी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आणि अनुभवी भिक्षुणी कडून ऐकलेला उपदेश ग्रहण करून कृतज्ञतापूर्वक स्मरण करीत असत. “सा मे धम्मदेसेसि खन्धायतनाधातुयो!" (त्यांनी मला स्कंध, आयतन आणि धातुंचा उपदेश दिला.) ह्याप्रमाणे सुत्तांत स्कंध, आयतन आणि धातुबद्दल उपदेश मिळतात परंतु सुत्तपिटकात ह्यांचा उद्देश केवळ अनात्मवादाचा उपदेश देणे मात्र आहे. सगळ्यांचे वेगवेगळे विश्लेषण करणे नाही. हे काम अभिधम्मात केल्या गेले आहे. हे पुढे आपण अभिधम्मात पाहणारच आहोत._
_*रूपस्कंधाचे अठ्ठाविस भागात विश्लेषण केल्या गेले आहे, त्याच प्रमाणे वेदना स्कंधाचे पांच भागात विश्लेषण केल्या गेले आहे. संस्कार स्कंधाचे पन्नास भागात विश्लेषण केल्या गेले आहे आणि विज्ञान स्कंधाचे एकोन्नव्वद भागात विश्लेषण केल्या गेले आहे. पण खरे पाहू गेले असता ह्या सगळ्यांचा आधार मात्र अगोदरच सांगितले आहे की, ह्याचा आधार सुत्तपिटकच आहे.*_
_उदाहरण म्हणून पहा रूप स्कंधाचे विश्लेषण सत्तंतात फक्त दोन भागात केल्या गेले आहे._
_"भिक्षुनो! रूप काय आहे ? चार महाभूत आणि चार महाभूताच्या उपादानाने भिक्षुनो! रूप उत्पन्न होते. ह्यालाच रूप म्हणतात.' "_
_रूपाच्या ह्या दोन प्रकारच्या विभागावरच अभिधम्माचे सगळ्याच्या सगळे विश्लेषण आधारीत आहे. त्याचप्रमाणे वेदना स्कंधाचे पांच भागातील विश्लेषण पण सुत्तंतातूनच घेतल्या गेले आहे. ज्यात सुखवेदना, दुःखवेदना, सौमनस्य, दौर्मनस्य आणि उपेक्षेचा स्पष्ट उल्लेख आहे._
_त्याचप्रमाणे अभिधम्म स्कंधाच्या एकशे एक्केविस भागातील बरेच सुत्तात मिळतात आणि त्यांच्या आधारावरच दुसरे अनेक सूक्ष्म विश्लेषण केल्या गेले आहेत._
_थोडक्यात सांगायचे म्हणजे अभिधम्माचे जेवढेही विश्लेषण आहेत तेवढ्यांचा आधार सुत्तपिटकच आहे._
*_अभिधम्मपिटकात सात ग्रंथ आहेत, ज्यांना प्रकरण ग्रंथ म्हणतात त्यांची नांवे खालीलप्रमाणे आहेत._*
(१) धम्मसङ्गणि, २) विभङ्ग, ३) धातुकथा, ४) पुग्गलपञ्ञति, ५) कथावत्थु, ६) यमक, ७) पट्ठान.
_'अट्ठसालीनीच्या' निदान कथेत बुद्धघोषाचार्याने ह्या क्रमाने सांगितले आहे._
*_"अभिधम्मो पनेस धम्मसङ्गणि-विभङ्ग धातुकथा पुग्गलपञ्ञत्ति कथावत्थु-यमक-पट्ठानानं सत्तन्नं प्रकरणानं वसेन ठितो ति।"_*
*_'सुमंगल विलासिनीच्या' निदान कथेत आणि 'समन्तपासादिका' च्या बाहिरनिदान कथेतही असेच सांगितले आहे._*
_अभिधम्मपिटक धम्माच्या अधिक गुढार्थात उतरते. म्हणून विद्वानांनी म्हटले आहे की, अभिधम्मपिटकाचा उद्भव विद्वत्तासंपन्न व्यक्तिंसाठीच झालेला आहे. 'अट्ठसालिनी', 'मनोरथपूर्णि' आणि 'विभंग - अट्ठकथा' मध्ये सांगितले आहे की "देव आणि मनुष्यांच्या शास्ताने अभिधम्माचा उपदेश सर्वप्रथम तांवतिस लोकात बोधिप्राप्तीनंतर आठवा वर्षावास करत असता आपली आई महामाया आणि अन्य देवतांना दिला आणि तोच उपदेश तथागतांनी मानसरोवरावर दिव्य विहार करत असता महाप्रज्ञ शिष्य धम्म सेनापती सारिपुत्तास दिला आणि सारिपुत्ताने त्यांच्या सहकारी पांचशे भिक्षूंना केला._
*_बुद्ध घोषाचार्यानि असे सांगितले आहे की, तथागताच्या बोधिप्राप्तीच्या रात्रीच्या अंतिम प्रहारात भगवान बुद्धास अभिधम्माचा स्वयंभूत उद्भव झाला आणि सर्वज्ञाचा प्रतिवेध करतच तथागताने अभिधम्माच्या ह्याच सागराची प्राप्त केली. "सब्बञ्ञतञापण पटिविज्झन्ति येव इमं अभि धम्मनय समुद्द अधिगच्छि ।”_*
_बोधिप्राप्तीनंतर चवथ्या आठवड्यात तथागताने अभिधम्माचे चिंतन केले. ही गोष्टपण स्थविरवादी परंपरेत पहिल्यापासूनच सुप्रतिष्ठित आहे. जातकट्ठ कथाच्या निदान कथेतही त्यासंबंधी सांगितले आहे की -_
*_"चतुत्थे पण सत्ताहे अभिधम्मपिटक विचिन्तो सत्ताहं वीतिना मेसि। " अशाचप्रकारे अट्ठसालिनिच्या निदान कथेत सुद्धा "चतुत्थे सत्ताहे सयम्भुञाणा-धिगमेन अधिगतं अभिधम्मं विचिनित्वा" म्हटले आहे._*
_खरं सांगायचं म्हणजे तथागताच्या बोधिप्राप्तीच्या चवथ्या आठवड्यातच अभिधम्माचा उद्भव होऊन सुत्त आणि विनयाबरोबरच 'अभिधम्म पण बुद्धाच्या वेळीच विद्यमान होते आणि म्हणून 'धम्मकथिक' शब्द अधिम्मिक. भिक्खुसाठीच प्रयोगात आणला आहे. अर्थात धम्मातच अभिधम्म होता._
_वास्तविक हे भगवान तथागताच्या वेळी स्वतंत्र पिटक म्हणून नव्हते. याला मातिकाच्या रूपात समजत असत. हे पिटक स्वतंत्र रूपात झाले. महाराजा अशोकाच्या काळात तिसऱ्या संगीतीच्या वेळी म्हणजे भगवान तथागताच्या महापरिनिर्वाणानंतर वर्षांनी मोगल्लीपुत्त तिस्साच्या अध्यक्षतेत झालेली संगीतीत म्हणजे तिसरी धम्म संगीतीत. ह्या पिटकास आपण वाचत असता यात ७ भाग होते. (१) धम्मसंगणि, (२) विभंग, (३) धातुकथा, (४) पुग्गलपञ्ञति, (५) कथावत्थु, (६) यमक आणि (७) पठ्ठान._
_*१. धम्मसंगणि* या ७ भागातील पहिला भाग जो धम्मसंगणि होता, त्यात आपण (१) चित्त विभक्ती, (२) रूप विभक्ती, (३) निक्खेप रासी आणि (४) अत्युद्धार असे ४ मुख्य भाग वाचले. पण ह्यात सर्वप्रथम आपण अनुक्रमणिकामातिका) च्या रूपात वाचत होतो. १२२ वर्गीकरण ह्यात २२ तिक मातिका म्हणजे तीन-तीनच्या जोड्या (१) कुसलो धम्म, (२) अकुसलो धम्म आणि (३) अव्याकृता धम्म, नंतर दोन-दोनच्या जोड्या आपण दुक म्हणून वाचल्या, त्या १०० जोड्या (१) हेतु. (२) न हेतु म्हणून असे वाचत दोन-दोनच्या रूपानेच १०० वाचल्या._
यानंतर आपण अभिधम्माचा दुसरा भाग वाचण्यासाठी प्रेरित झालो तो होता
_*२. विभंग -* विभंगात आपण १८ विभंग पाहिलेत- (१) खंध विभंग, (२) आयतन विभंग, (३) धातु विभंग, (४) सच्च विभंग, (५) इंद्रिय विभंग. (६) प्रतित्य समुप्पाद विभंग, (७) सति पट्ठान विभंग, (८) सम्मपधान विभंग, (९) इद्धिपाद विभंग, (१०) बोज्झंग विभंग, (११) मग्ग विभंग, (१२) ज्ञान विभंग, (१३) अप्पमञ्ञा विभंग, (१४) सिक्खापद विभंग, (१५) पटिसंभिदा मग्ग विभंग, (१६) ज्ञान विभंग, (१७) खुद्दक-वत्थु विभंग आणि (१८) धम्महृदय विभंग._
_यात होते ५ स्कंध, १२ आयतन, १८ धातु, ४ आर्यसत्य, २२ इंद्रिय, प्रतित्यसमुत्पाद, ४ स्मृति उपस्थान, ४ सम्यक प्रधान, ४ ऋद्धिपाद, ७ बोध्यंग, आर्य अष्टांगिक मार्ग, ४ ध्यान, ४ अप्रमाण्य, ५ शिक्षापाद, ४ प्रतिसम्भिदा, अनेक ज्ञान आणि अनेक मत-मतांतरे._
_*३. धातुकथा -* अभिधाम्माचा तिसरा भाग वाचत असता आपण त्यात वरील सर्वच पुन्हा वाचले, जरा प्रश्नोत्तराने आणि मग_
_*४. पुग्गलपञ्ञति -* आपण चौथा भाग अभिधम्माचा वाचत असता यात आपण ३९ पुग्गला (व्यक्ति) चे वर्णन वाचले. "कोणता व्यक्ति समयविमुक्त आहे? इथे काही व्यक्ति वेळे-वेळेवर ८ विमोक्षाला कायाने स्पर्श करून विहार करतात तर काही प्रज्ञाने पाहून त्याचे काही काही आश्रय (चित्त-मळ) नष्ट करतात, हाच माणूस समयविमुक्त आहे असे ३९५ प्रकारचे व्यक्ति आपण पाहिले._
_*५. कथावत्थु* हा अभिधम्मपिटकाचा ५ वा भाग आपण वाचत - असता आपण त्यात पुद्गल कथेपासून ते अपरिनिष्पन्न कथपर्यंत २१७ कथा वाचल्या आहेत. प्रत्येक कथा तर्कशास्त्राच्या नियमाने स्वकवादी, परीवारीच्या प्रश्नोत्तराबरोबरच अनुलोम, प्रतिलोम, निग्रह, स्थापन, प्रापण, उपनयन इत्यादिच्या क्रमाने वर्णन वाचले._
_यात १८ मतांचे खंडन-मंडन आहे. (१) व्यावहारिक, (२) प्राप्तिवादी, (३) बाहुलिक, (४) चैत्यवादी, (५) धर्मोत्तरीय (६) छन्नागारिक, (७) धर्म (द्ध) संकेतिक, (९) श्रुतीवादी हे ९ स्थविरवादातूनच निर्माण झालेले तर (१०) हैमवत, (११) वाजिरिया हे पहिल्यानंतरचे भारतीय निकाय, (१२) धर्मरूचि आणि (१३) सगलिय आणि यानंतरही वज्जिपुत्तक, महिंशासक, महासांघिक, गोकुलिक, सब्बत्थवादी, सम्मितिय, भद्रचातिक, कस्सपिक, हेतुवादी, उत्तरापथिक, अंधक, पुब्बसेलिय, अपरसेलिय, राजगिरीक, सिद्धत्थिक, वेत्युल्यक आणि महाशून्यतावादी असे बरेच मत-मतांतरे आपण यात वाचले आहेत._
_*६. यमक* यानंतर आपण अभिधम्माचा 'यमक' हा सहावा भाग वाचत असता यात आपणाला दिसून आले की, यमक म्हणजे जोडी (दोन-दोन भाग) (१) जे काही कुशल धम्म आहेत ते, (२) सगळे कुशलमूल आहेत ही एक जोडी आणि नंतर दुसरी जोडी म्हणजे - (१) जे कुशल मूल आहे, (२) ते सगळे धर्म कुशल आहेत अशीच यमकात तथागताच्या धम्माची व्याख्या केली आहे ती आपण वाचली. अशा तऱ्हेने यात १० यमक आहेत - (१) मूल यमक, (२) खंध यमक, (३) आयतन यमक, (४) धातु यमक, (५) सच्च यमक, (६) संक्खार यमक, (७) अनुसय यमक, (८) चित्त यमक, (९) धम्म यमक आणि (१०) इंद्रिय यमक. हे सर्व वाचल्यावर आपण मग अभिधम्माच्या शेवटच्या भागाकडे वळलोत आणि तो भाग म्हणजे_
_*७. पट्ठान -* सातवा भाग होता- 'पट्ठान'. ह्याची शैली किती कठीण होती, आकारही किती मोठा (जवळ जवळ ६ भागात) होता आणि १४,००० पृष्ठाता समाप्त झाला तरी याचेही ४ भाग म्हणजे (१) अनुलोम पठ्ठान (२) पच्चनिय पट्ठान, (३) अनुलोम पच्चनिय पट्ठान आणि (४) पच्चनिय अनुलोम पट्ठान यात प्रतित्य समुत्पादाचे २४ प्रत्यय वाचले आहेत._
_(१) हेतु प्रत्यय, (२) आलंबन प्रत्यय, (३) अधिपती प्रत्यय, (४) अनंतर प्रत्यय, (५) समनंतर प्रत्यय, (६) सहजात प्रत्यय, (७) अन्योन्य प्रत्यय, (८) निश्रय प्रत्यय, (९) उपनिश्रय प्रत्यय, (१०) पूर्वजात प्रत्यय, (११) पश्चातजात प्रत्यय, (१२) आसेवन प्रत्यय, (१३) कर्म प्रत्यय, (१४) विपाक प्रत्यय, (१५) आहार प्रत्यय, (१६) इंद्रिय प्रत्यय, (१७) ध्यान प्रत्यय, (१८) मार्ग प्रत्यय, (१९) सम्प्रयुक्त प्रत्यय, (२०) विप्रयुक्त प्रत्यय, (२१) अस्ति प्रत्यय, (२२) नास्ति प्रत्यय, (२३) विगत प्रत्यय आणि (२४) अविगत प्रत्यय._
_हे सगळे धम्म कार्यकारणाच्या संबंधाने होतात आणि एक धर्म दुसऱ्या धर्माचा कसा प्रत्यय होतो याचे वर्णन आपण यात वाचले. क्रम आपण या भागात ६ प्रकारचा पाहिला, तो म्हणजे -_
_(१) तिक्क पट्ठान, (२) दुक्क पट्ठान, (३) दुक-तिक्क पट्ठान, (४) तिक-दुक पट्ठान, (५) तिक-तिक पट्ठान, (६) दुक्क -दुक्क पट्ठान, म्हणजे आपण यात १४४ नय प्रति मंडित संमत पट्ठान महाप्रकरण सर्वच वाचले आणि आता अभिधम्मपिटकाचा शेवटचा पट्टान भाग वाचून पूर्ण केला._
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- अभिधम्मपिटक_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- १३/१०/२०२२
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_77.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment